21-06-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्हाला स्मृती आली आहे की आपण ८४ जन्मांचे चक्र पूर्ण केले, आता आपल्या
घरी शांतिधामला जातो, घरी जाण्यासाठी थोडा वेळ बाकी आहे”
प्रश्न:-
ज्या मुलांना
घरी जाण्याची आठवण असते, त्यांचे लक्षण काय असेल?
उत्तर:-
ते या जुन्या दुनियेला बघत असताना देखील पाहणार नाहीत. त्यांना बेहदचे वैराग्य असेल,
काम-धंद्यामध्ये राहूनही हलके राहतील. इकडे-तिकडे व्यर्थच्या गोष्टींमध्ये आपला वेळ
वाया घालवणार नाहीत. स्वतःला या दुनियेमध्ये पाहुणा समजतील.
ओम शांती।
केवळ तुम्ही संगमयुगी ब्राह्मण मुलेच जाणता की आपण थोड्या काळासाठी या जुन्या
दुनियेचे पाहुणे आहोत. तुमचे खरे घर आहे शांतीधाम. त्याचीच मनुष्य खूप आठवण करतात
जेणेकरून मनाला शांती मिळेल. परंतु मन काय आहे, शांती काय आहे, आपल्याला कुठून
मिळणार, काहीच समजत नाहीत. तुम्ही जाणता आता आपल्या घरी जाण्यासाठी थोडा वेळ बाकी
आहे. संपूर्ण दुनियेचे मनुष्य मात्र नंबरवार तिथे जातील. ते आहे शांतीधाम आणि हे आहे
दुःखधाम. याची आठवण करणे तर सोपे आहे ना. कोणीही वृद्ध असो अथवा तरुण असो, हे तर
आठवण करू शकता ना. यामध्ये संपूर्ण सृष्टीचे ज्ञान येते. संपूर्ण डिटेल बुद्धीमध्ये
येतात. आता तुम्ही संगमयुगावर बसला आहात, हे बुद्धीमध्ये राहते की, ड्रामा प्लॅन
अनुसार आपण शांतीधामला जात आहोत. हे बुद्धीमध्ये राहिल्याने तुम्हाला आनंद होईल,
स्मृती राहील. आता आम्हाला आपल्या ८४ जन्मांची स्मृती आली आहे. तो भक्तिमार्ग वेगळा
आहे, या आहेत ज्ञानमार्गाच्या गोष्टी. बाबा समजावून सांगत आहेत - ‘गोड मुलांनो, आता
आपले घर आठवते आहे का? किती ऐकत राहता, इतक्या पुष्कळ गोष्टी ऐकता. एक हेच आहे की
आता आपण शांतिधामला जाणार मग सुखधाममध्ये येणार. बाबा आलेच आहेत पावन दुनियेमध्ये
घेऊन जाण्यासाठी. सुखधाममध्ये देखील आत्मे सुख आणि शांतीमध्ये राहतात. शांतीधाममध्ये
फक्त शांती आहे, इथे तर खूप गडबड-गोंधळ आहे ना. आता इथून मधुबन मधून तुम्ही जेव्हा
आपल्या घरी जाल तर तुमची बुद्धी व्यर्थ गोष्टींमध्ये, आपला धंदा इत्यादीकडे जाईल.
इथे (मधुबनमध्ये) तर ते झंझट राहत नाही. तुम्ही जाणता आपण आत्मे आहोतच शांतीधामचे
निवासी. इथे आपण पार्टधारी बनलो आहोत, इतर कोणालाही हेच माहीत नाहीये की, आपण कसे
पार्टधारी आहोत! तुम्हा मुलांनाच बाबा येऊन शिकवतात, कोटींमध्ये कोणी शिकतात. सर्वच
काही शिकणार नाहीत. तुम्ही आता किती हुशार बनता. पहिले बुद्धू होता. आता तर पहा
भांडण-तंटा इत्यादी किती आहे, याला काय म्हणणार? आपण आपसामध्ये भाऊ-भाऊ आहोत, हेच
विसरले आहेत. भाऊ-भाऊ कधी खून करतात का? हो, खून पण करतात देखील केवळ संपत्तीसाठी.
