12-06-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्हाला आता ज्ञानाची दृष्टी मिळाली आहे, त्यामुळे तुमचे भटकणे बंद झाले, तुम्ही शांतीधाम-सुखधामची आठवण करता”

प्रश्न:-
देवतांमध्ये कोणती ताकद आहे आणि ती ताकद कोणत्या विशेषतेमुळे आहे?

उत्तर:-
देवतांमध्ये संपूर्ण विश्वावर राज्य करण्याची ताकद आहे, ती ताकद विशेष एक मताच्या विशेषतेमुळे आहे. तिथे एक मत असल्या कारणाने वजीर इत्यादी ठेवण्याची गरज नाही. देवतांनी संगमावर बाबांकडून असे श्रीमत घेतलेले आहे ज्यामुळे ते २१ जन्म राज्य करतात. तिथे एका राजाची एक दैवी फॅमिली असते, दुसरे मत असत नाही.

गीत:-
नयन हीन को राह दिखाओ प्रभू…

ओम शांती।
मुलांना नेत्र मिळाले आहेत, सुरुवातीला नेत्र नव्हते, कोणते नेत्र? ज्ञानाचे नेत्र नव्हते. अज्ञानाचे नेत्र तर होते. मुले जाणतात ज्ञानसागर एक बापच आहेत. इतर कोणाकडे हे रूहानी ज्ञान नाहीये, ज्या ज्ञानाद्वारे सद्गती होईल अर्थात शांतीधाम-सुखधामला जाता येईल. आता तुम्हा मुलांना दृष्टी मिळाली आहे - सुखधाम बदलून मग कसे मायेचे राज्य किंवा दुःखधाम बनते. आळवू लागतात की, ‘नयन हीन को राह बताओ’. भक्ती मार्गातील यज्ञ, दान-पुण्य इत्यादीने शांतीधाम-सुखधामला जाण्याकरिता कोणताही मार्ग मिळत नाही. प्रत्येकाला आपला पार्ट बजावायचाच आहे. बाबा म्हणतात - मला देखील पार्ट मिळालेला आहे. भक्तिमार्गामध्ये बोलावतात - मुक्ती-जीवनमुक्तीचा मार्ग सांगा. त्यासाठी किती यज्ञ-तप, दान-पुण्य इत्यादी करतात, किती भटकतात. शांतीधाम-सुखधाममध्ये भटकण्याची गरजच नाही. हे देखील तुम्ही जाणता, ते तर फक्त शास्त्रांचा अभ्यास आणि भौतिक शिक्षणा विषयीच जाणतात. या रूहानी बाबांना तर अजिबातच जाणत नाहीत. रुहानी बाबा ज्ञान तेव्हा येऊन देतात जेव्हा की सर्वांची सद्गती होते. जुनी दुनिया बदलणार असते. मनुष्यापासून देवता बनतात आणि मग संपूर्ण सृष्टीवर देवी-देवतांचे एकच राज्य होते, ज्याला स्वर्ग म्हटले जाते. भारतवासी हे देखील जाणतात आदि सनातन देवी-देवता धर्म भारतामध्येच होता. त्यावेळी दुसरा कोणताही धर्म नव्हता. तुम्हा मुलांसाठी आता आहे संगमयुग. बाकी सर्वजण आहेत कलियुगामध्ये. तुम्ही पुरुषोत्तम संगमयुगावर बसला आहात. जे-जे बाबांची आठवण करतात, बाबांच्या श्रीमतावर चालतात, ते संगमयुगामध्ये आहेत. बाकी सर्व कलियुगामध्ये आहेत. आता कोणतेही साम्राज्य, राजवट तर नाहीये. अनेक मतांवर राज्य चालते, सतयुगामध्ये तर एका महाराजाचेच मत चालते, वजीर इत्यादी नसतात. इतकी ताकद असते. नंतर मग जेव्हा पतित बनतात तेव्हा वजीर इत्यादी नेमतात कारण ती ताकद राहत नाही. आता तर आहेच प्रजेचे राज्य, सतयुगामध्ये एक मत असल्याकारणाने ताकद असते. आता तुम्ही ती ताकद घेत आहात, २१ जन्म स्वतंत्रपणे राज्य करता. आपलीच दैवी फॅमिली आहे. आता हा आहे तुमचा ईश्वरीय परिवार. बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा समजून बाबांच्या आठवणीमध्ये राहत असाल तर तुम्ही ईश्वरीय परिवाराचे आहात. जर देह-अभिमानामध्ये येऊन विसरत असाल तर आसुरी परिवाराचे आहात. एका सेकंदामध्ये ईश्वरीय संप्रदायाचे आणि मग एका सेकंदामध्ये आसुरी संप्रदायाचे बनता. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करणे किती सोपे आहे, परंतु मुलांना अवघड वाटते.

बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा समजून मग बाबांची आठवण कराल तर विकर्म विनाश होतील. देहाद्वारे कर्म तर करायचेच आहे. देहा विना तर तुम्ही कर्म करू शकणार नाही. प्रयत्न करायचा आहे - कामकाज करत असताना देखील आपण बाबांची आठवण करावी. परंतु इथे तर काम करत नसताना देखील आठवण करू शकत नाही. विसरून जातात. हीच मेहनत आहे. भक्तीमध्ये असे कधी थोडेच सांगितले जाते की, पूर्ण दिवसभर भक्ती करा. त्यासाठी वेळ असतो सकाळी, संध्याकाळी किंवा रात्री. मग मंत्र इत्यादी जे मिळतात, ते बुद्धीमध्ये राहतात. अनेकानेक शास्त्रे आहेत. ती भक्तिमार्गामध्ये वाचतात. तुम्हाला तर कोणते पुस्तक इत्यादी वाचायचे नाहीये, ना बनवायचे आहे. या मुरल्या छापतात देखील रिफ्रेश होण्यासाठी; शेवटी कोणतीही ग्रंथ-पुस्तके इत्यादी राहणार नाहीत. हे सर्व नष्ट होणार आहे. ज्ञान तर आहेच एका बाबांमध्ये. आता बघा ‘ज्ञान-विज्ञान’ भवन नाव ठेवले आहे, जणूकाही तिथे योग आणि ज्ञान शिकवले जाते. अशा प्रकारची अर्थहीन नावे देतात. काहीच समजत नाहीत की ज्ञान काय आहे, विज्ञान काय आहे. आता तुम्ही ज्ञान आणि विज्ञानाला जाणता. योगाद्वारे हेल्थ प्राप्त होते, ज्याला विज्ञान म्हटले जाते; आणि हे आहे ज्ञान, ज्यामध्ये वर्ल्डचा इतिहास-भूगोल समजावून सांगितला जातो. वर्ल्डचा इतिहास-भूगोल कसा रिपीट होतो ते जाणून घ्यायचे आहे. परंतु ते शिक्षण आहे हदचे, इथे तर तुम्हाला बेहदचा इतिहास-भूगोल बुद्धीमध्ये आहे. आम्ही कसे राज्य घेतो, किती काळ आणि केव्हा राज्य करत होतो, राजधानी कशी मिळाली होती - या गोष्टी इतर कोणाच्याही बुद्धीमध्ये येत नाहीत. बाबाच नॉलेजफूल आहेत. हे सृष्टीचे चक्र कसे फिरते ते सर्व बाबाच समजावून सांगतात. पूर्वनियोजित ड्रामाला न जाणल्या कारणाने मनुष्य म्हणतात - अमका स्वर्गवासी झाला किंवा ज्योत ज्योतीमध्ये सामावली.

