22-06-25    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   15.12.2005  ओम शान्ति   मधुबन


“आता स्नेह आणि सहयोगाची रूपरेशा स्टेजवर आणा, प्रत्येकाला गुण आणि शक्तींची गिफ्ट द्या”


आज परमात्म पिता आपल्या चोहो बाजूच्या परमात्म प्रेमाच्या अधिकारी मुलांना बघत आहेत. हे परमात्म प्रेम विश्वामध्ये कोटींमधून कोणाला प्राप्त होते. हे परमात्म प्रेम नि:स्वार्थ प्रेम आहे कारण एक परमात्मा पिताच निराकार, निरहंकारी आहेत. मनुष्य आत्मा शरीरधारी असल्याकारणाने त्यांच्यामध्ये कोणता ना कोणता स्वार्थीपणा येतोच. परमात्म पिताच आपल्या मुलांना नि:स्वार्थ प्रेम देतात. परमात्म प्रेम ब्राह्मण जीवनाचा विशेष आधार आहे. ब्राह्मण जीवनाचे जीवनदान आहे. जर ब्राह्मण जीवनामध्ये परमात्म प्रेमाचा अनुभव कमी असेल, तर प्रेमाशिवाय जीवन रमणीक नाही, परंतु रुक्ष (निरस) जीवन होते. परमात्म प्रेमच जीवनामध्ये सदैव सोबतही करते आणि साथी बनून सदैव सहयोगी राहते. जिथे प्रेम आहे, सोबत आहे तिथे सर्वकाही खूप सोपे आणि सरळ होऊन जाते. मेहनतीचा अनुभव होत नाही. असा अनुभव आहे ना! परमात्म प्रिय असणारे, कोणत्याही व्यक्तीच्या अथवा साधनांच्या आकर्षणामध्ये येऊ शकत नाहीत कारण परमात्म आकर्षण, परमात्म प्रेम असा अनुभव करवते जे सदैव प्रेमामुळे लवलीन राहतात, ज्याला लोकांनी परमात्म्यामध्ये लीन होणे असे समजले आहे. परमात्म्यामध्ये लीन होत नाहीत परंतु परमात्म प्रेमामध्ये लवलीन होतात.

बापदादा चोहो बाजूच्या मुलांना बघत असतात - परमात्म प्रिय तर सर्व बनले आहेत परंतु एक आहेत लवली (लाडकी) मुले, दुसरी आहेत लवलीन (प्रेमामध्ये एकरूप झालेली) मुले. तर आपणच आपल्याला विचारा - लाडके तर सगळे आहेत, परंतु लवलीन कितपत राहतो? लवलीन मुलांची निशाणी आहे ते सदैव परमात्म आज्ञेचे सहजपणे पालन करतात. आज्ञेमध्ये देखील राहतात आणि देहभानाने सुद्धा कुर्बान (समर्पित) होऊन राहतात कारण प्रेमामध्ये कुर्बान होणे काही अवघड नाहीये. सर्वात पहिली आज्ञा आहे - ‘योगी भव, पवित्र भव’. बाबांचे मुलांवर प्रेम असल्याकारणाने बाबा मुलांना मेहनत करताना पाहू शकत नाहीत; कारण बाबा जाणतात ६३ जन्म खूप मेहनत केली, आता हा अलौकिक जन्म मेहनतीपासून मुक्त होऊन अतींद्रिय सुखाचा आनंद लुटण्याचा आहे. तर आनंद लुटत आहात की मेहनत करावी लागते? प्रेमामध्ये आज्ञेनुसार चालणे काही अवघड वाटत नाही. जर मेहनत करावी लागत असेल तर प्रेमाच्या पर्सेंटेजमध्ये कमी आहे. कुठे ना कुठे प्रेमामध्ये काही ना काही लिकेज आहे. दोन गोष्टींचे लिकेज मेहनत करायला लावते - एक आहे - जुन्या संसाराचे आकर्षण, संसारामधील नातेसंबंध, भौतिक वस्तू सर्व गोष्टी येतात. आणि दुसरे आहे - जुन्या संस्कारांचे आकर्षण. हा जुना संसार आणि जुने संस्कार आपल्याकडे आकर्षित करतात त्यामुळे मग परमात्म प्रेमामध्ये पर्सेंटेज होऊन जाते. चेक करा - या दोन्ही लिकेज पासून मुक्त आहात? आठवा तुम्हा आत्म्यांचे अनादि संस्कार आणि आदि संस्कार कोणते होते आणि आता अंताचे ब्राह्मण जीवनाचे संस्कार कोणते आहेत? अनादि सुद्धा आहेत, आदि देखील आहेत आणि अंताला देखील श्रेष्ठ संस्कार आहेत. हे जुने संस्कार मध्यकाळातील आहेत, ना अनादि आहेत, ना आदि आहेत, ना अंत काळातील आहेत. परंतु सर्वांचे लक्ष्य काय आहे? कोणत्याही मुलाला विचारा तर एकच उत्तर देतात - ‘लक्ष्य आहे बाप समान बनण्याचे’. हेच आहे ना! जर असेल तर हात वर करा. हेच लक्ष्य आहे पक्के? का मधे-मधे लक्ष्य बदलते?

