15-06-25    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   30.11.2005  ओम शान्ति   मधुबन


“समयाच्या समीपतेनुसार स्वतःला हदच्या बंधनांमधून मुक्त करून संपन्न आणि समान बना”


आज बापदादा चोहो बाजूच्या संपूर्ण समान मुलांना बघत आहेत. समान मुलेच बाबांच्या हृदयामध्ये सामावलेली आहेत. समान मुलांची विशेषता आहे - ते सदैव निर्विघ्न, निर्विकल्प, निर्मान आणि निर्मल (विनम्र आणि निर्मळ) असतील. असे आत्मे सदैव स्वतंत्र असतात, कोणत्याही प्रकारच्या हदच्या बंधनामध्ये बंधायमान नसतात. तर आपणच आपल्याला विचारा - अशी बेहदची स्वतंत्र आत्मा बनलो आहे! सर्वात पहिली स्वतंत्रता आहे देहभानापासून स्वतंत्र. जेव्हा हवे तेव्हा देहाचा आधार घ्या, जेव्हा हवे तेव्हा देहापासून न्यारे व्हा. देहाच्या आकर्षणामध्ये येऊ नका. दुसरी गोष्ट - स्वतंत्र आत्मा कोणत्याही जुन्या स्वभाव आणि संस्काराच्या बंधनामध्ये अडकलेली नसेल. जुना स्वभाव आणि संस्कारापासून मुक्त असेल. त्याच सोबत कोणत्याही देहधारी आत्म्याच्या संबंध-संपर्कामध्ये आकर्षित होणार नाही. संबंध-संपर्कामध्ये येत असताना देखील न्यारे आणि प्रिय असतील. तर स्वतःला चेक करा - कोणतेही छोटे कर्मेंद्रिय बंधनामध्ये बांधून तर ठेवत नाही ना? आपल्या स्वमानाची आठवण करा - मास्टर सर्वशक्तिवान, त्रिकालदर्शी, त्रिनेत्री, स्वदर्शन चक्रधारी, याच स्वमानाच्या आधारावर सर्वशक्तीवानच्या मुलांना कोणतेही कर्मेंद्रिय आकर्षित करू शकेल काय? कारण समयाच्या समीपतेला बघताना स्वतःला पहा - सेकंदामध्ये सर्व बंधनांमधून मुक्त होऊ शकता? कोणतेही असे बंधन राहिलेले तर नाही ना? कारण लास्ट पेपरमध्ये नंबरवन होण्याचे प्रत्यक्ष प्रमाण आहे, सेकंदामध्ये मन-बुद्धीला जिथे आणि जसे टिकवू इच्छिता तिथे सेकंदामध्ये टिकावे. विचलित होऊ नये. जसे स्थूल शरीराद्वारे जिथे जाऊ इच्छिता, जाऊ शकता ना! तसे बुद्धीद्वारे ज्या स्थितीमध्ये स्थित होऊ इच्छिता त्यामध्ये स्थित होऊ शकता का? जसे विज्ञानाने लाइट हाऊस, माइट हाऊस बनवले आहे, तर सेकंदामध्ये स्विच ऑन करताच लाइट हाऊस चोहो बाजूला लाइट देऊ लागतो, माइट देऊ लागतो. असे तुम्ही स्मृतीच्या संकल्पाचा स्विच ऑन केल्यावर लाइट हाऊस, माइट हाऊस होऊन आत्म्यांना लाइट, माइट देऊ शकता का? एक सेकंदाची ऑर्डर असेल अशरीरी बना, बनाल ना! का युद्ध करावे लागेल? असा दीर्घ काळाचा अभ्यासच शेवटी सहयोगी बनेल. जर दीर्घ काळाचा अभ्यास नसेल तर त्यावेळी अशरीरी बनण्यासाठी मेहनत करावी लागेल म्हणून बापदादा हाच इशारा देत आहेत की संपूर्ण दिवसभरामध्ये कर्म करत असताना देखील वारंवार हा अभ्यास करत रहा. यासाठी मनाच्या कंट्रोलिंग पॉवरची आवश्यकता आहे. जर मन कंट्रोलमध्ये आले तर कोणतेही कर्मेंद्रिय वशीभूत करू शकणार नाही.