तुम्ही जाणता सर्व मनुष्य मात्र या सृष्टी चक्रामध्ये येतात, यामधून एकही कोणी सुटू शकत नाही. बाबा म्हणतात मनुष्याची आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते, किती मोठा ड्रामा आहे. सर्वांमध्ये आत्मा आहे, त्या आत्म्यामध्ये अविनाशी पार्ट भरलेला आहे. याला म्हटले जाते - ‘बनी बनाई…’ आता ड्रामा म्हणतात तर जरूर त्याचा आपला वेळही असला पाहिजे. बाबा समजावून सांगतात - हा ड्रामा ५ हजार वर्षांचा आहे. भक्तीमार्गाच्या शास्त्रांमध्ये लिहिले आहे - ड्रामा लाखो वर्षांचा आहे. या वेळीच जेव्हा की बाबांनी येऊन सहज राजयोग शिकवला होता, या वेळेचेच गायन आहे की, कौरव घोर अंधारामध्ये होते आणि पांडव प्रकाशामध्ये होते. ते लोक समजतात कलियुगाची तर अजून ४० हजार वर्षे बाकी आहेत. त्यांना हे कळतही नाही की भगवान आलेले आहेत, या जुन्या दुनियेचा मृत्यू समोर उभा ठाकला आहे. सर्व अज्ञान निद्रेमध्ये झोपून पडले आहेत. जेव्हा युद्ध बघतात तर म्हणतात हे तर महाभारत युद्धाचे लक्षण आहे. ही रिहर्सल होतच राहील. मग चालता-चालता बंद होईल. तुम्ही जाणता आपले स्थापनेचे कार्य अजून पूर्ण झालेले नाही. गीतेमध्ये हे थोडेच आहे की, बाबांनी सहज राजयोग शिकवून इथेच राज्य स्थापन केले. गीतेमध्ये तर प्रलय दाखवला आहे. दाखवतात - बाकीचे सर्वजण मरण पावले, शेवटी ५ पांडव वाचले. ते देखील डोंगरावर जाऊन वितळून मेले. राजयोगामुळे काय झाले, काहीच ठाऊक नाही. बाबा प्रत्येक गोष्ट समजावून सांगत राहतात. ती आहे हदची गोष्ट, हदची रचना हदचे ब्रह्मा रचतात, पालना देखील करतात बाकी प्रलयाने नष्ट करत नाहीत. पत्नीला ॲडॉप्ट करतात. बाबा देखील येऊन ॲडॉप्ट करतात. म्हणतात मी यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) प्रवेश करून मुलांना नॉलेज ऐकवतो, यांच्याद्वारे मुलांना रचतो. पिता देखील आहेत, फॅमिली देखील आहे, या अति गूढ गोष्टी आहेत. खूप गंभीर गोष्टी आहेत. मुश्किलीने कोणाच्या बुद्धीमध्ये बसतात. आता बाबा म्हणतात - सर्वप्रथम आपल्याला आत्मा तर समजा, आत्माच एक शरीर सोडून दुसरे घेते. शरीरालाच विविध नावे दिली जातात. नाव, रूप, फीचर्स सर्व वेगवेगळी आहेत. एकाची फीचर्स दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाहीत. प्रत्येक आत्म्याची जन्म-जन्मांतरीची आपली फीचर्स आहेत. आपला ॲक्ट ड्रामामध्ये नोंदलेला आहे म्हणून याला पूर्वनियोजित ड्रामा म्हटले जाते, आता बेहदचे बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. तर का नाही आपण बाबांची आठवण करावी. हीच मेहनतीची गोष्ट आहे.

