24-05-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - अमृतवेलेला आपल्या बाकी सर्व संकल्पांना लॉकअप (बंद) करुन एका बाबांची
प्रेमाने आठवण करा, बाबांशी गोड-गोड रुहरिहान करा”
प्रश्न:-
तुम्हा
मुलांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये अर्थ आहे, अर्थसहित शब्द कोण बोलू शकतो?
उत्तर:-
जो देही-अभिमानी आहे, तोच प्रत्येक बोल अर्थ सहित बोलू शकतो. बाबा तुम्हाला संगमावर
जे काही शिकवतात, ते अर्थ सहित आहे. देह-अभिमानामध्ये येऊन मनुष्य जे काही बोलतात
ते सर्व अर्था शिवाय अनर्थ आहे. त्यापासून कोणतेही फळ मिळत नाही, फायदा होत नाही.
गीत:-
नैन हीन को
राह दिखाओ प्रभु...
ओम शांती।
ही सर्व गाणी इत्यादी आहेत भक्तिमार्गाची. तुमच्यासाठी गाण्यांची गरज नाही. कोणतीही
अडचण येण्याचा प्रश्नच नाही. भक्तिमार्गामध्ये तर खूप त्रास आहे. किती रीती-रिवाज
असतात - ब्राह्मणांना जेऊ घालणे, हे करणे, तीर्थ इत्यादींवर खूप काही करायचे असते.
इथे येऊन सर्व त्रासातून सोडवतात. यामध्ये (ज्ञानामध्ये) काहीही करायचे नाही आहे.
मुखावाटे ‘शिव-शिव’ बोलायचे नाही आहे. हे नियमानुसार नाही, यापासून कोणतेही फळ
मिळणार नाही. बाबा म्हणतात - आतून असे समजायचे आहे की, ‘मी आत्मा आहे’. बाबांनी
सांगितले आहे माझी आठवण करा, अंतर्मुखी होऊन बाबांचीच आठवण करायची आहे, तर बाबा
प्रतिज्ञा करतात - तुमची पापे भस्म होतील. हा आहे योग अग्नि, ज्याद्वारे तुमची
विकर्म विनाश होतील मग तुम्ही परत निघून जाल. हिस्ट्री रिपीट होते. या सर्व आहेत
स्वतःशीच गप्पागोष्टी करण्याच्या युक्त्या. स्वतःशी रुहरिहान करत रहा. बाबा म्हणतात
- मी कल्प-कल्प तुम्हाला ही युक्ती सांगतो. हे देखील जाणता हळू-हळू या झाडाची वृद्धी
होत जाईल. मायेचे वादळ देखील यावेळी आहे जेव्हा मी येऊन तुम्हा मुलांना मायेच्या
बंधनातून सोडवतो. सतयुगामध्ये कोणतेही बंधन असत नाही. हे पुरुषोत्तम युग देखील
अर्थासहित आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे. इथे प्रत्येक गोष्ट अर्थासहीतच आहे.
देह-अभिमानी जे काही बोलतील ते अनर्थ. देही-अभिमानी जे बोलतील अर्थासहित. त्यापासून
फळ निष्पन्न होईल. आता भक्तिमार्गामध्ये किती अडचणी असतात. समजतात की, तीर्थयात्रा
करणे, हे करणे - हे सर्व भगवंताजवळ पोहोचण्याचे रस्ते आहेत. परंतु मुलांना आता समजले
आहे - असे एक सुद्धा कोणीही परत जाऊ शकत नाही. पहिल्या नंबरामध्ये जे विश्वाचे मालक
लक्ष्मी-नारायण होते, त्यांचेच ८४ जन्म सांगतात. तर मग बाकीचे कोणी सुटू कसे शकतात.
सर्वजण चक्रामध्ये येतात तर मग कृष्णासाठी असे कसे म्हणणार की तो सदैव कायम आहेच आहे.
हो, कृष्णाचे नाव-रुप तर गेले, बाकी आत्मा तर कोणत्या ना कोणत्या रुपामध्ये आहेच.
