18-06-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो, हा रुद्र ज्ञान यज्ञ स्वयं रुद्र भगवंताने रचला आहे, यामध्ये तुम्ही आपले
सर्व काही स्वाहा करा कारण आता घरी जायचे आहे”
प्रश्न:-
संगमयुगावर
कोणता वंडरफूल खेळ चालतो?
उत्तर:-
भगवंताने रचलेल्या यज्ञामध्येच असुरांची विघ्ने पडतात. हा देखील वंडरफूल खेळ
संगमावरच चालतो. असा यज्ञ मग साऱ्या कल्पामध्ये रचला जात नाही. हा आहे स्वराज्य
प्राप्त करण्याकरिता ‘राजस्व अश्वमेध यज्ञ’. यामध्येच विघ्न पडतात.
ओम शांती।
तुम्ही कुठे बसला आहात? याला स्कुल किंवा युनिव्हर्सिटी सुद्धा म्हणू शकता.
विश्वविद्यालय आहे, ज्याच्या ईश्वरीय ब्रँचेस आहेत. बाबांनी मोठ्यात मोठी
युनिव्हर्सिटी उघडली आहे. शास्त्रांमध्ये ‘रुद्र यज्ञ’ नाव लिहिले आहे, या वेळी
तुम्ही मुले जाणता शिवबाबांनी ही पाठशाळा अथवा युनिव्हर्सिटी उघडली आहे. सर्वोच्च
बाबा शिकवतात. हे तर मुलांच्या बुद्धीमध्ये लक्षात राहिले पाहिजे की, स्वयं भगवान
आम्हाला शिकवत आहेत. हा यज्ञ त्यांनी रचलेला आहे याचे नाव देखील प्रसिद्ध आहे -
‘राजस्व अश्वमेध रुद्र ज्ञान यज्ञ’, राजस्व अर्थात स्वराज्यासाठी. अश्वमेध, हे जे
काही दिसण्यात येते त्या सर्वांना स्वाहा करत आहोत, शरीर देखील स्वाहा होते. आत्मा
तर स्वाहा होऊ शकत नाही. सर्व शरीरे स्वाहा होतील. बाकी आत्मे परत पळत जातील. हे आहे
संगमयुग. असंख्य आत्मे पळत जातील, बाकी शरीरे तर नष्ट होतील. हा आहे सर्व ड्रामा,
तुम्ही ड्रामाच्या वश चालत आहात. बाबा म्हणतात - मी राजस्व यज्ञ रचला आहे. हा देखील
ड्रामा प्लॅन अनुसार रचला गेला आहे. असे म्हणणार नाहीत की, मी यज्ञ रचला आहे. ड्रामा
प्लॅन अनुसार तुम्हा मुलांना शिकविण्याकरिता कल्पापूर्वीप्रमाणे ज्ञान यज्ञ रचला
गेला आहे. याचा अर्थ असा देखील होत नाही की, मी रचला आहे. ड्रामा प्लॅन अनुसार रचला
गेला आहे. कल्प-कल्प रचला जातो. हा ड्रामा पूर्व नियोजित आहे. ड्रामाप्लॅन अनुसार
एकदाच यज्ञ रचला जातो, ही काही नवीन गोष्ट नाहीये. आता बुद्धीमध्ये आले आहे - खरोखर
५००० वर्षांपूर्वी देखील सतयुग होते, आता चक्र पुन्हा रिपीट होत आहे. पुन्हा नवीन
दुनिया स्थापन होत आहे. तुम्ही नवीन दुनियेमध्ये स्वराज्य प्राप्त करण्याकरिता शिकत
आहात. पवित्र देखील जरूर बनायचे आहे. बनतील देखील तेच जे ड्रामा अनुसार कल्पापूर्वी
बनले होते. आता देखील बनतील. साक्षी होऊन ड्रामाला बघावे लागेल आणि मग पुरुषार्थ
देखील करावा लागतो. मुलांनी मार्ग देखील सांगायचा आहे, मुख्य गोष्ट आहे पवित्रतेची.