तुम्ही मुले जेव्हा आठवणीच्या यात्रेमध्ये बसता तर मायेची वादळे येतात, युद्ध चालते, त्याला घाबरायचे नाही. माया घडोघडी आठवणीला कट करेल. संकल्प-विकल्प असे काही येतील जे एकदम डोकेच फिरवतील. तुम्ही मेहनत करा. बाबांनी समजावून सांगितले आहे - या लक्ष्मी-नारायणाची कर्मेंद्रिये कशी वश झाली. हे संपूर्ण निर्विकारी होते. हे शिक्षण यांना कुठून मिळाले? आता तुम्हा मुलांना हे असे बनण्याचे शिक्षण मिळत आहे. यांच्यामध्ये कोणताही विकार असत नाही. तिथे रावण राज्यच नाही. मागाहून रावण राज्य सुरु होते. रावण काय चीज आहे, हे कोणीही जाणत नाहीत. ड्रामा अनुसार हे देखील नोंदलेले आहे. ड्रामाच्या आदि-मध्य-अंताला जाणत नाहीत, म्हणूनच नेती-नेती करत आले आहेत. आता तुम्ही स्वर्गवासी बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. हे लक्ष्मी-नारायण स्वर्गाचे मालक आहेत ना. यांच्या समोर डोके टेकणारे तमोप्रधान कनिष्ठ पुरुष आहेत. बाबा म्हणतात - सर्वप्रथम एक गोष्ट तर पक्की करा - स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. यातच मेहनत आहे. जसे ८ तास सरकारी नोकरी असते ना. आता तुम्ही बेहदच्या सरकारचे मददगार आहात. तुम्हाला कमीत कमी ८ तास पुरुषार्थ करून आठवणीमध्ये रहायचे आहे. तुमची ही अवस्था अशी पक्की होईल की तुम्हाला कोणाचीही आठवण येणार नाही. बाबांच्या आठवणीमध्येच शरीर सोडाल. मग तेच विजयी माळेचे मणी बनतील. एका राजाची प्रजा किती असंख्य असते. इथे देखील प्रजा बनवायची आहे. तुम्ही विजयी माळेचे मणी पुजण्यालायक बनाल. १६१०८ ची माळा देखील असते. एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवलेली असते. ८ ची माळा आहे, १०८ ची देखील आहे. शेवटी मग १६१०८ ची देखील बनते. तुम्ही मुलांनीच बाबांकडून राजयोग शिकून संपूर्ण विश्वाला स्वर्ग बनवले आहे म्हणून तुम्हाला पुजले जाते. तुम्हीच पूज्य होता, परत पुजारी बनले आहात. हे दादा (ब्रह्मा बाबा) म्हणतात – ‘मी स्वतः माळेचा जप केला आहे’. लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरामध्ये खरे तर रुद्र माळा असायला हवी. तुम्ही आधी रुद्र माळा आणि मग रुंड माळा बनता. पहिल्या नंबरला आहे रुद्रमाळा ज्यामध्ये ‘शिव’सुद्धा आहेत, रुंड माळेमध्ये शिव कुठून येतील. ती आहे विष्णूची माळा. या गोष्टींना देखील कोणी समजतात थोडेच. आता तुम्ही म्हणता - आम्ही जाऊन शिवबाबांच्या गळ्यातील हार बनतो. ब्राह्मणांची माळा बनू शकत नाही. ब्राह्मणांची माळा असत नाही. तुम्ही जितके आठवणीमध्ये राहता मग तिथेही जवळच येऊन राज्य कराल. हे शिक्षण इतर कोणत्याही ठिकाणी मिळू शकत नाही. तुम्ही जाणता आता आपण या जुन्या शरीराला सोडून स्वर्गवासी बनणार. संपूर्ण भारत स्वर्गवासी बनेल. विशेषत: भारतच स्वर्ग होता. ५ हजार वर्षांची गोष्ट आहे, लाखो वर्षांची गोष्ट असू शकत नाही. देवतांनाच ५ हजार वर्षे झाली, स्वर्गाला मनुष्य विसरले आहेत त्यामुळे असेच बोलत राहतात. बाकी खरे काहीच नाहीये. इतके जुने संवत इत्यादी थोडेच आहे. आहेतच सूर्यवंशी-चंद्रवंशी नंतर मग इतर धर्मवाले येतात. जुन्या गोष्टी काय कामी येतील. किती खरेदी करतात, पुरातन वस्तूची खूप किंमत देतात. सर्वात मौल्यवान आहेत शिवबाबा, त्यांची किती शिवलिंग बनवतात. आत्मा इतकी छोटी बिंदू प्रमाणे आहे, हे कोणालाही समजून येत नाही. अति सूक्ष्म रूप आहे. बाबाच समजावून सांगतात - इतक्या छोट्याशा बिंदूमध्ये इतका पार्ट नोंदलेला आहे, हा ड्रामा रिपीट होत राहतो, हे ज्ञान तुम्हाला तिथे असणार नाही. हे प्रायः लोप होते. तर मग कोणी सहज राजयोग शिकवू कसे शकतील. हे सर्व भक्तीमार्गासाठी बसून बनवले आहे. आता मुले जाणतात बाबांद्वारे भविष्य नव्या दुनियेसाठी ब्राह्मण, देवता, क्षत्रिय - तीन धर्म स्थापन होत आहेत. ते शिक्षण (लौकिक शिक्षण) जे तुम्ही शिकता ते आहे या जन्मासाठी. याचे (या अलौकिक शिक्षणाचे) प्रारब्ध तुम्हाला नव्या दुनियेमध्ये मिळणार आहे. हे शिक्षण मिळते संगमयुगावर. हे आहे पुरुषोत्तम संगमयुग. मनुष्यापासून देवता तर जरूर संगमावर बनले असतील. बाबा मुलांना सर्व रहस्ये समजावून सांगतात. बाबा हे देखील जाणतात की, तुम्ही संपूर्ण दिवस या आठवणीमध्ये राहू शकणार नाही, अशक्य आहे म्हणून चार्ट ठेवा, बघा आपण कितपत आठवणीमध्ये राहू शकतो? देहाचा अभिमान असेल तर आठवण कशी राहू शकेल! पापांचे ओझे डोक्यावर खूप आहे म्हणून बाबा म्हणतात - आठवणीमध्ये रहा. त्रिमूर्तीचे चित्र खिशात ठेवा, परंतु तुम्ही वारंवार विसरता. ‘अल्फ’ची आठवण केल्याने ‘बे’ इत्यादी सर्व आठवते. बॅज तर कायम लागलेला असावा. लिटरेचर देखील सोबत असावे, कोणीही चांगली व्यक्ती असेल तर त्याला दिले पाहिजे. चांगली व्यक्ती कधीही फुकटचे घेणार नाही. विचारेल, याचे किती पैसे आहेत? तर तुम्ही सांगा - हे गरिबांसाठी तर विनामूल्य दिले जाते, बाकी जो जितके देईल. रॉयल्टी असली पाहिजे. तुमचे रीती-रिवाज दुनियेपेक्षा अगदी वेगळे असले पाहिजेत. रॉयल व्यक्ती स्वतःहूनच काहीतरी देतील. हे तर आम्ही सर्वांना कल्याणाकरिता देतो. कुणी वाचून देखील तुम्हाला पैसे पाठवतील. खर्च तर तुम्ही करता ना. बोला, ‘आम्ही आमचे तन-मन-धन भारताच्या सेवेकरिता खर्च करतो’. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) या बेहदच्या सरकारला मदत करण्यासाठी कमीत-कमी ८ तास आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. आठवणीमध्ये माया जी विघ्न आणते त्याला घाबरायचे नाही.

