14-06-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्हाला आता ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे, म्हणून आता तुमची दृष्टी
कशातही बुडता कामा नये”
प्रश्न:-
ज्यांना जुन्या
दुनियेपासून बेहदचे वैराग्य असेल, त्यांचे लक्षण कोणते असेल?
उत्तर:-
ते आपले सर्व काही बाबांना अर्पण करतील, आमचे काहीही नाही. बाबा हा देह देखील आमचा
नाही, हा तर जुना देह आहे, याला देखील सोडायचे आहे. त्यांचा सगळ्यामधून मोह सुटत
जाईल, नष्टोमोहा होतील. त्यांच्या बुद्धीमध्ये असते की इथले काहीही कामी येणार
नाहीये, कारण हे सर्व हदचे आहे.
ओम शांती।
बाबा मुलांना ब्रह्मांड आणि सृष्टीचक्राच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान ऐकवत आहेत. जे
इतर कोणीही ऐकवू शकत नाहीत. एक गीताच आहे, ज्यामध्ये राजयोगाचे वर्णन आहे, ईश्वर
येऊन नरापासून नारायण बनवितात. हे गीते शिवाय इतर कोणत्याही शास्त्रांमध्ये नाहीये.
हे देखील बाबांनी सांगितले आहे, म्हणतात - मी तुम्हाला राजयोग शिकवला होता. हे
समजावून सांगितले होते की हे ज्ञान काही परंपरेने चालत येत नाही. बाबा येऊन एका
धर्माची स्थापना करतात. इतर सर्व धर्म नष्ट होतात. कोणतेही धर्मग्रंथ, परंपरा
इत्यादी चालत नाही. बाकीचे जे धर्म स्थापन करण्यासाठी येतात त्यावेळी काही विनाश
होत नाही, ज्यामुळे सर्व नष्ट होईल. भक्तिमार्गाची शास्त्रेच वाचत येतात, यांचे (ब्राह्मण
धर्माचे) शास्त्र भले गीता आहे, परंतु ते देखील भक्तिमार्गातच बनवतात कारण
सतयुगामध्ये तर कोणतेही शास्त्रच असत नाही आणि बाकीच्या धर्मांच्या वेळी काही विनाश
होत नाही. जुनी दुनिया नष्ट होत नाही जी पुन्हा नवीन बनेल. तीच दुनिया सुरु असते.
आता तुम्ही मुले समजता ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. आम्हाला बाबा शिकवत आहेत.
गायन देखील एका गीतेचेच आहे. गीता जयंती देखील साजरी करतात. वेद जयंती तर नाहीये.
ईश्वर एकच आहेत, तर एकाचीच जयंती साजरी केली पाहिजे. बाकी आहे रचना, त्यांच्याकडून
काहीही मिळू शकत नाही. वारसा बाबांकडूनच मिळतो. चाचा, काका इत्यादींकडून काही वारसा
मिळत नाही. आता हे आहेत तुमचे बेहदचे पिता, बेहदचे ज्ञान देणारे. हे काही शास्त्र
ऐकवत नाहीत. म्हणतात - ही सर्व भक्ती मार्गाची आहेत. या सर्वांचे सार तुम्हाला
समजावून सांगतो. शास्त्र काही शिक्षण नाहीये. शिक्षणाने तर पद प्राप्त होते, हे
शिक्षण बाबा शिकवत आहेत मुलांना. भगवानुवाच मुलांप्रती - पुन्हा ५ हजार वर्षानंतर
देखील असेच होईल. मुले जाणतात - आपण बाबांकडून रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला
जाणले आहे. हे तर बाबांशिवाय दुसरे कोणीही समजावून सांगू शकणार नाही. या
मुखकमलाद्वारे ऐकवतात. हे भगवंताने लोन घेतलेले मुख आहे ना, ज्याला गोमुख देखील
म्हणतात. मोठी आई आहे ना. यांच्या मुखाद्वारे ज्ञानाची महावाक्ये निघतात, ना की जल
इत्यादी. भक्तीमार्गामध्ये मग गोमुखातून जल वाहताना दाखवले आहे. आता तुम्ही मुले
समजता भक्तीमार्गामध्ये काय-काय करतात. किती दूर गोमुखावर पाणी पिण्यासाठी जातात.
आता तुम्ही मनुष्यापासून देवता बनत आहात. हे तर जाणता - बाबा कल्प-कल्प येऊन
मनुष्यापासून देवता बनविण्यासाठी शिकवतात. बघता कसे शिकवत आहेत. तुम्ही सर्वाना हे
सांगता - ईश्वर आम्हाला शिकवत आहेत. म्हणतात मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर तुमची
विकर्मे विनाश होतील. तुम्ही जाणता सतयुगामध्ये फार थोडे मनुष्य असतात. कलियुगामध्ये
तर असंख्य मनुष्य आहेत. बाबा येऊन आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करत आहेत.