बाबांना बोलावतातच की, ‘या, पवित्र बनवून आम्हाला या छी-छी (विकारी) दुनियेमधून
घेऊन जा’. बाबा आलेच आहेत घरी घेऊन जाण्याकरिता. मुलांना पॉईंट्स तर पुष्कळ दिले
जातात. तरीही मुख्य गोष्ट बाबा सांगतात - मनमनाभव. आपण पावन बनण्याकरिता बाबांची
आठवण करतो, हे विसरता कामा नये. जितकी आठवण कराल तितका फायदा होईल, चार्ट ठेवला
पाहिजे. नाहीतर मग शेवटी फेल व्हाल. मुले समजतात, आपणच सतोप्रधान होतो, नंबरवार
पुरुषार्थानुसार जे श्रेष्ठ बनतात, त्यांना मेहनत देखील जास्त करावी लागेल.
आठवणीमध्ये रहावे लागेल. हे तर समजता बाकी थोडा वेळ शिल्लक आहे. सुखाचे दिवस येणार
आहेत. खरोखर आपले अथाह सुखाचे दिवस येणार आहेत. बाबा एकदाच येतात, दुःखधामला नष्ट
करून आपल्या सुखधाममध्ये घेऊन जातात. तुम्ही मुले जाणता आता आपण ईश्वरीय
परिवारामध्ये आहोत, मग दैवी परिवारामध्ये जाऊ. या वेळचे गायनच आहे - हा संगमच
पुरुषोत्तम उच्च बनवण्याचे युग आहे. तुम्ही मुले जाणता आम्हाला बेहदचे बाबा शिकवत
आहेत. मग पुढे जाऊन संन्यासी लोक सुद्धा मानतील. ती देखील वेळ येईल ना. आता तुमचा
प्रभाव तितकासा पडू शकत नाही. आता राजधानी स्थापन होत आहे, वेळ बाकी आहे. अखेरीला
हे संन्यासी इत्यादी देखील येऊन समजून घेतील. सृष्टीचे चक्र कसे फिरते, हे नॉलेज
कोणालाही नाहीये. मुले हे देखील जाणतात की पवित्रतेसाठी किती विघ्ने पडतात. अबलांवर
अत्याचार होतात. द्रौपदीने बोलावले आहे ना. वास्तविक तुम्ही सर्व द्रौपदी, सीता,
पार्वती आहात. आठवणीमध्ये राहिल्याने अबला, कुब्जा देखील बाबांकडून वारसा प्राप्त
करतात. आठवणीमध्ये तर राहू शकतात ना. भगवंताने येऊन यज्ञ रचला आहे, त्यामध्ये किती
विघ्ने पडतात. आजही विघ्न पडत राहतात, कन्यांचे जबरदस्तीने लग्न लावून देतात,
नाहीतर मारून घराबाहेर काढतात म्हणूनच तर बोलावतात - ‘ हे पतित-पावन या’; तर जरूर
त्यांना रथ पाहिजे, ज्यामध्ये येऊन पावन बनवतील. गंगेच्या पाण्याने काही पावन बनणार
नाही. बाबाच येऊन पावन बनवून पावन दुनियेचा मालक बनवतात.
तुम्ही बघता या पतित
दुनियेचा विनाश समोर उभा आहे. का नाही बाबांचे बनावे, स्वाहा होऊन जावे. विचारतात -
स्वाहा कसे व्हायचे? ट्रान्सफर कसे करायचे? बाबा म्हणतात - ‘मुलांनो, तुम्ही या
बाबांना (साकार ब्रह्मा बाबांना) बघता ना. हे स्वतः प्रॅक्टिकलमध्ये करून शिकवत
आहेत. जसे कर्म आपण करू आपल्याला पाहून इतरही करतील. बाबांनी यांच्याकडून कर्म करून
घेतले ना. सर्व यज्ञामध्ये स्वाहा केले. स्वाहा होण्यामध्ये काही त्रास थोडाच आहे.
