19-06-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - आता तुम्ही ईश्वरीय संतान बनला आहात, तुमच्यामध्ये कोणतेही आसुरी गुण
असता कामा नयेत, स्वतःची उन्नती करायची आहे, चूक करायची नाही”
प्रश्न:-
तुम्हा
संगमयुगी ब्राह्मण मुलांना कोणता निश्चय आणि नशा आहे?
उत्तर:-
आम्हा मुलांना निश्चय आणि नशा आहे की आम्ही ईश्वरीय संप्रदायाचे आहोत. आम्ही
स्वर्गवासी विश्वाचे मालक बनत आहोत. संगमावर आम्ही ट्रान्सफर होत आहोत. आसुरी
संतानापासून ईश्वरीय संतान बनून २१ जन्मांसाठी स्वर्गवासी बनतो, यापेक्षा किमती
वस्तू दुसरी कोणतीच नाही.
ओम शांती।
बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत, बहुतेक वेळा लोकांना शांती आवडते. घरामध्ये
जर मुलांची किटकिट होत असेल, तर अशांतता होते. अशांतीमुळे दुःख जाणवते. शांतीने सुख
जाणवते. इथे तुम्ही मुले बसला आहात, खरी शांती तुम्हाला आहे. तुम्हाला सांगितले गेले
आहे - बाबांची आठवण करा, स्वतःला आत्मा समजा. आत्म्यामध्ये जी अर्ध्याकल्पापासून
अशांती माजली आहे, तिला शांतीचा सागर बाबांची आठवण करून काढून टाकायची आहे. तुम्हाला
शांतीचा वारसा मिळत आहे. हे देखील तुम्ही जाणता शांतीची दुनिया आणि अशांतीची दुनिया
एकदम वेगळ्या आहेत. आसुरी दुनिया, ईश्वरीय दुनिया, सतयुग, कलियुग कशाला म्हटले जाते,
हे कोणी मनुष्य मात्र जाणत नाहीत. तुम्ही म्हणाल - आम्ही देखील जाणत नव्हतो. भले
कितीही पोझिशनवाले असले तरीही. पैसे असणाऱ्यांना पोझिशनवाले म्हटले जाते. गरीब आणि
श्रीमंत हे तर समजू शकतो ना.
तसे तुम्ही देखील
खरोखर ईश्वरीय संतान कोण आणि आसुरी संतान कोण हे समजू शकता. आता तुम्ही गोड मुले
समजता आम्ही ईश्वरीय संतान आहोत. हा पक्का निश्चय आहे ना. तुम्ही ब्राह्मण समजता
आम्ही ईश्वरीय संप्रदाय स्वर्गवासी विश्वाचे मालक बनत आहोत. हा आनंद कायम राहिला
पाहिजे. असे फार थोडे आहेत जे यथार्थ रीतीने समजतात. सतयुगामध्ये आहे ईश्वरीय
संप्रदाय. कलियुगामध्ये आहे आसुरी संप्रदाय. पुरुषोत्तम संगमयुगावर आसुरी संप्रदाय
बदलतो. आता आपण शिवबाबांची संतान बनलो आहोत. मध्यंतरी विसरून गेलो होतो. आता पुन्हा
यावेळी ओळखले आहे की, आपण शिवबाबांची संतान आहोत. तिथे सतयुगामध्ये कोणी स्वतःला
ईश्वरीय संतान म्हणू शकत नाहीत. तिथे आहेत दैवी संतान. या अगोदर आपण आसुरी संतान
होतो. आता ईश्वरीय संतान बनलो आहोत. आम्ही ब्राह्मण बी.के. आहोत. रचना आहे एका
बाबांची. तुम्ही सर्व भाऊ-बहीणी आहात आणि ईश्वरीय संतान आहात. तुम्ही जाणता
बाबांकडून राज्य मिळत आहे. भविष्यामध्ये जाऊन आम्ही दैवी स्वराज्य प्राप्त करणार,
सुखी होणार. बरोबर सतयुग आहे सुखाचे धाम, कलियुग आहे दुःखधाम. हे केवळ तुम्ही
संगमयुगी ब्राह्मणच जाणता. आत्माच ईश्वरीय संतान आहे. हे देखील जाणता बाबा स्वर्गाची
स्थापना करतात. ते रचता आहेत ना. नरकाचे क्रियेटर तर नाहीत. त्यांची कोण आठवण करेल.