२) या पुरुषोत्तम संगमयुगावर ईश्वरीय संप्रदायाचा बनून, ईश्वराच्या मतावर चालायचे आहे. कर्म करत असताना देखील एका बाबांच्या आठवणीमध्ये राहण्याचा अभ्यास करायचा आहे.

वरदान:-
अंतर्मुखतेच्या गुहेमध्ये राहणारे देहापासून न्यारे देही भव

पांडवांच्या ज्या गुहा दाखवतात - त्या याच अंतर्मुखतेच्या गुहा आहेत, जितके देहापासून न्यारे, देही रूपामध्ये स्थित होण्याच्या गुहेमध्ये राहता तितके दुनियेच्या वातावरणापासून दूर जाता, वातावरणाच्या प्रभावामध्ये येत नाही. जसे गुहेमध्ये राहिल्याने बाहेरच्या वातावरणापासून दूर होता तशी ही अंतर्मुखतेची गुहा देखील सर्वात न्यारी आणि बाबांची आवडती बनवते. आणि जो बाबांचा आवडता आहे तो स्वतः सर्वांपेक्षा वेगळा बनतो.

बोधवाक्य:-
‘साधना’ बीज आहे आणि ‘साधन’ त्याचा विस्तार आहे. विस्तारामध्ये साधनेला लपू देऊ नका.

अव्यक्त इशारे - आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा, अंतर्मुखी बना:-

अंतर्मुखीची निशाणी आहे - कायम सागराच्या तळाला हरवलेला गंभीरमुर्त, चेहऱ्याद्वारे आत्मिक स्थितीच्या खुणा दिसतील. एकीकडे मनन-चिंतन करणारा चेहरा आणि मग रमणिक अर्थात हसरा चेहरा, दोन्ही लक्षणे चेहऱ्यावरून प्रत्यक्ष होतील. अंतर्मुखी सदैव हर्षितमुख दिसून येतील कारण मायेचा सामना करणे बंद होईल.