तर बाबा मुलांना विचारत आहेत की बाबा आणि दादा दोघांचे समान संस्कार कोणते आहेत? जसे बाबा सदैव प्रत्येक आत्म्याप्रती उदारचित्त राहिले आहेत. प्रत्येक आत्म्याप्रती स्नेह आणि सन्मान स्वरूपामध्ये सहयोगी राहिले आहेत. तसे तुम्ही स्वतः देखील आपल्याला प्रत्येक आत्म्याप्रती सहयोगी अनुभव करता का? सहयोग दिला तर सहयोगी बनणार, असे नको. स्नेह दिला तर स्नेही बनू, असे नाही. जसे ब्रह्मा बाबा प्रत्येक मुलाप्रती सहयोगी बनले, स्नेही बनले, असे सर्वांचे सदैव स्नेही आणि सहयोगी; याला म्हटले जाते समान बनणे. जर कोणत्याही मुलाला संस्कार परिवर्तन करण्यामध्ये मेहनत करावी लागत असेल तर त्याचे कारण काय आहे? ब्रह्मा बाबांनी स्वतःवर अटेंशन ठेवले परंतु मेहनत केली नाही. संस्कार परिवर्तनामध्ये मेहनतीचे कारण आहे - लवली (लाडके) तर बनला आहात परंतु लवलीन बनलेले नाही आहात.

बापदादा तर प्रत्येक मुलाला लाडका मुलगा समजतात, जाणतात देखील, जन्मपत्री प्रत्येकाची जाणतात तरीही काय म्हणतील? लाडके आहेत. बापदादा नेहमी प्रत्येक मुलाला समान शिक्षण, एक समान पालना, एक समान वरदान देतात. भले जाणतात सुद्धा की हा लास्ट नंबर आहे तरीही बापदादा कोणत्याही मुलाचा अवगुण, कमजोरी संकल्पामध्ये सुद्धा ठेवत नाहीत. लाडका आहे, सिकीलधा आहे (खूप-खूप वर्षांनी भेटलेला आहे), गोड-गोड आहे… याच दृष्टीने आणि वृत्तीने बघतात कारण बापदादा जाणतात याच वृत्ती आणि श्रेष्ठ दृष्टीद्वारे कमजोर असणारा महावीर बनेल. असेच आपल्या श्रेष्ठ वृत्ती आणि शुभ भावना, शुभ कामनेद्वारे कोणाचेही परिवर्तन करू शकता. जेव्हा तुम्ही चॅलेंज केले आहे की प्रकृतीचे देखील परिवर्तन करून दाखवणार; तर मग आत्म्यांचे परिवर्तन करू शकत नाही काय! प्रकृतीजीत बनता तर आत्मा, आत्म्याचे श्रेष्ठ भावनेद्वारा, कल्याणाच्या कामनेद्वारे परिवर्तन करू शकत नाही!