आता सर्व आत्म्यांना तुमच्या द्वारे शक्तीचे वरदान हवे आहे. सर्व आत्म्यांची तुम्हा मास्टर सर्वशक्तिवान आत्म्यांप्रती हीच शुभ इच्छा आहे की, मेहनती शिवाय वरदान द्वारा, दृष्टी द्वारे, व्हायब्रेशन द्वारे आम्हाला मुक्त करा. आता मेहनत करून सगळे थकले आहेत. तुम्ही सर्व तर मेहनतीपासून मुक्त झाला आहात ना! की अजूनही मेहनत करावी लागते? सांगितले होते, मेहनती पासून मुक्त होण्याचे सहज साधन आहे - अंतःकरणापासून बाबांचे अति स्नेही बनणे. तुम्हा ब्राह्मण आत्म्यांचे जन्माच्या वेळचे वचन आहे, लक्षात आहे वचन? जर बाबांनी तुम्हाला आपले बनवले, ब्राह्मण जीवन दिले तर ब्राह्मण जीवनाचे तुम्हा सर्वांचे वचन कोणते आहे? ‘एक बाबा दुसरा न कोई’. लक्षात आहे वचन? लक्षात असेल तर मान हलवा. अच्छा हात हलवत आहेत. लक्षात आहे पक्के का कधी-कधी विसरून जाता? आता बघा ६३ जन्म तर विसराळू बनलात, आता हा एक जन्म स्मृती स्वरूप बनला आहात. तर बाबा मुलांना विचारत आहेत लहानपणीचे वचन लक्षात आहे का? किती सोपे करून दिले आहे - एका बाबांमध्ये संसार आहे. एका बाबांशीच सर्व नाती आहेत. एका बाबांकडून सर्व प्राप्ती आहेत. शिकवणारे देखील एकच आहेत आणि पालना करणारे सुद्धा आहेत. सगळ्यामध्ये एक आहेत. मग परिवार देखील आहे, ईश्वरीय परिवार परंतु परिवार सुद्धा एका बाबांचाच आहे. वेगवेगळ्या बाबांचा परिवार नाहीये. एकच परिवार आहे. परिवारामध्ये देखील एकमेकांमध्ये आत्मिक स्नेह आहे, स्नेह नाही आत्मिक स्नेह. बापदादा जन्माच्यावेळी दिलेल्या वचनाची आठवण करून देत आहेत, आणखी काय वचन दिलेत? सर्वांनी खूप उमंग-उत्साहाने बाबांसमोर मनापासून म्हटले - ‘सर्व काही तुमचे आहे’. तन-मन-धन सर्व तुमचे आहे. तर तुम्ही दिलेली वस्तू बाबांची ठेव म्हणून तुम्हाला बाबांनी कार्यामध्ये लावण्यासाठी दिलेली आहे, तुम्ही बाबांना दिली आहे, दिली आहे ना? का परत थोडी-थोडी घेत राहता? परत घेत असाल तर अमानत मध्ये ख्यानत (विश्वासघात) ठरतो. काही-काही मुले म्हणतात, रुहरिहान करत असतात ना तर म्हणतात - ‘माझे मन अस्वथ राहते’, ‘माझे मन’ आले कुठून? जर ‘माझे’ तुम्हाला (बाबांना) अर्पण केले, तर ‘माझे मन’ आले कुठून? तुम्ही सर्व तर बिन कवडी बादशहा झालात, आता तुमचे काहीही राहिलेले नाही, बिना कवडी झालात परंतु बादशहा झालात. असे का? बाबांचा खजिना तो तुमचा खजिना झाला, तर बादशहा झालात ना! परमात्म खजिना तो मुलांचा खजिना. तर बापदादा दिलेल्या वचनांची आठवण करून देत आहेत. ‘तुझे’ मध्ये ‘माझे’ म्हणू नका. बाबा म्हणत आहेत - जर बाबांनी तुम्हा सर्वांना परमात्म खजिन्यांनी माला-माल केले आहे, जबाबदारी बाबांनी घेतली, कोणत्या शब्दांमध्ये? ‘तुम्ही माझी आठवण करा तर सर्व प्राप्तीचे अधिकारी आहातच’. केवळ आठवण करा. आणि तुम्ही म्हटले - ‘आम्ही तुमचे, तुम्ही आमचे’. हे वचन आहे ना! तर बाबा म्हणत आहेत - खजिन्यांना सदैव स्वतः प्रति आणि सर्व आत्म्यांप्रती कार्यामध्ये लावा. जितके कार्यामध्ये लावाल तितकाच खजिना वाढत जाईल. सर्वशक्तींचा खजिना, सर्व शक्ती कार्यामध्ये वापरा. नॉलेज केवळ बुद्धीमध्ये ठेवू नका की, मी सर्वशक्तिवान आहे, परंतु सर्व शक्तींना समयानुसार कार्यामध्ये वापरा आणि सेवेमध्ये वापरा.

