17-06-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आपले कल्याण करायचे असेल तर प्रत्येक प्रकारचे पथ्य पाळा, फूल बनण्यासाठी पवित्र व्यक्तीच्या हातचे शुद्ध भोजन खा”

प्रश्न:-
तुम्ही मुले आता इथे कोणती प्रॅक्टिस करता, जी २१ जन्मांपर्यंत राहील?

उत्तर:-
कायम तनाने-मनाने निरोगी राहण्याची प्रॅक्टिस तुम्ही इथेच करता. तुम्हाला दधिची ऋषीप्रमाणे यज्ञ सेवेमध्ये हाडे सुद्धा स्वाहा करायची आहेत परंतु हठयोगाची गोष्ट नाहीये. आपले शरीर कमकुवत करण्याची गरज नाही. तुम्ही योगाद्वारे २१ जन्मांसाठी निरोगी बनता, त्याची प्रॅक्टिस इथून करता.

ओम शांती।
कॉलेज अथवा युनिव्हर्सिटी असते तर टीचर देखील स्टुडंटकडे बघतात. गुलाबाचे फूल (हुशार विद्यार्थी) कुठे आहे, फ्रंटला कोण बसले आहेत? हा देखील बगीचा आहे, परंतु नंबरवार तर आहेतच. इथेच गुलाबाचे फूल बघतो मग बाजूला रतन ज्योत. कुठे अकचे सुद्धा बघतो. माळ्याला तर बघावे लागेल ना. त्या बागवानालाच (बगिच्याच्या मालकालाच) बोलावतात की, ‘येऊन या काट्यांच्या जंगलाला नष्ट करून फुलांचे कलम लावा’. तुम्ही मुले प्रॅक्टिकलमध्ये जाणता की कसे काट्यांपासून फुलांचे कलम लागते. तुमच्यातही असे फार थोडे आहेत जे या गोष्टींचे चिंतन करतात. हे देखील तुम्ही मुले जाणता - ते बागवान देखील आहेत, खिवय्या देखील आहेत, सर्वांना घेऊन जातात. फूलांना पाहून बाबा देखील खुश होतात. प्रत्येक जण समजतो आम्ही काट्यांपासून फूल बनत आहोत. नॉलेज बघा किती श्रेष्ठ आहे. हे समजण्यासाठी देखील खूप तल्लख बुद्धी पाहिजे. हे आहेतच कलियुग नरकवासी. तुम्ही स्वर्गवासी बनत आहात. संन्यासी लोक तर घरदार सोडून पळून जातात. तुम्हाला पळून जायचे नाहीये. काही-काही घरामध्ये एक काटा आहे तर एक फूल आहे. बाबांना कोणी विचारतात - ‘बाबा, मुलाचे लग्न लावून देऊ?’ बाबा म्हणतील - भले करा. घरी ठेवा, सांभाळा. विचारतात तर यावरूनच समजते की, हिंमत नाहीये. म्हणून मग बाबा देखील म्हणतात - ‘भले करा’. म्हणतात मी तर आजारी असतो मग सून येईल, तिच्या हातचे खावे लागेल. बाबा म्हणतील - ‘भले खा’. नाही म्हणाल का! परिस्थितीच अशी आहे खावेच लागेल कारण मोह देखील आहे ना. घरात सून आली की मग विचारूच नका जशी देवी आली. इतके खुश होतात. आता तर ही समजण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला फूल बनायचे आहे तर पवित्र असणाऱ्याच्या हातचे खायचे आहे. त्यासाठी आपला प्रबंध करायचा आहे, यामध्ये विचारायचे थोडेच असते. बाबा समजावून सांगतात - तुम्ही देवता बनत आहात, यामध्ये हे पथ्य हवे. जितके जास्त पथ्य पाळाल तितके तुमचे कल्याण होईल. जास्त पथ्य पाळण्यासाठी काही मेहनत सुद्धा करावी लागेल. वाटेत भूक लागते, जेवण सोबत घेऊन जा. काही त्रास होत असेल, असहाय्य असाल तर स्टेशनवाल्यांकडून डबल रोटी घेऊन खा. फक्त बाबांची आठवण करा, यालाच म्हटले जाते योगबळ. यामध्ये हठयोगाची काही गोष्ट नाहीये, शरीर कमजोर होऊ द्यायचे नाही. दधिची ऋषी प्रमाणे हाड्न-हाड सेवेला लावायचे आहे, यामध्ये हठयोगाचा प्रश्नच नाही. या सर्व आहेत भक्तीमार्गाच्या गोष्टी. शरीराला तर अगदी निरोगी ठेवायचे आहे. योगाद्वारे २१ जन्मांकरिता निरोगी बनायचे आहे. ही प्रॅक्टिस इथेच करायची आहे. बाबा समजावून सांगतात यामध्ये विचारण्याची गरजच नसते. हां, एखादी मोठी गोष्ट आहे, त्यामध्ये गोंधळून जाता तर विचारू शकता. छोट्या-छोट्या गोष्टी बाबांना विचारण्यामध्ये किती वेळ जातो. मोठ-मोठ्या व्यक्ती फार कमी बोलतात. शिवबाबांना म्हटले जाते सद्गती दाता. रावणाला सद्गती दाता थोडेच म्हणणार. जर असता तर त्याला जाळले का असते? मुले समजतात रावण प्रसिद्ध आहे. भले रावणामध्ये ताकद भरपूर आहे, परंतु शत्रू तर आहे ना. अर्धा कल्प रावणाचे राज्य चालते. परंतु महिमा कधी ऐकली आहे का? कधीच नाही. तुम्ही जाणता रावण ५ विकारांना म्हटले जाते. साधू-संत पवित्र राहतात तर त्यांची महिमा करतो ना. या वेळचे मनुष्य तर सर्व पतित आहेत. भले कोणीही आले, समजा कोणी मोठ्या व्यक्ती येतात, म्हणतात बाबांना भेटायचे आहे, तर बाबा त्यांना काय विचारतील? त्यांना तर हेच विचारतील की, ‘राम-राज्य आणि रावण-राज्य कधी ऐकले आहे का? मनुष्य आणि देवता कधी ऐकले आहे का? यावेळी मनुष्यांचे राज्य आहे की देवतांचे? मनुष्य कोण, देवता कोण? देवता कोणत्या राज्यामध्ये होते?’ देवता तर असतात सतयुगामध्ये. यथा राजा राणी तथा प्रजा… तुम्ही विचारू शकता की ही सृष्टी नवीन आहे की जुनी? सतयुगामध्ये कोणाचे राज्य होते? आता कोणाचे राज्य आहे? चित्र तर समोर आहे. भक्ती काय आहे, ज्ञान काय आहे? हे बाबाच बसून समजावून सांगतात.

