23-06-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुमचा सर्वात पहिला पाठ आहे - ‘मी आत्मा आहे, शरीर नाही’; आत्म- अभिमानी
होऊन रहा तर बाबांची आठवण राहील”
प्रश्न:-
तुम्हा
मुलांजवळ कोणता गुप्त खजिना आहे, जो लोकांजवळ नाही?
उत्तर:-
तुम्हाला स्वयं भगवान शिकवत आहेत, त्या शिक्षणाच्या आनंदाचा गुप्त खजिना तुमच्याजवळ
आहे. तुम्ही जाणता आपण जे शिकत आहोत ते आहे भविष्य अमरलोकसाठी ना की मृत्यूलोकासाठी.
बाबा म्हणतात - पहाटे उठून फक्त पहिल्या पाठाची आठवण करत फेरफटका मारा, तरीही
आनंदाचा खजिना जमा राहील.
ओम शांती।
बाबा मुलांना विचारतात - मुलांनो, आत्म-अभिमानी होऊन बसले आहात का? स्वतःला आत्मा
समजून बसले आहात? आम्हा आत्म्यांना परमात्मा पिता शिकवत आहेत; मुलांना ही स्मृती आली
आहे आपण देह नाही, आत्मा आहोत. मुलांना देही-अभिमानी बनविण्यासाठीच मेहनत करावी
लागते. मुले आत्म-अभिमानी राहू शकत नाहीत. पुन्हा-पुन्हा देह-अभिमानामध्ये येतात
म्हणून मग बाबा विचारतात - आत्म-अभिमानी होऊन राहता का? आत्म-अभिमानी व्हाल तर
बाबांची आठवण येईल, जर देह-अभिमानी व्हाल तर लौकिक नातेवाईकांची आठवण येईल. सर्वात
आधी हा शब्द लक्षात ठेवावा लागेल की, आपण आत्मा आहोत. मज आत्म्यामध्येच ८४ जन्मांचा
पार्ट भरलेला आहे. हे पक्के करायचे आहे - ‘आपण आत्मा आहोत’. अर्धे कल्प तुम्ही
देह-अभिमानी होऊन राहिले आहात. आता फक्त संगमयुगावरच मुलांना आत्म-अभिमानी बनवले
जाते. स्वतःला देह समजल्याने बाबा आठवणार नाहीत, म्हणून सर्वप्रथम हा धडा पक्का करा
की - आपण आत्मे बेहदच्या पित्याची संतान आहोत. देहाच्या पित्याची आठवण करायला कधी
शिकवले जात नाही. आता बाबा म्हणतात - मज पारलौकिक पित्याची आठवण करा, आत्म-अभिमानी
बना. देह-अभिमानी बनल्याने देहाची नाती आठवतील, स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची
आठवण करा, हीच मेहनत आहे. हे कोण समजून सांगत आहे, आम्हा आत्म्यांचे पिता, ज्यांची
सर्वजण आठवण करतात - ‘बाबा या, येऊन या दुःखातून लिब्रेट करा’. मुले जाणतात या
शिक्षणाने आपण भविष्यासाठी उच्च पद प्राप्त करतो.
आता तुम्ही
पुरुषोत्तम संगमयुगावर आहात. या मृत्यूलोकामध्ये आता अजिबात रहायचे नाहीये. हे आपले
शिक्षणच आहे भविष्य २१ जन्मांकरिता. आपण सतयुग अमरलोकसाठी शिकत आहोत. अमरबाबा
आम्हाला ज्ञान ऐकवत आहेत तर जेव्हा इथे बसता तेव्हा पहिले स्वतःला आत्मा समजून
बाबांच्या आठवणीमध्ये रहायचे आहे तेव्हाच विकर्म विनाश होतील. आपण आता संगमयुगावर
आहोत. बाबा आम्हाला पुरुषोत्तम बनवत आहेत. बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर तुम्ही
पुरुषोत्तम बनाल. मी आलो आहे मनुष्यापासून देवता बनविण्यासाठी. सतयुगामध्ये तुम्ही
देवता होता, आता जाणता कशी शिडी उतरलो आहोत. आपल्या आत्म्यामध्ये ८४ जन्मांचा पार्ट
नोंदलेला आहे. दुनियेमध्ये कोणीही जाणत नाही, तो भक्तीमार्ग वेगळा आहे, हा
ज्ञानमार्ग वेगळा आहे. ज्या आत्म्यांना बाबा शिकवतात, तेच जाणतात, आणखी कोणीही जाणत
नाहीत. हा आहे गुप्त खजिना भविष्याकरिता. तुम्ही शिकताच अमर लोकसाठी, ना की या
मृत्यूलोकासाठी. आता बाबा म्हणतात - पहाटे उठून हिंडा-फिरा. सर्वप्रथम हा पाठ पक्का
करा की, ‘मी आत्मा आहे, ना की शरीर’. आमचे रुहानी बाबा आम्हाला शिकवत आहेत. ही
दुःखाची दुनिया आता बदलणार आहे. सतयुग आहे सुखाची दुनिया, बुद्धीमध्ये सर्व ज्ञान
आहे. हे आहे रुहानी स्पिरीच्युअल नॉलेज. बाबा ज्ञानाचा सागर स्पिरिचुअल फादर आहेत.