आता नवीन वर्ष सुरु होणार आहे ना - तर नवीन वर्षामध्ये सर्व बेहदच्या ब्राह्मण परिवारामध्ये एकमेकांप्रती आपल्या शुभ भावना, श्रेष्ठ कामनेद्वारे प्रत्येकाने एकमेकांना परिवर्तन करण्यामध्ये सहयोगी बना, भले कमजोर आहे, तुम्ही जाणता - याच्या संस्कारामध्ये ही कमजोरी आहे परंतु तुम्ही स्नेह आणि सहयोगाच्या शक्तीद्वारे सहयोगी बना. एकमेकांना सहकार्याचा हात द्या. असा सहकार्याचा हात दिल्याने एक असे दृश्य बनेल जसे स्नेहाचा हात हातामध्ये देणे, सहकार्याचा हात देणे, जणू माळा तयार व्हावी. शिकवण देऊ नका, स्नेहपूर्ण सहयोग द्या. न्यारे बनू नका, किनारा करू नका, सहारा बना कारण तुमचे यादगार ‘विजयी माळा’ आहे. प्रत्येक मणी इतर मण्यांचा सहकारी साथीदार आहे तेव्हाच तर माळेचे चित्र बनले आहे.

तर सगळे बापदादांना विचारतात नवीन वर्षामध्ये काय करायचे आहे? संदेश देण्याचे कार्य तर खूप केलेत, करत आहात, करत राहणार. आता संदेश वाहकांच्या सहकार्याची आणि स्नेहाची रूपरेशा स्टेजवर आणा. महादानी बना, आपल्या गुणांचे सहयोगी बना आणि बनवा. असे आपल्या गुणांचे, आहेत तर परमात्म्याचे गुण परंतु जे गुण तुम्ही स्वतःमध्ये धारण केले आहेत, त्या गुणांच्या शक्तीद्वारे त्यांची कमजोरी दूर करा. हे करू शकता ना? करू शकता की कठीण आहे? टीचर्स सांगा, करू शकता? करू शकता की करायचेच आहे? करायचेच आहे. कोणीही कमजोर राहू नये, कारण कोटींमध्ये कोणी आहे ना! भले मग लास्टचा मणी जरी आहे, आहे तर कोटींमध्ये कोणी. तुमचे टायटलच आहे - मास्टर सर्वशक्तिवान. तर सर्वशक्तिवानचे कर्तव्य काय आहे? शक्तीची देवाण-घेवाण करणे. बाबांकडून मिळालेल्या गुणांची आपसामध्ये देवाण-घेवाण करा. हीच सहकार्याची गिफ्ट एकमेकांना द्या. नवीन वर्षामध्ये एकमेकांना गिफ्ट देतात ना! तर या वर्षी एकमेकांना गुणांची गिफ्ट द्या. जर कल्याणाची भावना ठेवाल तर जसे भाषण करून वाणीद्वारे संदेश देता ना, तसे आपल्या कल्याणाच्या भावने द्वारे, कल्याणाच्या वृत्ती द्वारे, कल्याणाच्या वायूमंडळाद्वारे ही गुणांची गिफ्ट द्या, शक्तींची गिफ्ट द्या. कमजोर असणाऱ्याला सहयोग देणे, हे वेळेला गिफ्ट देणे आहे, खाली पडलेल्याला पुन्हा पाडू नका, वर उचला, पुढे घेऊन जा. हा असा आहे, हा असा आहे… नाही. ‘हे प्रभू प्रेमाचे पात्र आहेत, कोटींमध्ये कोणी आत्मा आहे, विशेष आत्मा आहे, विजयी बनणारी आत्मा आहे’, अशी दृष्टी ठेवा. आता वृत्ती, दृष्टी, वायुमंडळ चेंज करा. काही नवीनता करायला हवी ना! कमजोरी दिसत असताना, पाहू नका, उत्साह द्या, सहयोग द्या. असे ब्राह्मण संघटन तयार करा तेव्हा बापदादा विजयाची टाळी वाजवतील. तुम्ही सुद्धा वारंवार टाळ्या वाजवता ना, बापदादा देखील मुबारक असो, शुभेच्छा असो, ग्रीटिंग्स असो, त्याच्या टाळ्या वाजवतील. तुम्ही सुद्धा सोबत टाळ्या वाजवाल ना. आता टाळ्या वाजवल्यात चांगले केलेत; परंतु विश्वासमोर टाळ्या वाजायला हव्यात. सर्वांच्या मुखातून हाच आवाज निघावा - ‘आमचे इष्ट आले’. आमचे पूज्य आले. लक्ष्य तर पक्के आहे ना! पक्के आहे लक्ष्य, करायचेच आहे? का बघू, प्लॅन बनवू! करायचेच आहे, प्लॅन कशाला, करायचेच आहे. आता सगळे प्रतीक्षा करत आहेत, आता त्यांची प्रतीक्षा संपवा. प्रत्यक्ष होण्याची तयारी करा. पहा प्रकृती देखील किती हैराण झाली आहे. तर प्रकृतीला देखील शांत बनवा. तुम्ही प्रत्यक्ष व्हाल तर विश्व शांती आपोआप होईल. अच्छा.

