16-05-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुमचे प्रेम एका बाबांवर आहे कारण तुम्हाला बेहदचा वारसा मिळणार आहे,
तुम्ही प्रेमाने म्हणता - ‘मेरा बाबा’”
प्रश्न:-
कोणत्याही
देहधारी मनुष्याच्या शब्दांची तुलना बाबांशी केली जाऊ शकत नाही आणि का?
उत्तर:-
कारण बाबांचा एक-एक शब्द महावाक्य आहे, ज्या महावाक्यांना ऐकणारे महान अर्थात
पुरुषोत्तम बनतात. बाबांची महावाक्ये गुल-गुल अर्थात फूल बनवतात. मनुष्याचे शब्द
काही महावाक्ये नाहीत, यांच्यामुळे तर अजूनच खाली घसरत आले आहेत.
गीत:-
बदल जाए दुनिया...
ओम शांती।
या गाण्याच्या पहिल्या ओळीमध्ये थोडा फार अर्थ आहे, बाकी सर्व गाणे काहीच कामाचे
नाहीये. जसे गीतेमध्ये भगवानुवाच मनमनाभव, मध्याजी भव हे शब्द बरोबर आहेत. याला
पिठात मीठ म्हटले जाते. आता भगवान कोणाला म्हटले जाते हे तर मुलांना व्यवस्थित समजले
आहे. भगवान शिवबाबांना म्हटले जाते. शिवबाबा येऊन शिवालय रचतात. येतात कुठे?
वेश्यालयामध्ये. स्वतः येऊन म्हणतात - ‘गोड-गोड लाडक्या, सिकिलध्या आत्मिक मुलांनो’,
ऐकते तर आत्माच ना. तुम्ही जाणता आपण आत्मे अविनाशी आहोत. हा देह विनाशी आहे. आम्ही
आत्मे आता आपल्या परमपिता परमात्म्याकडून महावाक्ये ऐकत आहोत. महावाक्ये एका परमपिता
परमात्म्याचीच आहेत जे महान-पुरूष पुरुषोत्तम बनवतात. बाकी जे कोणी महात्मे, गुरु
इत्यादी आहेत, त्यांची काही महावाक्ये नाही आहेत. ‘शिवोहम्’ असे जे म्हणतात ते
देखील काही बरोबर वाक्य नाहीये. आता तुम्ही बाबांकडून महावाक्ये ऐकून गुल-गुल (फूल)
बनता. काटे आणि फुलांमधे किती फरक आहे. आता तुम्ही मुले जाणता आम्हाला काही कोणी
मनुष्य ऐकवत नाहीत. यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) शिवबाबा विराजमान आहेत, ते
देखील आत्माच आहेत, परंतु त्यांना म्हटले जाते परम आत्मा. आता पतित आत्मे म्हणतात -
‘हे परम आत्मा या, येऊन आम्हाला पावन बनवा’. ते आहेतच परमपिता, परम बनविणारे. तुम्ही
पुरुषोत्तम अर्थात सर्व पुरुषांमध्ये उत्तम पुरुष बनता. ते आहेत देवी-देवता. परमपिता
शब्द खूप गोड आहे. सर्वव्यापी म्हटल्याने तो गोडवा येत नाही. तुमच्यामध्ये देखील असे
फार थोडे आहेत जे प्रेमाने आतल्या आत आठवण करतात, ते पती-पत्नी तर एकमेकांची स्थूल
रीतीने (देहाची) आठवण करतात. हे आहे आत्म्यांनी परमात्म्याची खूप प्रेमाने आठवण करणे.
भक्तीमार्गामध्ये इतक्या प्रेमाने पूजा करू शकत नाहीत. ते प्रेम असत नाही. ओळखतच
नाहीत तर प्रेम तरी कसे वाटेल. आता तुम्हा मुलांचे खूप प्रेम आहे. आत्मा म्हणते
‘मेरा बाबा’. आत्मे भाऊ-भाऊ आहेत ना. प्रत्येक भाऊ म्हणतो बाबांनी आम्हाला आपला
परिचय दिला आहे. परंतु त्याला प्रेम म्हटले जात नाही. ज्याच्याकडून काही मिळते
त्याच्यावर प्रेम असते. वडिलांवर मुलांचे प्रेम असते कारण वडिलांकडून वारसा मिळतो.
