16-06-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - सदैव आनंदामध्ये रहा की, आम्हाला कोणी देहधारी शिकवत नाही, अशरीरी बाबा
शरीरामध्ये प्रवेश करून खास आम्हाला शिकविण्यासाठी आले आहेत”
प्रश्न:-
तुम्हा मुलांना
ज्ञानाचा तिसरा नेत्र कशाकरिता मिळाला आहे?
उत्तर:-
आम्हाला हा ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे आपल्या शांतीधामला आणि सुखधामला
पाहण्याकरिता. या डोळ्यांनी जी जुनी दुनिया, मित्र-संबंधी इत्यादी जे काही दिसते
त्यांच्यामधून बुद्धी काढून टाकायची आहे. बाबा आले आहेत कचऱ्यातून काढून फूल (देवता)
बनविण्यासाठी, तर अशा बाबांचा मग रिगार्ड देखील ठेवायचा आहे.
ओम शांती।
शिव भगवानुवाच, मुलांप्रती. ‘शिव भगवान’ला सत्य बाबा तर जरूर म्हणणार कारण ते रचयिता
आहेत ना. आता तुम्ही मुलेच आहात ज्यांना स्वयं भगवान शिकवत आहेत - भगवान-भगवती
बनविण्यासाठी. ते तर प्रत्येक जण चांगल्या रीतीने जाणतात, असा कोणताही स्टुडंट असत
नाही जो आपल्या टिचरला, अभ्यासाला आणि त्याच्या रिझल्टला जाणत नसेल. ज्यांना भगवान
शिकवतात त्यांना किती आनंद झाला पाहिजे. हा आनंद स्थायी का राहत नाही? तुम्ही जाणता
आपल्याला कोणी देहधारी मनुष्य शिकवत नाही. अशरीरी बाबा शरीरामध्ये प्रवेश करून खास
तुम्हा मुलांना शिकविण्यासाठी आले आहेत, हे कोणालाच ठाऊक नाही आहे की, भगवान येऊन
आम्हाला शिकवतात. तुम्ही जाणता आपण भगवंताची मुले आहोत, ते आम्हाला शिकवत आहेत, तेच
ज्ञानाचा सागर आहेत. शिवबाबांच्या सन्मुख तुम्ही बसले आहात. आत्मे आणि परमात्मा
आताच भेटतात, हे विसरू नका. परंतु माया अशी आहे जे विसरायला लावते. नाही तर तो नशा
राहिला पाहिजे ना की, आम्हाला स्वयं भगवान शिकवत आहेत! त्यांची आठवण करत राहिली
पाहीजे. परंतु इथे तर असे काही आहेत जे एकदमच विसरून जातात. काहीच जाणत नाहीत.
भगवान स्वतः म्हणतात की बरीच मुले हे विसरतात, नाही तर तो आनंद कायम राहिला पाहिजे
ना. आपण भगवंताची मुले आहोत, ते आम्हाला शिकवत आहेत. माया अशी प्रबळ आहे जी पूर्णपणे
विसरायला लावते. या डोळ्यांनी ही जी जुनी दुनिया, मित्र-संबंधी इत्यादी बघता
त्यांच्यामध्येच बुद्धी जात राहते. आता तुम्हा मुलांना बाबा तिसरा नेत्र देतात.
तुम्ही शांतीधाम-सुखधामची आठवण करा. हे आहे दुःख-धाम, छी छी दुनिया (विकारी दुनिया).
तुम्ही जाणता भारत स्वर्ग होता, आता नरक आहे. बाबा येतात पुन्हा फूल बनविण्यासाठी.
तिथे तुम्हाला २१ जन्मांसाठी सुख मिळते. यासाठीच तुम्ही शिकत आहात परंतु नीट शिकत
नाही त्यामुळे इथल्या धन-दौलत इत्यादीमध्येच बुद्धी गुंतून राहते, त्यातून बुद्धी
निघतच नाही. बाबा म्हणतात - शांतीधाम, सुखधामकडे बुद्धी ठेवा. परंतु बुद्धी या
घाणेरड्या दुनियेला एकदम जशी काही चिकटली आहे. निघतच नाही. भले इथे बसले आहेत तरी
देखील जुन्या दुनियेमधून बुद्धी निघतच नाही. आता बाबा आलेले आहेत - गुल-गुल पवित्र
बनविण्यासाठी. तुम्ही प्रामुख्याने पवित्रतेसाठीच म्हणता - बाबा, आम्हाला पवित्र
बनवून पवित्र दुनियेमध्ये घेऊन जातात तर अशा बाबांचा किती रिगार्ड ठेवला पाहिजे. अशा
बाबांवर तर जीव ओवाळून टाकावा. जे परमधाम मधून येऊन आम्हा मुलांना शिकवत आहेत.