बापदादांनी मेजॉरिटी मुलांचा पोतामेल बघितला आहे दोन शक्ती जर सदैव लक्षात राहिल्या आणि वेळेवर कार्यामध्ये लावल्या तर सदैव निर्विघ्न रहाल. विघ्ने तुमच्यासमोर येण्याचे धाडसही करणार नाहीत, ही बाबांची गॅरंटी आहे. तसे तर सर्व शक्तींची आवश्यकता आहे परंतु मेजॉरिटी बघितले आहे की सहनशक्ती आणि रियलाझेशनची शक्ती, रियलाईज करता देखील परंतु त्याला प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये आणण्यामध्ये अटेंशन कमी आहे त्यामुळे ज्यावेळी रियलाईज करता त्यावेळी चलन आणि चेहरा बदलून जातो. खूप छान उमंग-उत्साहामध्ये येता, हां रियलाईज केले परंतु नंतर काय होते? अनुभवी तर सगळे आहात ना! नंतर काय होते? त्याला प्रत्येकवेळी स्वरूपामध्ये आणा, त्याची कमतरता होते कारण इथे स्वरूप बनायचे आहे. केवळ बुद्धीने जाणणे वेगळी गोष्ट आहे, परंतु त्याला स्वरूपामध्ये आणणे, याची गरज आहे. कधी-कधी बापदादांना काही-काही मुलांची दया देखील येते, बाबा समजतात मुलांकडून मेहनत होत नाही तर मुलां ऐवजी बाबांनीच करून द्यावे. परंतु ड्रामाचे रहस्य आहे “जो करेगा वह पायेगा” म्हणून बापदादा सहयोग जरूर देतात परंतु तरीही करायला मुलांनाच लागते.

बापदादांनी बघितले आहे मुले संकल्प खूप छान-छान करतात. अमृतवेलेला बापदादांपाशी चांगल्या-चांगल्या संकल्पांच्या खूप-खूप माळा येतात. ‘हे करू, असे करू, तसे करू…’, बापदादा देखील खुश होतात, व्वा! मुलांनो व्वा! मग करण्यामध्ये कमजोर का बनता? याचे कारण पाहिले गेले - ब्राह्मण परिवारामध्ये संघटनचे वायुमंडळ. काही ठिकाणी वायुमंडळ कमजोर देखील असते, त्याचा प्रभाव लवकर पडतो. मग त्यांची भाषा सांगू काय असते? भाषा खूप गोड असते, भाषा असते - ‘हे तर चालतेच, असे तर होतच राहते…’ अशा वेळी काय संकल्प कराल! ‘असे होते, हे तर चालतेच…’ यामुळे निष्काळजीपणा येतो परंतु त्यावेळी या भाषेला परिवर्तन करा, विचार करा की बाबांचा आदेश काय आहे? बाबांना काय पसंत आहे? बाबा कोणत्या गोष्टीला पसंत करतात? बाबांनी ते सांगितले आहे? केले आहे? जर बाबांची आठवण आली तर निष्काळजीपणा नाहीसा होऊन, उमंग-उत्साह येईल. निष्काळजीपणा सुद्धा अनेक प्रकाराने येतो. तुम्ही लोक आपसामध्ये क्लास करा, लिस्ट काढा, एक आहे साधारण निष्काळजीपणा, एक आहे रॉयल निष्काळजीपणा. तर हा निष्काळजीपणा संकल्पामध्ये दृढता आणू देत नाही आणि दृढता सफलतेचे साधन आहे म्हणून संकल्पापर्यंत राहते परंतु स्वरूपामध्ये येत नाही.

तर आज काय ऐकले? वचन लक्षात आणून दिले ना! वचने इतकी चांगली-चांगली देता, बापदादा वचने ऐकून खुश होतात. परंतु जितकी वचने देता ना तितका त्याचा तुम्ही फायदा घेत नाही. तर बापदादा हेच इच्छितात, तुम्ही विचारता ना की, बाबांना आमच्याकडून काय हवे आहे? तर बापदादांना आमच्याकडून हीच अपेक्षा आहे की वेळेच्या अगोदर सर्वांनी एव्हररेडी बना. समयाने तुमचा शिक्षक बनू नये. समयाचे मास्टर तुम्ही आहात, म्हणून बापदादा हेच इच्छितात की वेळेच्या अगोदर संपन्न बनून विश्वाच्या स्टेजवर बाबांसोबत तुम्ही मुले देखील प्रत्यक्ष व्हा. अच्छा.

