23-05-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्हाला खिवैया मिळाला आहे या तीरावरून त्या तीरावर घेऊन जाण्यासाठी, तुमचे पाय आता या जुन्या दुनियेमध्ये नाहीत, तुमचा नांगर आता उचलला गेला आहे”

प्रश्न:-
जादूगार बाबांची वंडरफूल जादूगरी कोणती आहे जी दुसरे कोणीही करू शकत नाही?

उत्तर:-
कौडीतुल्य आत्म्याला हिरेतुल्य बनविणे, बागवान बनून काट्यांना फुल बनविणे - ही अतिशय वंडरफूल जादूगरी आहे जी एक जादूगार बाबाच करतात, दुसरे कोणीही करत नाही. मनुष्य फक्त पैसे कमविण्यासाठी जादूगार म्हणून संबोधले जातात, परंतु बाबांसारखी जादू करू शकत नाहीत.

ओम शांती।
पूर्ण सृष्टीचक्रामध्ये किंवा ड्रामामध्ये बाबा एकदाच येतात. आणखी कोणत्या सत्संग इत्यादीमध्ये असे समजत नसतील. ना ते कथा करणारे बाबा आहेत, ना ती मुले आहेत. ते तर वास्तवामध्ये फॉलोअर्स देखील नाहीत. इथे तर तुम्ही मुले देखील आहात, स्टुडंट देखील आहात आणि फॉलोअर्स सुद्धा आहात. बाबा मुलांना सोबत घेऊन जातील. बाबा निघून जातील तेव्हा मग मुले देखील या छी-छी (विकारी) दुनियेमधून आपल्या गुल-गुल दुनियेमध्ये जाऊन राज्य करतील. हे तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आले पाहिजे. या शरीराच्या आतमध्ये राहणारी जी आत्मा आहे ती खूप आनंदीत होते. तुमची आत्मा खूप आनंदीत झाली पाहिजे. बेहदचे बाबा आलेले आहेत जे सर्वांचे पिता आहेत, याची समज देखील फक्त तुम्हा मुलांनाच आहे. बाकी साऱ्या दुनियेमध्ये तर सर्व अडाणीच आहेत. बाबा बसून समजावून सांगतात रावणाने तुम्हाला किती मूर्ख बनवले आहे. बाबा येऊन हुशार बनवतात. साऱ्या विश्वावर राज्य करण्यालायक, इतके हुशार बनवतात. हे विद्यार्थी जीवन देखील एकदाच असते, जेव्हा कि भगवान येऊन शिकवतात. तुमच्या बुद्धीमध्ये हे आहे, बाकी जे आपला कामधंदा इत्यादीमध्ये खूप व्यस्त राहतात, त्यांच्या बुद्धीमध्ये हे कधीही येऊ शकत नाही की, भगवान शिकवत आहेत. त्यांना तर आपला कामधंदा इत्यादीच आठवणीत राहतो. तर तुम्ही मुले जेव्हा जाणता की, भगवान आपल्याला शिकवत आहे तर किती हर्षित राहिले पाहिजे; बाकीची तर सर्व आहेत पाई-पैसेवाल्यांची मुले, तुम्ही तर भगवंताची मुले बनला आहात, तर तुम्हा मुलांना अपार आनंद झाला पाहिजे. कोणी तर खूप हर्षित राहतात. कोणी म्हणतात - ‘बाबा, आमची मुरली चालत नाही, असे होते…’ अरे, मुरली काही अवघड थोडीच आहे. जसे भक्ती मार्गामध्ये साधू-संत इत्यादींना कोणी विचारतात - ‘आम्ही ईश्वराला कसे भेटावे?’ परंतु ते जाणत नाहीत, फक्त बोटाने इशारा करतील की भगवंताची आठवण करा. बस्स, खुश होतात. ते कोण आहेत - दुनियेमध्ये कोणीही जाणत नाहीत. आपल्या पित्यालाच कोणीही जाणत नाहीत. हा ड्रामाच असा बनलेला आहे, तरीही विसरतील. असे नाही की तुमच्यामधील सर्वच काही बाबांना आणि रचनेला जाणतात. कुठे-कुठे तर वर्तन असे करतात की काही विचारूच नका. तो नशाच उडून जातो. आता तुम्हा मुलांचे पाऊल जुन्या दुनियेमध्ये जसे की नाहीच आहे. तुम्ही जाणता कलियुगी दुनियेमधून आता पाऊल उचलले गेले आहे, बोटीचा नांगर उचललेला आहे. आता आपण जात आहोत, बाबा आपल्याला कुठे घेऊन जाणार आहेत ते बुद्धीमध्ये आहे कारण बाबा खिवय्या देखील आहेत तर बागवान देखील आहेत. काट्यांना फूल बनवतात. त्यांच्या सारखा बागवान कोणीही नाही जो काट्यांना फूल बनवेल. ही जादूगीरी काही कमी थोडीच आहे. कवडीतुल्य आत्म्याला हिरेतुल्य बनवितात. आजकाल जादूगार खूप झाले आहेत, ही आहे ठगांची दुनिया. बाबा आहेत सद्गुरु. म्हणतात देखील सद्गुरु अकाल. खूप उत्साहाने म्हणतात. आता जेव्हा स्वतः म्हणतात सद्गुरु एक आहे, सर्वांचा सद्गती दाता एक आहे, तर मग स्वतःला असे गुरु का बरे म्हटले पाहिजे? ना ते स्वतः समजत, ना लोकांना काही समजते. या जुन्या दुनियेमध्ये ठेवलेच काय आहे. मुलांना जेव्हा माहित होते की, बाबा नवीन घर बनवत आहेत तर असा कोण असेल जो नव्या घराचा तिरस्कार करेल आणि जुन्या घरावर प्रेम करेल. बुद्धीमध्ये नवीन घरच लक्षात राहते. तुम्ही बेहदच्या बाबांची मुले बनला आहात तुम्हाला ही आठवण राहिली पाहिजे की बाबा आपल्यासाठी न्यू वर्ल्ड बनवत आहेत. आपण त्या न्यू वर्ल्डमध्ये जातो. त्या न्यू वर्ल्डची अनेक नावे आहेत. सतयुग, हेवन, पॅराडाईज, वैकुंठ इत्यादी… तुमची बुद्धी आता जुन्या दुनियेला विटली आहे कारण जुन्या दुनियेमध्ये दुःखच दुःख आहे. याचे नावच आहे नरक, काट्यांचे जंगल, रौरव नरक, कंसपुरी. याचा अर्थ देखील कोणी जाणत नाहीत. पत्थर-बुद्धी आहेत ना. भारताचे बघा काय हाल झाले आहेत. बाबा म्हणतात यावेळी सर्व पत्थर-बुद्धी आहेत. सतयुगामध्ये सर्व आहेत पारस-बुद्धी, यथा राजा-राणी तथा प्रजा. इथे तर आहेच प्रजेचे प्रजेवर राज्य म्हणून सर्वांचे स्टॅम्प बनवत राहतात.

तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये हे लक्षात राहिले पाहिजे. सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत बाबा. मग दुसऱ्या क्रमांकावर कोण? ब्रह्मा, विष्णू, शंकर यांची तर कोणतीच श्रेष्ठता नाही. शंकराचा पेहराव इत्यादीच कसा विचित्र बनवला आहे. असे म्हणतात ते भांग पितात, धोत्रा खातात… हा तर अपमान आहे ना. अशा गोष्टी काही नाही आहेत. हे आपल्या धर्माला विसरले आहेत. आपल्या देवतांच्या बाबतीत काय-काय बोलत राहतात, किती बदनामी करतात! म्हणूनच बाबा म्हणतात माझी देखील बदनामी, शंकराची, ब्रह्माची सुद्धा बदनामी. विष्णूची बदनामी केली जात नाही. वास्तविक गुप्तपणे त्यांची देखील करतात, कारण विष्णूच राधा-कृष्ण आहेत. आता श्रीकृष्ण लहान मुलगा तर महात्म्या पेक्षाही महान गायला जातो. हे (ब्रह्मा) तर नंतर संन्यास करतात, तो तर लहान मुलगा आहेच मुळी पवित्र. पाप इत्यादीला जाणत नाही. तर उच्च ते उच्च आहेत शिवबाबा, तरी देखील बिचाऱ्यांना माहीतच नाहीये की प्रजापिता ब्रह्मा कुठे असले पाहिजेत. प्रजापिता ब्रह्माला दाखवतात देखील शरीरधारी. अजमेरमध्ये त्यांचे मंदिर आहे. दाढी-मिशा ब्रह्माला दाखवतात, शंकर किंवा विष्णूला नाही. तर ही समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. प्रजापिता ब्रह्मा सूक्ष्मवतनमध्ये कसे असतील! ते तर इथे असले पाहिजेत. यावेळी ब्रह्माची किती मुले आहेत? लिहिलेले आहे - ‘प्रजापिता ब्रह्माकुमार-कुमारी’, इतकी असंख्य मुले आहेत तर जरूर प्रजापिता ब्रह्मा असणार. चैतन्य आहेत तर जरूर काही करत असतील. प्रजापिता ब्रह्मा फक्त मुलेच जन्माला घालतात का आणखीही काही करतात. भले आदि देव ब्रह्मा, आदि देवी सरस्वती असे म्हणतात परंतु त्यांचा पार्ट काय आहे, हे कोणालाच माहित नाही. रचता आहेत तर जरूर इथे होऊन गेला असेल. जरूर ब्राह्मणांना शिवबाबांनी ॲडॉप्ट केले असेल. नाही तर ब्रह्मा कुठून येणार? या नवीन गोष्टी आहेत ना. जोपर्यंत बाबा येत नाही तोपर्यंत कोणी जाणू शकत नाही. ज्याचा जो पार्ट आहे तोच बजावतात. बुद्धाने कोणता पार्ट बजावला, कधी आला, येऊन काय केले - कोणीही जाणत नाहीत. तुम्ही आता जाणता - ते (बुद्ध) गुरु आहेत, शिक्षक आहेत, पिता आहेत का? नाही. सद्गती तर देऊ शकत नाहीत. ते तर फक्त आपल्या धर्माचे रचता आहेत, गुरु नाहीत. बाबा, मुलांना रचतात आणि मग शिकवतात. पिता, टीचर, गुरु तिन्ही आहेत. दुसऱ्या कोणाला थोडेच म्हणाल की, तुम्ही शिकवा. दुसऱ्या कुणाकडेही हे नॉलेजच नाही आहे. बेहदचे बाबाच ज्ञानाचा सागर आहेत. तर जरूर ज्ञान ऐकवतील. बाबांनीच स्वर्गाचे राज्य-भाग्य दिले होते. आता पुन्हा देत आहेत. बाबा म्हणतात - तुम्ही पुन्हा ५००० वर्षानंतर येऊन भेटला आहात. मुलांना आतून आनंद होतो, ज्यांना सारी दुनिया शोधत आहे, ते आम्हाला भेटले आहेत. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, तुम्ही ५००० वर्षानंतर पुन्हा येऊन भेटला आहात’. मुले म्हणतात - ‘होय बाबा, आम्ही तुम्हाला अनेक वेळा भेटलो आहोत. भले कोणी कितीही तुम्हाला मारपिट करेल परंतु आतमध्ये तो आनंद आहे ना. शिवबाबांना भेटल्याची आठवण तर आहे ना. आठवणीनेच किती पापे नष्ट होतात. अबला, बंधनात असलेल्यांची तर आणखीच जास्त पापे नष्ट होतात कारण त्या शिवबाबांची आठवण जास्त करतात. अत्याचार होतात तर बुद्धी शिवबाबांकडेच जाते ना. शिवबाबा रक्षा करा. तर आठवण करणे चांगले आहे ना. भले रोज मार खा, शिवबाबांची आठवण करतील, हे तर कल्याणच आहे ना. अशा मार खाण्यावर तर बलिहार गेले पाहिजे. मार पडतो तर आठवण करतात. असे म्हणतात - गंगाजल मुखामध्ये असावे, गंगेचा तट असावा, तेव्हा प्राण तनातून निघावा. तुम्हाला जेव्हा मार मिळतो, बुद्धीमध्ये अल्फ आणि बे (बाबा आणि बादशाही) ची आठवण असावी. बस्स. ‘बाबा’ म्हटल्याने जरूर वारशाची आठवण येईल. असा कोणीही नसेल, ज्याला ‘बाबा’ म्हटल्यावर वारशाची आठवण येणार नाही. पित्यासोबत संपत्तीची जरूर आठवण येईल. तुम्हाला देखील शिवबाबांसोबत वारशाची जरूर आठवण येईल. ते तर तुम्हाला विषासाठी (विकारासाठी) फटके मारुन शिवबाबांची आठवण करून देतात. तुम्ही बाबांकडून वारसा मिळवता, पापे नष्ट होतात. हे देखील ड्रामामध्ये तुमच्यासाठी गुप्त कल्याण आहे. जसे म्हटले जाते - युद्ध कल्याणकारी आहे तर ही मारहाण देखील चांगली आहे ना.