आजकाल विश्वामध्ये दोन गोष्टी विशेष चालतात - एक एक्सरसाईज आणि दुसरे भोजनावर अटेंशन. तर तुम्ही सुद्धा या दोन गोष्टी करता ना? तुमची एक्सरसाइज कोणती आहे? शारीरिक एक्सरसाइज तर सगळेच करतात परंतु मनाची एक्सरसाइज आहे - आता-लगेच ब्राह्मण, ब्राह्मण सो फरिश्ता आणि फरिश्ता सो देवता. या मनसा ड्रिलचा अभ्यास सदैव करत रहा. आणि शुद्ध भोजन, मनाचे शुद्ध संकल्प. जर व्यर्थ संकल्प, निगेटिव्ह संकल्प चालत असतील तर हे मनाचे अशुद्ध भोजन आहे. तर मनामध्ये सदैव शुद्ध संकल्प राहावेत, दोन्ही करता येते ना! जितका वेळ पाहिजे तितका वेळ शुद्ध संकल्प स्वरूप बना. अच्छा.

चोहो बाजूच्या परमात्म प्रेमाचे अधिकारी असलेल्या विशेष आत्म्यांना, सदैव एकमेकांचे सहयोगी बनणाऱ्या बाबांचे स्नेही आणि सहयोगी आत्म्यांना, सदैव विजयी आहे आणि विजयाचा झेंडा विश्वामध्ये फडकवायचा आहे, या ध्येयाला प्रॅक्टिकलमध्ये आणणाऱ्या विजयी मुलांना, सदैव या जुन्या संसाराच्या आणि संस्कारांच्या आकर्षणापासून दूर राहणाऱ्या बाप समान मुलांना दिलाराम बाबांची अंतःकरणापासून प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

दादींसोबत बातचीत:- खूप छान पार्ट बजावत आहात. तुम्हाला पाहून सर्वांना फरिश्ता लाईफची आठवण येते. न्यारा आणि प्यारा.

