02-06-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आठवणीत रहा तर दूर असून देखील सोबत आहात, आठवणीनेच सोबत असल्याचा देखील अनुभव होतो आणि विकर्म सुद्धा विनाश होतात”

प्रश्न:-
दूरदेशी बाबा मुलांना दुरांदेशी बनविण्यासाठी कोणते ज्ञान देतात?

उत्तर:-
आत्मा चक्रामध्ये कशी भिन्न-भिन्न वर्णांमध्ये येते, याचे ज्ञान दुरांदेशी बाबाच देतात. तुम्ही जाणता आता आपण ब्राह्मण वर्णाचे आहोत या अगोदर जेव्हा ज्ञान नव्हते तर शूद्र वर्णाचे होतो, त्या आधी वैश्य… वर्णाचे होतो. दूरदेशामध्ये राहणारे बाबा येऊन हे दुरांदेशी बनण्याचे सर्व ज्ञान मुलांना देतात.

गीत:-
जो पिया के साथ है…

ओम शांती।
जे ज्ञानसागरासोबत आहेत त्यांच्यासाठी ज्ञानाचा पाऊस आहे. तुम्ही बाबांसोबत आहात ना. भले परदेशामध्ये आहात किंवा कुठेही असाल, सोबत आहात. आठवण तर ठेवता ना. जी काही मुले आठवणीमध्ये राहतात, ती सदैव सोबत आहेत. आठवणीमध्ये राहिल्यामुळे सोबत राहतात आणि विकर्म विनाश होतात आणि मग सुरु होते - विकर्माजीत संवत. नंतर जेव्हा रावण राज्य सुरु होते तेव्हा म्हणतात - राजा विक्रमाचे संवत. हे विकर्माजीत, ते विक्रमी. आता तुम्ही विकर्माजीत बनत आहात. नंतर तुम्ही विक्रमी बनाल. यावेळी सर्वजण अति विकर्मी आहेत. कोणालाही आपल्या धर्माची माहिती नाही. आज बाबा एक छोटासा प्रश्न विचारत आहेत - सतयुगामध्ये देवता हे जाणतात का की आपण आदि सनातन देवी-देवता धर्माचे आहोत? जसे तुम्ही असे समजता आपण हिंदू धर्माचे आहोत, कोणी म्हणेल आम्ही ख्रिश्चन धर्माचे आहोत. तसे तिथे देवता स्वतःला देवी-देवता धर्माचे समजतात? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तिथे दुसरा कोणता धर्म तर नाहीये ज्यामुळे असे समजतील की आपण अमक्या धर्माचे आहोत. इथे अनेक धर्म आहेत, तर ओळख देण्यासाठी वेगवेगळी नावे ठेवली आहेत. तिथे तर आहेच मुळी एक धर्म त्यामुळे असे सांगण्याची आवश्यकता भासत नाही की आम्ही या धर्माचे आहोत. त्यांना तर माहीतच नाहीये की, कोणते धर्म सुद्धा असतात, त्यांचेच राज्य आहे. आता तुम्ही जाणता आपण आदि सनातन देवी-देवता धर्माचे आहोत. दुसऱ्या कोणाला देवी-देवता म्हटले जात नाही. पतित असल्या कारणाने स्वतःला देवता म्हणू शकत नाहीत. पवित्र असणाऱ्यालाच देवता म्हटले जाते. तिथे अशी कोणतीही गोष्ट असत नाही. कोणाशी तुलना करू शकत नाही. आता तुम्ही संगमयुगावर आहात, जाणता आदि सनातन देवी-देवता धर्म पुन्हा स्थापन होत आहे. तिथे तर धर्माची गोष्टच नाही. आहेच मुळी एक धर्म. हे देखील मुलांना समजावून सांगितले आहे, असे जे म्हणतात - महाप्रलय होतो अर्थात काहीच शिल्लक राहत नाही, हे देखील चुकीचे ठरते. बाबा बसून समजावून सांगतात - बरोबर काय आहे? शास्त्रांमध्ये तर प्रलय दाखवला आहे. बाबा म्हणतात - भारताशिवाय बाकी सर्व काही जलमय होते. एवढी मोठी सृष्टी काय करायची आहे. एका भारतामध्येच बघा किती गावे आहेत. आधी जंगल असते मग त्यातून वृद्धी होत जाते. तिथे तर फक्त तुम्ही आदि सनातन देवी-देवता धर्माचेच राहता. आता तुम्हा ब्राह्मणांच्या बुद्धीमध्ये बाबा हे पक्के करत आहेत. आता तुम्ही जाणता उच्च ते उच्च शिवबाबा कोण आहेत? त्यांची पूजा कशासाठी केली जाते? धोतरा इत्यादीची फुले का वाहतात? ते तर निराकार आहेत ना. असे म्हणतात - नावा-रूपापासून न्यारे आहेत, परंतु नावा-रूपापासून वेगळी कोणती गोष्ट असतच नाही. मग ते काय आहे - ज्यावर फुले इत्यादी वाहतात? सर्वप्रथम पूजा त्यांची होते. मंदिरे देखील त्यांची बनतात कारण भारताची आणि सर्व दुनियेतील मुलांची सेवा करतात. मनुष्यांचीच सेवा केली जाते ना. यावेळी तुम्ही स्वतःला देवी-देवता धर्माचे म्हणू शकत नाही. तुम्हाला ठाऊक देखील नव्हते की, आपण देवी-देवता होतो आता पुन्हा बनत आहोत. आता बाबा समजावून सांगत आहेत तर समजावून सांगितले पाहिजे - हे नॉलेज बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही देऊ शकत नाही. त्यांनाच म्हणतात ज्ञानाचा सागर, नॉलेज-फूल. गायले गेले आहे रचता आणि रचनेला ऋषी-मुनी इत्यादी कोणीही जाणत नाहीत. नेती-नेती करत गेले आहेत. जसे छोट्या मुलांना नॉलेज आहे काय? जसे मोठे होत जातात, बुद्धी प्रगल्भ होत जाईल. बुद्धीद्वारे समजत जाईल, परदेश कुठे आहे, हे कुठे आहे. तुम्ही मुले देखील आधी या बेहदच्या नॉलेजला अजिबात जाणत नव्हता. हे (ब्रह्मा बाबा) देखील म्हणतात - भले मी शास्त्र इत्यादी वाचत होतो परंतु काहीच समजत नव्हतो. मनुष्यच या ड्रामामध्ये ॲक्टर्स आहेत ना.

