01-06-25 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
21.10.2005 ओम शान्ति
मधुबन
“संपूर्ण आणि संपन्न
बनण्याची डेट फिक्स करुन आता समयानुसार एव्हररेडी रहा”
आज बापदादा चोहो
बाजूच्या मुलांची तीन रुपे बघत आहेत. जसे बाबांचे विशेष तीन संबंध लक्षात राहतात तशी
मुलांची देखील तीन रुपे बघून हर्षित होत आहेत. आपली तिन्ही रुपे जाणता ना! यावेळी
सर्व मुले ब्राह्मण रुपामध्ये आहेत आणि ब्राह्मणांची लास्ट स्टेज, ब्राह्मण सो
फरिश्ता आहे मग फरिश्ता सो देवता आहात. सर्वात विशेष वर्तमान ब्राह्मण जीवन आहे.
ब्राह्मण जीवन अमूल्य आहे. ब्राह्मण जीवनाची विशेषता आहे - प्युरिटी. प्युरिटीच
ब्राह्मण जीवनाची रियल्टी आहे. प्युरिटीच ब्राह्मण जीवनाची पर्सनॅलिटी आहे.
प्युरिटीच सुख-शांतीची जननी आहे. जितकी प्युरिटी असेल तितकी सुख आणि शांती
जीवनामध्ये नॅचरल आणि नेचर असेल. आणि प्युअर आत्म्यांचे लक्ष्य आहे ब्राह्मण सो
देवता नाही परंतु पहिले फरिश्ता बनण्याचे आहे, फरिश्ता सो देवता आहे. तर ब्राह्मण
सो फरिश्ता, फरिश्ता सो देवता - ही तीन रूपे बापदादा सर्व मुलांची बघत आहेत. तुम्हा
सर्वांना आपली तीन रुपे समोर आली का? आली का? ब्राह्मण तर बनलात, आता लक्ष्य आहे
फरिश्ता बनण्याचे. हेच लक्ष्य आहे ना! फरिश्ता बनायचेच आहे, चेक करा - जीवनामध्ये
फरिश्तेपणाच्या विशेषता किती दिसून येतात? फरिश्ता अर्थात ज्याचा जुना संसार आणि
जुने संस्कार यांच्याशी कोणतेही नाते नाही. फरिश्ता अर्थात केवळ समस्येच्या वेळी
डबल लाइट नाही, परंतु सदैव मनसा-वाचा, संबंध-संपर्कामध्ये डबल लाइट, हलका. हलकी
वस्तू चांगली वाटते का भारी वस्तू चांगली वाटते, काय चांगले वाटते? हलके पसंत आहे
ना? फरिश्ता अर्थात जो सर्वांचा, फक्त काहीजणांचाच नाही, परंतु सर्वांचा लाडका आणि
न्यारा (अलिप्त) असेल. फक्त लाडका नाही, जितका लाडका तितकाच न्यारा असेल.
फरिश्त्याची निशाणी आहे - तो सर्वांचा लाडका असेल, जे कोणी बघतील, जे कोणी भेटतील,
जे कोणी संबंधामध्ये येतील, संपर्कामध्ये येतील ते अनुभव करतील की, हा माझा आहे. जसे
बाबांसाठी सर्व अनुभव करता - माझे आहेत. अनुभव करता ना? असा फरिश्ता अर्थात
प्रत्येकाने अनुभव करावा की, हा माझा आहे. आपलेपणाचा अनुभव व्हावा कारण हलका असेल
ना तर हा हलकेपणा सर्वांचा लाडका बनवतो. सगळ्या ब्राह्मण परिवाराने अनुभव करावे की,
हा माझा आहे. भारीपणा नसावा कारण फरिश्ता याचा अर्थच आहे - डबल लाइट. फरिश्ता
अर्थात संकल्प, बोल, कर्म, संबंध, संपर्कामध्ये बेहद असणे. हदचे नसावे. सगळे माझे
आहेत आणि मी सर्वांचा आहे. जिथे जास्त आपलेपणा असतो ना तिथे हलकेपणा असतो.