हे ना खूप श्रीमंत, ना खूप गरीब होते. साधारण होते. यज्ञ रचला जातो तर त्यामध्ये
खाण्या-पिण्याची सगळी सामग्री पाहिजे ना. हा आहे ईश्वरीय यज्ञ. ईश्वराने येऊन या
ज्ञान यज्ञाची स्थापना केली आहे. तुम्हाला शिकवतात, या यज्ञाची महिमा खूप जबरदस्त
आहे. ईश्वरीय यज्ञामधूनच तुमचा शरीर निर्वाह होतो. जे आपल्याला अर्पणीय समजतात, आपण
ट्रस्टी आहोत. हे सर्व काही ईश्वराचे आहे, आम्ही शिवबाबांच्या यज्ञातून भोजन ग्रहण
करतो - ही समजूतदारपणाची गोष्ट आहे ना. सर्वांनी येऊन इथे तर बसायचे नाहीये. यांचे
(ब्रह्मा बाबांचे) उदाहरण तर पाहिले - कसे सर्वकाही स्वाहा केले. बाबा म्हणतात - जसे
कर्म हे करतात, यांना पाहून इतरांनाही वाटले. खुपजण स्वाहा झाले. जे कोणी होतात ते
आपला वारसा घेतात. बुद्धीने देखील समजले जाते - आत्मा तर निघून जाईल, बाकी सर्व
शरीरे नष्ट होतील. हा बेहदचा यज्ञ आहे. यामध्ये सर्व स्वाहा होतील. तुम्हा मुलांना
कसे बुद्धीने स्वाहा होऊन नष्टोमोहा बनायचे ते समजावून सांगितले जाते. हे देखील
जाणता ही सर्व सामग्री खाक होणार आहे. किती मोठा यज्ञ आहे, तिथे मग कोणता यज्ञ रचला
जात नाही. ना कोणते उपद्रव होतात. हे सर्व जे भक्तिमार्गाचे अनेक यज्ञ आहेत ते सर्व
नष्ट होतात. ज्ञान सागर एकच भगवान आहेत. तेच मनुष्य सृष्टीचे बीजरूप. सत् चैतन्य
आहेत. शरीर तर जड आहे, आत्माच चैतन्य आहे. ते ज्ञान सागर आहेत, तुम्हा मुलांना
ज्ञान सागर बसून शिकवत आहेत. ते फक्त गात राहतात आणि तुम्हाला बाबा सर्व ज्ञान ऐकवत
आहेत. ज्ञान काही फार तर नाहीये. या दुनियेचे चक्र कसे फिरते, हे फक्त समजावून
सांगायचे आहे.
इथे बाबा स्वतः
तुम्हाला शिकवत आहेत. म्हणतात - देखील मी साधारण तनामध्ये प्रवेश करतो. भगीरथ देखील
प्रसिद्ध आहे, जरूर मनुष्यच असेल ज्याच्यामध्ये बाबा येतील. त्यांचे एकच नाव चालत
येते ते म्हणजे - शिव; बाकी सर्वांची नावे बदलतात, यांचे नाव बदलत नाही. बाकी
भक्तीमध्ये अनेक नावे ठेवली आहेत. इथे तर आहेतच शिवबाबा. शिव कल्याणकारी असे म्हटले
जाते. ईश्वरच येऊन नवी दुनिया स्वर्ग स्थापन करतात. तर कल्याणकारी झाले ना. तुम्ही
जाणता भारतामध्ये स्वर्ग होता. आता नरक आहे मग स्वर्ग जरूर असेल. याला म्हटले जाते
पुरुषोत्तम संगमयुग जेव्हा बाबा खिवैया बनून तुम्हाला या तीरावरून त्या तीरावर घेऊन
जातात. ही आहे जुनी दुःखाची दुनिया पुन्हा जरूर नवीन दुनिया होईल, ड्रामा अनुसार,
ज्यासाठी तुम्ही आता पुरुषार्थ करत आहात. बाबांची आठवणच घडोघडी विसरायला होते,
यामध्ये आहे मेहनत बाकी तुमच्याकडून जी विकर्मे झाली आहेत, त्याची सजा कर्मभोगाच्या
रूपामध्ये भोगावीच लागते, कर्मभोग शेवटपर्यंत भोगायचाच आहे, त्यामध्ये माफी मिळू
शकत नाही. असे नाही, बाबा क्षमा करा. अजिबात नाही. ड्रामा अनुसार सर्व होते. क्षमा
इत्यादी असतच नाही. हिशोब चुकता करायचाच आहे. तमोप्रधानापासून सतोप्रधान बनायचे आहे,
यासाठी श्रीमत देखील मिळते, श्री श्री शिवबाबांच्या श्रीमताद्वारे तुम्ही श्री बनता.
