25-06-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - बाबा तुम्हाला नवीन दुनियेसाठी राजयोग शिकवत आहेत, म्हणून या जुन्या
दुनियेचा विनाश देखील जरुर होणार आहे”
प्रश्न:-
लोकांना कोणती
एक चांगली सवय जडलेली आहे परंतु त्याने देखील प्राप्ती होत नाही?
उत्तर:-
लोकांना भगवंताची आठवण करण्याची जशी सवय जडलेली आहे, जेव्हा कोणती गोष्ट होते तर
म्हणतात - ‘हे भगवान!’ समोर शिवलिंग येते परंतु खरी ओळख नसल्याकारणाने प्राप्ती होत
नाही मग म्हणतात सुख-दुःख सर्व तेच देतात. तुम्ही मुले आता असे म्हणणार नाही.
ओम शांती।
बाबा ज्यांना रचता म्हटले जाते, कोणाचे रचता? नवीन दुनियेचे रचता. नवीन दुनियेला
म्हटले जाते स्वर्ग अथवा सुखधाम, नाव घेतात परंतु समजत नाहीत. श्रीकृष्णाच्या
मंदिराला सुद्धा सुखधाम म्हणतात. आता ते तर झाले छोटे मंदिर. श्रीकृष्ण तर विश्वाचा
मालक होता. बेहदच्या मालकाला जणूकाही हदचा मालक बनवतात. श्रीकृष्णाच्या छोट्याशा
मंदिराला सुखधाम म्हणतात. बुद्धीमध्ये हे येत नाही की तो तर विश्वाचा मालक होता.
भारताचाच रहिवासी होता. तुम्हाला देखील अगोदर काहीच माहित नव्हते. बाबांना तर
सर्वकाही माहित आहे, ते सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला जाणतात. आता तुम्ही मुले जाणता,
दुनियेमध्ये तर हे देखील कोणाला माहिती नाहीये - ब्रह्मा-विष्णू-शंकर कोण आहेत? शिव
तर आहेत उच्च ते उच्च भगवान. अच्छा, मग प्रजापिता ब्रह्मा कुठून आले? आहेत तर
मनुष्यच. प्रजापिता ब्रह्मा तर जरुर इथेच हवेत ना ज्यामुळे ब्राह्मण जन्माला येतील.
प्रजापिता अर्थातच मुखाद्वारे ॲडॉप्ट करणारे, तुम्ही आहात मुखवंशावळी. आता तुम्ही
जाणता की कसे ब्रह्माला बाबांनी आपले बनवून मुखवंशावळी बनवली आहे, यांच्यामध्ये
प्रवेश देखील केला आणि म्हटले की, हा माझा मुलगा सुद्धा आहे. तुम्ही जाणता ब्रह्मा
नाव कसे पडले, कसा जन्म झाला, हे इतर कोणीही जाणत नाही. केवळ स्तुती-सुमने गातात की
परमपिता परमात्मा उच्च ते उच्च आहेत, परंतु हे कोणाच्याही बुद्धीमध्ये येत नाही की
उच्च ते उच्च बाबा आहेत. आम्हा सर्व आत्म्यांचे ते पिता आहेत. ते देखील बिंदू रुपच
आहेत, त्यांच्यामध्ये सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान आहे. हे नॉलेज देखील
तुम्हाला आत्ता मिळाले आहे. अगोदर थोडे देखील हे ज्ञान नव्हते. मनुष्य फक्त बोलत
राहतात ब्रह्मा-विष्णू-शंकर, परंतु जाणत काहीही नाहीत. तर त्यांनाच समजावून सांगायचे
आहे. आता तुम्ही हुशार बनला आहात. जाणता की बाबा ज्ञानाचा सागर आहेत, जे आम्हाला
ज्ञान ऐकवतात, शिकवतात. हा राजयोग आहेच सतयुग नवीन दुनियेकरिता तर जरुर जुन्या
दुनियेचा विनाश झाला पाहिजे. त्यासाठी ही महाभारत लढाई आहे. अर्ध्या कल्पापासून
तुम्ही भक्तीमार्गाची शास्त्रे वाचत आला आहात. आता तर बाबांकडून डायरेक्ट ऐकता. बाबा
काही शास्त्र शिकवत बसत नाहीत. जप-तप करणे, शास्त्र इत्यादी पठण करणे ही सर्व भक्ती
आहे. आता भक्तांना भक्तीचे फळ हवे आहे कारण मेहनत करतातच भगवंताला भेटण्यासाठी.