आम्ही मनुष्यापासून देवता बनत आहोत. मनुष्यापासून देवता बनणाऱ्या मुलांमध्ये दैवी
गुण दिसून येतील. त्यांच्यामध्ये क्रोधाचा अंश देखील असणार नाही. जर कधी क्रोध आला
तर लगेच बाबांना लिहितील, ‘बाबा, आज माझ्याकडून ही चूक झाली. मी क्रोध केला, विकर्म
केले’. बाबांशी तुमचे किती कनेक्शन आहे. ‘बाबा, क्षमा करा’. बाबा म्हणतील - क्षमा
इत्यादी केली जात नाही. बाकी पुढच्यावेळी अशी चूक करू नको. टीचर काही क्षमा करत
नाहीत. रजिस्टर दाखवतात - तुझे मॅनर्स चांगले नाहीत. बेहदचे बाबा देखील म्हणतात -
तुम्ही आपले मॅनर्स बघत आहात. रोज आपला पोतामेल (हिशोब) बघा. कोणाला दुःख तर दिले
नाही ना, कोणाला त्रास तर दिला नाही ना? दैवी गुण धारण करण्यासाठी वेळ तर लागतो ना.
देह-अभिमान मोठ्या मुश्किलीने नष्ट होतो. जेव्हा आपल्याला देही समजाल तेव्हा
बाबांवर देखील प्रेम जडेल. नाहीतर देहाच्या कर्मबंधनामध्येच बुद्धी लटकून राहते.
बाबा म्हणतात - तुम्हाला शरीर निर्वाह अर्थ कर्म देखील करायचे आहे, त्यातून वेळ काढू
शकता. भक्तीसाठी सुद्धा वेळ काढतात ना. मीरा श्रीकृष्णाच्याच आठवणीत राहत होती ना.
पुनर्जन्म तर इथेच घेत गेली.
आता तुम्हा मुलांना
या जुन्या दुनियेपासून वैराग्य येते. जाणता या जुन्या दुनियेमध्ये मग पुनर्जन्म
घ्यायचाच नाहीये. दुनियाच नष्ट होते. या सर्व गोष्टी तुमच्या बुद्धीमध्ये आहेत. जसे
बाबांमध्ये ज्ञान आहे तसे मुलांमध्ये देखील आहे. हे सृष्टीचे चक्र दुसऱ्या
कोणाच्याही बुद्धीमध्ये नाहीये. तुमच्यामध्ये देखील नंबरवार आहेत, ज्यांच्या
बुद्धीमध्ये हे राहते - उच्च ते उच्च पतित-पावन बाबा आहेत, ते आम्हाला शिकवत आहेत.
हे देखील तुम्हीच जाणता. तुमच्या बुद्धीमध्ये सारे ८४ जन्मांचे चक्र आहे. स्मृती
राहते - आता या नरकामध्ये हा अंतिम जन्म आहे, याला म्हटले जाते रौरव नरक. खूप घाण
आहे, म्हणून संन्यासी लोक घरदार सोडून जातात. ती होते भौतिक (स्थूल) गोष्ट. तुम्ही
संन्यास करता बुद्धीने कारण तुम्ही जाणता आपल्याला आता परत जायचे आहे. सर्व काही
विसरावे लागते. ही जुनी छी-छी दुनिया (विकारी दुनिया) नष्ट झाल्यातच जमा आहे. घर
जुने होते, नवे बनून तयार होते तर मनात येते ना - हे घर तर मोडूनच जाणार आहे. आता
तुम्ही मुले शिकत आहात ना. जाणता नवीन दुनियेची स्थापना होत आहे. अजून थोडा वेळ बाकी
आहे. पुष्कळ मुले येऊन शिकतील. नवीन घर आता बनत आहे, जुने तुटून जात आहे. बाकी थोडे
दिवस आहेत. तुमच्या बुद्धीमध्ये या बेहदच्या गोष्टी आहेत. आता आमचे या जुन्या
दुनियेत मन लागत नाही. हे काहीच शेवटी कामी येणार नाही, आम्ही इथून जाऊ इच्छितो.
बाबा देखील म्हणतात - जुन्या दुनियेमध्ये मन गुंतू देऊ नका. मज पित्याची आणि घराची
आठवण करा तर विकर्म विनाश होतील. नाही तर खूप सजा भोगाल. पदही भ्रष्ट होईल.
आत्म्याला ध्यास लागला आहे की, आम्ही ८४ जन्म भोगले आहेत. आता बाबांची आठवण करायची
आहे, तेव्हा विकर्म विनाश होतील. बाबांच्या मतावर चालायचे आहे तेव्हाच श्रेष्ठ जीवन
बनेल. बाबा आहेत उच्च ते उच्च, हे देखील तुम्हीच जाणता. बाबा चांगल्या प्रकारे आठवण
करून देतात, ते बेहदचे बाबाच ज्ञानाचा सागर आहेत, तेच येऊन शिकवतात. बाबा म्हणतात -
हे शिक्षणही शिका आणि शरीर निर्वाह अर्थ देखील सर्व काही करा. परंतु ट्रस्टी होऊन
रहा.