बाबांनी येऊन मुलांना या सर्व गोष्टी समजावून सांगितल्या आहेत. हे शिक्षण आहे.
विद्यार्थी जीवनामध्ये लक्ष द्यायचे आहे. आपला चार्ट लिहिण्याचा रोजचा टाइम नक्की
करा. व्यापारी लोकांना वेळेचे खूप बंधन असते. नोकरी करणाऱ्यांना वेळेचे बंधन नसते.
ते (नोकरीवाले) तर आपले काम पूर्ण केले संपले. व्यापाऱ्यांकडे तर कधी ग्राहक आले तर
त्यांना पुरवठा करावा लागतो. बुद्धियोग बाहेर निघून जातो. तर प्रयत्न करुन वेळ काढला
पाहिजे. अमृतवेलेचा वेळ चांगला आहे. त्यावेळी बाहेरच्या विचारांना लॉकअप करून टाकले
पाहिजे, कोणताही विचार येता कामा नये. बाबांचीच आठवण रहावी. बाबांच्या महिमेमध्ये
लिहिले पाहिजे - बाबा ज्ञानाचा सागर, पतित-पावन आहेत. बाबा आम्हाला विश्वाचा मालक
बनवत आहेत, त्यांच्या श्रीमतावर चालायचे आहे. सर्वात चांगले मत मिळते मनमनाभव. दुसरे
कोणीही बोलू शकत नाही. तमोप्रधानपासून सतोप्रधान बनण्याचे हे मत कल्प-कल्प मिळते.
बाबा फक्त म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. याला म्हटले जाते - वशीकरण मंत्र,
अर्थ सहित आठवण केल्यानेच आनंद होईल.
बाबा म्हणतात -
अव्यभिचारी आठवण हवी. जसे भक्तीमध्ये एका शिवाची पूजा अव्यभिचारी आहे मग व्यभिचारी
झाल्याने अनेकांची भक्ती करतात. अगोदर अद्वैत भक्ती होती, एकाची भक्ती करत होते.
ज्ञान देखील त्या एकाचेच ऐकायचे आहे. तुम्ही मुले ज्यांची भक्ती करत होता, ते स्वतः
तुम्हाला समजावून सांगत आहेत - ‘गोड-गोड मुलांनो, आता मी आलो आहे, हा भक्ती कल्ट (भक्ती
पंथ) आता पूर्ण झाला. सर्वप्रथम तुम्हीच एका शिव बाबांचे मंदिर बनवले. त्यावेळी
तुम्ही अव्यभिचारी भक्त होता, म्हणून खूप सुखी होता नंतर व्यभिचारी भक्त बनल्याने
द्वैतमध्ये आलात तेव्हा थोडेसे दुःख असते. एक बाबाच तर सर्वांना सुख देणारे आहेत
ना. बाबा म्हणतात - मी येऊन तुम्हा मुलांना मंत्र देतो. मंत्र देखील एकाचाच ऐका, इथे
कोणीही देहधारी नाही. इथे तुम्ही येताच बापदादांपाशी. शिवबाबांपेक्षा श्रेष्ठ अजून
कोणीही नाही. आठवण देखील सगळे त्यांचीच करतात. भारतच स्वर्ग होता, लक्ष्मी-नारायणाचे
राज्य होते. त्यांना असे कोणी बनवले? ज्यांची तुम्ही मग पूजा करता. कोणालाच माहित
नाहीये की, महालक्ष्मी कोण आहे! महालक्ष्मीचा आधीचा जन्म कोणता होता? तुम्ही मुले
जाणता ती आहे जगत-अंबा. तुम्ही सर्व माता आहात, वंदे मातरम्. संपूर्ण विश्वावरच
तुम्ही आपले वर्चस्व मिळवता. ‘भारत माता’ काही एकाचे नाव नाहीये. तुम्ही सगळे
शिवाकडून योगबलाद्वारे शक्ती घेता. शक्ती घेण्यामध्ये माया अडथळे निर्माण करते.