परंतु ज्ञानाने आहे सद्गती. ज्ञान आणि भक्ती दोन्ही एकत्र चालू शकत नाही. आता आहेच
भक्तीचे राज्य. सगळे भगत आहेत. प्रत्येकाच्या मुखातून ओ गॉड फादर जरुर निघेल. आता
तुम्ही मुले जाणता की बाबांनी आपला परिचय दिला आहे की मी छोटा बिंदू आहे. मलाच
ज्ञानाचा सागर म्हणतात. मज बिंदूमध्ये संपूर्ण ज्ञान भरलेले आहे. आत्म्यामध्येच
नॉलेज असते. आता तुम्ही मुले समजता की त्यांना परमपिता परमात्मा म्हटले जाते. ते
आहेत सुप्रीम सोल अर्थात सर्वात उच्च ते उच्च पतित-पावन बाबाच सुप्रीम आहेत ना.
मनुष्य, ‘हे भगवान’ असे म्हणाले तर शिवलिंगाचीच आठवण येईल. ते देखील योग्य रीतीने
नाही. ही जशी की एक सवय झाली आहे की भगवंताची आठवण करायची आहे. भगवंतच सुख-दुःख
देतात. आता तुम्ही मुले असे म्हणणार नाही. तुम्ही जाणता की बाबा तर सुखदाता आहेत.
सतयुगामध्ये सुखधाम होते. तिथे दुःखाचे नाव नव्हते. कलियुगामध्ये आहेच दुःख, इथे
सुखाचे नाव सुद्धा नाहीये. उच्च ते उच्च भगवान, ते आहेत सर्व आत्म्यांचे पिता. हे
कोणाला माहिती नाहीये की, आत्म्यांचे पिता देखील आहेत, म्हणतात देखील आम्ही सर्व
बांधव आहोत. तर जरुर सर्व एका पित्याची मुले झालो ना. कोणी मग म्हणतात की ते तर
सर्वव्यापी आहेत - तुझ्यामध्ये देखील आहे, माझ्यामध्ये देखील आहे… अरे, तुम्ही तर
आत्मा आहात, हे तुमचे शरीर आहे मग तिसरी वस्तू कशी असू शकते! आत्म्याला परमात्मा
थोडेच म्हटले जाईल. जीव-आत्मा म्हटले जाते. जीव-परमात्मा म्हटले जात नाही. मग
परमात्मा सर्वव्यापी कसे असू शकतात! बाबा सर्वव्यापी असते तर मग फादरहूड (पितृभाव)
होईल, पित्याला पित्याकडून थोडाच वारसा मिळेल. बाबांकडून मुलगाच वारसा घेतो. सगळेच
पिता कसे असू शकतील. इतकी छोटी गोष्ट देखील कोणाला समजत नाही. तेव्हाच तर बाबा
म्हणतात - मुलांनो, मी आजपासून ५००० वर्षांपूर्वी तुम्हाला किती हुशार बनवले होते,
तुम्ही एव्हरहेल्दी, वेल्दी (सदैव निरोगी, समृद्ध), आणि हुशार होता. यापेक्षा जास्ती
हुशार अजून कोणी असू शकत नाही. तुम्हाला आता जी बुद्धी मिळते (ज्ञान मिळते) ते मग
तिथे (सतयुगामध्ये) असणार नाही. तिथे हे थोडेच माहित असते की आम्ही पुन्हा घसरणार (आपले
पतन होणार). हे माहीत झाले तर मग सुखाची अनुभूतीच राहणार नाही. हे ज्ञान मग प्राय:
लोप होते. हे ड्रामाचे ज्ञान फक्त आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे. ब्राह्मणच अधिकारी
असतात. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की आता आपण ब्राह्मण वर्णाचे आहोत. ब्राह्मणांनाच
बाबा ज्ञान ऐकवतात. ब्राह्मण मग बाकी सर्वांना ऐकवतात. गायन देखील आहे की भगवंताने
येऊन स्वर्गाची स्थापना केली होती, राजयोग शिकवला होता. पहा, श्रीकृष्ण जयंती साजरी
करतात, समजतात श्रीकृष्ण वैकुंठाचा मालक होता, परंतु तो तर विश्वाचा मालक होता - हे
डोक्यातच येत नाही. जेव्हा त्यांचे राज्य होते तेव्हा दुसरा कोणताही धर्म नव्हता.
