24-06-25    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली  ओम शान्ति   मधुबन


मातेश्वरीजींच्या पुण्य स्मृ ति दिवसा निमित्त प्रातः क्लासमध्ये ऐकविण्याकरिता मधुर महावाक्ये


गीत:- मेरा छोटा-सा देखो ये संसार है…

हे गीत कोणत्या वेळी गायलेले आहे कारण या संगम वेळीच आपल्या ब्राह्मण कुळाचा हा छोटासा संसार आहे. हा आपला कोणता परिवार आहे, ते नंबरवार सांगतात. आपण परमपिता परमात्मा शिवाची नातवंडे आहोत, ब्रह्मा-सरस्वतीची मुख संतान आहोत आणि विष्णू-शंकर आपले चुलते आहेत आणि आपण सर्व आपसामध्ये भाऊ-बहीणी आहोत. हा आहे आपला छोटासा संसार… यापलीकडे दुसरे कोणते नाते रचलेलेच नाही आहे, या वेळेचे एवढेच नाते म्हणणार. बघा आपले नाते किती मोठ्या ऑथॉरिटीशी आहे! आपले ग्रँड पप्पा (आजोबा) आहेत शिव, त्यांचे नाव किती जबरदस्त आहे, ते संपूर्ण मनुष्य सृष्टीचे बीज रूप आहेत. सर्व आत्म्यांचे कल्याणकारी असल्या कारणाने त्यांना म्हटले जाते - ‘हर हर भोलानाथ शिव महादेव’. ते संपूर्ण सृष्टीचे दुःख हर्ता, सुख कर्ता आहेत, त्यांच्या द्वारे आपल्याला सुख-शांती-पवित्रतेचा खूप मोठा अधिकार मिळतो, शांतीमध्ये मग कोणत्या कर्मबंधनाचा हिशोब राहत नाही. परंतु या दोन्ही गोष्टी पवित्रतेच्या आधारावर ठेवतात. जोपर्यंत पित्याच्या पालन-पोषणाचा पूर्ण वारसा घेऊन, पित्याकडून सर्टिफिकेट मिळत नाही, तोपर्यंत तो वारसा मिळू शकत नाही. बघा, ब्रह्मावर किती मोठ्या कार्याची जबाबदारी आहे - म्लेंछ ५ विकारांमध्ये बरबटलेल्या अपवित्र आत्म्यांना गुलगुल (फूल) बनवतात, ज्या अलौकिक कार्याचे प्रतिफळ मग सतयुगाचा पहिला नंबर श्रीकृष्णाचे पद मिळते. आता बघा, त्या पित्या सोबत तुमचा कसा संबंध आहे! तर मग किती निश्चिंत आणि आनंदी असले पाहिजे. आता प्रत्येकाने आपल्या मनाला विचारा की, आपण पूर्णत: त्यांचे झालो आहोत?

विचार केला पाहिजे की जेव्हा परमात्मा पिता आलेले आहेत तर त्यांच्याकडून आपण संपूर्ण वारसा घ्यावा. स्टुडंटचे काम आहे संपूर्ण पुरुषार्थ करून स्कॉलरशिप घेणे, तर आपण पहिल्या नंबरची लॉटरी का नाही जिंकावी! ते आहे विजयीमाळेमध्ये ओवले जाणे. बाकी कोणी असे आहेत जे दोन लाडू पकडून बसले आहेत, इथले देखील हदचे सुख घेईन आणि तिथे देखील वैकुंठामध्ये काही ना काही सुख घेईन, अशा व्यक्तीला मध्यम आणि कनिष्ठ पुरुषार्थी म्हणणार, ना की सर्वोत्तम पुरुषार्थी. जेव्हा बाबा देण्यामध्ये टाळाटाळ करत नाहीत तर घेणारे का करतात? म्हणूनच गुरुनानकांनी म्हटले आहे - परमात्मा तर दाता आहेत, समर्थ आहेत परंतु आत्म्यांची घेण्याची ताकत नाही. एक म्हण आहे - देंदा दे, लेंदा थक पावे. (देणारा देतो परंतु घेणारा थकतो) तुमच्या मनामध्ये येत असेल आपल्याला का नाही वाटावे की आपण देखील हे पद प्राप्त करावे. परंतु पहा, बाबा किती मेहनत करतात, तरीही माया किती विघ्न टाकते, कशासाठी? आता मायेचे राज्य संपुष्टात येणार आहे. आता मायेने सगळे सारच काढून टाकले आहे तेव्हाच तर परमात्मा येतात. त्यांच्यामध्ये सर्व रस सामावलेला आहे, त्यांच्याकडून सर्व नात्यांचा रस मिळतो तेव्हाच - ‘त्वमेव माताश्च पिता…’ इत्यादी ही महिमा त्या परमात्म्याची गायलेली आहे, तर बलिहारी या वेळची आहे जे असे नाते जुळले आहे.