जी नवीन मुले भेटण्यासाठी आली आहेत, त्यांनी हात वर करा. मोठा हात वर करा, उंच. अच्छा - बापदादा नवीन मुलांना पाहून आनंदित होत आहेत की भाग्यवान मुले आपले भाग्य घेण्यासाठी पोहोचले म्हणून मुबारक असो, मुबारक असो. आता जी कोणी नवीन मुले आली आहेत त्यांच्यामध्ये मी बघणार की, कोण कमाल (चमत्कार) करून दाखवतो ते? भले आले मागाहून आहेत परंतु पुढे जाऊन दाखवा. बापदादांपाशी तर सर्वांचा रिझल्ट पोहोचतो. अच्छा.

डबल विदेशी:- चांगले आहे, डबल विदेशी स्वतःवर आणि सेवेवर चांगले अटेंशन देत आहेत. परंतु यामध्ये फक्त एक मात्रा लावायची आहे. अंडरलाइन करायची आहे, जो परिवर्तनाचा संकल्प घेता आणि छान उमंग-उत्साहाने, हिंमत ठेवून घेता, त्याला फक्त अंडरलाइन करत जा, करायचेच आहे. बदलायचेच आहे. बदलून विश्वाला बदलायचे आहे. ही दृढतेची अंडरलाइन वारंवार करत जा. बाकी बापदादा खुश आहेत, वृद्धी देखील करत आहात तसेच सेवा आणि स्वतःवर सुद्धा अटेंशन आहे. परंतु पूर्ण टेंशन गेलेले नाही, अटेंशन आहे थोडे मधून-मधून टेंशन देखील आहे, ते संपवून टाकायचेच आहे. बाकी हिंमत चांगली आहे. हिंमतीसाठी मुबारक असो, सगळे जे पण बसले आहेत बाबांसह तुम्हा सर्वांना हिंमतीची मुबारक देत आहेत. टाळ्या वाजवा. अच्छा.

तुम्ही तर इथे बसले आहात परंतु बापदादांना दूर बसलेल्या बऱ्याच मुलांची प्रेमपूर्वक आठवण मिळाली आहे आणि बापदादा प्रत्येक मुलाला डोळ्यांमध्ये सामावून घेत अंत:करणापासून खूप-खूप आशीर्वाद देत आहेत. भले भारतातील असो किंवा विदेशातील, अनेक मुलांकडून आठवण येत आहे, पत्र येतात, ई-मेल येतात, सर्व बाबांपाशी पोहोचले आहे. अच्छा.

बापदादा एका सेकंदामध्ये ‘अशरीरी भव’ची ड्रिल पाहू इच्छितात, जर अंतिम समयाच्या वेळी पास व्हायचे असेल तर ही ड्रिल खूप आवश्यक आहे त्यामुळे आता इतक्या मोठ्या संघटनमध्ये बसले असताना एका सेकंदामध्ये देहभानापासून परे स्थितीमध्ये स्थित व्हा. कोणतेही आकर्षण आकर्षित करू नये. (ड्रिल) अच्छा.

चोहो बाजूच्या तीव्र पुरुषार्थी मुलांना, सदैव स्व-परिवर्तन आणि विश्व परिवर्तनाच्या सेवेमध्ये तत्पर राहणाऱ्या विशेष आत्म्यांना, सदैव ब्रह्मा बाबा समान कर्मयोगी, कर्माच्या, कर्मेंद्रियांच्या आकर्षणापासून मुक्त आत्म्यांना, सदैव दृढतेला प्रत्येक संकल्पामधून, प्रत्येक शब्दामधून, प्रत्येक कर्मामधून स्वरूपामध्ये आणणाऱ्या बाबांच्या समीप आणि समान मुलांना बापदादांचे अंतःकरणापासून आशीर्वाद आणि अंतःकरणापासून प्रेमपूर्वक आठवण स्वीकार असो आणि नमस्ते.