मुलांवर किती मेहनत घेतात. एकदम कचऱ्यातून बाहेर काढतात. आता तुम्ही फूल बनत आहात.
तुम्ही जाणता कल्प-कल्प आपण असे फुल (देवता) बनतो. ‘मनुष्य से देवता किये करत न लागी
वार’. आता आम्हाला बाबा शिकवत आहेत. आपण इथे मनुष्यापासून देवता बनण्यासाठी आलो
आहोत. हे आता तुम्हाला माहित झाले आहे, आधी हे माहित नव्हते की, आपण स्वर्गवासी होतो.
आता बाबांनी सांगितले आहे - ‘तुम्ही राज्य करत होता मग रावणाने राज्य घेतले.
तुम्हीच खूप सुख बघितले, मग ८४ जन्म घेत-घेत शिडी खाली उतरता’. ही आहेच छी-छी (विकारी)
दुनिया. मनुष्य किती दु:खी आहेत. कित्येक तर भुकेने मरत असतात, अजिबात सुख नाही आहे.
भले कितीही श्रीमंत आहेत, तरी देखील हे अल्पकाळाचे सुख कागविष्ठे समान आहे. याला
म्हटले जाते विषय वैतरणी नदी. स्वर्गामध्ये आपण खूप सुखी असणार. आता तुम्ही सावळ्या
पासून गोरे बनत आहात.
आता तुम्ही समजता आपणच देवता होतो मग पुनर्जन्म घेत-घेत वेश्यालयामध्ये येऊन पडलो
आहोत. आता पुन्हा तुम्हाला शिवालयामध्ये घेऊन जातात. शिवबाबा स्वर्गाची स्थापना करत
आहेत. तुम्हाला शिकवत आहेत तर व्यवस्थित शिकले पाहिजे ना. शिकून, चक्र बुद्धीमध्ये
ठेवून दैवी गुण धारण केले पाहिजेत. तुम्ही मुले आहात रूप-बसंत, तुमच्या मुखातून
सदैव ज्ञान रत्नेच निघावीत, कचरा नाही. बाबा देखील म्हणतात - ‘मी रूप-बसंत आहे… मी
परम आत्मा ज्ञानाचा सागर आहे, शिक्षण सोर्स ऑफ इन्कम असते’. शिकून जेव्हा बॅरिस्टर,
डॉक्टर इत्यादी बनतात तर लाखोंनी कमावतात. एक-एक डॉक्टर महिन्यामध्ये लाख रुपये
कमावतात. खायला देखील वेळ मिळत नाही. तुम्ही देखील आता शिकत आहात. तुम्ही काय बनता?
विश्वाचे मालक. तर या शिक्षणाचा नशा असला पाहिजे ना. तुम्हा मुलांमध्ये संभाषण
करण्याची किती रॉयल्टी असली पाहिजे. तुम्ही रॉयल बनत आहात ना. राजांचे वर्तन बघा कसे
असते. बाबा (ब्रह्मा बाबा) तर अनुभवी आहेत ना. राजांना जेव्हा नजराणा देतात, तर ते
कधी असा हातात घेणार नाहीत. जर घ्यायचा असेल तर इशारा करतील - सेक्रेटरीकडे द्या.
खूप रॉयल असतात. बुद्धीमध्ये हा विचार असतो, यांच्याकडून घेतले तर यांना परत देखील
दिले पाहिजे, नाहीतर घेणार नाहीत. काही राजे प्रजेकडून अजिबात काहीच घेत नाहीत. कोणी
तर खूप लुटतात. राजांमध्ये देखील फरक असतो ना. आता तुम्ही सतयुगी डबल मुकुटधारी राजे
बनता. डबल मुकुटासाठी पवित्रता अवश्य पाहिजे. या विकारी दुनियेला सोडायचे आहे.
