20-06-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - बाबांचे प्रेम मिळवायचे असेल तर आत्म-अभिमानी होऊन बसा, बाबांकडून आम्ही
स्वर्गाचा वारसा घेत आहोत, याच आनंदात रहा”
प्रश्न:-
संगमयुगावर
तुम्ही ब्राह्मण सो फरिश्ता बनण्यासाठी कोणती गुप्त मेहनत करता?
उत्तर:-
तुम्हा ब्राह्मणांना पवित्र बनण्याचीच गुप्त मेहनत करावी लागते. तुम्ही ब्रह्माची
मुले संगमावर भाऊ-बहीणी आहात, भावा-बहिणीची घाणेरडी दृष्टी असू शकत नाही. पती-पत्नी
एकत्र राहून दोघेही स्वतःला बी.के. समजता. या स्मृती द्वारे जेव्हा संपूर्ण पवित्र
बनाल तेव्हा फरिश्ता बनू शकाल.
ओम शांती।
गोड-गोड मुलांनो, स्वतःला आत्मा समजून इथे बसायचे आहे. हे रहस्य तुम्हा मुलांनी
देखील समजावून सांगायचे आहे. आत्म-अभिमानी होऊन बसाल तर बाबांविषयी प्रेम वाटेल.
बाबा आम्हाला राजयोग शिकवतात. बाबांकडून आम्ही स्वर्गाचा वारसा घेत आहोत. ही आठवण
संपूर्ण दिवस बुद्धीमध्ये रहावी - यामध्येच मेहनत आहे. हे क्षणोक्षणी विसरून जाता
तर आनंदाचा पारा खाली जातो. बाबा सावधान करतात की मुलांनो, देही-अभिमानी होऊन बसा.
स्वतःला आत्मा समजा. आता आत्म्यांचा आणि परमात्म्याचा मेळा सुरु आहे ना. मेळा भरला
होता, कधी भरला होता? नक्कीच कलियुगाचा अंत आणि सतयुगाची आदि यांच्या संगमावरच भरला
असेल. आज मुलांना टॉपिकवर समजावून सांगत आहेत. तुम्हाला टॉपिक तर जरूर घ्यायचा आहे.
उच्च ते उच्च आहेत भगवान मग खाली याल तर ब्रह्मा-विष्णू-शंकर. बाबा आणि देवता.
लोकांना हेच माहित नाही आहे की, शिव आणि ब्रह्मा-विष्णू-शंकर यांचा संबंध काय आहे?
कोणालाही त्यांच्या जीवन कहाणीबद्दल माहिती नाहीये. त्रिमूर्तीचे चित्र प्रसिद्ध आहे.
हे तिन्ही देवता आहेत. फक्त तिघांचा धर्म थोडाच असतो. धर्म तर मोठा असतो, डीटी धर्म
(देवी-देवता धर्म). हे आहेत सूक्ष्म वतनवासी, वर आहेत शिवबाबा. मुख्य आहेत ब्रह्मा
आणि विष्णू. आता बाबा म्हणतात - तुम्हाला टॉपिक द्यायचा आहे - ब्रह्मा सो विष्णू,
विष्णू सो ब्रह्मा कसे बनतात. जसे तुम्ही म्हणता आम्ही ‘शूद्र सो ब्राह्मण,
ब्राह्मण सो देवता’, तसे यांचे देखील आहे, सर्वप्रथम ‘ब्रह्मा सो विष्णू, विष्णू सो
ब्रह्मा’. ते (दुनियावाले) तर म्हणतात आत्मा सो परमात्मा, परमात्मा सो आत्मा. हे तर
चुकीचे आहे. असे होऊ सुद्धा शकत नाही. तर या टॉपिकवर चांगल्या रीतीने समजावून
सांगायचे आहे, कोणी म्हणतात - परमात्मा श्रीकृष्णाच्या शरीरामध्ये आले आहेत. जर
श्रीकृष्णामध्ये आले तर ब्रह्माचा पार्टच संपून जातो. श्रीकृष्ण तर आहे सतयुगाचा
पहिला प्रिन्स. तिथे पतित असू कसे शकतात, ज्यांना येऊन पावन बनवतील. हे पूर्णपणे
चुकीचे आहे. या गोष्टी देखील महारथी सेवाभावी मुलांनाच समजतात. बाकी तर कोणाच्या
बुद्धीमध्ये बसतच नाही. हा टॉपिक तर एकदम फर्स्ट क्लास आहे - ‘ब्रह्मा सो विष्णू,
विष्णू सो ब्रह्मा’ कसे बनतात. त्यांची जीवन कहाणी सांगतात कारण यांचे कनेक्शन आहे.