ज्या मुलांना जुन्या
दुनियेपासून बेहदचे वैराग्य असेल ते आपले सर्व काही बाबांना अर्पण करतील. आमचे
काहीच नाही. बाबा, हा देह देखील आमचा नाही. हा तर जुना देह आहे, याला देखील सोडायचे
आहे. सर्वातून मोह नष्ट होत जातो. नष्टो-मोहा व्हायचे आहे. हे आहे बेहदचे वैराग्य.
ते असते हदचे वैराग्य. बुद्धीमध्ये आहे आम्ही स्वर्गामध्ये जाऊन आपले महाल बनवणार.
इथले काहीच कामी येणार नाही कारण इथले सर्व हदचे आहे. तुम्ही आता हद मधून निघून
बेहदमध्ये जाता. तुमच्या बुद्धीमध्ये हे बेहदचे ज्ञानच राहिले पाहिजे. आता अजून
कशातच तुमची दृष्टी जात नाही. आता तर घरी जायचे आहे. कल्प-कल्प बाबा येऊन आम्हाला
शिकवून परत सोबत घेऊन जातात. तुमच्यासाठी हे काही नवीन शिक्षण नाहीये. तुम्ही जाणता
कल्प-कल्प आम्ही हे शिकतो. तुमच्यामध्ये देखील नंबरवार आहेत. साऱ्या दुनियेमध्ये
किती प्रचंड लोकसंख्या आहे, परंतु तुम्ही थोडेच जाणता, हळू-हळू या ब्राह्मणांच्या
झाडाची वृद्धि होत जाते. ड्रामा प्लॅन अनुसार स्थापना होणारच आहे. मुले जाणतात आमचे
रुहानी गव्हर्मेंट आहे. आम्ही दिव्य दृष्टीने नव्या दुनियेला बघतो. तिथेच जायचे आहे.
ईश्वर देखील एकच आहेत, तेच शिकवणारे आहेत, राजयोग बाबांनीच शिकवला होता. त्यावेळी
खरोखर युद्ध देखील लागले होते. अनेक धर्मांचा विनाश आणि एका धर्माची स्थापना झाली
होती. तुम्ही देखील तेच आहात, कल्प-कल्प तुम्हीच शिकत आला आहात, वारसा घेत आला आहात.
प्रत्येकाने आपला पुरुषार्थ करायचा आहे. हे आहे बेहदचे शिक्षण. हे शिक्षण काही कोणी
मनुष्य मात्र देऊ शकत नाही.
बाबांनी श्याम आणि
सुंदरचे रहस्य देखील समजावून सांगितले आहे. तुम्ही देखील समजता आता आम्ही सुंदर बनत
आहोत. आधी श्याम होतो. श्रीकृष्ण काही एकटा थोडाच होता. संपूर्ण राजधानी होती ना.
आता तुम्ही समजता - आपण नरकवासी पासून स्वर्गवासी बनत आहोत. आता तुम्हाला या नरकाचा
तिटकारा येतो. तुम्ही आता पुरुषोत्तम संगमयुगावर आला आहात. इतके असंख्य येतात,
यातून निघतीलही तेच जे कल्पापूर्वी निघाले असतील. संगमयुगाचीही चांगल्या प्रकारे
आठवण करायची आहे. आम्ही पुरुषोत्तम अर्थात मनुष्यापासून देवता बनत आहोत. मनुष्य तर
हे सुद्धा समजत नाहीत की, नरक काय आहे आणि स्वर्ग काय आहे? म्हणतात - सर्वकाही इथेच
आहे, जे सुखी आहेत ते स्वर्गामध्ये आहेत, जे दुःखी आहेत ते नरकामध्ये आहेत. अनेक मते
आहेत ना. एका घरामध्ये देखील अनेक मते होतात. मुले इत्यादीमध्ये मोह असतो, तो सुटत
नाही. मोहवश काही समजतात थोडेच की आम्ही कसे राहतो. विचारतात - मुलाचे लग्न करावे
का? परंतु मुलांना हा देखील नियम समजावून सांगितला जातो की, तुम्ही एकीकडे
स्वर्गवासी होण्यासाठी ज्ञान घेत आहात, दुसरीकडे विचारता त्याला नरकामध्ये टाकू का?