तुम्ही मुलांनी विकारांना सोडले आहे. कोणीही विकारी येऊन बसू शकत नाही. जर न सांगता
येऊन बसतात तर आपलेच नुकसान करतात. कोणी चालाखी करतात, कोणाला कळणार थोडेच. बाबा भले
बघो, न बघो, स्वतःच पाप-आत्मा बनतात. तुम्ही देखील पाप-आत्मे होता. आता पुरुषार्थ
करून पुण्य-आत्मा बनायचे आहे. तुम्हा मुलांना किती नॉलेज मिळाले आहे. या नॉलेजद्वारे
तुम्ही श्रीकृष्णपुरीचे मालक बनता. बाबा किती शृंगार करतात. उच्च ते उच्च भगवान
शिकवतात तर किती आनंदाने शिकले पाहिजे. असे शिक्षण तर कोणी सौभाग्यशालीच शिकतात आणि
मग सर्टिफिकेट सुद्धा घ्यायचे आहे. बाबा म्हणतील - तुम्ही शिकता कुठे. बुद्धी भटकत
राहते, तर मग काय बनणार! लौकिक पिता देखील म्हणतो या परिस्थितीमध्ये तर तू नापास
होशील. कोणी तर शिकून लाखो कमावतात. कोणी बघाल तर धक्के खात राहतात. तुम्हाला फॉलो
करायचे आहे - माता-पित्याला. बाकी जे भाऊ चांगल्या रीतीने शिकतात आणि शिकवतात, ते
हाच धंदा करतात. प्रदर्शनीमध्ये खूप जणांना शिकवतात ना. पुढे चालून जितके दुःख वाढत
जाईल तितके मनुष्यांना वैराग्य येईल मग शिकू लागतील. दुःखामध्ये भगवंताची खूप आठवण
करतील. दुःखामध्ये मरते वेळेस ‘हे राम, हाय भगवान’ करत राहतात. तुम्हाला तर काहीच
करायचे नाहीये. तुम्ही तर आनंदाने तयारी करता. कुठे हे जुने शरीर सुटले तर आपण
आपल्या घरी जाऊ. मग तिथे शरीर देखील सुंदर मिळेल. पुरुषार्थ करून शिकविणाऱ्या
पेक्षाही जास्त पुढे गेले पाहिजे. असे देखील आहेत शिकविणाऱ्यापेक्षा देखील
शिकणाऱ्याची अवस्था खूप चांगली असते. बाबा तर प्रत्येकाला जाणतात ना. तुम्ही मुले
देखील जाणू शकता स्वतःकडे बघितले पाहिजे - आपल्यामध्ये कोणती कमी आहे? मायेच्या
विघ्नांपासून पार जायचे आहे, त्यामध्ये अडकायचे नाही.
जे म्हणतात - माया तर खूप शक्तिशाली आहे, आम्ही कसे चालू शकणार, जर असा विचार कराल
तर माया एकदम कच्चे खाऊन टाकेल. हत्तीला मगरीने खाल्ले. ही आत्ताची गोष्ट आहे ना.
चांगल्या-चांगल्या मुलांना देखील मायारूपी मगर एकदम गिळंकृत करते. स्वतःला सोडवू
शकत नाहीत. स्वतःदेखील समजतात - आम्ही मायेची थप्पड खाण्यापासून सुटू इच्छितो. परंतु
माया सुटू देत नाही. म्हणतात - ‘बाबा, मायेला सांगा - असे पकडू नको’. अरे, हे तर
युद्धाचे मैदान आहे ना. मैदानामध्ये असे थोडेच म्हणणार की, याला सांगा आम्हाला बोट
देखील लावू नका. मॅच खेळताना असे म्हणाल का की, आमच्याकडे बॉल टाकू नका. ताबडतोब
म्हणतील युद्धाच्या मैदानामध्ये आला आहात तर लढा, तर माया खूप पछाडेल. तुम्ही खूप
उच्च पद मिळवू शकता. स्वयं भगवान शिकवत आहेत, काही छोटी गोष्ट आहे का! आता तुमची
चढती कला होते - नंबरवार पुरुषार्था नुसार. प्रत्येक मुलाने छंद ठेवायचा आहे की आपण