आता तुम्ही जाणता आपण सर्व एका पित्याची मुले भाऊ-भाऊ आहोत. तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये
समजता, आम्हा आत्म्यांना बाबा येऊन शिकवत आहेत. ५ हजार वर्षांपूर्वी प्रमाणे
आपल्याला शिकवतात कारण ते ज्ञानाचा सागर आहेत, या शिक्षणाला दुसरे कोणीही जाणत
नाहीत. हे देखील तुम्ही मुलेच जाणता - बाबाच स्वर्गाचे रचयिता आहेत. त्यांना कधी
सृष्टीला रचणारे म्हणणार नाही. सृष्टी तर अनादि आहेच. स्वर्गाला रचणारे म्हणता येईल,
तिथे दुसरा कोणताही खंड नव्हता. इथे तर अनेक खंड आहेत. एक वेळ होती जेव्हा एकच धर्म
होता, एकच खंड होता. मागाहून मग इतर व्हरायटी धर्म आले आहेत.
आता लक्षात येते आहे
की, व्हरायटी धर्म कसे येतात ते. सर्वात पहिला आदि सनातन देवी-देवता धर्म आहे,
सनातन धर्म इथे देखील म्हणतात. परंतु अर्थ तर काहीच समजत नाहीत. तुम्ही सर्व आदि
सनातन देवी-देवता धर्माचे आहात फक्त पतित बनले आहात, सतोप्रधानापासून सतो-रजो-तमो
होत गेला आहात. तुम्ही समजता - आपण आदि सनातन देवी-देवता धर्माचे आहोत, खूप पवित्र
होतो, आता पतित बनलो आहोत. तुम्ही बाबांकडून पवित्र दुनियेचा मालक बनण्याचा वारसा
घेतला होता. समजता आपण सर्वात अगोदर पवित्र गृहस्थ धर्माचे होतो, आता ड्रामाच्या
प्लॅन अनुसार रावण राज्यामध्ये आपण पतित प्रवृत्ती मार्ग वाले बनलो आहोत. तुम्हीच
बोलावता - ‘हे पतित-पावन आम्हाला सुखधाम मध्ये घेऊन जा’. कालचीच गोष्ट आहे. काल
तुम्ही पवित्र होता, आज अपवित्र बनून बोलावत आहात. आत्मा पतित झाली आहे. आत्मा
बोलावते बाबा येऊन आम्हाला पुन्हा पावन बनवा. बाबा म्हणतात - ‘आता हा अंतिम जन्म
पवित्र बना म्हणजे मग तुम्ही २१ जन्मांसाठी खूप सुखी व्हाल. बाबा तर खूप चांगल्या
गोष्टी ऐकवतात. वाईट गोष्टींपासून सोडवतात, तुम्ही देवता होता ना. आता पुन्हा बनायचे
आहे. पवित्र बना. किती सोपे आहे. कमाई खूप जबरदस्त आहे. तुम्हा मुलांच्या
बुद्धीमध्ये आहे शिवबाबा आले आहेत, प्रत्येक ५ हजार वर्षानंतर येतात. दुनिया
नव्यापासून जुनी होते जरूर. हे दुसरे कोणीही सांगू शकणार नाही. शास्त्रांमध्ये
कलियुगाचा कालावधी प्रदीर्घ केला आहे. ही सर्व आहे ड्रामाची भावी.
आता तुम्ही मुले पापा
पासून मुक्त होण्याचा पुरुषार्थ करता, लक्ष रहावे की अजून कोणते पाप होऊ नये.