जी मुले म्हणतात - ‘बाबा, धारणा होत नाही’; त्यांना बाबा म्हणतात - अरे, अल्फ आणि बे (बाबा आणि बादशाही) तर सोपे आहे ना. अल्फ बाबाच म्हणतात - ‘मज पित्याची आठवण करा तर वारसा मिळेल’. भारतामध्ये शिवजयंती देखील साजरी करतात परंतु केव्हा भारतामध्ये येऊन स्वर्ग बनवला? भारत स्वर्ग होता - हे जाणत नाहीत, विसरले आहेत. तुम्ही म्हणाल - आम्ही देखील काहीच जाणत नव्हतो की, आम्ही स्वर्गाचे मालक होतो. आता बाबांद्वारे आम्ही पुन्हा देवता बनत आहोत. समजावून सांगणारा मीच आहे. सेकंदामध्ये जीवनमुक्ती गायले गेले आहे. परंतु याचा देखील अर्थ थोडेच समजतात. सेकंदामध्ये तुम्ही स्वर्गातील पऱ्या बनता ना! याला इंद्रसभा देखील म्हणतात, ते (दुनियावाले) मग पाऊस पाडणाऱ्याला इंद्र समजतात. आता पाऊस पाडणाऱ्यांची काही सभा भरते का? इंद्रवज्र, इंद्रसभा काय काय सांगतात.

आज पुन्हा हा पुरुषार्थ करत आहोत, अभ्यास आहे ना. बॅरिस्टरी शिकतात तर समजतात उद्या आम्ही बॅरिस्टर बनू. तुम्ही आज शिकता, उद्या शरीर सोडून राजाईमध्ये जाऊन जन्म घ्याल. तुम्ही भविष्यासाठी प्रारब्ध मिळवता. इथून शिकून जाणार आणि मग आपला जन्म सतयुगामध्ये होईल. एम ऑब्जेक्ट आहेच मुळी - राजकुमार-राजकुमारी बनण्याचे. राजयोग आहे ना. कोणी म्हणते बाबा आमची बुद्धी काम करत नाही, हे तर तुमचे नशीबच असे आहे. ड्रामामध्ये पार्टच असा आहे. त्याला बाबा कसे बदलू शकतील. स्वर्गाचा मालक बनण्याचा तर सर्वांना अधिकार आहे. परंतु नंबरवार तर असतील ना. असे तर नाही सर्वजण राजा बनतील. कोणी म्हणतात - ईश्वरीय ताकद आहे तर मग सर्वांना राजा बनवा. मग प्रजा कुठून येणार. ही समजून घेण्याची गोष्ट आहे ना. या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. आता तर फक्त नावाला महाराजा-महाराणी आहेत. उपाधी सुद्धा देतात. लाख-दोन लाख दिल्याने राजा-राणीची उपाधी मिळते. मग वर्तन सुद्धा तसे ठेवावे लागेल.