उच्च ते उच्च बाबा तुम्हाला उच्च बनवतात. तुम्ही आता बनत आहात, आता तुम्हाला स्मृती
आली आहे - बाबा कल्प कल्प येऊन आम्हाला शिकवतात. अर्धाकल्प त्याचे प्रारब्ध मिळते.
सृष्टिचक्र कसे फिरते, त्या ज्ञानाची गरज उरत नाही. कल्प-कल्प एकदाच येऊन सांगतात
की हे सृष्टीचे चक्र कसे फिरते.
तुमचे काम आहे शिकणे
आणि पवित्र बनणे. योगामध्ये रहायचे आहे. बाबांचे बनून जर पवित्र बनला नाहीत तर १००
पटीने दंड भोगावा लागेल. नाव सुद्धा बदनाम होते. गातात देखील ‘सद्गुरु का निंदक ठौर
ना पाये’. लोकांना माहितीच नाही आहे की हे कोण आहेत. सत् बाबाच सद्गुरु, सत् शिक्षक
असतील ना. तुम्हाला ते शिकवत आहेत, सच्चा सद्गुरु देखील आहेत. जसे बाबा ज्ञानाचे
सागर आहेत, तुम्ही देखील ज्ञानाचे सागर आहात ना. बाबांनी तर सर्व ज्ञान दिले आहे,
ज्याने जितके कल्पापूर्वी धारण केले असेल, तितकेच करतील. पुरुषार्थ करायचा आहे,
कर्माशिवाय तर कोणी राहू शकत नाही. कितीही हठयोग इत्यादी करतात, ते देखील कर्म आहे
ना. हा देखील एक धंदा आहे, आजीविका करण्याचा. नाव होते, खूप पैसा मिळतो तर
पाण्यावरून, आगीवरून चालू लागतात. फक्त उडू शकत नाहीत. त्यासाठी तर पेट्रोल वगैरे
पाहिजे ना. परंतु त्याने फायदा तर काहीच नाही. पावन तर बनत नाहीत. वैज्ञानिकांची तर
शर्यत चालू आहे. त्यांची आहे विज्ञानाची शर्यत आणि तुमची आहे सायलेन्सची शर्यत.
सर्वजण शांतीच मागतात. बाबा म्हणतात शांती तुमचा स्वधर्म आहे, स्वतःला आत्मा समजा,
आपल्या घरी शांतीधामला जायचे आहे. हे आहे दुःखधाम. आपण शांतीधामवरून मग सुखधाममध्ये
येणार. हे दुःख धाम नष्ट होणार आहे. हे चांगल्या रीतीने धारण करून मग इतरांकडूनही
धारण करवून घ्यायचे आहे. बाकी थोडे दिवस आहेत, हे शिक्षण शिकून मग शरीर निर्वाह
अर्थ डोकेफोड करावी लागते. भाग्यवान मुले लगेच निर्णय घेतात की आपल्याला कोणते
शिक्षण घ्यायचे आहे. त्या शिक्षणाने काय मिळते आणि या शिक्षणाने काय मिळते. या
शिक्षणाने तर २१ जन्मांचे प्रारब्ध बनते. तर विचार केला पाहिजे की आपल्याला कोणते
शिक्षण घ्यायचे आहे! ज्यांना बेहदच्या बाबांकडून वारसा मिळवायचा आहे, ते बेहदच्या
अभ्यासाला लागतात. परंतु ड्रामा प्लॅन अनुसार कोणाच्या भाग्यामध्ये नसेल तर मग त्या
शिक्षणाची गोडी लागते. हे शिक्षण शिकत नाहीत. म्हणतात वेळ मिळत नाही. बाबा विचारतात,
कोणते नॉलेज चांगले आहे? त्या (लौकिक) शिक्षणाने काय मिळणार आणि या (अलौकिक)
शिक्षणाने काय मिळणार? तर म्हणतात - ‘बाबा, भौतिक शिक्षणाने काय मिळणार, थोडी फार
कमाई करू. इथे तर भगवान शिकवत आहेत. आपल्याला जर शिकून राज्य पद मिळवायचे असेल तर
जास्त लक्ष कोणत्या गोष्टीवर दिले पाहिजे. कोणी तर मग असे म्हणतात की ‘बाबा, ते
शिक्षण पूर्ण करून मग येतो’. बाबा समजून जातात यांच्या भाग्यामध्ये नाही आहे. काय
होणार आहे हे तर पुढे चालून बघायचे आहे. समजतात की शरीराचा काहीच भरवसा नाही, तर मग
खऱ्या कमाईच्या मागे लागले पाहिजे. ज्यांच्या भाग्यामध्ये आहे तेच आपले भाग्य
उजळवतील. पूर्ण ताकद लावायची आहे, आम्ही तर बाबांकडून वारसा घेऊनच सोडणार. बेहदचे
बाबा आपल्याला राजाई देत आहेत तर मग हा एक अंतिम जन्म आपण का नाही पवित्र बनायचे.