ते आहेत ‘देही’चे (आत्म्याचे) पिता. बाकी तर सर्व देहाचेच नातलग आहेत. आता देहाची
नाती तोडून एका सोबत जोडायची आहेत. गातात देखील - ‘मेरा तो एक दुसरा न कोई’. आपण एका
बाबांचीच आठवण करतो. देहाची देखील आठवण करत नाही. हा जुना देह तर सोडायचा आहे. याचे
देखील तुम्हाला ज्ञान मिळते की, हे शरीर कसे सोडायचे आहे. आठवण करत-करत शरीर सोडून
द्यायचे आहे म्हणून बाबा म्हणतात देही-अभिमानी बना. मनातल्या मनात घोटत रहा - बाबा,
बीज आणि झाडाची आठवण करायची आहे. शास्त्रांमध्ये या कल्पवृक्षाचा वृत्तांत आहे.
मुले हे देखील जाणतात
- आम्हाला ज्ञान सागर बाबा शिकवत आहेत. कोणी मनुष्य शिकवत नाहीत. हे पक्के करायचे
आहे. शिकायचे तर आहे ना. सतयुगामध्ये देखील देहधारी शिकवतात, हे (शिवबाबा) देहधारी
नाहीत. ते म्हणतात - मी जुन्या शरीराचा आधार घेऊन तुम्हाला शिकवतो. कल्प-कल्प मी
तुम्हाला शिकवतो. कल्पानंतर सुद्धा पुन्हा असेच शिकवणार. आता माझी आठवण करा तर तुमची
विकर्म विनाश होतील, मीच पतित-पावन आहे. मलाच सर्वशक्तिमान म्हणतात. परंतु माया
देखील काही कमी नाहीये, ती देखील शक्तिमान आहे, कुठून खाली पाडले आहे. आता आठवते आहे
ना. ८४ च्या चक्राचे देखील गायन आहे. ही मनुष्यांचीच गोष्ट आहे. बरेचजण विचारतात,
पशुपक्ष्यांचे काय होणार? अरे इथे पशुपक्ष्यांची गोष्टच नाही. बाबा देखील मुलांसोबत
बोलतात, बाहेरचे तर बाबांना जाणतही नाहीत, तर ते काय बोलणार. कोणी म्हणतील - ‘आम्ही
बाबांना भेटू इच्छितो’; आता जाणत काहीच नाहीत, बसून उलटे-सुलटे प्रश्न मात्र करतील.
७ दिवसांचा कोर्स केल्यानंतरही हे ही नीटसे समजत नाही की, हे आपले बेहदचे पिता आहेत.
जे जुने भक्त आहेत, ज्यांनी खूप भक्ती केली आहे त्यांच्या बुद्धीमध्ये तर ज्ञानाच्या
सर्व गोष्टी फिट्ट बसतात. भक्ती कमी केली असेल बुद्धीमध्ये कमी बसेल. तुम्ही आहात
सर्वात जास्त जुने भक्त. गायले देखील जाते - भगवान भक्तीचे फळ देण्यासाठी येतात.
परंतु कोणाला हे थोडेच माहिती आहे. ज्ञानमार्ग आणि भक्तीमार्ग एकदम वेगळे आहेत.