आजकाल मुलांचा प्रदर्शनी जत्रांमधील सेवेवर जास्त भर आहे. ‘नव निर्माण’ प्रदर्शनी सोबतच हे ही लिहा - ‘गेट वे टू हेवन’. दोन्ही शब्द असले पाहिजेत. नवीन दुनिया कशी स्थापन होते, त्याचे एक्झिबिशन (प्रदर्शन) असेल तर लोकांना ऐकून आनंद होईल. नवीन दुनिया कशी स्थापन होते, त्यासाठी ही चित्रे बनविली आहेत, येऊन पहा. ‘गेट वे टू न्यू वर्ल्ड’, हे शब्द सुद्धा योग्य आहेत. हे जे युद्ध आहे त्याच्याद्वारे गेट उघडतात. गीतेमध्ये देखील आहे - भगवान आले होते, येऊन राजयोग शिकवला होता. मनुष्यापासून देवता बनवले तर जरूर नवीन दुनिया स्थापन झाली असेल. मनुष्य चंद्रावर जाण्यासाठी किती प्रयत्न करतात. तिथे बघतात जमीनच जमीन आहे,. माणसे इत्यादी काहीच दिसत नाही; एवढेच सांगतात. याचा फायदाच काय! आता तुम्ही खऱ्या सायलेन्समध्ये जाता ना. अशरीरी बनता. ते आहे सायलेन्स वर्ल्ड. तुम्हाला मृत्यू हवा आहे, शरीर सोडून जावू इच्छिता. बाबांना देखील मृत्यूच्या इच्छेपोटी बोलवतात की, येऊन आपल्या सोबत मुक्ती-जीवनमुक्तीमध्ये घेऊन जा. परंतु समजतात थोडेच, पतित-पावन येतील तर जणू आपण काळांच्याही काळाला बोलावत आहोत. आता तुम्ही समजता, बाबा आलेले आहेत, म्हणतात चला घरी आणि आपण घरी जातो. बुद्धी काम करते ना. इथे अशी कितीतरी मुले असतील ज्यांची बुद्धी काम-धंदा इत्यादीकडे धावत असेल. अमका आजारी आहे, काय झाले असेल. अनेक प्रकारचे संकल्प येतात. बाबा म्हणतात - तुम्ही इथे बसले आहात, आत्म्याची बुद्धी बाबा आणि वारशाकडे असावी. आत्माच आठवण करते ना. समजा कोणाचा मुलगा लंडनमध्ये आहे आणि समाचार आला की आजारी आहे. बस्स, बुद्धी तिकडे जाईल. मग ज्ञान बुद्धीमध्ये राहू शकणार नाही. इथे बसलेले असताना देखील बुद्धीमध्ये त्यांची आठवण येत राहील. कोणाचा पती आजारी असेल तर पत्नीचा जीव अगदी वर-खाली होईल. बुद्धी तर जाते ना. तर तुम्ही देखील इथे बसलेले असताना, सर्व काही करत असताना शिवबाबांची आठवण करत रहा. एवढे केले तरी देखील अहो सौभाग्य. जसे ते (दुनियावाले) आपल्या पतीची अथवा गुरुची आठवण करतात, तुम्ही बाबांची आठवण करा. तुम्हाला आपले एक मिनिट देखील वाया घालवता कामा नये. बाबांची जितकी आठवण कराल तितके सेवा करताना देखील बाबांचीच आठवण येईल. बाबांनी सांगितले आहे माझ्या भक्तांना समजावून सांगा. हे कोणी म्हटले? शिवबाबांनी. श्रीकृष्णाच्या भक्तांना काय समजावून सांगाल? त्यांना सांगा - श्रीकृष्ण नवीन दुनिया स्थापन करत आहेत. तर मानतील? क्रियेटर तर गॉडफादर आहेत, श्रीकृष्ण थोडाच आहे. परमपिता परमात्माच जुन्या दुनियेला नवीन बनवत आहेत, हे मानतील देखील. नवीन ती जुनी, जुनी तीच मग नवीन होते. फक्त जास्त कालावधी दिल्यामुळे मनुष्य घोर अंधारामध्ये आहेत. तुमच्याकरिता तर आता तळहातावर स्वर्ग आहे. बाबा म्हणतात - मी तुम्हाला त्या स्वर्गाचा मालक बनविण्यासाठी आलो आहे. बनणार? व्वा, का नाही बनणार? अच्छा, माझी आठवण करा, पवित्र बना. आठवणीनेच पापे भस्म होतील. तुम्ही मुले जाणता विकर्मांचे ओझे आत्म्यावर आहे, ना की शरीरावर. जर शरीरावर ओझे असले असते तर जेव्हा शरीराला जाळतात तेव्हा त्याच्या सोबत पापे देखील जळली असती. आत्मा तर आहेच अविनाशी, त्यामध्ये फक्त भेसळ पडते. ज्याला काढण्यासाठी बाबा एकच युक्ती सांगतात की आठवण करा. पतितापासून पावन बनण्याची युक्ती किती चांगली आहे. मंदिर बनविणारे, शिवाची पूजा करणारे देखील भक्त आहेत ना. पुजाऱ्याला कधी पूज्य म्हणू शकत नाही. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) ज्याला सारी दुनिया शोधत आहे, ते बाबा आपल्याला मिळाले आहेत - या आनंदामध्ये रहायचे आहे. आठवणीनेच पापे नष्ट होतात त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये बाबांची आणि वारशाची आठवण करायची आहे. एक मिनिट सुद्धा आपला वेळ वाया घालवायचा नाही.