तर परमात्म्या सोबत इतके संपूर्ण नाते जोडायचे आहे जेणेकरून २१ जन्मांकरिता सुख प्राप्त होईल, ही आहे पुरुषार्थाची सिद्धी. परंतु २१ जन्मांचे नाव ऐकून थंड होऊ नका (घाबरू नका). असा विचार करू नका की, २१ जन्मांसाठी यावेळी इतका पुरुषार्थ देखील करा, आणि तरीही २१ जन्मानंतर कोसळायचेच आहे (अधोगती होणारच आहे), तर मग सिद्धी काय झाली? परंतु ड्रामामध्ये आत्म्यांची जितकी सर्वोत्तम सिद्धी निश्चित आहे ती तर मिळेलच ना! बाबा येऊन आपल्याला संपूर्ण स्टेजपर्यंत घेऊन जातात, परंतु आपण मुले बाबांना विसरून जातो तर जरूर अधोगती होणारच, यामध्ये बाबांचा काहीच दोष नाही. आता दोष असलाच तर आम्हा मुलांचा, सतयुग, त्रेताचे संपूर्ण सुख या जन्मातील पुरुषार्थावर आधारीत आहे तर का नाही संपूर्ण पुरुषार्थ करून आपण आपला सर्वोत्तम पार्ट बजावावा! का नाही पुरुषार्थ करून तो वारसा घ्यावा. मनुष्य पुरुषार्थ नेहमी सुखासाठीच करतो, सुख दुःखापासून न्यारे होण्यासाठी काही कोणी पुरुषार्थ करत नाही, ते तर ड्रामाच्या अंताला परमात्मा येऊन सर्व आत्म्यांना सजा देऊन, पवित्र बनवून पार्ट पासून मुक्त करतील. हे तर परमात्म्याचे कार्य आहे, ते आपल्या ठरलेल्या वेळी आपणहून येऊन सांगतात. आता जेव्हा आत्म्यांना काहीही झाले तरीही पार्टमध्ये यावेच लागेल तर मग का नाही सर्वोत्तम पार्ट बजावायचा.