युद्धामध्ये कोणी वार केला तर बहाद्दूर बनून प्रतिकार केला पाहिजे. असे नाही की वार
केला आणि तुम्ही अडकलात, हे आहेच मायेचे युद्ध. बाकी कौरव आणि पांडवांचे काही युद्ध
नाहीये, त्यांचे तर आपसात युद्ध होत आहे. मनुष्य जेव्हा भांडतात, तेव्हा एक-दोन इंच
जमिनीसाठी गळा कापतात. बाबा येऊन समजावून सांगत आहेत - हा सर्व ड्रामा बनलेला आहे.
राम राज्य, रावण राज्य, आता तुम्हा मुलांना हे ज्ञान आहे की आम्ही राम राज्यामध्ये
जाणार, तिथे अथाह सुख आहे. नावच आहे सुखधाम, तिथे दुःखाचे नामोनिशाण नसते. आता अशी
राजाई देण्यासाठी जेव्हा बाबा आलेले आहेत, तर मुलांनी किती पुरुषार्थ केला पाहिजे.
घडोघडी सांगतो - ‘मुलांनो, थकू नका. शिवबाबांची आठवण करत रहा’. ते देखील बिंदू आहेत,
आपण आत्मे देखील बिंदू आहोत, इथे पार्ट बजावण्यासाठी आलो आहोत, आता पार्ट पूर्ण झाला
आहे. आता बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील’. विकर्म आत्म्यावरच
चढतात ना. शरीरे तर इथेच नष्ट होतील. बरीच माणसे जर काही पाप केले तर आपल्या
शरीरालाच संपवून टाकतात, परंतु याने काही पाप नष्ट होत नाही. पाप-आत्मा म्हटले जाते.
साधू-संत इत्यादी तर म्हणतात - आत्मा निर्लेप आहे, आत्मा सो परमात्मा, अनेक मते
आहेत. आता तुम्हाला एक श्रीमत मिळते. बाबांनी तुम्हाला ज्ञानाचा तीसरा नेत्र दिला
आहे. आत्माच सर्व काही जाणते. या अगोदर ईश्वराविषयी काहीही जाणत नव्हता. सृष्टी
चक्र कसे फिरते, आत्मा किती छोटी आहे, सर्वप्रथम आत्म्याचे रीअलायझेशन (अनुभूती)
करवतात. आत्मा अति सूक्ष्म आहे, त्याचा साक्षात्कार होतो, त्या सर्व आहेत भक्ती
मार्गाच्या गोष्टी. ज्ञानाच्या गोष्टी बाबाच समजावून सांगतात. ते (शिवबाबा) देखील
भृकुटीच्या मध्यभागी बाजूला येऊन बसतात. हे (ब्रह्मा बाबा) देखील लगेच समजतात. या
सर्व आहेत नवीन गोष्टी जे बाबाच बसून समजावून सांगतात. हे पक्के लक्षात ठेवा, विसरू
नका. जितकी बाबांची आठवण कराल तितकी विकर्म विनाश होतील. विकर्म विनाश होण्यावरच
तुमच्या भविष्याचा आधार आहे. तुम्हा मुलांसोबतच भारत खंड सुद्धा सर्वात सौभाग्यशाली
आहे, याच्या सारखा सौभाग्यशाली दुसरा कोणता खंड नाही. इथे बाबा येतात. भारतच हेवन
होता, ज्याला गार्डन ऑफ अल्लाह म्हटले जाते. तुम्ही जाणता बाबा पुन्हा भारताला
फुलांची बाग बनवत आहेत, आपण शिकतोच मुळी तिथे जाण्याकरिता. साक्षात्कार देखील करतात,
हे देखील जाणता की ही तिच महाभारत लढाई आहे, पुन्हा अशी लढाई कधी होत नाही. तुम्हा
मुलांसाठी नवीन दुनिया सुद्धा जरूर हवी. नवीन दुनिया होती ना, भारत स्वर्ग होता. ५
हजार वर्षे झाली, लाखों वर्षांची तर काही गोष्टच नाही. लाखो वर्षे असती तर अगणित
मनुष्य होतील. हे देखील कोणाच्या बुद्धीमध्ये येत नाही की, इतके कसे असू शकतात जर
इतकी लोकसंख्याच नाही.