आता तुम्ही मुले जाणता - आपण श्रीमतावर आपले राज्य स्थापन करत आहोत. तिथे तर सर्वजण सुंदर गोरे असतील. या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते ना. शास्त्रांमध्ये कल्पाचा कालावधी प्रदीर्घ लिहिल्याने मनुष्य विसरून गेले आहेत. आता तुम्ही पुरुषार्थ करत आहात - सावळ्या पासून सुंदर बनण्याचा. आता देवता काळे असतात का? श्रीकृष्णाला सावळा, राधेला गोरी दाखवतात. आता सुंदर (गोरे) आहेत तर दोघेही सुंदरच असतील ना. मग काम-चितेवर चढून दोघेही काळे बनतात. तिथे आहेत सोनेरी दुनियेचे मालक, ही आहे काळी दुनिया. तुम्हा मुलांना एक तर आतून आनंद झाला पाहिजे आणि दैवी गुण सुद्धा धारण केले पाहिजेत. कोणी म्हणतात - ‘बाबा, विडी सुटत नाही’. बाबा म्हणतील - ‘ठीक आहे, भरपूर ओढा. विचारता तर मग काय म्हणणार! पथ्याप्रमाणे चालला नाहीत तर कोसळाल’. स्वतःलाच आपली समज असली पाहिजे ना. आपण देवता बनत आहोत तर आपली चाल-चलन, खाणे-पिणे कसे असायला हवे. सर्वजण म्हणतात - आम्ही लक्ष्मीला, नारायणाला वरणार. अच्छा, आपल्यामध्ये बघा असे गुण आहेत? आम्ही विडी ओढतो, मग नारायण बनू शकाल? नारदाची सुद्धा कथा आहे ना. नारद काही कोणी एक तर नाहीये ना. सर्व मनुष्य भक्त (नारद) आहेत.