इतकी खंडीभर मुले पवित्र राहतात. खोटे थोडेच बोलतात. सर्व पुरुषार्थ करत आहेत. शिकत
आहेत, तरी देखील विश्वास करत नाहीत. बेहदचे बाबा येतातच तेव्हा जेव्हा जुन्या
दुनियेला नवीन बनवायचे असते. जुन्या दुनियेचा विनाश तर समोर उभा आहे. हे अतिशय
स्पष्ट आहे. काळ देखील बरोबर तोच आहे, अनेक धर्म देखील आहेत, सतयुगामध्ये असतोच मुळी
एक धर्म. हे देखील तुमच्या बुद्धीमध्ये आहे. तुमच्यामध्ये देखील कोणी असे आहेत जे
अजूनही निश्चयच करत आहेत. अरे निश्चय करण्यासाठी वेळ लागतो का. शरीराचा सुद्धा भरवसा
थोडाच आहे, थोडी सुद्धा संधी गमावता कामा नये. कोणाच्या भाग्यामध्ये नसेल तर जरा
सुद्धा बुद्धीमध्ये येत नाही. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) सच्ची कमाई
करून २१ जन्मांकरिता आपले भाग्य बनवायचे आहे. शरीराचा अजिबात भरवसा नाही त्यामुळे
थोडी सुद्धा संधी गमवायची नाही.
२) नष्टोमोहा बनून
आपले सर्वकाही रुद्र यज्ञामध्ये स्वाहा करायचे आहे. स्वतःला अर्पण करून ट्रस्टी
होऊन सांभाळायचे आहे. साकार बाबांना फॉलो करायचे आहे.
वरदान:-
ईश्वरीय
नशेद्वारे जुन्या दुनियेला विसरणारे सर्व प्राप्ती संपन्न भव
जसा तो नशा सर्व काही
विसरायला लावतो, तसा हा ईश्वरीय नशा दुःखाच्या दुनियेला सहजच विसरायला लावतो. त्या
नशेमध्ये तर खूप नुकसान होते, जास्त पिल्याने मरून जातात परंतु हा नशा अविनाशी बनवतो.
जे सदैव ईश्वरीय नशेमध्ये मस्त राहतात ते सर्व प्राप्ती संपन्न बनतात. ‘एक बाबा
दुसरा न कोई’ - ही स्मृतीच नशा चढवते. याच स्मृतीद्वारे समर्थी येते (शक्ती येते).
बोधवाक्य:-
एकमेकांना कॉपी
करण्या ऐवजी बाबांना कॉपी करा.
अव्यक्त इशारे -
आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा, अंतर्मुखी बना:- अंतर्मुखी राहणारेच
प्रत्येक ज्ञान-रत्नाच्या गुह्यतेमध्ये जाऊ शकतात. ज्ञानाच्या प्रत्येक पॉईंटचे
रहस्य काय आहे आणि कोणत्या वेळी, कोणत्या विधीने त्याला कार्यामध्ये अथवा सेवेमध्ये
वापरायचे आहे, या पद्धतीने त्यावर मनन करत त्या रहस्याच्या रसामध्ये निघून जा,
तेव्हाच नशेची अनुभूती करू शकाल.