सुरुवातच अशी करायची आहे. एका सेकंदामध्ये ब्रह्मा सो विष्णू. विष्णू सो ब्रह्मा
बनण्यामध्ये ८४ जन्म लागतात. या नीट समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. आता तुम्ही
आहात ब्राह्मण कुळाचे. प्रजापिता ब्रह्माचे ब्राह्मण कुळ कुठे गेले? प्रजापिता
ब्रह्माची तर नवीन दुनिया हवी ना. नवीन दुनिया आहे सतयुग. तिथे तर प्रजापिता नाहीये.
कलियुगामध्ये देखील प्रजापिता असू शकत नाही. तो आहे संगमयुगावर. तुम्ही आता
संगमयुगावर आहात. शूद्रपासून तुम्ही ब्राह्मण बनले आहात. बाबांनी ब्रह्माला ॲडॉप्ट
केले आहे. शिवबाबांनी यांना कसे रचले, हे कुणीही जाणत नाही. त्रिमूर्तीच्या
चित्रामध्ये रचता शिवाचे चित्रच नाहीये, तर माहित कसे पडेल की उच्च ते उच्च भगवान
आहेत. बाकी सर्व आहे त्यांची रचना. हा आहे ब्राह्मण संप्रदाय तर जरूर प्रजापिता
पाहिजेत. कलियुगामध्ये तर असू शकत नाही, सतयुगामध्ये सुद्धा नाही. गायले जाते -
‘ब्राह्मण देवी-देवताय नमः’. आता ब्राह्मण कुठले आहेत? प्रजापिता ब्रह्मा कुठले
आहेत? जरूर संगमयुगाचे म्हणणार. हे आहे पुरुषोत्तम संगमयुग. या संगमयुगाचे कोणत्याही
शास्त्रांमध्ये वर्णन नाही. महाभारत लढाई सुद्धा संगमावर लागली आहे, ना की सतयुग
किंवा कलियुगामध्ये. पांडव आणि कौरव, हे आहेत संगमावर. तुम्ही पांडव संगमयुगी आहात,
तर कौरव कलियुगी आहेत. गीतेमध्ये सुद्धा भगवानुवाच आहे ना. तुम्ही आहात पांडव दैवी
संप्रदाय. तुम्ही रुहानी पंडे बनता. तुमची आहे रुहानी यात्रा, जी तुम्ही बुद्धीने
करता.
बाबा म्हणतात -
स्वतःला आत्मा समजा. आठवणीच्या यात्रेवर रहा. भौतिक यात्रेमध्ये तीर्थक्षेत्र
इत्यादी ठिकाणी जाऊन मग घरी परत येतात. ती यात्रा अर्धाकल्प चालते. ही संगमयुगाची
यात्रा एकदाच केली जाते. तुम्ही जाऊन मग मृत्यूलोकमध्ये परत येणार नाही. पवित्र
बनून मग तुम्हाला पवित्र दुनियेमध्ये यायचे आहे म्हणून तुम्ही आता पवित्र बनत आहात.
तुम्ही जाणता आता आपण ब्राह्मण संप्रदायाचे आहोत. मग दैवी संप्रदाय, विष्णू
संप्रदाय बनतात. सतयुगामध्ये देवी-देवता विष्णू संप्रदाय आहे. तिथे चतुर्भुजची
प्रतिमा असते, ज्यामुळे माहिती होते की हा विष्णू संप्रदाय आहे. इथे प्रतिमा आहे
रावणाची, तर रावण संप्रदाय आहे. तर हा टॉपिक ठेवल्यामुळे मनुष्य आश्चर्यचकित होतील.
आता तुम्ही देवता बनण्यासाठी राजयोग शिकत आहात. ब्रह्मा मुखवंशावली ब्राह्मण, तुम्ही
शुद्रापासून ब्राह्मण बनला आहात. दत्तक घेतलेले आहात. ब्राह्मण सुद्धा इथेच आहेत आणि
मग देवता देखील इथेच बनणार. डिनायस्टी (घराणे) इथेच असते. घराणे राजाईला म्हटले जाते.
विष्णूचे घराणे आहे. ब्राह्मणांचे घराणे म्हणणार नाही. घराण्यामध्ये राजाई चालते.