संस्कारांमध्ये देखील हलकेपणा, तर चेक करा की, किती प्रमाणामध्ये आपण फरिश्ता
स्टेजपर्यंत पोहोचलो आहोत? चेक करता येते ना? चेकर देखील बनला आहात, मेकर देखील बनला
आहात. मुबारक असो.
बापदादांची हीच शुभ
आशा आहे की आता काळाला पाहता जे स्वतःला महारथी समजतात त्यांची स्टेज तर ९५% असली
पाहिजे. असली पाहिजे ना! (कोणी म्हटले ९८% होऊ) मुबारक असो, तुमच्या तोंडामध्ये
गुलाबजामून, कारण बघत तर आहात, जाणता देखील, की व्हायचेच आहे. होऊ नाही, व्हायचेच
आहे. ऊ, ऊ करु नका; होऊ, पाहू… प्रयत्न करु… आता ही भाषा बदला. जो काही संकल्प कराल,
चेक करा की, किती परसेंट निश्चय आणि सफलतापूर्वक आहे? आता चेक करण्याचा वेग वाढावा.
आधी चेक करा नंतर कर्मामध्ये या. असे नाही - काहीपण संकल्प आला, काहीपण बोलण्यामध्ये
आले, काहीपण संबंध-संपर्कामध्ये झाले, नाही. जे व्ही.व्ही.आई.पी. असतात त्यांची
चेकिंग किती होत असते, माहित आहे ना. प्रत्येक गोष्ट अगोदर चेक होते नंतर पाऊल
ठेवतात. तर आता दोन तासानंतर, चार तासानंतर असे चेकिंग चालणार नाही. अगोदर चेकिंग
नंतर पाऊल उचलणे; कारण आजकालचे जे व्ही.व्ही.आई.पी. आहेत, ते तर एका जन्मासाठी आहेत.
तेही थोड्या काळासाठी आणि तुम्ही तर सृष्टीच्या ड्रामातील ब्राह्मण सो फरिश्ते
कितीही व्ही.व्ही. लावा, इतके महान आहात. बघा, तुम्ही तुमच्या नावासमोर
व्ही.व्ही.व्ही. लावत जा. आपली चित्रे तर बघितली आहेत ना ज्यांची पूजा केली जात आहे,
ती पाहिली आहेत ना. ठीक आहे, मंदिरे बघितली नसतील फोटो तर बघितले आहेत, आता देखील
त्यांची किती व्हॅल्यू आहे. किती मोठी-मोठी मंदिरे बनवतात आणि तुमचे चित्र (मूर्ती)
जी आहे ती तर तीन फुटामध्ये बनते, तर तुमची किती व्हॅल्यू आहे. जड चित्राची देखील
व्हॅल्यू आहे. व्हॅल्यू आहे ना! तुमच्या मूर्तीचे दर्शन करण्यासाठी किती मोठी लाईन
लागते. आणि चैतन्यामध्ये किती व्ही.व्ही.आई.पी. आहात. तर पाऊल उचलण्यापूर्वी चेक करा,
केल्यानंतर चेक केलेत, तर ते पाऊल तर उचलले गेले. ते पाऊल पुन्हा तुमच्या हातामध्ये
येणार नाही. अज्ञान काळामध्ये देखील म्हणतात - ‘आधी विचार करून मग काम करा’. ‘काम
करुन मग विचार करा’, असे नाही. अगोदर विचार करा नंतर करा. तर आपल्या स्वमानाच्या
सीटवर रहा. जितके पोझिशनमध्ये राहता तितके अपोझिशन होऊ शकत नाही. मायेचे अपोझिशन
तेव्हा होते जेव्हा तुम्ही पोझिशनमध्ये रहात नाही. तर आता बापदादांचा प्रश्न आहे,
सर्वांचे लक्ष्य तर आहे संपूर्ण बनण्याचे, संपन्न बनण्याचे. लक्ष्य आहे की थोडे-थोडे
बनण्याचे आहे? लक्ष्य आहे? सर्वांचे लक्ष्य आहे तर हात वर करा. संपूर्ण बनायचे आहे
ना? अच्छा. कधीपर्यंत? तुम्ही लोकांना प्रश्न विचारता ना, स्टुडंट्स पेक्षा टीचर्स
प्रश्न विचारतात ना - तुमचे लक्ष्य काय आहे? तर आज बापदादा विशेष टिचर्सना विचारत
आहेत. ३० वर्षवाले बसले आहेत ना. तर ३० वर्षवाल्यांना उद्याच आपसात बसून प्रोग्राम
बनवला पाहिजे. मिटिंग तर खूप करता. बापदादा बघत असतात मिटिंग-सीटिंग, मिटिंग-सीटिंग.