सर्व दुनिया आहे भक्तीमार्गामध्ये. कोटींमध्ये कोणी येऊन हे शिकतात. स्पष्टीकरण तर
खूप गोड आहे. ८४ जन्मांचे चक्र देखील मनुष्यच जाणतील ना. तुम्ही आधी काहीच जाणत
नव्हता, ‘शिव’ला देखील जाणत नव्हता. शिवाची मंदिरे किती असंख्य आहेत. शिवाची पूजा
करतात, जलाचा अभिषेक करतात, शिवाय नमः म्हणतात, परंतु कशासाठी पूजा करतो, हे मात्र
काहीच माहिती नाही. लक्ष्मी-नारायणाची पूजा का करतात, ते कुठे गेले, काहीच माहिती
नाही. भारतवासीच आहेत जे आपल्या पूज्यला अजिबात जाणत नाहीत. ख्रिश्चन जाणतात,
क्राईस्ट अमक्या संवतमध्ये आला, येऊन स्थापना केली. शिवबाबांना कोणीही जाणत नाही.
पतित-पावन देखील ‘शिव’लाच म्हणतात. तेच उच्च ते उच्च आहेत ना. त्यांची सर्वात जास्त
सेवा करतात. सर्वांचे सद्गती दाता आहेत. तुम्हाला बघा कसे शिकवतात. बाबांना
बोलावतात देखील की येऊन पावन बनवा. मंदिरामध्ये किती पूजा करतात, किती धूम-धाम, किती
खर्च करतात. श्रीनाथाच्या मंदिरामध्ये, जगन्नाथाच्या मंदिरामध्ये जाऊन बघा. आहेत तर
एकच. जगन्नाथमध्ये (जगत नाथमध्ये) भाताचा हंडा चढवतात. श्रीनाथमध्ये तर खूप
पक्वान्ने बनवतात. फरक का असतो? काही कारण तर पाहिजे ना. श्रीनाथाला देखील काळा,
जगन्नाथाला देखील काळा करतात. कारण तर काहीच समजत नाहीत. ‘जगत-नाथ’,
लक्ष्मी-नारायणालाच म्हणतात का राधे-कृष्णाला म्हणणार? राधा-कृष्ण, लक्ष्मी-नारायण
यांचा काय संबंध आहे, हे देखील कोणी जाणत नाही. आता तुम्हा मुलांना माहीत झाले आहे
की आपण पूज्य देवता होतो मग पुजारी बनलो आहोत. चक्र फिरलो. आता पुन्हा देवता
बनण्याकरिता आपण शिकत आहोत. हे कोणी मनुष्य शिकवत नाहीत. भगवानुवाच आहे. ज्ञानसागर
देखील भगवंताला म्हटले जाते. इथे तर भक्तीचे सागर पुष्कळ आहेत जे पतित-पावन
ज्ञानसागर बाबांची आठवण करतात. तुम्ही पतित बनलात परत पावन जरूर बनायचे आहे. ही
आहेच पतित दुनिया. हा काही स्वर्ग नाहीये. वैकुंठ कुठे आहे, हेच कोणाला माहिती नाही
आहे. म्हणतात - वैकुंठाला गेला. तर मग नरकाचे भोजन इत्यादी तुम्ही त्यांना का खाऊ
घालता? सतयुगामध्ये तर खूप फळे-फुले इत्यादी असतात. इथे काय आहे? हा आहे नरक. आता
तुम्ही जाणता बाबांद्वारे आपण स्वर्गवासी बनण्याचा पुरुषार्थ करत आहोत. पतिता पासून
पावन बनायचे आहे. बाबांनी युक्ती तर सांगितली आहे - कल्प-कल्प बाबाच युक्ती सांगतात.
माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. आता तुम्ही जाणता आपण पुरुषोत्तम संगमयुगावर
आहोत. तुम्हीच म्हणता - ‘बाबा, आम्ही ५००० वर्षांपूर्वी हे बनलो होतो. तुम्हीच जाणता
कल्प-कल्प ही अमर कथा बाबांकडून ऐकतो. शिवबाबाच अमरनाथ आहेत. बाकी असे नाही की
पार्वतीला बसून कथा ऐकवतात. ती आहे भक्ती. ज्ञान आणि भक्ती तुम्हाला समजली आहे.