मनुष्य सृष्टीला सुखदायी बनविणारे बाबा जाणतात की ही मनुष्य सृष्टी सुखदायी कशी बनेल? जोपर्यंत आत्मे स्वच्छ बनणार नाहीत तोपर्यंत संसार सुखदायी होऊ शकत नाही यासाठी ते येऊन सर्वप्रथम आत्म्यांनाच स्वच्छ बनवतात. आता आत्म्यामध्ये इम्प्युरिटी (अस्वच्छता) भरलेली आहे. पहिले त्या इम्प्युरीटीला काढायचे आहे. म्हणजे मग आत्म्याच्या बळाद्वारे प्रत्येक वस्तूमधील तमोप्रधानता बदलून सतोप्रधानता येईल, ज्याला म्हणता येईल की सर्व गोल्डन एजेडमध्ये (सुवर्णयुगामध्ये) येतात, तर ही तत्त्व इत्यादी सर्व गोल्डन एजेड स्टेजमध्ये येतात. परंतु पहिली आत्म्याची स्टेज बदलते. तर आत्म्यांना बदलविणारे अर्थात आत्म्यांना प्युरिफाइड करणारे ऑथॉरिटी मग ते झाले. तुम्ही बघता ना की आता दुनिया बदलत जात आहे. पहिले तर स्वतःला बदलायचे आहे, जेव्हा आपण स्वतःला बदलू तेव्हा त्याच्या आधारे दुनिया बदलेल. जर अजून पर्यंत आपल्यामध्ये फरक झालेला नसेल, स्वतःलाच बदलले नसेल तर मग दुनिया कशी बदलणार त्यामुळे स्वतःची रोज तपासणी करा. जसे पोतामेल ठेवणारे रात्रीला आपले खाते पाहतात ना की आज किती जमा झाले? सर्वजण आपला हिशोब ठेवतात. तर हा देखील आपला पोतामेल ठेवायचा आहे की, संपूर्ण दिवसभरामध्ये आपला किती फायदा झाला, किती नुकसान झाले? जर नुकसानामध्ये काही जास्त गेले तर मग दुसऱ्या दिवसासाठी खबरदार रहायचे आहे. अशा प्रकारे आपले लक्ष ठेवल्याने मग आपण फायद्यामध्ये जात-जात आपली जी पोझिशन आहे त्यानुसार चालायला लागू. तर अशी तपासणी करत स्वतःमध्ये बदल झाल्याची जाणीव झाली पाहिजे. असे नाही की आपण तर देवता बनणार, ते तर नंतर बनाल, आता जसे आहोत तसे ठीक आहोत… नाही. आत्तापासूनच ते देवताई संस्कार विकसित करायचे आहेत. आता पर्यंत जे ५ विकारांच्या वश संस्कार चालत आले, आता पहायचे आहे की, त्या विकारांपासून आपण मुक्त होत आहोत का? आपल्यामध्ये जो क्रोध इत्यादी होता तो निघून जात आहे का? लोभ किंवा मोह इत्यादी जो होता ते सर्व विकारी संस्कार बदलत जात आहेत का? जर बदलत जात असतील, निघून जात असतील तर समजा आपण परिवर्तित होत आहोत. जर ते विकारी संस्कार बदलत नसतील तर समजा की अजून आपण बदललेले नाही आहोत. तर परिवर्तन झाल्याचा फरक जाणवला पाहिजे, स्वतःमध्ये परिवर्तन आले पाहिजे. असे नाही की संपूर्ण दिवस विकारी खात्यामध्येच चालत रहाल आणि समजाल की आम्ही तर चांगले दान-पुण्य केले, बस्स. असे नाही. आपले जे कर्मांचे खाते चालते, त्यामध्येच आपल्याला सांभाळायचे आहे. आपण जे काही करतो त्यामध्ये कोणत्याही विकाराच्या अधीन होऊन आपण आपले विकर्मी खाते तर बनवत नाही ना? यामध्ये स्वतःला सांभाळायचे आहे. हा सारा पोतामेल ठेवायचा आहे आणि झोपण्यापूर्वी १०-१५ मिनिटे स्वतःला चेक केले पाहिजे की, आपला संपूर्ण दिवस कसा गेला? बरेचजण तर लिहून देखील ठेवतात कारण मागील पापांचे जे ओझे डोक्यावर आहे त्याला देखील नष्ट करायचे आहे, त्यासाठी बाबांचा आदेश आहे - ‘माझी आठवण करा’, तर तो देखील आपण किती वेळ आठवणीसाठी दिला? कारण हा चार्ट ठेवल्याने दुसऱ्या दिवसासाठी सावध रहाल. असे सावध राहता-राहता मग सावधान व्हाल, मग आपली कर्म चांगली होत राहतील आणि मग असे कोणते पापच होणार नाही. पापांपासून तर वाचायचे आहे. अच्छा. गोड मम्माची गोड-गोड मुलांप्रती प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.

संदेशीच्या तनाद्वारे सरस्वती मम्मा सोबत अव्यक्ति प्रभू मिलन आणि संवाद -

बेटा श्री राधे बघ, तुझ्याकडे कोण येऊन पोहोचले आहेत? किती मोठी शक्ती तुझ्याशी बोलत आहे. माझ्या येण्याच्या रहस्याने तू स्वतःला देखील ओळखू शकतेस. येणाऱ्याच्या पोझिशन सोबतच स्वतःच्या पोझिशनला अथवा पदाला देखील ओळखू शकतेस.

हे राधे बेटा, तू माझा करिष्मा पाहू इच्छितेस! मी म्हटले तर एका सेकंदामध्ये विनाश करू शकतो. परंतु करत नाही कारण विराट फिल्म अनुसार जे-जे कर्तव्य ज्यांच्या-ज्यांच्या द्वारे जसे प्ले होणार आहे, ते अवश्य प्ले होईल. अव्यक्त प्रभू, अनादि कायदे कानूनला जाणणारेच येऊन अनादि कायद्यांची ओळख करून देतात. या संपूर्ण सृष्टीचा अनादि खेळ स्टेजवर प्ले होतो, तर प्रॅक्टिकलमध्ये प्ले होण्यासाठी वेळ लागतो, जर इतक्या वर्षांचा खेळ मी एका सेकंदामध्ये संपवला तर मग उर्वरित खेळ कसा चालणार! तर जे-जे कष्ट जसे-जसे पहायचे आहेत किंवा सहन करायचे आहेत, ते तसेही त्याच विचित्र रहस्यमय रीतीने रिपीट होतात. हे विचित्र रिपीटेशन आहे ज्याला हे माझ्या प्रिय राधे तू आणि मी पाहून किती हर्षित होतो.