बाबा म्हणतात - देवता बनणाऱ्या मुलांनो, अंतर्मुखी बनून स्वतःशीच गप्पा मारा की जर का आपण देवता बनत आहोत तर मग आपले वर्तन कसे असायला हवे? आम्ही देवता बनत आहोत तर दारू पिऊ शकत नाही, विडी ओढू शकत नाही, विकारामध्ये जाऊ शकत नाही, पतिताच्या हातचे खाऊ शकत नाही. नाहीतर अवस्थेवर परिणाम होईल. या गोष्टी बाबा बसून समजावून सांगतात. ड्रामाच्या रहस्याला देखील कोणीही जाणत नाही. हे नाटक आहे, सर्वजण पार्टधारी आहेत. आपण आत्मे वरून येतो, पार्ट तर साऱ्या दुनियेतील ॲक्टर्सना बजावायचा आहे. सर्वांचा आपला-आपला पार्ट आहे. किती पार्टधारी आहेत, कसे पार्ट बजावतात, हे व्हरायटी धर्मांचे झाड आहे. एका आंब्याच्या झाडाला व्हरायटी झाड म्हणणार नाही. त्याला तर आंबाच लागेल. हे मनुष्य सृष्टीचे झाड तर आहे परंतु याचे नाव आहे - ‘व्हरायटी धर्मांचे झाड’. बीज एकच आहे आणि मनुष्यांची व्हरायटी बघा किती आहे. कोणी कसे, कोणी कसे. हे बाबा बसून समजावून सांगतात, मनुष्य तर काहीच जाणत नाहीत. मनुष्यांना बाबाच पारस-बुद्धी बनवतात. तुम्ही मुले जाणता या जुन्या दुनियेमध्ये आता थोडे दिवस बाकी आहेत. कल्पापूर्वीप्रमाणे कलम लागत राहते. चांगली प्रजा, साधारण प्रजेचे देखील कलम लागते. इथेच राजधानी स्थापन होत आहे. मुलांना प्रत्येक गोष्टीमध्ये बुद्धी वापरायची आहे. असे नाही, मुरली ऐकली न ऐकली. इथे बसूनही बुद्धी बाहेर पळत राहते. असे देखील आहेत - काही तर सन्मुख मुरली ऐकून खूप हर्षित होतात. मुरलीसाठी धाव घेतात. भगवान शिकवत आहेत, तर असे शिक्षण सोडले थोडेच पाहिजे. टेपमध्ये ॲक्युरेट मुरली भरते, ऐकली पाहिजे. श्रीमंत लोक खरेदी करतील तर गरीब ऐकतील. कितीजणांचे कल्याण होईल. गरीब मुले देखील आपले भाग्य खूप उच्च बनवू शकतात. बाबा मुलांसाठी घर बनवून घेतात, गरीब दोन रुपये सुद्धा मनी ऑर्डर करतात, बाबा याची एक वीट घराला लावा. एक रुपया यज्ञामध्ये टाका. मग कोणी तर हुंडी भरणारा देखील असेल ना. मनुष्य हॉस्पिटल इत्यादी बनवतात, किती खर्च होतो, श्रीमंत लोक सरकारला खूप मदत करतात, त्यांना काय मिळते! अल्पकाळाचे सुख. इथे तर तुम्ही जे करता ते २१ जन्मांसाठी. तुम्ही बघता - बाबांनी (ब्रह्मा बाबांनी) सर्व काही दिले आणि विश्वाचा मालक पहिला नंबर बनले. २१ जन्मांसाठी असा सौदा कोण करणार नाही. तेव्हाच तर भोलानाथ म्हणतात ना. आत्ताचीच गोष्ट आहे. किती भोळा आहे, म्हणतात जे काही करायचे आहे करा. किती गरीब मुली आहेत, शिलाई करून पोट भरतात. बाबा जाणतात ही तर खूप उच्च पद मिळवणारी आहे. सुदाम्याचे सुद्धा उदाहरण आहे ना. मूठभर तांदळाच्या बदल्यात २१ जन्मांसाठी महाल मिळाले. तुम्ही या गोष्टी नंबरवार पुरुषार्थानुसार जाणता. बाबा म्हणतात - मी भोलानाथ सुद्धा आहे ना. हे दादा (ब्रह्मा बाबा) काही भोलानाथ नाहीत. हे देखील म्हणतात - भोलानाथ शिवबाबा आहेत म्हणून त्यांना सौदागर, रत्नागर, जादूगार म्हटले जाते. तुम्ही विश्वाचे मालक बनता. इथे भारत कंगाल आहे, प्रजा श्रीमंत आहे, गव्हर्मेंट गरीब आहे. आता तुम्ही समजता भारत किती श्रेष्ठ होता! स्वर्ग होता. त्याच्या खाणाखुणा सुद्धा आहेत. सोमनाथाचे मंदिर किती हिरे-माणकांनी सजवलेले होते. जी हिरे-माणके उंट भरून घेऊन गेले. तुम्ही मुले जाणता आता ही दुनिया बदलणार आहे जरूर. त्यासाठी तुम्ही तयारी करत आहात. जो करेल तो मिळवेल. मायेचे अपोझिशन खूप होते. तुम्ही आहात ईश्वराचे भक्त. बाकी सर्व आहेत रावणाचे भक्त. तुम्ही आहात शिवबाबांचे. शिवबाबा तुम्हाला वारसा देतात. बाबांशिवाय इतर कोणतीही गोष्ट बुद्धीमध्ये येऊ नये. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) अंतर्मुखी बनून स्वतःशीच गप्पा मारायच्या आहेत - जेव्हा आपण देवता बनतो तर आपले वर्तन कसे आहे! काही अशुद्ध खाणे-पिणे तर नाहीये ना!

२) आपले भविष्य २१ जन्मांसाठी श्रेष्ठ बनवायचे आहे तर सुदाम्याप्रमाणे जे काही आहे भोलानाथ बाबांच्या हवाली करा. अभ्यासासाठी कोणतेही कारण देऊ नका.

वरदान:-
आदि आणि अनादि स्वरूपाच्या स्मृतीद्वारे आपल्या निजी स्वधर्माला धारण करणारे पवित्र आणि योगी भव

ब्राह्मणांचा निजी स्व-धर्म पवित्रता आहे, अपवित्रता पर-धर्म आहे. ज्या पवित्रतेला धारण करणे लोक कठीण समजतात ते तुम्हा मुलांसाठी अति सहज आहे कारण स्मृती आली की आमचे वास्तविक आत्म स्वरूप कायम पवित्र आहे. अनादि स्वरूप - पवित्र आत्मा आहे आणि आदि स्वरूप - पवित्र देवता आहे. आताचा अंतिम जन्म देखील पवित्र ब्राह्मण जीवन आहे म्हणून पवित्रताच ब्राह्मण जीवनाची पर्सनॅलिटी आहे. जो पवित्र आहे तोच योगी आहे.

बोधवाक्य:-
स्वतःला सहजयोगी म्हणून निष्काळजीपणा आणू नका, शक्तिरूप बना.

अव्यक्त इशारे - आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा, अंतर्मुखी बना:-

म्हटले जाते “अंतर्मुखी सदा सुखी”. त्यांना बाहेरचे कोणतेही आकर्षण आकर्षित करू शकत नाही. कधी मनमत, कधी परमत आकर्षित करू शकत नाही. अंतर्मुखी सदा सुखी राहणारे, सुखदात्याची मुले मास्टर सुखदाता असतील, बहिर्मुखतेपासून मुक्त असतील.