ब्राह्मणांचा दिवस आणि मग ब्राह्मणांची रात्र. बाबा समजावून सांगतात - तुम्ही
ब्राह्मण आहात ना. आदि देव देखील ब्राह्मणच होता, देवता म्हणणार नाही. आदि देवकडे
देखील जातात, देवींची सुद्धा किती नावे आहेत. तुम्ही सेवा केली आहे तेव्हाच तर तुमचे
गायन आहे, भारत जो वाईसलेस (निर्विकारी) होता तो पुन्हा विशश (विकारी) बनतो. आता
रावण राज्य आहे ना.
तुम्ही मुले आता
संगमावरच पुरुषोत्तम बनता, तुमच्यावर बृहस्पतीची दशा अविनाशी बसते तेव्हा तुम्ही
अमरपुरीचे मालक बनता. बाबा तुम्हाला शिकवत आहेत, मनुष्यापासून देवता बनविण्याकरिता.
स्वर्गाचे मालक बनण्याला बृहस्पतीची दशा म्हटले जाते. तुम्ही स्वर्ग अमरपुरीमध्ये
तर जरूर जाल. बाकी अभ्यासामध्ये दशा वर-खाली होत राहतात. आठवणच विसरायला होते.
बाबांनी सांगितले आहे - माझी आठवण करा. गीतेमध्ये देखील आहे भगवानुवाच - काम विकार
महाशत्रू आहे. वाचतात देखील परंतु विकाराला जिंकतात थोडेच. भगवंताने हे कधी सांगितले?
५००० वर्षे झाली. आता पुन्हा भगवान म्हणतात - काम महाशत्रू आहे, यावर विजय प्राप्त
करायचा आहे. हा आदि-मध्य-अंत दुःख देणारा आहे. मुख्य आहे काम विकाराची गोष्ट,
यावरूनच पतित म्हटले जाते. आता माहिती झाले आहे, हे चक्र फिरत राहते. आपण पतित बनतो,
मग बाबा येऊन पावन बनवतात - ड्रामा नुसार. बाबा वारंवार सांगतात - सर्वप्रथम अल्फची
(बाबांनी सांगितलेली) गोष्ट आठवा, श्रीमतावर चालल्यानेच तुम्ही श्रेष्ठ बनाल. हे
देखील तुम्हीच समजता आपण आधी श्रेष्ठ होतो मग भ्रष्ट बनलो. आता पुन्हा श्रेष्ठ
बनण्याचा पुरुषार्थ करत आहोत. दैवी-गुण धारण करायचे आहेत. कोणालाही दुःख द्यायचे
नाही. सर्वांना रस्ता सांगत जा, बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा तर पापे नष्ट होतील-.
पतित-पावन तुम्ही मलाच म्हणता ना. हे कोणालाच माहिती नाही आहे की पतित-पावन कसे
येऊन पावन बनवतात. कल्पापूर्वी देखील बाबांनी सांगितले होते - मामेकम् (मज एकाची)
आठवण करा. हा योग अग्नी आहे, ज्यामुळे पापे भस्म होतात. भेसळ निघाल्यामुळे आत्मा
पवित्र बनते. खाद सोन्यामध्येच टाकतात. दागिना देखील तसाच बनतो. आता तुम्हा मुलांना
बाबांनी समजावून सांगितले आहे आत्म्यामध्ये कशी भेसळ पडली आहे, तिला काढायची आहे.
बाबांचा देखील ड्रामामध्ये पार्ट आहे जे तुम्हा मुलांना येऊन देही-अभिमानी बनवतात.
पवित्र देखील बनायचे आहे. तुम्ही जाणता सतयुगामध्ये आपण वैष्णव होतो. पवित्र गृहस्थ
आश्रम होता. आता आपण पवित्र बनून विष्णुपुरीचे मालक बनतो. तुम्ही डबल वैष्णव बनता.