देह-अभिमानामध्ये आल्यानेच मग इतर विकार येतात, ज्यामुळे पाप होते त्यामुळे भूतांना
पळवून लावावे लागते. या दुनियेतील कोणत्याही वस्तूमध्ये मोह नसावा. या जुन्या
दुनियेपासून वैराग्य असावे. भले पाहता, जुन्या घरामध्ये अडकून पडले आहात परंतु
बुद्धी नवीन दुनियेमध्ये गुंतली आहे. जेव्हा नवीन घरामध्ये जाल तेव्हा नव्यालाच
पहाल. जोपर्यंत हे जुने घर नष्ट होत नाही तोपर्यंत डोळ्यांनी हे जुने बघत असताना
आठवण नव्या घराची करायची आहे. कोणतेही असे काम करायचे नाही ज्यामुळे मग पश्चाताप
करावा लागेल. आज अमक्याला दुःख दिले, हे पाप केले, बाबांना विचारू शकता बाबा हे पाप
आहे का? घुसमटायचे कशासाठी. जर विचारले नाहीत तर मग घुसमटतच रहाल. बाबांना विचाराल
तर बाबा लगेच हलके करतील (शंका निरसन करतील). आता तुम्ही खूप भारी आहात. पापांचे ओझे
खूप भारी आहे. २१ जन्म मग पापांमधून हलके व्हाल (मुक्त व्हाल). जन्म-जन्मांतरीचे ओझे
डोक्यावर आहे. जितके आठवणीमध्ये रहाल, हलके होत जाल. भेसळ निघून जाईल आणि खुशी
वाढेल. सतयुगामध्ये तुम्ही खूप आनंदामध्ये होता मग तो आनंद कमी होत-होत आता तुमचा
सगळा आनंद हरवून गेला आहे. सतयुगापासून कलियुगापर्यंत या यात्रेमध्ये ५ हजार वर्षे
लागली आहेत. स्वर्गातून नरकामध्ये येण्याच्या या यात्रेविषयी आता माहीत झाले आहे
की, आपण स्वर्गातून नरकामध्ये कसे आलो आहोत. आता पुन्हा तुम्ही नरकातून स्वर्गामध्ये
येता. एका सेकंदामध्ये जीवनमुक्ती. बाबांना ओळखले. बाबा आले आहेत तर जरूर आपल्याला
स्वर्गामध्ये घेऊन जातील. बाळ जन्माला आले आणि संपत्तीचे मालक बनले. बाबांचे बनला
आहात तर नशा चढायला पाहिजे ना. उतरतो कशासाठी.(?) तुम्ही तर मोठे आहात ना. बेहदच्या
बाबांची मुले बनला आहात तर बेहदच्या राजधानीवर तुमचा अधिकार आहे म्हणून गायन देखील
आहे - अतींद्रिय सुख विचारायचे असेल तर गोपी वल्लभच्या गोप-गोपिकांना विचारा. वल्लभ,
बाबा आहेत ना, त्यांना विचारा. नंबरवार पुरुषार्थानुसारच आनंदाचा पारा चढेल. कोणी
तर लगेच आप समान बनवतील. मुलांचे कामच हे आहे, सर्वकाही विसरून आपल्या राजधानीची
आठवण करून देणे.
तुम्ही तर स्वर्गाचे
मालक होता. आता कलियुग जुनी दुनिया आहे मग नवीन दुनिया होईल. आता तुम्हा मुलांच्या
बुद्धीमध्ये आहे की दर ५ हजार वर्षा नंतर बाबा भारतामध्येच येतात. त्यांची जयंती
देखील साजरी करतात. तुम्ही जाणता बाबा येऊन आम्हाला राजधानी देऊन जातात मग आठवण
करण्याची गरज राहत नाही. नंतर जेव्हा भक्ती सुरू होते तेव्हा मग आठवण करतात.
आत्म्याने पक्वान्ने खाल्ली आहेत, म्हणून आठवण करते बाबा पुन्हा येऊन आम्हाला
शांतीधाम, सुखधाममध्ये घेऊन जा. आता तुम्ही मुले समजता - ते आपले पिता आहेत, टीचर
देखील आहेत, गुरु देखील आहेत. सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे चक्र, ८४ जन्मांचे ज्ञान
तुमच्या बुद्धीमध्ये आहे. अगणित वेळा ८४ जन्म घेतले आहेत आणि घेत रहाल. याचा कधीही
अंत होत नाही. तुमच्या बुद्धीमध्येच हे चक्र आहे घडोघडी स्वदर्शन चक्र आठवले पाहिजे.
हेच मनमनाभव आहे, जितकी बाबांची आठवण कराल तितकी पापे भस्म होतील.