एकामागून दुसरा, मग तिसरा... आता तुम्ही जाणता - आपण आहोत ब्राह्मण कुलभूषण. मग
देवता बनतो ब्राह्मण सो विष्णू कुळामध्ये, विष्णू कुळामधून येतो क्षत्रिय चंद्रवंशी
कुळामध्ये, मग वैश्य कुळामध्ये आणि मग शूद्र कुळामध्ये. मग पुन्हा ब्राह्मण सो देवता
बनणार. अर्थ किती क्लिअर आहे. चित्रांमध्ये काय-काय दाखवले आहे. आपण ब्राह्मण सो
विष्णुपुरीचे मालक बनतो. यामध्ये गोंधळून जायचे नाही. बाबा जो निबंध देतात त्यावर
मग विचार सागर मंथन केले पाहिजे - कोणाला कसे समजावून सांगावे, ज्यामुळे लोकांना
आश्चर्य वाटेल की, यांचे हे स्पष्टीकरण तर खूप चांगले आहे. हे तर ज्ञानसागराशिवाय
दुसरे कोणीही समजावून सांगू शकत नाही. विचार सागर मंथन करून मग बसून लिहिले पाहिजे.
त्यानंतर वाचा म्हणजे मग लक्षात येईल. हे-हे शब्द ॲड केले पाहिजेत. बाबा देखील
सुरुवातीला मुरली लिहून तुम्हाला हातामध्ये देत होते. त्यानंतर ऐकवत होते. इथे तर
तुम्ही घरामध्ये बाबांसोबत राहता. आता तर तुम्हाला बाहेर जाऊन इतरांना ऐकवावे लागते,
हा टॉपिक खूप सुंदर आहे - ‘ब्रह्मा सो विष्णू’, यांना कोणीही जाणत नाहीत. विष्णूच्या
नाभीतून ब्रह्माला दाखवतात. जसे गांधीजींच्या नाभीतून नेहरू. परंतु घराणे तर हवे
ना. ब्राह्मण कुळामध्ये राजाई नाही, ब्राह्मण संप्रदायवालेच मग दैवी घराण्याचे
बनतात. मग चंद्रवंशी घराण्यामध्ये जाल आणि मग वैश्य घराण्यामध्ये. असे प्रत्येक
घराणे चालते ना. सतयुग आहे व्हाईसलेस वर्ल्ड (निर्विकारी दुनिया), कलियुग आहे विशश
वर्ल्ड (विकारी दुनिया). हे दोन शब्द सुद्धा कोणाच्या बुद्धीमध्ये नाही आहेत.
नाहीतर हे जरूर बुद्धीमध्ये असले पाहिजे की विकारी पासून निर्विकारी कसे बनतात.
मनुष्य ना निर्विकारीला जाणत, ना विकारीला जाणत. तुम्हाला समजावून सांगितले जाते -
देवता निर्विकारी आहेत. असे कधी ऐकले नाही की ब्राह्मण निर्विकारी आहेत. नवीन दुनिया
आहे निर्विकारी, जुनी दुनिया आहे विकारी. तर जरूर संगमयुग दाखवावे लागेल. याविषयी
कोणालाच माहिती नाहीये. पुरुषोत्तम मास साजरा करतात ना. ते तीन वर्षानंतर एक महिना
साजरा करतात. तुमचे ५००० वर्षानंतर एक संगमयुग येते. मनुष्य आत्म्याला आणि
परमात्म्याला यथार्थरित्या जाणत नाहीत फक्त असे म्हणतात - ‘चमकता है, अज़ब सितारा.’
बस्स जसे दाखवतात, रामकृष्ण परमहंसचा शिष्य विवेकानंद म्हणत होता - मी गुरूच्या
समोर बसलो होतो…’, गुरुचे देखील ध्यान तर करतात ना. आता बाबा म्हणतात - मामेकम् (मज
एकाची) आठवण करा. ध्यानाची तर गोष्टच नाही, गुरुची तर आठवण आहेच. खास बसून आठवण
केल्यामुळे आठवण येईल काय. त्यांची गुरुमध्ये भावना होती की, हे भगवान आहेत तर
त्यांनी असे बघितले की, त्यांच्या गुरुची आत्मा निघून आपल्यामध्ये लीन झाली. त्यांची
आत्मा कुठे जाऊन बसली नंतर काय झाले, काहीही वर्णन नाही, बस्स. खुश झाला आपल्याला
भगवंताचा साक्षात्कार झाला. भगवान काय आहेत, ते जाणत नाहीत. बाबा म्हणतात शिडीच्या
चित्रावर तुम्ही समजावून सांगा. हा आहे भक्तीमार्ग. तुम्ही जाणता एक आहे भक्तीची
नाव, दुसरी आहे ज्ञानाची. ज्ञान वेगळे, भक्ती वेगळी आहे. बाबा म्हणतात - मी तुम्हाला
कल्पापूर्वी ज्ञान दिले होते, विश्वाचा मालक बनवले होते. आता तुम्ही कुठे आहात.
तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये सारे ज्ञान आहे, बाकीची डिनायस्टी (घराणी) कशी येतात,
कसे झाड वाढते. जसा पुष्पगुच्छ असतो ना. हे सृष्टी रूपी झाड देखील फुलदाणी आहे.
मध्यभागी आहे तुमचा धर्म आणि यापासून आणखी ३ धर्म उदयास येतात मग त्यापासून वृद्धी
होत जाते. तर या झाडाची देखील आठवण करायची आहे. किती शाखा-उपशाखा इत्यादी येत
राहतात. नंतर येणाऱ्याचा देखील मान असतो. वडाचे झाड असते ना, खोड राहिलेले नाहीये,
बाकी सर्व झाड उभे आहे. देवी-देवता धर्म देखील नष्ट झाला आहे. एकदम सडला आहे.
भारतवासी आपल्या धर्मांना अजिबातच जाणत नाहीत बाकीचे सर्व आपापल्या धर्माला जाणतात,
हे म्हणतात - आम्ही धर्माला मानतच नाही. मुख्य आहेतच ४ धर्म. बाकी छोटे-छोटे धर्म
तर अनेक आहेत. या झाड आणि सृष्टीचक्राला तुम्ही आत्ता जाणता. देवी-देवता धर्माचे
नावच नाहीसे केले आहे. आता बाबा त्याची स्थापना करून बाकी सर्व धर्मांचा विनाश
करतात. गोळ्याच्या चित्रा समोर देखील तुम्ही जरूर घेऊन गेले पाहिजे. हे सतयुग, हे
कलियुग. कलियुगामध्ये किती धर्म आहेत, सतयुगामध्ये आहे एक धर्म. एका धर्माची स्थापना,
अनेक धर्मांचा विनाश कोण करत असेल? भगवान देखील जरूर कोणाद्वारे तरी करतील ना. बाबा
म्हणतात - ब्रह्माद्वारा आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करतो. ब्राह्मण सो
विष्णुपुरीचे देवता बनतात.
संगमावरच तुम्हा
ब्राह्मणांना पवित्र बनवण्यासाठीच गुप्त मेहनत करावी लागते. तुम्ही ब्रह्माची मुले
संगमावर भाऊ-बहिणी आहात. भावा-बहिणीची वाईट दृष्टी असू शकत नाही. पती-पत्नी दोघेही
स्वतःला बी. के. समजतात, यामध्येच खूप मेहनत आहे. स्त्री-पुरुषांमधील आकर्षण असे आहे
जे बस्स, स्पर्श केल्याशिवाय राहू शकत नाहीत. इथे भाऊ-बहिणीला स्पर्श तर करायचाच
नाहीये, नाहीतर पापाची फिलिंग येते. आपण बी. के. आहोत, हेच विसरून जातात त्यामुळे
मग संपून जातात. यामध्ये खूप गुप्त मेहनत आहे. भले युगल होऊन राहतात कोणाला काय
माहित, ते स्वतःजाणतात आपण बी. के. आहोत, फरिश्ते आहोत. स्पर्श करायचा नाहीये. असे
करता-करता सूक्ष्मवतनवासी फरिश्ते बनाल. नाहीतर फरिश्ता बनू शकणार नाही. फरिश्ता
बनायचे असेल तर पवित्र रहावे लागेल. अशी जोडी निघाली तर नंबर वनमध्ये जाईल. म्हणतात
- दादाने (ब्रह्मा बाबांनी) तर सर्व अनुभव घेतला, मागाहून मग संन्यास घेतला आहे,
जास्ती मेहनत तर त्यांना करावी लागते जे जोडपी बनतात. मग त्यांच्यामध्ये ज्ञान आणि
योग देखील पाहिजे. अनेकांना आप समान बनवतील तेव्हाच मोठा राजा बनतील. फक्त एकाचीच
गोष्ट तर नाहीये ना. बाबा म्हणतात तुम्ही शिवबाबांची आठवण करा. हे आहेत प्रजापिता.