तुम्ही गोड-गोड मुले जाणता - बाबा स्वर्गाची स्थापना करत आहेत. ते आमचे खूप गोड बाबा
आहेत. आम्हाला २१ जन्मांसाठी स्वर्गवासी बनवतात, यापेक्षा किमती वस्तू दुसरी कोणतीच
नाही. हे समजून घेतले पाहिजे. आपण ईश्वरीय संतान आहोत, तर आमच्यामध्ये कोणताही आसुरी
अवगुण असता कामा नये. स्वतःची उन्नती करायची आहे. वेळ बाकी थोडा आहे, यामध्ये चूक
करता कामा नये. विसरून नका जाऊ. तुम्ही बघता बाबा सन्मुख बसलेले आहेत, ज्यांची आपण
संतान आहोत. आम्ही ईश्वर पित्याकडून शिकत आहोत दैवी संतान बनण्याकरिता, तर किती
आनंद झाला पाहिजे. बाबा फक्त एवढेच सांगतात - ‘माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील’.
बाबा आलेच आहेत सर्वांना घेऊन जाण्यासाठी. जितकी-जितकी आठवण कराल तितकी विकर्म
विनाश होतील. अज्ञान काळामध्ये जसा कन्येचा साखरपुडा होतो तर आठवण एकदम छापली जाते.
मुलगा जन्माला आला आणि आठवण छापली जाते. ही आठवण तर स्वर्गामध्ये सुद्धा छापली जाते,
नरकामध्ये सुद्धा छापली जाते. मुलगा म्हणेल हे माझे बाबा आहेत, आता हे (शिवबाबा) तर
आहेत बेहदचे बाबा. ज्यांच्याकडून स्वर्गाचा वारसा मिळतो तर त्यांची आठवण छापली गेली
पाहिजे. बाबांकडून आम्ही पुन्हा भविष्य २१ जन्मांचा वारसा घेत आहोत. बुद्धीमध्ये
वारसाच लक्षात आहे.
हे देखील जाणता मरायचे
तर सर्वांनाच आहे. एकही राहणार नाही, जे कोणी प्रिय ते प्रिय आहेत, सगळे निघून
जातील. हे केवळ तुम्ही ब्राह्मणच जाणता की ही जुनी दुनिया आता गेली की गेली. ती
जाण्याअगोदर पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे. जर का ईश्वरीय संतान आहात तर अपार आनंद
झाला पाहिजे. बाबा सांगत राहतात - ‘मुलांनो, आपले जीवन हिऱ्यासारखे बनवा’. ते आहे
डीटी वर्ल्ड (दैवी दुनिया), हे आहे डेव्हील वर्ल्ड (आसुरी दुनिया). सतयुगामध्ये किती
अथाह सुख असते. ते बाबाच देतात. इथे तुम्ही बाबांपाशी आला आहात. इथे बसून तर राहणार
नाही. असेही नाही की सगळे एकत्र राहतील कारण बेहदची मुले आहेत. इथे तुम्ही खूप
उमंगाने येता. आम्ही जातो बेहदच्या बाबांपाशी. आम्ही ईश्वरीय संतान आहोत. गॉड फादरची
मुले आहोत, तर आम्ही स्वर्गामध्ये का असू नये. गॉड फादर तर स्वर्ग रचतात ना. आता
तुमच्या बुद्धीमध्ये साऱ्या वर्ल्डची हिस्ट्री-जॉग्राफी आहे. जाणता हेवीनली गॉड
फादर आम्हाला हेवनच्या लायक बनवत आहेत. कल्प-कल्पांतर बनवतात. असा एकही मनुष्य नाही
ज्याला हे ठाऊक आहे की आपण ॲक्टर आहोत. गॉड फादरची मुले आहोत तर मग आपण दुःखी का
आहोत! आपसात भांडतो कशासाठी! आपण आत्मे सगळे भाऊ-भाऊ आहोत ना. भाऊ-भाऊ आपसात कसे
भांडण-तंटे करत राहतात. भांडून-भांडून संपून जातील. इथे आम्ही सगळे बाबांकडून वारसा
घेत आहोत. भावा-भावांनी आपसात कधी खारे-पाणी होता कामा नये. इथे तर बाबांशी सुद्धा
खारे-पाणी होतात. चांगली-चांगली मुले खारे-पाणी होतात. माया किती जबरदस्त आहे. जी
चांगली-चांगली मुले आहेत त्यांची बाबांना आठवण तर येते. बाबांचे मुलांवर किती प्रेम
आहे. बाबांना तर मुलांशिवाय दुसरे कोणीही नाही ज्याची आठवण करतील. तुमच्यासाठी तर
खूप आहेत. तुमची बुद्धी इकडे-तिकडे जाते. धंदा इत्यादीमध्ये सुद्धा बुद्धी जाते.