गुजरातच्या मुख्य १३ बहिणींसोबत बातचीत:- चांगले-चांगले महावीर आहात. महावीरांचे काम आहे विजयी बनून विजयी बनविणे. तर सगळे चांगली सेवा करत आहात आणि पुढे देखील सेवा होत राहील. बापदादा मुलांच्या उमंग-उत्साहाला पाहून आनंदीत होतात. अच्छा गुजरातमध्ये पसरवत आहात आणखी ही पुढे पसरवत रहाल. बापदादांना सर्व मुले आशेचे दीपक वाटत आहेत. छान आहे. संघटन सुद्धा चांगले आहे. प्रत्येकाची विशेषता आहे. अच्छा. खुश, आनंद वाटणारे. (सरला दीदी विचारत आहेत, दादींनी माळेमध्ये कोणाला ठेवले आहे) तुम्ही काय समजता? आम्ही तर असणारच, असे समजता ना? थोडाफार एकमेकांना सहयोग देऊन आणखी जे काही राहिलेले आहे, ते संपून जाईल. सगळे बाप समान बनणारेच आहात. (नवीनता काय करायची) सांगितले ना - प्रत्येक सेंटरने कमीत-कमी एक तरी वारसदार तयार करावा. आणि या वर्षी त्यांना घेऊन या, २१ वारसदार तरी घेऊन या. हे सुरू करा. पहिल्या नंबरमध्ये या. सगळे हां करत आहेत. वारसदाराची क्वालिफिकेशन जाणता ना. हे सर्वजण बाबांचेच बनवणार ना, आपले तर बनवणार नाही ना. अच्छा. ओम् शांती.

गुजरातची सेवा आहे, गुजरातवाले मिलन साजरे करण्यासाठी आले आहेत:- गुजरातवाले जे देखील आहेत, भले भेटीसाठी आले आहेत किंवा सेवेसाठी आले आहेत. त्यांनी हात वर करा. पुष्कळ आहेत, खूप छान. चांगला चान्स घेतला आहे. गुजरातला बापदादा म्हणतात, सिंधीमध्ये एक म्हण आहे - ‘जो चूल पर वह दिल पर’. तर सर्वात जवळचे गुजरात आहे. जो जवळ असतो ना, त्याला म्हटले जाते शडपंथ वर (काठावर, एकदम जवळ) आहे, बोलावले आणि पोहोचले. तर गुजरातवाले असे एव्हररेडी आहात ना - कधीही बोलावले की या, तर याल ना? असे आहात? परिवाराला तर बघणार नाही काय कराल, याल? एव्हररेडी आहात. चांगले आहे, गुजरात साकार ब्रह्माच्या प्रेरणेतून स्थापन झाला आहे. गुजरातने काही गुजरातला निमंत्रण दिले नाही, परंतु ब्रह्मा बाबांनी गुजरातला उघडले (गुजरातमध्ये सुरुवात केली). तर गुजरातवर विशेष ब्रह्मा बाबांची नजर पडली आहे. आणि गुजरातने पुरुषार्थ देखील केला आहे, सेंटर्स खूप उघडली आहेत. किती सेंटर्स आहेत? (३०० सेवाकेंद्र, उपसेवाकेंद्र आहेत आणि ३ हजार गीतापाठशाळा आहेत) अच्छा, सर्वात जास्त सेंटर्स कोणत्या झोनची आहेत? (मुंबई-महाराष्ट्राची) अच्छा - महाराष्ट्रवाले आले आहेत? (आज आलेले नाहीत) गुजरातवाले सेवा तर चांगली करत आहेत, गुजरातचा विस्तार देखील चांगला आहे. आता काय करायचे आहे? विस्तार तर आहे, विस्तार तर चांगला केला आहे, आता गुजरातवाले नंबरवन वारसदार तयार करा. कमीत-कमी जी मोठी सेवाकेंद्र आहेत, जे जुने वारसदार आहेत, ते तर आहेतच परंतु नवीन कोणी वारसदार काढा. भले प्रत्येकी एक तर काढा, कारण माळेमध्ये मणी तेच बनतील जे वारसदार क्वालिटीचे असतील. आता माळा तर तयार करायची आहे ना! १६१०८ ची सुद्धा माळा बनलेली आहे. आता जर बापदादा म्हणाले १०८ ची माळा बनवा, तर बनवू शकता का? बनू शकते? दादी तुम्ही सांगा, १०८ ची माळा बनू शकते? (दादीजी म्हणाल्या बनू शकते) तयार आहे? १०८ ची माळा तयार झाली आहे? (हां बाबा तयार आहे) अच्छा लिहून द्या. तयार आहे तर खूप छान, मुबारक असो. अच्छा १६ हजारची माळा, अर्धी बनली आहे? (अर्धीच काय त्यापेक्षाही जास्त बनली आहे) चांगले आहे ना. बघा गुप्त रूपामध्ये बनली आहे आणि तुमच्या दादीने बघितली आहे. चांगले आहे. आता तुम्हाला सगळे विचारणार की, माझे माळेमध्ये नाव आहे? छान आहे. अशी शुभ भावना, शुभ आशा तयार करवतेच. आता सर्वांनी ऐकले ना, स्वतःला चेक करा - मी त्या माळेमध्ये एव्हररेडी आहे? अच्छा. आणखी काय करायचे आहे?