बरेच असे देखील आहेत जे म्हणतात आमचे काम तर शिवबाबांकडे आहे. आम्ही ब्रह्माची
आठवणच का करावी! त्यांना पत्र तरी कशाला म्हणून लिहायचे! असे देखील आहेत. तुम्हाला
आठवण करायची आहे शिवबाबांना, म्हणूनच बाबा फोटो इत्यादी सुद्धा देत नाहीत.
यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) शिवबाबा येतात, हे तर देहधारी आहेत ना. आता तर
तुम्हा मुलांना बाबांकडून वारसा मिळतो. ते (दुनियावाले ) स्वतःला ईश्वर म्हणतात मग
त्यांच्याकडून काय मिळते,(?) भारतवासीयांना किती घाटा झाला आहे. भारतवासीयांचे एकदम
दिवाळेच निघाले आहे. प्रजेकडून भीक मागत राहतात. दहा-वीस वर्षांसाठी लोन घेतात मग
द्यायचे थोडेच असते. घेणारे आणि देणारे दोघेही संपून जातील. खेळच समाप्त होणार आहे.
अनेक संकटे डोक्यावर आहेत. दिवाळे निघणे, आजारपण इत्यादी खूप आहेत. कोणी आपली
संपत्ती सावकाराकडे ठेवतात आणि त्यांचे जेव्हा दिवाळे निघते तेव्हा गरिबांना किती
दुःख होते. पावलो-पावली दुःखच दुःख आहे. अचानक बसल्या-बसल्या मरतात. हा आहेच
मृत्यूलोक. तुम्ही आता अमरलोकमध्ये जात आहात. अमरपुरीचे बादशहा बनता. ‘अमरनाथ’,
तुम्हा पार्वतींना खरी-खरी अमरकथा ऐकवत आहेत. तुम्ही जाणता ‘अमर’ बाबा आहेत,
त्यांच्याकडून आपण ‘अमरकथा’ ऐकत आहोत. आता अमरलोकला जायचे आहे. यावेळी तुम्ही आहात
संगमयुगावर. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) विचार सागर
मंथन करून “ब्रह्मा सो विष्णू” कसे बनतात, या टॉपिकवर ऐकवायचे आहे. बुद्धीला ज्ञान
मंथनामध्ये बिझी ठेवायचे आहे.
२) राजाई पद प्राप्त
करण्यासाठी ज्ञान आणि योगासोबतच आप समान बनविण्याची सेवा देखील करायची आहे. आपली
दृष्टी अतिशय शुद्ध बनवायची आहे.
वरदान:-
सर्व नात्यांचा
अनुभव एका बाबांसोबत करणारे अथक आणि विघ्नविनाशक भव
ज्या मुलांची सर्व
नाती एका बाबांसोबत आहेत त्यांना बाकीची सर्व नाती निमित्त मात्र अनुभव होतील, ते
सदैव आनंदाने नाचणारे असतील, कधीही थकल्याचा अनुभव करणार नाहीत, अथक असतील. बाबा आणि
सेवा याच धूनमध्ये मग्न असतील. विघ्नांच्या मुळे थांबण्याऐवजी सदैव विघ्न विनाशक
असतील. सर्व नात्यांची अनुभूती एका बाबांसोबत असल्यामुळे डबल लाईट राहतील, कोणते ओझे
असणार नाही. सर्व कंप्लेंट समाप्त होतील. कंप्लिट स्थितीचा अनुभव होईल. सहजयोगी
असतील.
बोधवाक्य:-
संकल्पामध्ये
देखील कोणत्या देहधारीकडे आकर्षित होणे अर्थात कृतघ्न बनणे आहे.
अव्यक्त इशारे -
आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा, अंतर्मुखी बना:- जसे अंतराळ यानामधील
अंतराळवीर खूप उंचावर असल्या कारणाने संपूर्ण पृथ्वीचे पाहिजे तिथले फोटो काढू
शकतात, अशा सायलेन्सच्या शक्तीने अंतर्मुखी यान द्वारा, मनसा शक्तीद्वारे कोणत्याही
आत्म्याला चरित्रवान बनण्याची, श्रेष्ठ आत्मा बनण्याची प्रेरणा देऊ शकता.