आपले भविष्य जीवन हिऱ्यासारखे बनवावे. विघ्नांना नष्ट करत जायचे आहे. कसेही करून
बाबांकडून वारसा जरूर घ्यायचा आहे. नाहीतर आपण कल्प-कल्पांतर नापास होणार. समजा कोणी
श्रीमंताचा मुलगा आहे, वडील त्याच्या या रुहानी शिक्षणामध्ये अडथळा निर्माण करत
असतील तर तो म्हणेल - ‘मी हे लाख तरी घेऊन काय करणार, मला तर बेहदच्या बाबांकडून
विश्वाची बादशाही घ्यायची आहे’. हे लाख करोड तर सर्व भस्मिभूत होणार आहेत. ‘किनकी
दबी रहेगी धूल में, किनकी जलाये आग..’, सर्व सृष्टीरुपी भंभोरला आग लागणार आहे. ही
सारी रावणाची लंका आहे. तुम्ही सर्व सीता आहात. राम आलेले आहेत. सर्व धरती एक बेट
आहे, यावेळी आहेच रावण राज्य. बाबा येऊन रावण राज्याला नष्ट करून तुम्हाला
रामराज्याचा मालक बनवतात. तुम्हाला तर आतून अथाह आनंद झाला पाहिजे - गायले गेले आहे
अतींद्रिय सुख विचारायचे असेल तर मुलांना विचारा. तुम्ही प्रदर्शनीमध्ये आपल्या
सुखाचे वर्णन करता ना. आम्ही भारताला स्वर्ग बनवत आहोत. श्रीमतावर भारताची सेवा करत
आहोत. जितके-जितके श्रीमतावर चालाल तितके तुम्ही श्रेष्ठ बनणार. तुम्हाला मत देणारे
पुष्कळ निघतील त्यामुळे तेही पारखून घ्यायचे आहे, सांभाळायचे आहे. कुठे-कुठे माया
देखील गुप्तपणे प्रवेश करते. तुम्ही विश्वाचे मालक बनता, आतून खूप आनंद झाला पाहिजे.
तुम्ही म्हणता - ‘बाबा, आम्ही तुमच्याकडून स्वर्गाचा वारसा घेण्यासाठी आलो आहोत’.
सत्यनारायणाची कथा ऐकून आम्हीच नरापासून नारायण, नारी पासून लक्ष्मी बनणार. तुम्ही
सर्व हात उंच करता ना की, ‘बाबा, आम्ही तुमच्याकडून पूर्ण वारसा घेऊनच सोडणार,
नाहीतर आम्ही कल्प-कल्प गमावून बसू. कोणत्याही विघ्नाला आम्ही परतवून लावणार, एवढी
बहाद्दुरी पाहिजे. तुम्ही एवढी बहाद्दुरी दाखवली आहे ना. ज्यांच्याकडून वारसा मिळतो
त्यांना थोडेच सोडणार. काहीजण तर चांगल्या रीतीने टिकून राहिले आहेत, कोणी मग
भागन्ती झाले (पळून गेले). चांगले-चांगले असणाऱ्यांना मायेने खाऊन टाकले. अजगराने
खाऊन पूर्ण गिळंकृत केले.
आता बाबा म्हणतात, ‘हे आत्म्यांनो…’, खूप प्रेमाने समजावून सांगतात. ‘मी येऊन पतित
दुनियेला पावन दुनिया बनवतो’. आता पतित दुनियेचा मृत्यू समोर उभा आहे. आता मी
तुम्हाला राजांचाही राजा बनवतो. पतित राजांचा देखील राजा. सिंगल ताज असणारे राजा
डबल ताजवाल्या राजांसमोर डोके का झुकवतात, अर्ध्या कल्पानंतर जेव्हा यांची ती
पवित्रता नष्ट होते, तेव्हा रावण राज्यामध्ये मग सगळे विकारी आणि पुजारी बनतात. तर
आता बाबा मुलांना समजावून सांगत आहेत - कोणतीही चूक करू नका. विसरू नका. चांगल्या
रीतीने शिका. रोज क्लास अटेंड करू शकत नसाल तरी देखील बाबा सर्व प्रबंध देऊ शकतात.