या विराट ड्रामातील सर्व पार्ट परीक्षा घेणारे बनलेले आहेत. या खेळाला चालविणारा पाहिजे तर एका सेकंदामध्ये या ड्रामाला ड्रॉप करून (थांबवून) पुन्हा नव्याने सुरू करू शकतो, परंतु करत नाही कारण ईश्वराला देखील याच साधारण रीतीने कर्तव्य पार पाडावे लागते. स्वतः सर्व शक्तीमान निराकार ईश्वर साकारमध्ये आहेत परंतु साधारण वेषामध्ये आहेत! हाच तर भुल-भुलैय्याचा खेळ आहे, ज्याला जो जाणेल तोच जानी-जाननहार.

बेटा श्री राधे, प्रिय वत्सांना हा सहन करण्याचा मार्ग देखील अवश्य निवडायचा आहे. जर मला वाटले तर आपल्या वत्सांप्रति याला सहज मार्ग देखील बनवू शकतो कारण साक्षात्कार करविण्याची चावी माझ्याच हातामध्ये आहे. जर कोणत्याही श्रीमंत भक्ताला कोणत्याही देवाचा साक्षात्कार घडवला, तर तो आपले सगळे धन घेऊन यज्ञामध्ये येऊन स्वाहा करेल, कारण ईश्वर तर सर्व श्रीमंताहूनही श्रीमंत आहे. परंतु तुझ्या पित्याला वाटते की मी आपल्या गरीब लाडक्या वत्सांना प्रिन्स आणि प्रिन्सेस बनवावे, म्हणून तुम्ही हे सर्व सहन केल्यानंतरच प्रिन्स आणि प्रिन्सेस बनाल. पिता जाणतात की वत्सांना हा सहन करण्याचा मार्ग अवश्य निवडायचा आहे कारण सहन करणे, हा ईश्वरीय आणि दैवी गुण आहे, ज्यामध्येच आनंद सामावलेला आहे. या गुणानेच ईश्वरीय सुखाचा अनुभव होतो. सहन करत असताना देखील तुम्हाला किती मजा येत आहे, हेच गोपनीय ज्ञान आहे. असे अनासक्त योगीच स्थाई सुखाला प्राप्त करतात.

आता तर परीक्षांचा वेळ जवळ येऊन पोहोचला आहे, प्रत्येक वत्साने येणाऱ्या परीक्षेला अगोदरच समोर ठेवून त्या अभ्यासामध्ये चालत रहावे. भले कोणत्या वत्साला खाणे-पिणे इत्यादी नाही मिळेल, परंतु स्वतः निश्चिंत बादशहा बनून उपस्थित रहावे. अशी आपली सुंदर अवस्था बऱ्याच काळापासून धारण करायची आहे, जर कोणी समजत असेल की, त्यावेळी आपणच चालून पार करेन, असे समजून बसणे म्हणजे स्वतःला धोका देणे आहे. त्यामुळे अगोदर पासूनच सावध होऊन रहायचे आहे.

माझे अति प्रिय वत्स आठवणीमध्ये तर बसतात परंतु आता पर्यंत त्या लाईटचे तेज माझ्या वतन पर्यंत पोहोचत नाही. प्रत्येकजण जेव्हा लाईट स्वरूप होऊन उपस्थित होतील तेव्हा त्यांच्या योगाचे तेज माझ्या वतनमध्ये येईल तेव्हाच त्या प्रत्येकाची संपूर्ण लाईट त्यांच्यामध्ये प्रवेश होईल. त्याचवेळी मग शक्तींची महिमा होईल. तर प्रत्येकाने आपल्या निश्चयामध्ये स्थेरियम (स्थितप्रज्ञ) होऊन रहायचे आहे. जेणेकरून मी स्वतः जरी खाली उतरवले तरी देखील उतरू शकणार नाही.