कॅड ग्रुप (हार्ट पेशंटचा ग्रुप) आलेला आहे:- छान आहे, हे देखील आवाज पसरविण्याचे साधन खूप चांगले आहे कारण प्रॅक्टिकल पुरावा बघतात ना आणि खर्चा शिवाय मेडिटेशन द्वारे ठीक होणे, हे तर सर्वांना खूप आवडते. आता हळू-हळू हे वाढवत जा. ऐकले आहे - करत आहेत आणि सफलता देखील मिळत आहे अजूनही मिळत राहील; बाकी बापदादा या कार्यासाठी निमित्त बनणाऱ्यांना मुबारक देत आहेत. ऑफिशियल गव्हर्मेंट पर्यंत रिझल्ट जात आहे आणखीही पसरवत रहाल तर मेडिटेशनचे महत्व वाढत जाईल. बाकी बापदादांना ही विधी पसंत आहे. अच्छा.

वरदान:-
मनाच्या मौना द्वारे सेवेचे नवीन इन्व्हेन्शन (नवे शोध) लावणारे सिद्धी स्वरूप भव जसे अगदी सुरुवातीला मौन व्रत ठेवले होते तेव्हा सगळे फ्री झाले होते, वेळ वाचला होता तसे आता मनाचे मौन ठेवा;

ज्यामुळे व्यर्थ संकल्पच येऊ नयेत. जसे मुखातून आवाज येत नाही तसे व्यर्थ संकल्प येऊ नयेत, हे आहे - मनाचे मौन, त्यामुळे वेळ वाचेल. या मनाच्या मौनाद्वारे सेवेचे असे नवीन इन्व्हेन्शन (नवीन शोध) लागेल ज्याने साधना कमी आणि सिद्धी जास्त होईल. जसे सायन्सची साधने सेकंदामध्ये विधीला प्राप्त करवतात तसे सायलेन्सच्या साधनाद्वारे सेकंदामध्ये विधी प्राप्त होईल.

सुविचार:-
जे स्वतः समर्पित स्थितीमध्ये राहतात - सर्वांचा सहयोग देखील त्यांच्या समोर समर्पित होतो.

अव्यक्त इशारे - आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा, अंतर्मुखी बना:-

अनेक प्रकारच्या व्यक्ती, वैभव अथवा अनेक प्रकारच्या वस्तूंच्या संपर्कामध्ये येत असताना आत्मिक भाव आणि अनासक्त भाव धारण करा. हे वैभव आणि वस्तू अनासक्त असणाऱ्या समोर दासीच्या रूपामध्ये असतील आणि आसक्त भाव असणाऱ्यांच्या समोर चुंबकाप्रमाणे फसवणारे असतील.