परंतु आता अशी मिटिंग करा की, कधीपर्यंत संपन्न बनणार? बाकीचे सर्व कार्यक्रम साजरे
करता, डेट फिक्स करता, अमका प्रोग्राम, अमुक डेट, मग याची डेट नाहीये का? किती वर्षे
हवी आहेत तितकी सांगा. कशासाठी? बापदादा का असे म्हणत आहेत? कारण बाबांना प्रकृती
विचारते की कधी विनाश करु? तर बापदादांनी काय उत्तर द्यायचे. बापदादा मुलांनाच
विचारणार ना. कधीपर्यंत? आजचा विशेष टॉपिक आहे - ‘कधीपर्यंत’? डबल फॉरेनर्स बसले
आहेत ना, तर डबल पुरुषार्थ असेल ना. चमत्कार करा. फॉरेनर्स, ब्राह्मण परिवारासमोर,
विश्वासमोर संपन्न आणि संपूर्णचे उदाहरण बना, बस्स. सर्व शक्तींनी, सर्व गुणांनी
संपन्न अर्थात संपूर्ण, सर्व असावेत. मनसा, वाचा, संबंध-संपर्क चारही गोष्टींमध्ये,
परंतु चार पैकी एकामध्ये जरी कमजोर राहिलात, तर संपन्न म्हणणार नाही. त्या चार
गोष्टी लक्षात आहेत ना - मनसा, वाचा, संबंध-संपर्कामध्ये कर्म आले, चारही
गोष्टींमध्ये. असे नाही मनसा, वाचा यामध्ये तर आम्ही ठीक आहोत, संबंध-संपर्कामध्ये
थोडे आहे. सांगितले आहे ना - ज्या कोणाच्या समोर जाल, किंवा कोणाच्याही संपर्कामध्ये
जाल त्यांना अनुभव व्हावा की, हा माझा आहे. ‘माझे’वर अधिकार असतो ना. दुसऱ्यांसोबत
तितकासा आपलेपणा नसतो, थोडासा परकेपणा असतो परंतु आपल्यांसोबत आपलेपणा असतो. तर
सर्वांसोबत आपलेपणा, असे नाही फक्त आपल्या झोन पुरता आपलेपणा, आपल्या सेंटर पुरता
आपलेपणा, नाही. फक्त आपल्या झोनमध्ये आपलेपणा किंवा सेंटरमध्ये आपलेपणा जर असेल, तर
मग तुम्ही विश्वराजन कसे बनणार? ना तुम्ही विश्व कल्याणकारी बनू शकणार, ना विश्व
राजन बनू शकणार. ‘राजन’ याचा अर्थ असा नाही की सिंहासनावर बसेल, राजधानीमध्ये रॉयल
फॅमिली मध्ये देखील राज्य अधिकार आहे, राज्याचा. तर काय कराल? ‘कधीपर्यंत’ या
प्रश्नाचे उत्तर देणार ना! मीटिंग कराल! मिटिंग घेऊन फायनल करा. ठीक आहे? अच्छा.