विचारता तर बाबा म्हणतील - ‘जा, जाऊन करा’. बाबांना विचारता याचा अर्थ बाबा म्हणतात
- यांचा मोह आहे. आता नाही म्हटले तरीही अवज्ञा करतील. मुलीचे तर लग्न करायचेच आहे
नाहीतर संगदोषामध्ये येऊन खराब होते. मुलाचे लग्न तुम्ही करू शकत नाही. परंतु तेवढी
हिंमत हवी ना! बाबांनी यांच्याकडून कृती करून घेतली ना. यांना पाहून मग इतर करू
लागले. घरामध्ये सुद्धा पुष्कळ भांडणे चालू असतात. ही आहेच तंट्याची दुनिया,
काट्यांचे जंगल आहे ना. एकमेकांना टोचत राहतात (दुःख देत राहतात.). स्वर्गाला म्हटले
जाते - गार्डन. हे आहे - जंगल. बाबा येऊन काट्यांपासून फूल बनवतात. कोणी विरळेच
निघतात, प्रदर्शनीमध्ये भले ‘हो-हो’ असे करतात परंतु समजत काहीच नाहीत. एका कानाने
ऐकतात आणि दुसऱ्याने सोडून देतात. राजधानी स्थापन करण्यासाठी वेळ तर लागतो ना.
मनुष्य स्वतःला काटा समजतात थोडेच. यावेळी चेहरा भले मनुष्याचा आहे परंतु सीरत (वर्तन)
माकडापेक्षाही वाईट आहे. परंतु स्वतःला असे समजत नाहीत; तर बाबा म्हणतात - आपल्या
रचनेला (पत्नी-मुलाबाळांना) समजावून सांगायचे आहे. जर ऐकत नसतील तर मग पळवून लावले
पाहिजे. परंतु तेवढी ताकद हवी ना. मोहाचा कीडा असा लागलेला असतो जो निघू शकत नाही.
इथे तर नष्टो-मोहा बनायचे आहे. ‘मेरा तो एक दूसरा न कोई’. आता बाबा आलेले आहेत,
आपल्याला घेऊन जाण्याकरिता. पावन बनायचे आहे. नाहीतर खूप सजा खाल, पद सुद्धा भ्रष्ट
होईल. आता स्वतःला सतोप्रधान बनविण्याचाच ध्यास लागलेला आहे. ‘शिव’च्या मंदिरामध्ये
जाऊन तुम्ही समजावून सांगू शकता - भगवंताने भारताला स्वर्गाचा मालक बनवले होते, आता
ते पुन्हा बनवत आहेत; म्हणतात - फक्त मामेकम् (मज एकाची) आठवण करा. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) या जुन्या
दुनियेपासून बेहदचे वैरागी बनून आपले सर्वकाही अर्पण करायचे आहे. माझे काहीही नाही,
हा देह देखील माझा नाही. यातून मोह नष्ट करून नष्टो-मोहा बनायचे आहे.
२) कधीही अशी कोणती
चूक करायची नाही ज्यामुळे रजिस्टर वर डाग लागेल. सर्व दैवी गुण धारण करायचे आहेत,
आतमध्ये थोडासुद्धा क्रोधाचा अंश नसावा.
वरदान:-
बोलणे, विचार
करणे आणि प्रत्यक्ष कृती करणे - या तिघांनाही समान बनविणारे ज्ञानी तू आत्मा भव
आता वानप्रस्थ
अवस्थेमध्ये जाण्याची वेळ जवळ येत आहे - त्यामुळे ‘मी’पणाच्या कमजोरींना किंवा
व्यर्थच्या खेळाला समाप्त करून बोलणे, विचार करणे आणि प्रत्यक्ष कृती करणे समान बनवा
तेव्हाच म्हणणार ज्ञान स्वरूप. जे असे ज्ञानस्वरूप ज्ञानी तू आत्मे आहेत त्यांचे
प्रत्येक कर्म, संस्कार, गुण आणि कर्तव्य समर्थ बाबांसारखे असेल. ते कधीही व्यर्थचे
विचित्र खेळ खेळू शकत नाहीत. सदैव परमात्म मिलनाच्या खेळामध्ये बिझी राहतील. एका
बाबांसोबत मिलन साजरे करतील आणि इतरांना बाप समान बनवतील.
बोधवाक्य:-
सेवेचा उमंग
छोट्या-छोट्या आजारांना मर्ज करून टाकतो.
अव्यक्त इशारे -
आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा, अंतर्मुखी बना:-
अंतर्मुखी अर्थात मुख
आणि मनाचे मौन ठेवणारे. मुखाचे मौन तर दुनियेमध्ये सुद्धा ठेवतात परंतु इथे व्यर्थ
संकल्पापासून मनाचे मौन असायला हवे. जसे ट्रॅफिक कंट्रोल करता तर व्यर्थच्या
ट्रॅफिकला कंट्रोल करता तसे अधून-मधून एक दिवस मनाच्या व्यर्थचा ट्रॅफिक कंट्रोल करा.