त्यांचेच संपूर्ण विश्वावर राज्य होते आणि यमुनेच्या तीरावर होते. आता तुम्हाला हे
कोण समजावून सांगत आहे? भगवानुवाच. बाकी ते जी काही वेद-शास्त्रे इत्यादी ऐकवतात ती
आहेत भक्ती मार्गाची. इथे तर स्वयं भगवान तुम्हाला ऐकवत आहेत. आता तुम्ही समजता आपण
पुरुषोत्तम बनत आहोत. तुम्हालाच ही बुद्धी आहे की, आपण शांतीधामचे रहिवासी आहोत आणि
मग आपण परत येऊन २१ जन्मांचे प्रारब्ध उपभोगणार.
तुम्हा मुलांना आतून
आनंदाने पुलकित झाले पाहिजे की, बेहदचे बाबा शिवबाबा आपल्याला शिकवत आहेत, ते
ज्ञानाचे सागर आहेत, सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला जाणतात. असे बाबा आमच्यासाठी आले
आहेत तर आनंदाने गुदगुल्या होतात. बाबांना म्हणतात - ‘बाबा, आम्ही तुम्हाला आपले
वारसदार बनवले आहे’. बाबा मुलांवर बलिहार जातात. मुले मग म्हणतात की, भगवंता तुम्ही
जेव्हा याल तेव्हा आम्ही तुमच्यावर बलिहार जाणार अर्थात तुम्हाला मुलगा बनवणार. हे
(शिवबाबा) देखील आपल्या मुलांनाच वारसदार बनवतात. बाबांना वारसदार कसे बनवायचे, ही
देखील एक गूढ गोष्ट आहे. आपले सर्व काही एक्सचेंज करणे - यामध्ये बुद्धीचे काम आहे.
गरीब तर लगेच एक्सचेंज करतील आणि श्रीमंत फार मुश्किलीने करतील. जोपर्यंत पूर्ण
रीतीने ज्ञान लक्षात येत नाही तर तेवढी हिंमत नसते. गरीब तर लगेच म्हणतात - ‘बाबा,
आम्ही तर तुम्हालाच वारसदार बनवणार. आमच्या जवळ आहेच काय’. वारस बनवून मग आपला शरीर
निर्वाह देखील करायचा आहे. केवळ ट्रस्टी समजून रहायचे आहे. युक्त्या अनेक सांगत
राहतात. बाबा तर फक्त बघतात की, कोणी पाप कर्मामध्ये तर पैसे खर्च करत नाही ना?
मनुष्याला पुण्य-आत्मा बनवण्यासाठी पैसा वापरतात का? सेवा देखील नियमानुसार करतात
का? अशी पूर्ण तपासणी करतील, आणि मग सर्व सल्ला देतील. हे (ब्रह्मा बाबा) देखील
धंद्यामध्ये ईश्वर अर्थ काढून ठेवत होते ना. ते तर होते इनडायरेक्ट. आता बाबा
डायरेक्ट आले आहेत. मनुष्य समजतात आम्ही जे काही करतो त्याचे फळ ईश्वर दुसऱ्या
जन्मामध्ये देतात. कोणी गरीब दुःखी असेल तर समजेल कर्मच असे केलेले आहे. चांगली
कर्म केली असतील तर सुखी आहेत. बाबा तुम्हा मुलांना कर्माच्या गतीवर समजावून
सांगतात, रावण राज्यामध्ये तुमची सर्व कर्म विकर्मच होतात. सतयुग आणि त्रेतामध्ये
रावणच नाही त्यामुळे तिथे कोणतेही कर्म विकर्म होत नाही. इथे जे चांगली कर्म करतात
त्याचे अल्पकाळासाठी सुख मिळते. तरीही कोणता ना कोणता आजार त्रास तर असतोच कारण
अल्पकाळाचे सुख आहे. आता बाबा म्हणतात - हे रावण राज्यच नष्ट होणार आहे. राम
राज्याची स्थापना शिवबाबा करत आहेत.