सगळे ठीक आहात,
उत्साह वाटतो आहे का की करायचेच आहे, होणारच आहे? बापदादा उमंग-उत्साह देतात. माया
बघते उमंग-उत्साहामध्ये आहेत तर काही ना काही करते कारण तिचा देखील आता अंतिम समय
जवळ आला आहे ना. तर ती आपली अस्त्र-शस्त्रे जी काही आहेत ती यूज करते आणि अशी पालना
करते जे समजू शकत नाही की ही मायेची पालना आहे, मायेचे मत आहे की बाबांचे मत आहे,
त्यामध्ये मिक्स करते. या फरिश्तेपणामध्ये किंवा पुरुषार्थामध्ये विशेष जो अडथळा
उत्पन्न होतो, त्याचे दोन शब्दच आहेत - जे कॉमन शब्द आहेत, कठीण सुद्धा नाही आहेत
आणि अनेकदा यूज सुद्धा करता. ते कोणते आहेत? ‘मी’ आणि ‘माझे’. बापदादांनी या ‘मी’
आणि ‘माझे’ ला परिवर्तन करण्याची खूप सोपी विधी यापूर्वी सुद्धा सांगितली आहे,
लक्षात आहे? बघा, जेव्हा तुम्ही ‘मी’ शब्द बोलता ना, त्यावेळी समोर यावे की, ‘मी
आहेच आत्मा’, ‘मी’ शब्द बोला आणि समोर आत्म्याच्या रुपाला आणा. ‘मी’ शब्द असा बोलू
नका की, ‘मी, आत्मा’. हे नॅचरली स्मृतीमध्ये आणा. ‘मी’ शब्दाच्या मागे ‘आत्मा’ लावा.
‘मी आत्मा’. जेव्हा ‘माझे’ शब्द बोलता तेव्हा अगोदर बोला - ‘माझे बाबा, माझा रुमाल,
माझी साडी…’ माझे हे. परंतु अगोदर ‘माझे बाबा’. ‘माझे’ शब्द बोललात आणि बाबा समोर
आले. ‘मी’ शब्द बोललात आणि आत्मा समोर आली, हे नेचर आणि नॅचरल (स्वाभाविक आणि
नैसर्गिक) बनवा, सोपे आहे ना की अवघड आहे? जाणत तर आहातच की, मी आत्मा आहे. फक्त
त्यावेळी मानत नाही. जाणणे १०० टक्के आहे, मानणे परसेंटेजमध्ये आहे. जसा बॉडी
कॉन्शस नॅचरल झाला आहे, तर आठवावे लागते का की मी शरीर आहे, नैसर्गिकपणे लक्षात आहे
ना. तर ‘मी’ शब्द बोलण्यापूर्वी संकल्पामध्ये येतो ना. तर संकल्पामध्ये देखील ‘मी’
शब्द आला तर लगेच आत्मा स्वरुप समोर यावे. हा अभ्यास करणे सोपे नाही आहे का? फक्त
‘मी’ शब्द बोलू नका, तर त्या सोबत ‘आत्मा’ बोला, पक्के होईल. जसे शरीराचे नाव पक्के
झाले आहे ना. दुसऱ्याला जरी कोणी बोलावले तरी तुम्ही असे वळून पहाल. तर मी आत्मा आहे.
आत्म्याचा संसार बापदादा, आत्म्याचा संस्कार ब्राह्मण सो फरिश्ता, फरिश्ता सो देवता.
तर काय करणार? ही मनाची ड्रिल (एक्सरसाइज) करा. आजकाल डॉक्टर्स देखील म्हणतात -
‘ड्रिल करा, ड्रिल करा. एक्सरसाइज करा’. तर ही एक्सरसाइज करा - ‘मी आत्मा, माझे बाबा’,
कारण की काळाच्या गतीला ड्रामा अनुसार स्लो करावे लागते. वेगवान झाले पाहिजे
क्रियेटरला, क्रियेशनला नाही परंतु आत्ताच्या परिस्थितीनुसार वेळ वेगाने जात आहे.