माझ्यासाठी तर कोणता धंदा इत्यादी सुद्धा नाहीये. तुम्हा अनेक मुलांचे अनेक धंदे
आहेत. माझा तर एकच धंदा आहे. मी आलोच आहे मुलांना स्वर्गाचा वारसदार बनविण्यासाठी.
बेहदच्या बाबांची प्रॉपर्टी फक्त तुम्ही मुलेच आहात. गॉड फादर आहेत ना. सर्व आत्मे
त्यांची प्रॉपर्टी आहे. मायेने छी-छी (विकारी) बनवले आहे. आता गुल-गुल (फूल) बनवतात
बाबा. बाबा म्हणतात माझे तर तुम्हीच आहात. तुमच्यामध्ये माझा मोह देखील आहे. चिठ्ठी
लिहित नाहीत तर मग काळजी वाटते. चांगल्या-चांगल्या मुलांची चिठ्ठी येत नाही.
चांगल्या-चांगल्या मुलांना एकदम माया संपवून टाकते. जरुर देह-अभिमान आहे. बाबा
सांगत राहतात आपला कुशल समाचार लिहा. बाबा मुलांना विचारतात - ‘मुलांनो, माया
तुम्हाला हैराण तर करत नाही ना? बहाद्दूर बनून मायेवर विजय प्राप्त करत आहात ना!’
तुम्ही युद्धाच्या मैदानावर आहात ना. कर्मेंद्रियांना असे वश केले पाहिजे जेणेकरून
अजिबात चलबिचल होऊ नये. सतयुगामध्ये सर्व कर्मेंद्रिये आपल्या वशमध्ये असतात.
कर्मेंद्रियांची कोणतीही चलबिचल होत नाही. ना मुखाची, ना हाताची, ना कानाची...
कोणत्याही प्रकारची चलबिचल होण्याचा प्रश्नच नसतो. तिथे कोणतीही घाण वस्तूच नसते.
इथे योगबलाने कर्मेंद्रियांवर विजय मिळवता. बाबा म्हणतात - काही वाईट गोष्ट नाहीये.
कर्मेंद्रियांना वश करायचे आहे. चांगल्या रीतीने पुरुषार्थ करायचा आहे. वेळ फार कमी
आहे. गायन देखील आहे - ‘बहुत गयी थोड़ी रही’. आता वेळ कमी होत जाते आहे. नवीन घर
तयार होत असते तर बुद्धीमध्ये राहते ना - आता थोडा वेळ बाकी आहे. आता हे तयार होईल,
हे थोडे काम बाकी राहिले आहे. ती आहे हदची गोष्ट, ही आहे बेहदची गोष्ट. हे देखील
मुलांना समजावून सांगितले गेले आहे - त्यांचे आहे ‘सायन्स’ बळ, तुमचे आहे
‘सायलेन्स’ बळ. त्यांचे देखील बुद्धिबळ आहे, तुमचे देखील बुद्धिबळ आहे. विज्ञानाचे
किती शोध लावत असतात. आता तर असे बॉम्ब्स बनवत असतात; ज्यामुळे म्हणतात तिथे
बसल्या-बसल्या बॉम्ब टाकला तरीही संपूर्ण शहर खाक होईल. मग हे सैन्य, एरोप्लेन
इत्यादी काहीही कामी येणार नाही. तर ती आहे सायन्स बुद्धी, तुमची आहे सायलेन्स
बुद्धी. ते विनाशाकरिता निमित्त बनलेले आहेत. तुम्ही अविनाशी पद प्राप्त करण्यासाठी
निमित्त बनला आहात. हे देखील समजण्यासाठी बुद्धी पाहिजे ना.