जितका वारसा जास्त, तितके मुलाचे प्रेम जास्त असते. जर वडिलांकडे काहीही प्रॉपर्टी
नसेल, आजोबांकडे असेल तर मग वडिलांवर इतके प्रेम असणार नाही. मग आजोबांवर प्रेम
असेल. समजतील यांच्याकडून धन मिळणार. आता तर आहेत बेहदचे बाबा. तुम्ही मुले जाणता
आम्हाला बाबा शिकवत आहेत. ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे. भगवान आमचे पिता आहेत, ज्या
रचता पित्याला कोणीही जाणत नाहीत. न जाणल्या कारणाने मग स्वतःला पिता म्हणवतात. जसे
मुलाला विचारा तुझे वडील कोण? सरते शेवटी ते (लौकिक पिता) म्हणतील मीच त्याचा पिता
आहे. आता तुम्ही मुले जाणता त्या सर्व पित्यांचा पिता आहे नक्की, आम्हाला आता जे
बेहदचे बाबा मिळाले आहेत त्यांचा कोणीही पिता नाहीये. हे आहेत सर्वोच्च पिता. तर
मुलांना आतून आनंद वाटला पाहिजे. त्या (दुनियेतील) यात्रांना जातात तर तिथे इतका
आनंद होत नाही कारण काहीच प्राप्ती नसते. फक्त दर्शन घ्यायला जातात. फुकटची किती
दगदग करतात. एक तर हे कपाळ झिजले आणि दुसरे मग पैशाची सुद्धा माती होते. खूप पैसे
खर्च करतात, प्राप्ती काहीच नाही. भक्तीमार्गामध्ये जर कमाई झाली असती तर भारतवासी
खूप श्रीमंत झाले असते. ही मंदिरे वगैरे बनवण्यासाठी करोडो रूपये खर्च करतात. तुमचे
सोमनाथचे मंदिर काही एकच नव्हते. सर्व राजांकडे मंदिरे होती. तुम्हाला किती धन दिले
होते - ५ हजार वर्षांपूर्वी तुम्हाला विश्वाचे मालक बनवले होते. एक बाबाच असे
म्हणतात. आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी तुम्हाला राजयोग शिकवून असे बनवले होते. आता
तुम्ही काय बनले आहात. बुद्धीमध्ये आले पाहिजे ना. आपण किती श्रेष्ठ होतो,
पुनर्जन्म घेत-घेत एकदम जमिनीवर येऊन पडलो आहोत. कौडीतुल्य बनलो आहोत. आता पुन्हा
आम्ही बाबांकडे जात आहोत. जे बाबा आम्हाला विश्वाचे मालक बनवत आहेत. ही एकच यात्रा
आहे जेव्हा आत्म्यांना बाबा भेटतात, तर आतून ते प्रेम वाटले पाहिजे. तुम्ही मुले
जेव्हा इथे येता तेव्हा बुद्धीमध्ये राहिले पाहिजे की आम्ही अशा बाबांकडे जात आहोत,
ज्यांच्याकडून आम्हाला पुन्हा विश्वाची बादशाही मिळते. ते बाबा आम्हाला शिकवण देतात
- मुलांनो, दैवीगुण धारण करा. सर्वशक्तिमान पतित-पावन मज पित्याची आठवण करा. मी
कल्प-कल्प येऊन सांगतो की मामेकम् (मज एकाची) याद करा तर विकर्म विनाश होतील.
मनामध्ये हे आले पाहिजे आम्ही बेहदच्या बाबांजवळ आलो आहोत. बाबा म्हणतात - मी गुप्त
आहे. आत्मा म्हणते - मी गुप्त आहे. तुम्ही समजता आम्ही शिवबाबांकडे, ब्रह्मा दादाकडे
जात आहोत. जे कंबाइंड आहेत त्यांना भेटण्यासाठी आम्ही जात आहोत, ज्यांच्यामुळे आम्ही
विश्वाचे मालक बनतो. आतून किती बेहद आनंद झाला पाहिजे. जेव्हा मधुबनला येण्यासाठी
आपल्या घरून निघता तेव्हा आतून किती परमानंद झाला पाहिजे. बाबा आम्हाला
शिकविण्यासाठी आले आहेत, आम्हाला दैवीगुण धारण करण्याची युक्ती सांगत आहेत. घरातून
निघण्याच्या वेळीच आतून हा आनंद झाला पाहिजे. जशी कन्या पतीला भेटते तेव्हा दागिने
वगैरे घालते तर चेहरा खुलून येतो. तो चेहरा खुलतो दुःख मिळवण्यासाठी. तुमचा चेहरा
खुलतो सदा सुख प्राप्त करण्यासाठी. तर अशा बाबांकडे येताना किती आनंद झाला पाहिजे.