आता तुम्ही समजता -
आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी आम्ही विश्वावर राज्य करत होतो, दुसरे कोणतेही खंड
नव्हते, ते तर नंतर बनतात. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये या सर्व गोष्टी आहेत, इतर
कोणाच्या बुद्धीमध्ये अजिबातच नाही आहे. थोडा जरी इशारा दिला तर समजून जातील. गोष्ट
तर बरोबर आहे, आपल्या पूर्वी जरूर कोणता धर्म होता. आता तुम्ही सांगू शकता की, एक
आदि सनातन देवी-देवता धर्म होता, तो प्राय: लोप झाला आहे. कोणीही स्वतःला देवता
धर्माचे म्हणू शकत नाही. समजतच नाहीत की आपण आदि सनातन देवी-देवता धर्माचे होतो मग
तो धर्म कुठे गेला? हिंदू धर्म कुठून आला? या गोष्टींमध्ये कोणाचेही चिंतन चालत नाही.
तुम्ही मुले समजावून सांगू शकता - बाबा तर आहेत ज्ञानाचा सागर, ज्ञानाची ऑथॉरिटी.
तर जरुर येऊन ज्ञान ऐकवले असेल. ज्ञानामुळेच सद्गति होते, यामध्ये प्रेरणेची गोष्ट
नाही. बाबा म्हणतात - जसा आता आलो आहे, तसा कल्प-कल्प येतो. कल्पानंतर सुद्धा येऊन
पुन्हा सर्व मुलांना भेटणार. तुम्ही देखील असे चक्र फिरता. राज्य घेता आणि मग गमावता.
हे बेहदचे नाटक आहे, तुम्ही सर्व ॲक्टर्स आहात. आत्मा ॲक्टर असून क्रियेटर,
डायरेक्टर, मुख्य ॲक्टरला जाणत नसेल तर ती काय कामाची. तुम्ही मुले जाणता की, आत्मा
कशी शरीर धारण करते आणि पार्ट बजावते. आता पुन्हा परत जायचे आहे. आता या जुन्या
दुनियेचा अंत आहे. किती सोपी गोष्ट आहे. तुम्ही मुलेच जाणता - बाबा कसे गुप्त बसले
आहेत. गोदरीमध्ये करतार बघितला (जुन्या शरीरामध्ये लपलेल्या रचयिता शिवबाबांना
पाहिले). आता बघितले म्हणा किंवा जाणले म्हणा - गोष्ट एकच आहे. आत्म्याला बघू शकतो,
परंतु त्याने फायदा काहीच नाही. कोणाला समजू सुद्धा शकणार नाही. नवधा भक्तिमध्ये
खूप साक्षात्कार होतात, अगोदर तुम्ही मुले देखील किती साक्षात्कार करत होता, खूप
प्रोग्रॅम येत होते शेवटी पुन्हा हा लपंडाव तुम्ही बघाल. आता तर बाबा म्हणतात
अभ्यास करून हुशार व्हा. जर अभ्यास केला नाहीत तर मग रिझल्ट येईल तेव्हा चेहरा खाली
पडेल, मग कळेल आपण किती वेळ वेस्ट केला. जितके-जितके बाबांच्या आठवणीमध्ये रहाल,
आठवणीच्या बळाने पापे भस्म होतील. जितके बाबांच्या आठवणीमध्ये रहाल तितका आनंदाचा
पारा चढेल.
लोकांना हे माहित नाही
आहे की भगवंताची आठवण का केली जाते! म्हणतात देखील - ‘तुम मात-पिता…’ अर्थ जाणत
नाहीत. आता तुम्ही जाणता, शिवाच्या चित्रावर समजावून सांगू शकता - हे ज्ञानाचे सागर,
पतित-पावन आहेत, त्यांची आठवण करायची आहे. मुले जाणतात तेच बाबा आलेले आहेत भरभरून
सुखाचा मार्ग सांगण्याकरिता. हे शिक्षण आहे. यामध्ये जो जितका पुरुषार्थ करेल तितके
उच्च पद प्राप्त करेल. हे काही साधू-संत इत्यादी नाहीत, ज्यांची गादी चालत आली आहे.