खरे-खरे वैष्णव तुम्ही आहात. ते आहेत विकारी वैष्णव-धर्माचे. तुम्ही आहात निर्विकारी
वैष्णव-धर्माचे. आता तुम्ही एक तर बाबांची आठवण करता आणि जे नॉलेज बाबांमध्ये आहे,
ते तुम्ही धारण करता. तुम्ही राजांचेही राजा बनता. ते राजा बनतात अल्पकाळासाठी, एका
जन्मासाठी. तुमची राजाई आहे २१ पिढी अर्थात फुल एज (पूर्ण युग) पास करता. तिथे कधी
अकाली मृत्यू होणार नाही. तुम्ही काळावर विजय प्राप्त करता. जेव्हा वेळ येते तेव्हा
तुम्ही समजता - आता हे जुने कातडे (शरीर) सोडून नवीन घ्यायचे आहे. तुम्हाला
साक्षात्कार होईल. आनंदाचे ढोल वाजत राहतात. तमोप्रधान शरीराला सोडून सतोप्रधान
शरीर घेणे ही तर आनंदाची गोष्ट आहे. तिथे सरासरी १५० वर्षे आयु असते. इथे तर अकाली
मृत्यू होत राहतो कारण भोगी आहेत. ज्या मुलांचा योग यथार्थ आहे त्यांची सर्व
कर्मेंद्रिये योगबलाने वश होतील. पूर्णपणे योग मध्ये राहिल्यामुळे कर्मेंद्रिये
शीतल होतात. सतयुगामध्ये तुम्हाला कोणतीही कर्मेंद्रिये धोका देत नाहीत, असे कधी
म्हणणार नाही की, कर्मेंद्रिये वशमध्ये नाहीत. तुम्ही अतिशय सर्वोच्च पद प्राप्त
करता. याला म्हटले जाते बृहस्पतीची अविनाशी दशा. वृक्षपती मनुष्य सृष्टीचे बीजरूप
आहेत - बाबा. बीज वरती आहे, त्यांची आठवण देखील वरती करतात. आत्मा बाबांची आठवण करते.
तुम्ही मुले जाणता बेहदचे बाबा आम्हाला शिकवत आहेत, ते येतातच एकदा अमरकथा
ऐकविण्याकरिता. अमरकथा म्हणा, सत्यनारायणाची कथा म्हणा, त्या कथेचा देखील अर्थ समजत
नाहीत. सत्यनारायणाच्या कथेमुळे नरापासून नारायण बनतात. अमरकथेमुळे तुम्ही अमर बनता.
बाबा प्रत्येक गोष्ट क्लिअर करून समजावून सांगतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)
योगबळाद्वारे आपल्या सर्व कर्मेंद्रियांना वशमध्ये करायचे आहे. एका वृक्षपती
बाबांच्या आठवणीमध्ये रहायचे आहे. खरा वैष्णव अर्थात पवित्र बनायचे आहे.
२) पहाटे उठून पहिला
पाठ पक्का करायचा आहे की, मी आत्मा आहे, शरीर नाही. आमचे रुहानी बाबा आम्हाला शिकवत
आहेत, ही दुःखाची दुनिया आता बदलणार आहे… असे बुद्धीमध्ये सर्व ज्ञानाचे चिंतन होत
रहावे.
वरदान:-
प्रत्येक
खजिन्याला कार्यामध्ये लावून पदमांची कमाई जमा करणारे पद्मा-पदम भाग्यशाली भव
प्रत्येक सेकंद
पद्मांची कमाई जमा करण्याचे वरदान ड्रामामध्ये संगमाच्या समयाला मिळालेले आहे. अशा
वरदानाला स्वयंप्रति जमा करा आणि दुसऱ्यांप्रती दान करा, त्याचप्रमाणे संकल्पाच्या
खजिन्याला, ज्ञानाच्या खजिन्याला, स्थूल धनरुपी खजिन्याला कार्यामध्ये लावून
पद्मांची कमाई जमा करा. कारण यावेळी स्थूल धन देखील ईश्वर अर्थ समर्पण केल्यामुळे
एक नवीन पैसा देखील एका रत्ना इतका मौल्यवान बनतो - तर या सर्व खजिन्यांना स्वयं
प्रति अथवा सेवे प्रति कार्यामध्ये वापरा म्हणजे मग पद्मा-पदम भाग्यशाली बनाल.
बोधवाक्य:-
जिथे हृदयाचा
स्नेह आहे तिथे सर्वांचा सहयोग सहज प्राप्त होतो.
अव्यक्त इशारे -
आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा, अंतर्मुखी बना:-
आता असे पारदर्शक बना
जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये जी आत्मा विराजमान आहे, ती स्पष्टपणे सर्वांना दिसेल.
तुमचे आत्मिक स्वरूप त्यांना आपल्या आत्मिक स्वरूपाचा साक्षात्कार घडवेल, यालाच
म्हटले जाते अव्यक्त अथवा आत्मिक स्थितीचा अनुभव करविणे.