आता आम्हाला बेहदचे बाबा मिळाले आहेत. सतयुगामध्ये जाल मग डिग्री कमी होईल. आता तर
तुम्ही ब्राह्मण ईश्वरीय संतान आहात. भगवान बसून शिकवतात. ते आमचे पिता देखील आहेत,
टीचर देखील आहेत, शिकवतात आणि मग पावन बनवून सोबतही घेऊन जातील. आम्हा आत्म्यांची
आता या घाणेरड्या (पतित) रावणराज्यातून सुटका होते. आतून अपार आनंद झाला पाहिजे -
जेव्हा की बाबा आपल्याला विश्वाचा मालक बनवत आहेत तर अभ्यास किती चांगल्या प्रकारे
केला पाहिजे. स्टुडंट जेव्हा चांगला अभ्यास करतात तेव्हा चांगल्या मार्कांनी पास
होतात, मुले म्हणतात - ‘बाबा, आम्ही तर श्री नारायण बनणार’. ही आहेच सत्यनारायणाची
कथा अर्थात नरापासून नारायण बनण्याची कथा. त्या खोट्या कहाण्या जन्म-जन्मांतर ऐकत
आला आहात. आता बाबांकडून एकदाच तुम्ही खरीखुरी कथा ऐकता. ते सर्व मग
भक्तीमार्गामध्ये चालत येते. जसा शिवबाबांनी जन्म घेतला त्यांची मग वर्षानुवर्षे
जयंती साजरी करत आले आहेत. ते केव्हा आले, काय केले काहीही जाणत नाहीत. अच्छा,
कृष्ण जयंती साजरी करतात, तो देखील कधी आला, कसा आला, काहीच पत्ता नाही. म्हणतात -
कंसपुरीमध्ये येतो, आता तो पतित दुनियेमध्ये कसा जन्म घेईल! मुलांना किती आनंद झाला
पाहिजे - आम्ही बेहदच्या बाबांकडे जात आहोत. अनुभव सुद्धा ऐकवतात ना - आम्हाला
अमक्याद्वारे तिर लागला, बाबा आले आहेत...! बस्स, त्या दिवसापासून आम्ही बाबांचीच
आठवण करतो.
ही आहे तुमची मोठ्यात
मोठी बाबांकडे येण्याची यात्रा. बाबा तर चैतन्य आहेत, मुलांकडे जातात सुद्धा. त्या
आहेत जड यात्रा (भौतिक यात्रा). इथे तर बाबा चैतन्यमध्ये आहेत. जशी मी आत्मा बोलते,
तसे हे परमात्मा बाबा देखील शरीराद्वारे बोलतात. हे शिक्षण आहे भविष्य २१ जन्म
उदरनिर्वाहाकरिता. ते (लौकिक शिक्षण) आहे फक्त या एका जन्मासाठी. आता कोणते शिक्षण
शिकले पाहिजे आणि कोणता व्यवसाय केला पाहिजे? बाबा म्हणतात - दोन्ही करा.
संन्याशांप्रमाणे घर-दार सोडून जंगलामध्ये जायचे नाहीये. हा तर प्रवृत्ती मार्ग आहे
ना. दोघांसाठीही हे शिक्षण आहे. सगळेच तर शिकणार सुद्धा नाहीत. कोणी चांगले शिकतील,
कोणी कमी. कोणाला एकदम लगेच तीर लागेल (ज्ञान काळजाला भिडेल). कोणी तर वेड्यासारखे
बोलत राहतील. कोणी म्हणतात - हो, आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करू. कोणी म्हणतील -
या तर एकांतामध्ये समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. बस्स, आणि मग नाहीसे होतील.