प्रकृति एव्हररेडी आहे फक्त ऑर्डरसाठी थांबली आहे. ड्रामाची वेळच ऑर्डर करेल ना.
स्थापनावाले जर एव्हररेडी नसतील तर विनाशानंतर प्रलय कसा होईल? होणार आहे प्रलय? की
विनाशानंतर स्थापना होणारच आहे? तर स्थापनेच्या निमित्त बनलेले आता समयानुसार
एव्हररेडी झाले पाहिजेत. बापदादा हेच पाहू इच्छितात, जसे ब्रह्माबाबा अर्जुन बनले
ना, एक्झाम्पल बनले ना! तसे ब्रह्मा बाबांना फॉलो करणारे कोण बनतात? स्वतःला देखील
बघा आणि वेळेला देखील बघा.
बापदादांनी यापूर्वी
देखील सांगितले आहे की, वर्तमान समयी तुम्हा सर्व ब्राह्मण सो फरिश्ता आत्म्यांना
निमित्त भाव आणि निर्मान भाव, या दोन्ही शब्दांना अंडरलाईन करायची आहे. यामध्ये
बॉडी-कॉन्सेसचा ‘मी’पणा नष्ट व्हावा. ‘माझे’पणा देखील नष्ट व्हावा. निमित्त आहे आणि
निर्मान (नम्र) स्वभाव. जितके निर्मान (नम्र) होता ना तितका मान मिळतो; कारण जो
निर्मान (विनम्र) असतो तो सर्वांचा लाडका बनतो. आणि जेव्हा लाडका बनतो तर मान
ऑटोमॅटिकली मिळेल. तर निमित्त आणि निर्मान भाव आणि भावना, शुभ भावना. भाव आणि भावना
दोन गोष्टी असतात. तर निमित्त आणि निर्मान भाव आणि भावना प्रत्येकाप्रति शुभ भावना,
शुभ कामना. कसाही असो, तुमचा निमित्त निर्मान भाव आणि शुभ भावना असे वायुमंडळ बनवेल,
जो समोरचा सुद्धा व्हायब्रेशनने बदलून जाईल. बरीच मुले रुहरिहान करतात ना, तर
म्हणतात - ‘आम्ही एक महिन्यापासून शुभ भावना ठेवली परंतु तो बदलतच नाहीये’. मग थकून
जातात, निराश होतात. आता त्या बिचाऱ्याची जी वृत्ति आहे किंवा दृष्टी आहे ती आहेच
दगडासारखी, त्यासाठी थोडा तरी वेळ लागेल ना. अच्छा, समजा तो नाही बदलत तर निदान
तुम्ही स्वतःला तरी ठीक ठेवा ना. तुम्ही तरी आपल्या पोझिशनमध्ये रहा ना. तुम्ही
कशासाठी निराश होता. निराश होऊ नका. ठीक आहे, तो बदलत नाही तर मी तरी त्याच्या सोबत
बदलायला नको. जर तुम्ही निराश झालात तर तो पॉवरफुल झाला आणि त्याने तुम्हाला बदलले.