तुम्ही मुले समजू शकता
- बाबा किती सोपा मार्ग सांगतात. भले कितीही अहिल्या, कुब्जा आहात, फक्त दोन शब्द
लक्षात ठेवायचे आहेत - ‘बाबा’ आणि ‘वारसा’. मग जितकी जे आठवण करतील. बाकीची सगळी
संगत सोडून एका बाबांची आठवण करायची आहे. बाबा म्हणतात - ‘मी जेव्हा आपल्या घरी
परमधाममध्ये होतो तेव्हा भक्तीमार्गामध्ये तुम्ही मला आळवत होता - बाबा, तुम्ही याल
तेव्हा आम्ही सर्व काही कुर्बान करु’. हे जसे करणीघोर (अंत्यविधी करणारे ब्राह्मण)
झाले, करणीघोरला जुने सामान दिले जाते. तुम्ही बाबांना काय देणार? यांना (ब्रह्मा
बाबांना) तर देत नाही ना. यांनी देखील सर्वकाही दिले. हे थोडेच इथे बसून इमले
बांधतील. हे सर्वकाही शिवबाबांसाठी आहे. आपण त्यांच्या डायरेक्शन प्रमाणे करत आहोत.
ते करन-करावनहार आहेत, डायरेक्शन देत राहतात. मुले म्हणतात - ‘बाबा, आमच्यासाठी
तुम्ही एकटेच आहात. तुमच्यासाठी तर खूप मुले आहेत’. मग बाबा म्हणतात - ‘माझ्यासाठी
फक्त तुम्ही मुलेच आहात. तुमच्यासाठी तर खूप आहेत’. किती देहाच्या नातेवाईकांची
आठवण असते. गोड-गोड मुलांना बाबा म्हणतात - जितकी शक्य आहे तितकी बाबांची आठवण करा
बाकी सर्वांना विसरत जा. स्वर्गाच्या राजाईचे लोणी तुम्हाला मिळते. जरा विचार तर करा,
कशी या खेळाची रचना आहे. तुम्ही फक्त बाबांची आठवण करता आणि स्वदर्शन चक्रधारी
बनल्याने चक्रवर्ती राजा बनता. आता तुम्ही मुले प्रॅक्टिकलमध्ये अनुभवी आहात.
मनुष्य तर समजतात भक्ती परंपरेने चालत आली आहे. विकार देखील परंपरेने चालत आले आहेत.
या लक्ष्मी-नारायणाला, राधे-कृष्णाला सुद्धा मुले तर होती ना. अरे हां, मुले का
नसतील परंतु त्यांना म्हटले जाते संपूर्ण निर्विकारी. इथे आहेत संपूर्ण विकारी.
एकमेकांना शिव्या देत राहतात. आता तुम्हा मुलांना श्री श्री बाबांचे श्रीमत मिळते.
तुम्हाला श्रेष्ठ बनवतात. जर बाबांचे म्हणणे ऐकले नाहीत तर मग थोडेच बनाल. आता माना
नाहीतर नका मानू. सपूत मुले तर लगेच मानतील. पूर्ण मदत देत नाहीत त्यामुळे मग आपलेच
नुकसान करतात. बाबा म्हणत आहेत - ‘मी कल्प-कल्प येतो. किती पुरुषार्थ करवून घेतो’.
किती आनंदामध्ये घेऊन येतात. बाबांकडून पुरा वारसा घेण्यामध्येच माया चूक करायला
लावते. परंतु तुम्हाला तिच्या सापळ्यात अडकायचे नाहीये. मायेशीच युद्ध होते. खूप
मोठं-मोठी वादळे येतील. त्यातूनही वारसदार असणाऱ्यांवर माया जास्ती वार करेल.