कोणाला ज्ञानाचा तीर लागला तर ताबडतोब येऊन समजून घेतील. कोणी मग म्हणतील - आम्हाला
फुरसत नाही. तर समजा बाण लागला नाही. बघा, बाबाला (ब्रह्मा बाबांना) तीर लागला तर
ताबडतोब सर्व सोडून दिले ना. समजला बादशाही मिळत आहे तर त्याच्या पुढे हे धन ते काय
आहे! आपल्याला तर बाबांकडून राजाई घ्यायची आहे. आता बाबा म्हणतात तो व्यवसाय वगैरे
सुद्धा करा; फक्त एक आठवडा हे चांगल्या प्रकारे समजून घ्या. गृहस्थ व्यवहार सुद्धा
सांभाळायचा आहे. रचनेचे (मुलाबाळांचे) पालन-पोषण सुद्धा करायचे आहे. ते (संन्यासी)
तर रचना रचून मग पळून जातात. बाबा म्हणतात - तू रचना रचली आहेस तर मग त्यांचा नीट
सांभाळ कर. समजा पत्नी किंवा मुलगा तुमचे म्हणणे ऐकत असेल तर सपूत (सुपुत्र) आहे.
ऐकत नसेल तर कपूत (कुपुत्र) आहे. सुपुत्र आणि कुपुत्र ओळखू येतो ना. बाबा म्हणतात -
तुम्ही श्रीमतानुसार चाललात तर श्रेष्ठ बनाल, नाही तर वारसा मिळू शकणार नाही.
पवित्र बनून, सुपुत्र मुलगा बनून नाव मोठे करा. तीर लागला (ज्ञान काळजाला भिडले) तर
मग म्हणतील - बस्स, आता तर आम्ही खरी कमाई करणार. बाबा आले आहेत शिवालयामध्ये घेऊन
जाण्याकरिता. तर शिवालयामध्ये जाण्यासाठी पुन्हा लायक बनायचे आहे. मेहनत आहे. तुम्ही
बोला, ‘आता शिवबाबांची आठवण करा, मृत्यू समोर उभा आहे’. कल्याण तर त्यांचे सुद्धा
करायचे आहे ना. बोला, आता आठवण करा तर विकर्म विनाश होतील. तुम्हा मुलींचे कर्तव्य
आहे माहेरचा आणि सासरचा उद्धार करणे; जेव्हा तुम्हाला बोलावणे येते तेव्हा तुमचे
कर्तव्य आहे कल्याण करणे. दयाळू बनले पाहिजे. पतित तमोप्रधान मनुष्यांना सतोप्रधान
बनण्याचा रस्ता सांगायचा आहे. तुम्ही जाणता प्रत्येक गोष्ट नव्यापासून जुनी जरूर
होते. नरकामध्ये सर्व पतित आत्मे आहेत, म्हणून तर गंगेमध्ये स्नान करून पावन
होण्यासाठी जातात. पहिले हे तर समजू दे की, आम्ही पतित आहोत म्हणून पावन बनायचे आहे.
बाबा आत्म्यांना सांगतात - माझी आठवण करा तर तुमची पापे नष्ट होतील. साधू-संत
इत्यादी जे कोणी आहेत - सर्वांना हा माझा संदेश द्या की, ‘बाबा म्हणतात - माझी आठवण
करा. या योग अग्नीद्वारे अथवा आठवणीच्या यात्रेमुळे तुमच्यातील अशुद्धता निघत जाईल.
तुम्ही पवित्र बनून माझ्याकडे याल. मी तुम्हा सर्वांना सोबत घेऊन जाईन’. जसा विंचू
असतो, चालत रहातो, कुठे मऊ वस्तू दिसली की डंख मारतो. दगडाला डंख करून काय करेल?
तुम्ही सुद्धा बाबांचा परिचय द्या. बाबांनी हे देखील सांगितले आहे की, माझे भक्त
कुठे रहातात! शिवाच्या मंदिरामध्ये, कृष्णाच्या मंदिरामध्ये, लक्ष्मी-नारायणाच्या
मंदिरामध्ये. भक्त माझी भक्ती करत राहतात. आहेत तर मुलेच ना. माझ्याकडून राज्य घेतले
होते, आता पूज्य पासून पुजारी बनले आहेत. देवतांचे भक्त आहेत ना. नंबरवन आहे शिवाची
अव्यभिचारी भक्ती. मग खाली उतरत-उतरत आता तर भूत पूजा (पंचमहाभूतांची पूजा) करू
लागले आहेत. शिवाच्या पुजाऱ्यांना समजावून सांगणे सोपे आहे - ‘हे सर्व आत्म्यांचे
पिता शिवबाबा आहेत. स्वर्गाचा वारसा देतात’. आता बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर
विकर्म विनाश होतील. आम्ही तुम्हाला संदेश देत आहोत. आता बाबा म्हणतात - पतित-पावन,
ज्ञानाचा सागर मी आहे. ज्ञान सुद्धा ऐकवत आहे. पावन बनण्यासाठी योग सुद्धा शिकवत आहे.