तुम्ही जेव्हा
कर्मातीत अवस्थेच्या जवळ पोहचाल तेव्हा तुमच्याकडून कोणतीही विकर्म होणार नाहीत. आता
थोडी-थोडी विकर्म होतात. संपूर्ण कर्मातीत अवस्था आता थोडीच बनली आहे. हे बाबा (ब्रह्मा
बाबा) देखील तुमच्या सोबत स्टुडंट आहेत. शिकवणारे आहेत शिवबाबा. भले यांच्यामध्ये
प्रवेश करतात, हे देखील स्टुडंट आहेत. या आहेत नवीन गोष्टी. आता तुम्ही फक्त बाबांची
आणि सृष्टीचक्राची आठवण करा. तो आहे भक्तीमार्ग, हा आहे ज्ञानमार्ग. रात्रं-दिवसाचा
फरक आहे! तिथे (भक्तीमध्ये) किती झांज-घंटा इत्यादी वाजवतात. इथे फक्त आठवणीमध्ये
रहायचे आहे. आत्मा तर अमर आहे, अकाल तख्त देखील आहे. असे नाही की केवळ बाबा
अकालमूर्त आहेत. तुम्ही देखील अकालमूर्त आहात. अकालमूर्त आत्म्याचे ही भृकुटी तख्त
आहे. जरूर भृकुटीमध्येच बसतील. पोटामध्ये थोडेच बसतील. आता तुम्ही जाणता आम्हा
अकालमूर्त आत्म्याचे तख्त कुठे आहे. या भृकुटीच्या मध्यभागी आपले तख्त आहे.
अमृतसरमध्ये अकाल तख्त आहे ना. अर्थ काहीच समजत नाहीत. महिमा देखील गातात अकालमूर्त.
त्यांच्या अकाल तख्ता विषयी कोणालाच माहिती नाहीये. आता तुम्हाला माहित झाले आहे,
तख्त तर हा (ब्रह्मा) आहे, ज्याच्यावर बसून ऐकवतात. तर आत्मा अविनाशी आहे, शरीर आहे
विनाशी. आत्म्याचे हे अकालतख्त आहे, नेहमीच हे अकाल तख्त राहते. हे तुम्ही समजता.
त्यांनी मग तो तख्त बनवून नाव दिले आहे. वास्तविक अकाल आत्मा तर इथे बसली आहे.
तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये अर्थ आहे, एक ओंकार… याचा अर्थ तुम्हीच समजता. लोक
मंदिरामध्ये जाऊन म्हणतात अच्यूतम् केशवम्… अर्थ काहीच नाही. अशीच स्तुती करत
राहतात. अच्यूतम् केशवम् राम नारायणम्… आता राम कुठे, नारायण कुठे. बाबा म्हणतात -
तो सर्व आहे भक्तिमार्ग. ज्ञान तर खूप सोपे आहे, दुसरी कोणती गोष्ट विचारण्याच्या
अगोदर बाबांची आणि वारशाची आठवण करायची आहे, ती मेहनत कोणाकडूनही होत नाही, विसरून
जातात. एक नाटक देखील आहे - माया असे करते, भगवान असे करतात. तुम्ही बाबांची आठवण
करता, माया तुम्हाला जास्त तुफानामध्ये घेऊन जाते. मायेचा आदेश आहे - पैलवानाशी
पैलवान होऊन लढा, तुम्ही सर्व युद्धाच्या मैदानामध्ये आहात. जाणता यामध्ये
कोण-कोणत्या प्रकारचे योद्धे आहेत. कोणी तर खूप कमजोर आहेत, कोणी मध्यम कमजोर आहेत,
कोणी तर खूप तल्लख आहेत. सर्व मायेशी युद्ध करणारे आहेत. गुप्त रितीने अंडरग्राउंड.
ते देखील अंडरग्राउंड बॉम्ब्सची चाचणी करतात. हे देखील तुम्ही मुलेच जाणता, आपल्याच
मृत्यूसाठी सर्व काही करत आहेत. तुम्ही एकदम शांतीमध्ये बसले आहात, त्यांचे आहे
सायन्स बळ. नैसर्गिक आपत्ती देखील अनेक आहेत. त्यामध्ये तर कोणाचे काहीही चालू शकत
नाही. आता कृत्रिम पावसासाठी सुद्धा प्रयत्न करतात. कृत्रिम पाऊस पडेल तर मग धान्य
जास्त पिकेल. तुम्ही मुले तर जाणता किती जरी पाऊस पडला तरीही नैसर्गिक आपदा जरूर
होणार आहे. मुसळधार पाऊस पडेल मग काय करू शकाल. याला म्हटले जाते नैसर्गिक आपदा.