पैलवाना सोबत पैलवान होऊन लढेल. जसे वैद्य औषध देतात तर संपूर्ण आजार बाहेर निघून
येतो. इथे देखील माझे बनलात की मग सर्वांची आठवण येऊ लागेल. वादळे येतील, यामध्ये
लाइन क्लियर हवी. आपण अगोदर पवित्र होतो नंतर अर्धाकल्प अपवित्र बनलो. आता पुन्हा
परत जायचे आहे. बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर या योग अग्नीद्वारे तुमची विकर्म
विनाश होतील. जितकी आठवण कराल तितके उच्च पद प्राप्त कराल. आठवण करता-करता तुम्ही
घरी निघून जाल, यामध्ये एकदम अंतर्मुखता पाहिजे. नॉलेज सुद्धा आत्म्यामध्ये धारण
होते ना. आत्माच शिकते. आत्म्याचे ज्ञान देखील परमात्मा बाबाच येऊन देतात. विश्वाचा
मालक बनण्यासाठी इतके किमती ज्ञान तुम्ही घेता. मला तुम्ही म्हणताच मुळी -
पतित-पावन, ज्ञानाचा सागर, शांतीचा सागर. जे माझ्यापाशी आहे ते सर्व तुम्हाला देतो.
फक्त दिव्य दृष्टीची चावी मात्र देत नाही. त्याच्या बदल्यात मग तुम्हाला विश्वाचा
मालक बनवतो. साक्षात्कारामध्ये काहीच नाहीये. मुख्य आहे शिक्षण. या शिक्षणाने
तुम्हाला २१ जन्मांचे सुख मिळते. मीरेच्या सुखाची तुलना तुम्ही आपल्या सुखाशी करा.
ती तर कलियुगामध्ये होती, साक्षात्कार झाला मग पुढे काय. भक्तीची माळाच वेगळी आहे.
ज्ञान मार्गाची माळा वेगळी आहे. रावणाची राजाई वेगळी, तुमची राजाई वेगळी. त्याला
दिवस, याला रात्र म्हटले जाते. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आठवणीच्या
बळाने आपली कर्मेंद्रिये अशी वश करायची आहेत की कोणतीही चलबिचलता राहू नये. वेळ फार
कमी आहे म्हणून चांगल्या रीतीने पुरुषार्थ करून मायाजीत बनायचे आहे.
२) बाबा जे ज्ञान
देतात त्याला अंतर्मुखी बनून धारण करायचे आहे. कधीही आपसामध्ये खारे-पाणी व्हायचे
नाही. बाबांना आपला कुशल समाचार जरूर द्यायचा आहे.
वरदान:-
कल्याणकारी
वृत्ती द्वारे सेवा करणारे सर्व आत्म्यांच्या आशीर्वादांचे अधिकारी भव
कल्याणकारी वृत्ती
द्वारे सेवा करणे - हेच सर्व आत्म्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्याचे साधन आहे. जेव्हा
लक्ष्य असते की, आपण विश्व कल्याणकारी आहोत, तर मग अकल्याणाचे कर्तव्य होऊ शकत नाही.
जसे कार्य असते तशी आपली धारणा असते, जर कार्य लक्षात राहिले तर सदैव दयाळू, सदैव
महादानी रहाल. प्रत्येक पाऊल कल्याणकारी वृत्तीने टाकाल, ‘मी’पणा येणार नाही,
निमित्तपणाची आठवण राहील. अशा सेवाधारींना सेवेच्या रिटर्नमध्ये सर्व आत्म्यांच्या
आशीर्वादांचा अधिकार प्राप्त होतो.
बोधवाक्य:-
साधनांचे
आकर्षण साधनेला खंडित करते.
अव्यक्त इशारे -
आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा, अंतर्मुखी बना:- अंतर्मुखी आत्मे तीन
प्रकारच्या भाषेचे अनुभवी असतात - १) डोळ्यांची भाषा २) भावनेची भाषा ३) संकल्पाची
भाषा या तीन प्रकारच्या भाषा रुहानी योगी जीवनाच्या भाषा आहेत, जितके-जितके तुम्ही
अंतर्मुखी स्वीट सायलेन्स स्वरूपामध्ये स्थित होत जाल - तितके या तीन भाषांद्वारे
सर्व आत्म्यांना अनुभव करवू शकाल. आता याच रुहानी भाषेचे अभ्यासी बना.