सारा खेळ दोन गोष्टींवर बनलेला आहे. भारताची हार आणि भारताची जित. भारतामध्ये सतयुग इत्यादीच्या काळात पवित्र धर्म होता, यावेळी आहे अपवित्र धर्म. अपवित्रतेमुळे स्वतःला देवता म्हणू शकत नाहीत तरीही ‘श्री श्री’ नाव ठेवतात. परंतु श्री अर्थात श्रेष्ठ. श्रेष्ठ म्हटलेच जाते पवित्र देवतांना. श्रीमत भगवानुवाच म्हटले जाते ना. आता ‘श्री’ कोण आहेत? जे बाबांच्या सन्मुख ऐकून ‘श्री’ बनतात ते की ज्यांनी स्वतःला ‘श्री श्री’ उपाधी दिली आहे ते? बाबांच्या कर्तव्यानुसार जी नावे पडली आहेत, ती नावे देखील स्वतःसाठी दिली आहेत. या सर्व आहेत विस्ताराच्या गोष्टी. तरी देखील बाबा म्हणतात - मुलांनो, एका बाबांची आठवण करत रहा. हाच वशीकरण मंत्र आहे. तुम्ही रावणावर विजय प्राप्त करून जगतजीत बनता. वारंवार स्वतःला आत्मा समजा. हे शरीर तर इथे ५ तत्वांचे बनलेले आहे. बनते, सुटते आणि पुन्हा बनते. आता आत्मा तर अविनाशी आहे. अविनाशी आत्म्यांना आता अविनाशी बाबा शिकवत आहेत संगमयुगावर. भले कितीही विघ्न इत्यादी येतात, मायेची वादळे येतात, तुम्ही बाबांच्या आठवणीमध्ये रहा. तुम्ही समजता आपणच सतोप्रधान होतो मग तमोप्रधान बनलो आहोत. तुमच्यामध्ये देखील नंबरवार जाणतात. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे - सर्वात पहिली भक्ती आपण केली आहे. जरूर ज्यांनी सर्वात आधी भक्ती केली आहे त्यांनीच शिवाचे मंदिर बनवले कारण धनवान देखील तेच असतात ना. मोठ्या राजाला पाहून मग बाकीचे राजा सुद्धा आणि प्रजा देखील करेल. या सर्व आहेत डिटेल मधल्या गोष्टी. एका सेकंदामध्ये जीवनमुक्ती म्हटले जाते. मग समजावून सांगण्यासाठी किती वर्षे लागतात. ज्ञान तर सोपे आहे, त्यामध्ये इतका वेळ लागत नाही, जितका आठवणीच्या यात्रेसाठी लागतो. बोलावतात देखील - ‘बाबा या, येऊन आम्हाला पतितापासून पावन बनवा’; असे कधी म्हणत नाहीत की, ‘बाबा, आम्हाला विश्वाचा मालक बनवा’. सर्वजण म्हणतील पतितापासून पावन बनवा. पावन दुनिया म्हटले जाते सतयुगाला, याला पतित दुनिया म्हणणार. पतित दुनिया म्हणत असून देखील स्वतःला पतित समजत नाहीत. स्वतः विषयी तिरस्कार वाटत नाही. तुम्ही कोणाच्या हातचे खात नाही, तर म्हणतात - ‘आम्ही काही अस्पृश्य आहोत काय?’ अरे, तुम्ही स्वतःच म्हणता ना. पतित तर सगळेच आहेत ना. तुम्ही म्हणता देखील आम्ही पतित आहोत, हे देवता पावन आहेत. तर पतित असणाऱ्याला काय म्हणणार. गायन आहे ना - ‘अमृत छोड़ विष काहे को खाए’. विष (विकार) तर खराब आहे ना. बाबा म्हणतात - हे विष तुम्हाला आदि-मध्य-अंत दुःख देते परंतु याला पॉयझन थोडेच समजतात. जसे अमली पदार्थ घेणारा त्याच्या शिवाय राहू शकत