ही तर शिवबाबांची गादी आहे. असे नाही हे गेले की दुसरा कोणी गादीवर बसेल. बाबा तर
सर्वांना सोबत घेऊन जातील. बरीच मुले व्यर्थ विचारांमध्ये आपला वेळ वाया घालवतात.
विचार करतात पुष्कळ संपत्ती गोळा करावी, मुले-नातवंडे खातील, नंतर कामी येईल, बँक
लॉकरमध्ये जमा करू, मुलेबाळे खात राहतील. परंतु कोणालाही गव्हर्मेंट सोडणार नाही
त्यामुळे त्याचा जास्त विचार न करता आपल्या भविष्य कमाईमध्ये तत्पर झाले पाहिजे. आता
मुलांना पुरुषार्थ करायचा आहे. असे नाही की ड्रामामध्ये असेल तर करु.
पुरुषार्थाशिवाय जेवण सुद्धा मिळत नाही; परंतु कोणाच्या नशिबात नसेल तर मग अशा
प्रकारचे विचार येतात. नशिबातच नाहीये तर मग ईश्वरीय पुरुषार्थ तरी काय करणार.
ज्यांच्या नशिबामध्ये आहे, ते चांगल्या रीतीने धारण करतात आणि करवून घेतात. बाबा
तुमचे टीचर देखील आहेत, गुरु सुद्धा आहेत तर त्यांची आठवण केली पाहिजे. सर्वात आवडते
वडील, टीचर आणि गुरुच असतात. त्यांची तरी आठवण केली पाहिजे. बाबा युक्त्या तर खूप
सांगतात. तुम्ही साधू-संत इत्यादींना निमंत्रण देऊ शकता. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) पुरुषार्थ
करून आपल्या भविष्य कमाईमध्ये तत्पर व्हायचे आहे, ड्रामामध्ये असेल तर करु, असे
म्हणून पुरुषार्थहीन बनायचे नाही.
२) पूर्ण दिवसभरामध्ये
जी काही पापे होतात किंवा कोणाला दुःख दिले तर नोट करायचे आहे. सच्चाईने बाबांना
ऐकवायचे आहे, साफ दिल बनून एका बाबांच्या आठवणीद्वारे सर्व हिशोब चुकतू करायचे आहेत.
वरदान:-
ताज आणि तख्तला
सदैव कायम ठेवणारे निरंतर स्वतः योगी भव
वर्तमान समयी
बाबांद्वारे सर्व मुलांना ताज आणि तख्त मिळते, आताचा हा ताज आणि तख्त अनेक
जन्मांसाठी ताज, तख्त प्राप्त करवितो. विश्व कल्याणाच्या जबाबदारीचा ताज आणि
बापदादांचे दिलतख्त सदैव कायम रहावे तर निरंतर स्वतः योगी बनाल. त्यांना कोणत्याही
प्रकारची मेहनत करण्याचा प्रश्नच नाही. कारण एक तर जवळचे नाते आहे, दुसरे प्राप्ति
अखूट आहे. जिथे प्राप्ति असते तिथे आठवणही आपोआपच येते.
बोधवाक्य:-
प्लेन बुद्धीने
प्लॅनला प्रॅक्टिकलमध्ये आणा तर सफलता सामावलेली आहे.
अव्यक्त इशारे -
रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:-
दुःख-अशांतीची
उत्पत्ति अपवित्रतेने होते. जिथे अपवित्रता नाही तिथे दुःख-अशांति कुठून आली. तुम्ही
सर्व पतित-पावन बाबांची मुले मास्टर पतित-पावन आहात, तर जे इतरांना पतितापासून पावन
बनविणारे आहेत ते स्वतः तर पावन असणारच ना. अशा पावन-पवित्र आत्म्यांकडे सुख आणि
शांति स्वतःच आहे. सर्वात मोठ्यात मोठी महानता आहेच मुळी पावन बनणे. आजही याच
महानतेसमोर सर्वजण मान झुकवतात.