तुम्ही तुमची स्वमानाची सीट सोडता कशाला? वेस्ट थॉट्स सुद्धा येता कामा नयेत,
कशासाठी? कारण, ‘का’ म्हटले आणि वेस्ट थॉट्सचा दरवाजा उघडला. आणि मग तो दरवाजा फार
मुश्किलीने बंद होतो त्यामुळे ‘का’ याचा विचार करु नका, मर्सीफुल होऊन (दयाळू बनून)
व्हायब्रेशन देत रहा. तुम्ही तुमची सीट सोडून निराश का होता? लक्षात ठेवलेत ना -
पोझिशनवरुन खाली येऊ नका, त्यामुळे मग खूप अपोझिशन होते. व्यक्ती-व्यक्तीमध्ये
अपोझिशन होते, स्वभाव संस्कारांमध्ये अपोझिशन होते, विचारांमध्ये अपोझिशन होते
त्यामुळे पोझिशनमध्ये रहा. तर उद्या काय कराल? लक्षात आहे? बापदादांचे प्रेम आहे
ना, तर बापदादांना वाटते सर्व ब्रह्मा बाप समान बनावेत. काय बाबांसमोर अपोझिशन आली
नाही का, ब्रह्मा बाबांच्या समोर अपोझिशन नाही झाले, मायेचे सुद्धा झाले, आत्म्यांचे
सुद्धा झाले, प्रकृतिचे सुद्धा झाले, परंतु ब्रह्मा बाबांनी आपली पोझिशन सोडली? नाही
सोडली ना. तेव्हाच तर फरिश्ता बनले ना. तर आता स्वतःला तर फरिश्ता समजून चालाच, ‘मी
फरिश्ता आहे…’ परंतु एकमेकांना देखील फरिश्ता रुपामध्ये बघा, सर्व फरिश्ते आहेत. आता
माझे ना जुन्या संसाराशी नाते, ना जुन्या संस्कारांशी नाते, ना या कोणा ब्राह्मणांशी
नाते. बस्स संपले. हा देखील फरिश्ता, हा देखील फरिश्ता त्याच नजरेने बघा. वायुमंडळ
पसरवा. अच्छा.
आता एक मिनिट अशी
पॉवरफुल सर्व शक्तिंनी संपन्न विश्वाच्या आत्म्यांना किरणे द्या जेणेकरून चोहो
बाजूंना तुमच्या शक्तींचे व्हायब्रेशन विश्वामध्ये पसरेल. (डेड सायलेन्स) अच्छा.
चोहो बाजूंच्या
ब्राह्मण सो फरिश्ता मुलांना, सदैव स्वदर्शनाद्वारे स्वतःला चेक आणि चेंज करणाऱ्या,
ब्रह्मा बाबांना फॉलो करणाऱ्या आज्ञाधारक मुलांना, सदैव डबल लाईट बनून सेवा आणि
पुरुषार्थ करणाऱ्या फरिश्ता आत्म्यांना, सदैव आपल्या पोझिशनच्या सीटवर सेट होऊन
अपोझिशनला समाप्त करणाऱ्या मास्टर सर्वशक्तीवान मुलांना, संगमयुगाचे प्रत्यक्ष फळ
अनुभव करणाऱ्या बाबांच्या समीप मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.
वरदान:-
प्रत्यक्षतेच्या वेळेला समीप आणणारे सदा शुभचिंतक आणि स्व चिंतक भव
सेवेमध्ये सफलतेचा
आधार आहे शुभ चिंतक वृत्ति कारण तुमची ही वृत्ति आत्म्यांची ग्रहण शक्ति अथवा
जिज्ञासेला वाढवते, यामुळे वाणीची सेवा सहज सफल होते आणि स्वयं प्रति स्व-चिंतन
करणारी स्व-चिंतक आत्मा सदैव माया प्रूफ, कोणाच्याही कमजोरींना ग्रहण करण्यापासून,
व्यक्ती आणि वैभवाच्या आकर्षणापासून सुरक्षित होते. तर जेव्हा ही दोन्ही वरदाने
प्रॅक्टिकल जीवनामध्ये आणाल तेव्हा प्रत्यक्षतेची वेळ समीप येईल.
सुविचार:-
आपल्या संकल्पांना
सुद्धा अर्पण करा म्हणजे सर्व कमजोऱ्या स्वतः दूर होतील.
अव्यक्त इशारे -
आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा, अंतर्मुखी बना:-
परमात्म प्रेमाचा
अनुभव करण्याकरिता अंतर्मुखी बनून या देहापासून न्यारे देही (आत्मिक) रुपामध्ये
स्थित रहाण्याचा अभ्यास वाढवा. कायम अंतर्मुखतेच्या गुहेमध्ये रहा तर जुन्या
दुनियेच्या वातावरणापासून दूर होत जाल. वातावरणाच्या प्रभावामध्ये येणार नाही.