नाही, दारूची सवय असणारा दारू शिवाय राहू शकत नाही. युद्धाची वेळ असते तेव्हा त्यांना दारू पाजून नशा चढवून युद्धाला पाठवतात. नशा मिळाला आणि बस्स, समजतील आपल्याला असे करायचे आहे. त्या लोकांना मृत्यूची भीती वाटत नाही. कुठेही बॉम्बस घेऊन जाऊन बॉम्ब सहित उडी मारतात. गायन देखील आहे - मुसळांचे (मिसाईल्सचे) युद्ध लागले, खरी गोष्ट आता तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये बघत आहात. आधी तर फक्त वाचत होता, पोटातून मुसळ निघाले, मग असे केले. आता तुम्ही समजता पांडव कोण आहेत, कौरव कोण आहेत? स्वर्गवासी बनण्यासाठी पांडवांनी जिवंतपणी देह-अभिमानामधून विरघळण्याचा (मुक्त होण्याचा) पुरुषार्थ केला. तुम्ही आता हे जुने चप्पल (शरीर) सोडण्याचा पुरुषार्थ करत आहात. म्हणता ना - जुने शरीर सोडून नवीन घ्यायचे आहे. बाबा मुलांनाच समजावून सांगतात. बाबा म्हणतात - मी कल्प-कल्प येतो. माझे नाव शिव आहे. शिवजयंती देखील साजरी करतात. भक्तीमार्गासाठी किती मंदिरे इत्यादी बनवतात. नावे देखील खूप ठेवली आहेत. देवींची देखील अशी नावे ठेवतात. यावेळी तुमची पूजा होत आहे. हे देखील तुम्ही मुलेच जाणता ज्यांची आपण पूजा करत होतो ते आपल्याला शिकवत आहेत. ज्या लक्ष्मी-नारायणाचे आपण पुजारी होतो ते आता आपण स्वतः बनत आहोत. हे ज्ञान बुद्धीमध्ये आहे. याचे चिंतन करत रहा आणि इतरांना देखील ऐकवा. असे बरेच आहेत जे धारणा करू शकत नाहीत. बाबा म्हणतात - जास्त धारणा करू शकत नसाल तरी हरकत नाही. आठवणीची तर धारणा आहे ना. बाबांची आठवण करत रहा. ज्यांची मुरली चालत नाही तर इथे बसून आठवण करा. इथे कोणतेही बंधन, झंझट इत्यादी काहीच नाही. घरामध्ये मुलेबाळे इत्यादींचे वातावरण पाहून तो नशाच निघून जातो. इथे चित्रे देखील ठेवली आहेत. कोणालाही समजावून सांगणे खूप सोपे आहे. ते लोक (दुनियावाले) तर गीता इत्यादी पूर्ण तोंडपाठ करतात. शीख लोकांना देखील ग्रंथ तोंड पाठ असतो. तुम्हाला काय तोंडपाठ करायचे आहे? बाबांना. तुम्ही म्हणता देखील बाबा, ही आहे एकदम नवीन गोष्ट. ही एकच अशी वेळ आहे जेव्हा तुम्ही स्वतःला आत्मा समजून एका बाबांची आठवण करायची आहे. ५००० वर्षांपूर्वी देखील शिकवले होते, आणखी कोणामध्ये ताकद नाही जो असे समजावून सांगू शकेल. ज्ञानसागर आहेतच एक बाबा, दुसरा कोणीही असू शकत नाही. ज्ञान-सागर बाबाच तुम्हाला समजावून सांगतात, आज-काल असे देखील खूप निघाले आहेत जे म्हणतात - आम्ही अवतार घेतला आहे म्हणून सत्याच्या स्थापनेमध्ये किती विघ्न पडतात परंतु गायले गेले आहे - ‘सच की नांव हिलेगी, डुलेगी, लेकिन डूबेगी नही’ (सत्याची नाव हलेल, डुलेल परंतु बुडणार नाही).