ब्रह्मा तनाद्वारे संदेश देत आहे - माझी आठवण करा. आपल्या ८४ जन्मांची आठवण करा.
तुम्हाला भक्त मिळतील मंदिरांमध्ये आणि मग कुंभ मेळ्यामध्ये. तिथे तुम्ही समजावून
सांगू शकता. पतित-पावन गंगा आहे की परमात्मा?
तर मुलांना हा आनंद
असला पाहिजे की आपण कोणाकडे जात आहोत! आहेत किती साधारण. मोठेपणा तो कसला दाखवायचा!
शिवबाबा काय करतील ज्यामुळे मोठा माणूस दिसेल? संन्याशांचे कपडे तर घालू शकत नाहीत.
बाबा म्हणतात - मी तर सर्वसाधारण तन घेतो. आता तुम्हीच सांगा की मी काय करू? या
रथाला कसा शृंगारू? ते हुसेनच्या घोड्याची मिरवणूक काढतात, त्याला शृंगारतात. इथे
मग शिवबाबांचा रथ बैलाला बनवले आहे. बैलाच्या मस्तकावर गोल-गोल शिवाचे चित्र काढतात.
आता शिवबाबा बैलामध्ये कुठून येणार? भले मंदिरामध्ये बैल का बरे ठेवला आहे? शंकराचे
वाहन म्हणतात. सूक्ष्मवतनमध्ये शंकराचे वाहन असते का? हा सर्व आहे भक्तीमार्ग जो
ड्रामामध्ये आधीच नोंदलेला आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आपणच
आपल्याशी प्रतिज्ञा करायची आहे की आता आम्ही खरी कमाई करणार. स्वतःला शिवालयामध्ये
जाण्यासाठी लायक बनवणार. लायक मुलगा बनून श्रीमतानुसार चालून बाबांचे नाव मोठे
करणार.
२) दयाळू बनून
तमोप्रधान मनुष्यांना सतोप्रधान बनवायचे आहे. सर्वांचे कल्याण करायचे आहे.
मृत्यूच्या पूर्वी सर्वांना बाबांची आठवण करून द्यायची आहे.
वरदान:-
प्रत्येक
मनुष्य-आत्म्याला आपल्या तिन्ही काळाचे दर्शन घडविणारे दिव्य दर्पण भव तुम्ही मुले
आता असे दिव्य दर्पण बना, ज्या दर्पणाद्वारे प्रत्येक मनुष्य-आत्मा आपल्या तिन्ही
काळांचे दर्शन करू शकेल. त्यांना स्पष्ट दिसावे की, काय होतो आणि आता काय आहे,
भविष्यामध्ये काय बनायचे आहे. जेव्हा जाणतील अर्थात अनुभव करतील आणि बघतील की अनेक
जन्मांची तहान व अनेक जन्मांच्या आशा - मुक्तीमध्ये जाण्याची आणि स्वर्गामध्ये
जाण्याची - आता पूर्ण होणार आहे तर सहजच बाबांकडून वारसा घेण्यासाठी आकर्षित होऊन
येतील.
बोधवाक्य:-
‘एक बल, एक
भरोसा’, हा धडा कायम पक्का ठेवा म्हणजे भोवऱ्यातून सहजपणे बाहेर पडाल.
अव्यक्त इशारे -
रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:- वारिस क्वालिटी प्रत्यक्ष
तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही आपल्या प्युरिटीच्या रॉयल्टीमध्ये रहाल. कुठेही हदच्या
आकर्षणामध्ये मन गुंतू नये. वारसदार अर्थात अधिकारी. तर जे इथे सदैव अधिकारी
स्टेजवर राहतात, ते कधीही मायेच्या अधीन होत नाहीत, अधिकारीपणाच्या शुभ नशेमध्ये
राहतात, असे अधिकारी स्टेजवालेच तिथे देखील अधिकारी बनतात.