हे शिरोमणी शक्ती राधे, शक्तींना ज्ञान नेष्ठाबळामध्ये आणि मुखाद्वारे ज्ञान मुरली वाजवण्यामध्ये तयार असले पाहिजे. तुला आपल्या एकरस ईश्वरीय दृष्टीद्वारे प्रत्येकाला निहाल करून आपल्या मधुर वीणेने ओळख द्यायची आहे की, मी कोण आहे आणि माझा पिता कोण आहे! कसे ब्रह्मामध्ये भगवान प्रत्यक्ष झाले आहेत, जे या अंतीम समयी डेविल वर्ल्डला (आसुरी दुनियेला) नष्ट करून आपला निज देश डीटी वर्ल्डमध्ये (आपला देश दैवी दुनियेमध्ये) घेऊन जात आहेत.

हे राधे बेटा, जेव्हा प्रत्येकाची अवस्था दिव्याच्या ललाटा प्रमाणे स्थेरीयम राहील तेव्हा सूक्ष्म अंत: प्रेरणांना पकडून आपले कार्य संपूर्ण रीतीने सिद्ध करू शकतील; जितकी ज्ञान अनुसार अवस्था असेल, तितकेच प्रेरणेला कॅच करू शकतील. जितके त्या अवस्थेमध्ये निरंतर रहाल तितक्या जास्त सर्व प्रेरणा टच होऊ शकतील.

ओहो! बेटा राधे, माझे स्वरूप तर पहा, वत्स माझ्या स्वरूपाला पाहू शकत नाहीत काय की, कसा मी अखंड ज्योती तत्त्वामधून येऊन साक्षात प्रविष्ट होऊन बोलत आहे, माझ्या द्वारेच हे सर्व साक्षात्कार होतात कारण सर्व गोष्टींचे मुख्य मूळ मीच आहे. पहा, प्रकृतीमध्ये ज्ञानाचा प्रकाश चमकत आहे. वत्सांनी फक्त एवढाच विचार करावा की, ओहो! ज्याला सारे जग बोलावत आहे ते स्वतः सर्वशक्तिवान ईश्वर यज्ञामध्ये आम्हा वत्सांच्या सन्मुख येऊन पोहोचले आहेत. त्यांच्या शीतल गोदीमध्ये बसल्याने मन शांत होते. जर रचनेला रचणारा मिळाला तर मग त्यांना सोडून त्यांच्या रचनेमध्ये का जाऊ! सर्वोच्चमध्ये सर्वोच्च ऑथॉरिटी सर्व शक्तींचा स्वतः मालक ज्यांच्यामधून सर्व शक्ती प्रकट झाल्या आहेत, त्यांना ओळखलेत तर मग ही गोद सोडणे असंभव होईल. जेव्हा द क्रियेटरला ओळखाल तेव्हाच तर समजेल की हे कोण आहेत! समजले, शिरोमणी राधे. अच्छा.

वरदान:-
सदैव अतींद्रिय सुखाच्या झोपाळ्यावर झोके घेणारे संगमयुगातील सर्व अलौकिक प्राप्तींनी संपन्न भव

जी मुले अलौकिक प्राप्तींनी नेहमी संपन्न आहेत ते अतींद्रिय सुखाच्या झोपाळ्यावर झोके घेत राहतात. ज्याप्रमाणे जी लाडकी मुले असतात त्यांना झोपाळ्यावर झोके देतात. अशा सर्व प्राप्ती संपन्न ब्राह्मणांचा झोपाळा (pause घेणे) अतींद्रिय सुखाचा झोपाळा आहे. याच झोपाळ्यावर नेहमी झोके घेत रहा. कधीही देह-अभिमानामध्ये येऊ नका. जे झोपाळ्यावरून उतरून धरतीवर पाय ठेवतात ते मलीन होतात. उच्च ते उच्च बाबांची स्वच्छ मुले नेहमी अतींद्रिय सुखाच्या झोपाळ्यावर झोके घेत राहतात, ते कधीही मातीमध्ये पाय ठेवू शकत नाहीत.

सुविचार:-
“मी त्यागी आहे” या अभिमानाचा त्याग हाच खरा त्याग आहे.

अव्यक्त इशारे - आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा, अंतर्मुखी बना:-

जेव्हा स्वतःला अकालमूर्त आत्मा समजाल, तेव्हा अकाले मृत्यू पासून, अकाल पासून, सर्व समस्यांपासून वाचू शकाल. मानसिक चिंता, मानसिक परिस्थितींना नाहीसे करण्याचे एकच साधन आहे - आपल्या या जुन्या शरीराचे भान मिटविणे. देह-अभिमानाला नष्ट केल्यानेच सर्व परिस्थिती नाहीशा होतील.