आता तुम्ही मुले बाबांकडे येता तुमच्या मनामध्ये किती आनंद असला पाहिजे. पूर्वी यात्रेवर जात होता, तर मनामध्ये काय येत होते? आता घरदार सोडून इथे येता तर काय विचार येतात? आम्ही बापदादांकडे जात आहोत. बाबांनी हे देखील समजावून सांगितले आहे - मला फक्त ‘शिवबाबा’ म्हणतात ज्याच्यामध्ये मी प्रवेश केला आहे, ते आहेत ब्रह्मा. बिरादऱ्या (वंशावळ्या) असतात ना. सर्वात पहिली वंशावळी ब्राह्मणांची आहे, मग देवतांची वंशावळी बनते. आता दूरदेशी बाबा मुलांना दुरांदेशी बनवतात. तुम्ही जाणता आत्मा कशी पूर्ण चक्रामध्ये विविध वर्णांमध्ये आली आहे, याचे ज्ञान दुरांदेशी बाबाच देतात. तुम्ही विचार कराल की, आता आपण ब्राह्मण वर्णाचे आहोत, या आधी जेव्हा ज्ञान नव्हते तेव्हा शूद्रवर्णाचे होतो. आमचे आहेत ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर. तेच ग्रेट शूद्र, ग्रेट वैश्य, ग्रेट क्षत्रिय... त्याच्या अगोदर ग्रेट ब्राह्मण होते. या सर्व गोष्टी बाबांशिवाय आणखी कोणीही समजावून सांगू शकत नाहीत. याला म्हटले जाते - दुरांदेशीचे ज्ञान. दूर देशामध्ये राहणारे बाबा येऊन दूरदेशाचे सर्व ज्ञान मुलांना देतात. तुम्ही जाणता आपले बाबा दूरदेशातून यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) येतात. हा परका देश, परके राज्य आहे. शिवबाबांना स्वतःचे शरीर नाहीये आणि ते आहेत ज्ञानाचा सागर, स्वर्गाचे राज्य देखील त्यांनीच द्यायचे आहे. श्रीकृष्ण थोडेच देणार. शिवबाबाच देतील. श्रीकृष्णाला बाबा म्हणणार नाही. बाबा राज्य देतात, बाबांकडूनच वारसा मिळतो. आता हदचे सर्व वारसे पूर्ण होतात. सतयुगामध्ये तुम्हाला हे माहिती नसणार की आपण या संगमावर २१ जन्मांसाठी वारसा घेतलेला आहे. हे आता जाणता - आपण अर्ध्या कल्पासाठी २१ जन्मांचा वारसा घेत आहोत. २१ पिढी अर्थात संपूर्ण आयुष्य. जेव्हा शरीर वृद्ध होईल तेव्हा वेळेवर शरीर सोडणार. जसे सर्प जुनी कात टाकून नवीन घेतो. आपला देखील पार्ट बजावता-बजावता हे वस्त्र (हे शरीर) जुने झाले आहे.