७ दिवसांचा कोर्स करा, ज्यामुळे मुरलीला सहज समजू शकाल. कुठेही जा फक्त दोन शब्द
लक्षात ठेवा. हा आहे महामंत्र. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. कोणतेही
विकर्म अथवा पाप कर्म देह-अभिमानामध्ये आल्यामुळेच होते. विकर्मांपासून वाचण्यासाठी
बुद्धीची प्रीत एका बाबांवरच ठेवायची आहे, कोणत्याही देहधारीशी नाही. एका सोबतच
बुद्धीचा योग लावायचा आहे. शेवटपर्यंत आठवण करत रहायची आहे म्हणजे मग कोणतेही
विकर्म होणार नाही. हा तर सडलेला देह आहे. त्याचा अभिमान सोडून द्या. नाटक पूर्ण
होत आहे, आता आपले ८४ जन्म पूर्ण झाले. ही जुनी आत्मा, जुने शरीर आहे. आता
तमोप्रधानापासून सतोप्रधान बनायचे आहे मग शरीर देखील सतोप्रधान मिळेल. आत्म्याला
सतोप्रधान बनवायचे आहे - हीच चिंता लागून रहावी. बाबा फक्त एवढेच सांगतात - मामेकम्
(मज एकाची) आठवण करा. बस्स, हीच काळजी घ्या. तुम्ही देखील म्हणता ना - बाबा, आम्ही
पास होऊन दाखवू. क्लासमध्ये जाणतात सर्वांनाच काही स्कॉलरशिप मिळणार नाही. तरी
देखील पुरुषार्थ तर खूप करतात ना. तुम्ही देखील समजता आपल्याला नरा पासून नारायण
बनण्याचा पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे. कमी का करावा. कोणत्याही गोष्टीची काळजी
करायची नाहीये. योद्धे कधीही काळजी करत नाहीत. कोणी म्हणतात - ‘बाबा, खूप वादळे,
स्वप्न इत्यादी येतात’. हे तर सर्व होणार. तुम्ही एका बाबांची आठवण करत रहा. या
शत्रूवर विजय प्राप्त करायचा आहे. काही वेळेला तर अशी काही स्वप्न येतील ना मनामध्ये,
ना चित्तामध्ये, अशा प्रकारच्या विचारांनी अगदी गुदमरून जाल. ही सर्व माया आहे. आपण
मायेला जिकंतो. अर्ध्याकल्पासाठी आपण शत्रूकडून राज्य घेतो, आपल्याला कसलीही चिंता
नाही. बहाद्दुर कधीही कुरकुर करत नाहीत. रणभूमीवर आनंदाने जातात. तुम्ही तर इथे खूप
आरामात बाबांकडून वारसा घेत आहात. हे छि-छि शरीर सोडायचे आहे. आता स्वीट सायलेन्स
होमला जातो. बाबा म्हणतात - ‘मी आलो आहे, तुम्हाला घेऊन जाण्याकरिता. माझी आठवण करा
तर पावन बनाल. अपवित्र आत्मा जाऊ शकत नाही’. या आहेत नवीन गोष्टी. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)
विकर्मांपासून वाचण्याकरिता बुद्धीची प्रीत एका बाबांवरच ठेवायची आहे, या सडलेल्या
देहाचा अभिमान सोडून द्यायचा आहे.
२) आपण वॉरियर्स आहोत,
या स्मृतीने मायारूपी शत्रूवर विजय प्राप्त करायचा आहे, त्याची पर्वा करायची नाही.
माया गुप्त रूपामध्ये खूप प्रवेश करते त्यामुळे तिला पारखायचे आहे आणि स्वतःला
सांभाळायचे आहे.
वरदान:-
मनसा-वाचा आणि
कर्मणेच्या पवित्रतेमध्ये पूर्ण मार्क्स घेणारे नंबर वन आज्ञाधारक भव
मनसा पवित्रता अर्थात
संकल्पामध्ये देखील अपवित्रतेचे संस्कार इमर्ज होऊ नयेत. सदैव आत्मिक स्वरूप अर्थात
भावा-भावाची श्रेष्ठ स्मृती रहावी. वाचेमध्ये सदैव सत्यता आणि मधुरता असावी,
कर्मामध्ये सदैव नम्रता, संतुष्टता आणि हर्षितमुखता असावी. याच आधारावर नंबर मिळतात
आणि अशा संपूर्ण पवित्र आज्ञाधारक मुलांचे बाबा देखील गुणगान करतात. तेच आपल्या
प्रत्येक कर्माने बाबांच्या कर्तव्याला सिद्ध करणारे समीप रत्न आहेत.
बोधवाक्य:-
संबंध-संपर्क
आणि स्थितीमध्ये लाईट (हलके) बना, दिनचर्ये मध्ये नाही.
अव्यक्त इशारे -
आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा, अंतर्मुखी बना:-
अंतर्मुखी आत्मे कशीही
परिस्थिती असेल, भले चांगली असेल किंवा अस्वस्थ करणारी असेल परंतु प्रत्येक वेळी,
प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःला ॲडजेस्ट करतात. एकटे असाल किंवा संघटनमध्ये असाल,
दोन्ही ठिकाणी ॲडजेस्ट होणे - हे आहे ब्राह्मण जीवन.