दादींजीं सोबत बातचीत:- तंदुरुस्त झालात. आता आजार गेला. आजार महारथींना निरोप देण्यासाठी येतो. आतल्या-आत कर्मातीत बनण्याची प्रॅक्टिस करत आहे. (दादी जानकी म्हणत आहेत - दादी बेफिकीर बादशहा आहे).

तुम्ही चिंता करणाऱ्या आहात का? तुम्ही देखील बेफिकीर (निश्चिंत) आहात. दोघीही छान पार्ट बजावत आहात. पहा, सर्वात मोठ्यात मोठा जबाबदारीचा ताज घालणाऱ्या निमित्त तर बनलात ना. या सर्व सोबती आहेत. तुम्हा लोकांना पाहून उमंग-उत्साह येतो ना. (आता नवीन काय करायचे आहे? बाबांनीच काही प्रेरणा द्यावी) बापदादांनी सांगितले आहे की, प्रत्येक वर्गाचा (क्षेत्रातील) गुलदस्ता जो माइक देखील असावा आणि माइट सुद्धा असावा. केवळ माइक आणि संपर्कवाला नाही, तर संबंधामध्ये देखील समीप असावा, असा गुलदस्ता तयार करा. मग तो ग्रुप सेवा करण्यासाठी निमित्त बनेल. तो माइक बनेल आणि तुम्ही (दादी) माइट बनाल. त्यांच्या हृदयातून निघावे - ‘बाबा’, तेव्हा प्रभाव पडेल. त्यांना संबंधामध्ये समीप आणा. कधी-कधी असे काहीतरी होते ना, तर मग नशा थोडा कमी होतो. जिथे कुठे संबंध-संपर्कामध्ये येतील तिथे त्यांच्याशी संबंध आणि संपर्क राहिला तरी चांगले होतील. अच्छा.

वरदान:-
सदैव श्रेष्ठ आणि नवीन प्रकारच्या सेवेद्वारे वृद्धी करणारे सहज सेवाधारी भव

संकल्पांद्वारे ईश्वरीय सेवा करणे ही देखील सेवेची श्रेष्ठ आणि नवीन पद्धत आहे, जसे ज्वेलर रोज सकाळी आपल्या प्रत्येक रत्नाला चेक करतो की स्वच्छ आहे, त्याची चमक ठीक आहे, योग्य जागेवर ठेवली आहेत… असे रोज अमृतवेलेला आपल्या संपर्कामध्ये येणाऱ्या आत्म्यांवर संकल्पाद्वारे नजर फिरवा, जितकी तुम्ही त्यांची संकल्पाद्वारे आठवण कराल तितका तो संकल्प त्यांच्यापाशी पोहोचेल… या प्रकारे सेवेची नवीन पद्धत स्वीकारून वृद्धी करत चला. तुमच्या सहजयोगाची सूक्ष्म शक्ती आत्म्यांना तुमच्याकडे आपोआप आकर्षित करेल.

सुविचार:-
बहाणेबाजीला मर्ज करा आणि बेहदच्या वैराग्य वृत्तीला इमर्ज करा.

अव्यक्त इशारे - आत्मिक स्थितीमध्ये रहाण्याचा अभ्यास करा, अंतर्मुखी बना :

ज्ञानाचे मनन करण्यासोबत शुभ-भावना, शुभ-कामनेचे संकल्प, सकाश देण्याचा अभ्यास, असा मनाच्या मौनाचा किंवा ट्रॅफिक कंट्रोलचा मधून-मधून एक दिवस निश्चित करा. जितके अंतर्मुखतेच्या खोलीमध्ये बसून रिसर्च कराल तितके चांगले-चांगले टचिंग होईल आणि त्याच टचिंग द्वारे अनेक आत्म्यांना लाभ मिळेल.


सूचना:- आज आंतरराष्ट्रीय योग दिवस तिसरा रविवार आहे, सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजे पर्यंत सर्व भाऊ-बहिणी संघटित रूपामध्ये एकत्रित होऊन योग अभ्यासामध्ये अनुभव करा की मी भृकुटी आसनावर विराजमान परमात्म शक्तीने संपन्न सर्वश्रेष्ठ राजयोगी आत्मा कर्मेंद्रियजीत, विकर्माजीत आहे. संपूर्ण दिवस याच स्वमानामध्ये रहा की, साऱ्या कल्पामध्ये हिरो पार्ट बजावणारी मी सर्वश्रेष्ठ महान आत्मा आहे.