तुम्ही आहात खरे-खरे ब्राह्मण. तुम्हालाच भ्रामरी म्हटले जाते. तुम्ही किड्यांना आप समान ब्राह्मण बनवता. तुम्हाला सांगितले जाते की, किड्यांना घेऊन येऊन बसून भू-भू करा. भ्रामरी देखील भू-भू करते मग कुणाला पंख फूटतात, कोणी मरून जातात. उदाहरणे सर्व आत्ताची आहेत. तुम्ही लाडकी मुले आहात, मुलांना नुरे रत्न म्हटले जाते. बाबा म्हणतात - नुरे रत्न. तुम्हाला आपले बनवले आहे तर तुम्ही देखील माझे झालात ना. अशा बाबांची जितकी आठवण कराल तितकी पापे नष्ट होतील. आणखी कोणाचीही आठवण केल्याने पापे काही नष्ट होणार नाहीत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) जिवंतपणी देह-अभिमानामधून विरघळण्याचा (मुक्त होण्याचा) पुरुषार्थ करायचा आहे. या जुन्या शरीरामध्ये जरा देखील मोह ठेवायचा नाही.

२) खरे ब्राह्मण बनून किड्यांवर ज्ञानाची भू-भू करून त्यांना आप समान ब्राह्मण बनवायचे आहे.

वरदान:-
अमृतवेलेचे महत्व जाणून खुल्या भंडाऱ्यातून आपली झोळी भरपूर करणारे भाग्यवान भव अमृतवेलेला वरदाता, भाग्यविधात्याकडून जितकी भाग्याची रेषा काढायची असेल तितकी काढा कारण त्यावेळेस भोळ्या भगवंताच्या रूपामध्ये लवफुल आहे त्यामुळे मालक बना आणि अधिकार घ्या. खजिन्यावर कोणतेही कडी-कुलूप नाहीये. त्यावेळी फक्त मायेच्या बहाणेबाजीला सोडून एक संकल्प करा की, जसा पण आहे, जशी पण आहे, तुमची आहे. मन-बुद्धी बाबांच्या हवाली करून तख्तनशीन बना तर बाबांचे सर्व खजिने स्वतःचे खजिने असल्याचा अनुभव होईल.

बोधवाक्य:-
सेवेमध्ये जर स्वार्थ मिक्स असेल तर सफलता देखील मिक्स होईल म्हणून नि:स्वार्थ सेवाधारी बना.

अव्यक्त इशारे - आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा, अंतर्मुखी बना:- असा कोणताही ब्राह्मण नसेल जो आत्म-अभिमानी बनण्याचा पुरुषार्थी नसेल. परंतु निरंतर आत्म-अभिमानी, ज्यामुळे कर्मेंद्रियांवर संपूर्ण विजय प्राप्त व्हावा, प्रत्येक कर्मेंद्रीय सतोप्रधान स्वच्छ व्हावे, देहाचे जुने संस्कार आणि संबंधापासून संपूर्ण मरजीवा व्हावे, यासाठी अंतर्मुखी बना, याच पुरुषार्थाने नंबर बनतील.