सतयुगामध्ये असे होत नाही. इथे होते ज्यामुळे मग विनाशामध्ये मदत होते.
तुमच्या बुद्धीमध्ये
आहे आपण जेव्हा सतयुगामध्ये असणार तेव्हा यमुनेच्या काठावर सोन्याचे महाल असतील.
कल्प-कल्प असे होत राहते. अगोदर थोडे असतात मग झाड वाढत जाते, तिथे कोणतीही घाणीची
वस्तू असतच नाही. इथे तर पहा चिमण्या देखील घाण करत राहतात, तिथे घाणीची गोष्ट नाही,
त्याला म्हटलेच जाते स्वर्ग. आता तुम्ही समजता आपण हे देवता बनतो तर आतून किती आनंद
झाला पाहिजे. माया रुपी जिन्न पासून वाचण्यासाठी बाबा म्हणतात - तुम्ही मुलांनी या
रूहानी धंद्याला लागा. मनमनाभव. बस यामध्येच जिन्न बना. जिन्नाचे उदाहरण देतात ना.
म्हणाला - काम द्या… तर बाबा देखील काम देतात. नाहीतर माया खाऊन टाकेल. बाबांचे
पूर्ण मदतगार बनायचे आहे. एकटे बाबा तर करणार नाहीत. बाबा तर राज्य सुद्धा करत
नाहीत. तुम्ही सेवा करता, राजाई देखील तुमच्यासाठीच आहे. बाबा म्हणतात मी देखील मगध
देशामध्ये येतो. माया देखील मगरमच्छ आहे, किती महारथींना गिळून खाऊन टाकते. हे सर्व
आहेत शत्रू. ज्याप्रमाणे बेडकाचा शत्रू साप आहे ना. तुम्हाला माहित आहे, तशी तुमची
शत्रू आहे माया. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) स्वतःला
पापांपासून मुक्त करण्याचा पुरुषार्थ करायचा आहे, कधीही देह-अभिमानामध्ये यायचे नाही.
या दुनियेतील कोणत्याही वस्तूमध्ये मोह ठेवायचा नाही.
२) माया रुपी जिन्न
पासून वाचण्यासाठी बुद्धीला रूहानी धंद्यामध्ये व्यस्त ठेवायचे आहे. बाबांचे पूर्णत:
मदतगार बनायचे आहे.
वरदान:-
सर्व
खजिन्यांना वेळेवर युज करून निरंतर आनंदाचा अनुभव करणारे खुशनसीब (भाग्यशाली) आत्मा
भव
बापदादांद्वारे
ब्राह्मण जन्म होताच संपूर्ण दिवसासाठी अनेक श्रेष्ठ आनंदाचे खजिने प्राप्त होतात
म्हणूनच तुमच्या नावानेच आता पर्यंत अनेक भक्त अल्प काळाच्या आनंदामध्ये येतात,
तुमच्या जड चित्रांना पाहून आनंदाने नाचू लागतात. इतके तुम्ही सर्व भाग्यशाली आहात,
पुष्कळ खजिने मिळाले आहेत परंतु फक्त वेळेवर युज करा. चावीला नेहमी समोर ठेवा
अर्थात नेहमी लक्षात ठेवा आणि स्मृतीला स्वरूपामध्ये आणा म्हणजे निरंतर आनंदाचा
अनुभव होत राहील.
बोधवाक्य:-
बाबांच्या
श्रेष्ठ आशांचा दीपक जागृत करणारेच कुल दीपक आहेत.
अव्यक्त इशारे -
आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा, अंतर्मुखी बना:-
आत्मिक स्थितीमध्ये
राहून बाह्यमुखतेला सोडून द्या म्हणजे मग मेहनती पासून सुटाल आणि अनुभवाच्या
सागरामध्ये सामावून जाल. एक-दोन अनुभव नाहीत अनेक आहेत. एक-दोन अनुभव करून
अनुभवाच्या तलावामध्ये आंघोळ करू नका. सागराची मुले अनुभवांच्या सागरामध्ये सामावून
जा.