२) या जुन्या दुनियेमधून बुद्धीचा नांगर उचलायचा आहे. बाबा आपल्यासाठी नवीन घर बनवत आहेत, हा आहे रौरव नरक, कंसपुरी, आपण जातो वैकुंठपुरीमध्ये. सदैव याच स्मृतीमध्ये रहायचे आहे.

वरदान:-
विहंग मार्गाच्या सेवेद्वारे विश्व परिवर्तनाच्या कार्याला संपन्न करणारे सच्चे सेवाधारी भव

विहंग मार्गाची सेवा करण्यासाठी संघटित रूपामध्ये ‘रूप’ आणि ‘वसंत’ या दोन गोष्टींचा बॅलन्स हवा. जसे वसंत रुपाने एकाच वेळी अनेक आत्म्यांना संदेश देण्याचे कार्य करता असेच ‘रूप’ अर्थात आठवणीच्या बळाद्वारे, श्रेष्ठ संकल्पांच्या बळाद्वारे विहंग मार्गाची सेवा करा. याचे देखील संशोधन करा. त्याचसोबत संघटित रूपामध्ये दृढ संकल्पाद्वारे जुने संस्कार, स्वभाव आणि जुन्या स्वभावाचे तीळ आणि जव यज्ञामध्ये स्वाहा करा तेव्हा विश्व परिवर्तनाचे कार्य संपन्न होईल अथवा यज्ञाची समाप्ती होईल.

बोधवाक्य:-
बालक आणि मालकीपणाच्या बॅलन्सद्वारे प्लॅनला प्रॅक्टिकलमध्ये आणा.


अव्यक्त इशारे - रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:-

या ईश्वरीय सेवेमध्ये मोठ्यात मोठे पुण्य आहे - पवित्रतेचे दान देणे. पवित्र बनणे आणि बनविणेच पुण्य आत्मा बनणे आहे कारण कोणत्याही आत्म्याला आत्म-घात महा-पापापासून सोडविता. अपवित्रता आत्म-घात आहे. पवित्रता जीवनदान आहे. कुणाचे दुःख घेऊन सुख देणे, हेच सर्वात मोठ्यात मोठे पुण्याचे काम आहे. असे पुण्य करता-करता पुण्यात्मा बनाल.