तुम्ही जाणता हे चक्र
कसे फिरते. भारतच पुन्हा गरीब होतो. भारत आजपासून ५००० वर्षांपूर्वी स्वर्ग होता,
या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. पहिली गादी यांची चालत होती. श्रीकृष्ण प्रिन्स
मग स्वयंवर केले तेव्हा राजा बनला. श्री नारायण नाव पडले. हे देखील तुम्ही आता समजता
तर तुम्हाला आश्चर्य वाटते. बाबा तुम्ही साऱ्या रचता आणि रचनेची नॉलेज ऐकवता. तुम्ही
आम्हाला किती उच्च शिक्षण देता. बलिहार जावे, आम्हाला तर एका बाबांशिवाय इतर
कोणाचीही आठवण करायची नाहीये. शेवटपर्यंत शिकायचे आहे तर जरुर टिचरची आठवण करायची
आहे. स्कूलमध्ये टिचरची आठवण करतात ना. त्या शाळांमध्ये तर किती टीचर्स असतात.
प्रत्येक विषयाचा टीचर वेगळा असतो, इथे तर एकच टीचर आहे. किती गोड आहे. बाबा गोड,
टीचर गोड… अगोदर भक्तिमार्गामध्ये अंधश्रद्धेने आठवण करत होता. आता तर डायरेक्ट बाबा
शिकवत आहेत तर किती आनंद झाला पाहिजे तरी देखील म्हणतात - ‘बाबा, विसरुन जातो.
माहिती नाही आमची बुद्धी तुमची आठवण का करत नाही’. गातात देखील - ‘ईश्वराची गत-मत
न्यारी आहे’. बाबा तुमची गति आणि सद्गतीची मत तर खूप वंडरफुल आहे. अशा बाबांची आठवण
केली पाहिजे. पत्नी आपल्या पतीचे गुण गाते ना - ‘खूप चांगले आहेत, एवढी त्यांची
प्रॉपर्टी आहे’, आतून आनंद होत असतो ना. हे (शिवबाबा) तर पतींचेही पती, बापांचेही
बाप आहेत, यांच्याकडून आम्हाला किती सुख मिळते. इतर सर्वांकडून तर दुःखच मिळते.
हां, टीचर कडून सुख मिळते कारण की शिक्षणामुळे इन्कम होते. गुरु नेहमी केला जातो
वानप्रस्थमध्ये. बाबा देखील म्हणतात - मी वानप्रस्थमध्ये आलो आहे. हे (ब्रह्मा बाबा)
देखील वानप्रस्थी, मी देखील वानप्रस्थी. ही सर्व माझी मुले देखील वानप्रस्थी आहेत.
पिता, टीचर, गुरु तीनही एकत्र आहेत. बाप टीचर देखील बनतात आणि मग गुरु बनून सोबत
घेऊन जातात. त्या एका बाबांचीच महिमा आहे, या गोष्टी इतर कोणत्या शास्त्र
इत्यादीमध्ये नाही आहेत. बाबा प्रत्येक गोष्ट चांगल्या रीतीने समजावून सांगतात.
यांच्यापेक्षा उच्च नॉलेज कोणते असत नाही, ना जाणण्याची गरज राहते. आम्ही सर्व काही
जाणून विश्वाचे मालक बनतो आणखी जास्ती काय करणार. हे मुलांच्या बुद्धीमध्ये राहिले
तर आनंदामध्ये आणि त्याच आठवणीमध्ये राहतील. पुण्य-आत्मा बनण्यासाठी आठवणीमध्ये
जरुर राहिले पाहिजे. मायेचा धर्म आहे तुमच्या योगाला तोडणे. योगामध्येच माया विघ्न
आणते. विसरुन जाता. मायेची वादळे खूप येतात. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे.
सर्वात पुढे तर हे (ब्रह्मा बाबा) आहेत, तर यांना सर्व अनुभव येतात. जेव्हा
माझ्याकडे येतील तेव्हाच तर सर्वांना समजावणार ना की, ही सर्व मायेची वादळे येतील.
बाबांकडे देखील येतात. तुम्हाला सुद्धा येतील. मायेची वादळेच आली नाहीत, योग
लागलेलाच राहीला म्हणजे तर कर्मातीत अवस्था होईल. मग आपण इथे राहू शकणार नाही.
कर्मातीत अवस्था झाली तर मग सगळे निघून जातील. शिवाची वरात गायली गेली आहे ना.
शिवबाबा येतील तेव्हाच आपण सर्व आत्मे जाणार. शिवबाबा येतातच सर्वांना घेऊन
जाण्यासाठी. सतयुगामध्ये इतके आत्मे थोडेच असणार. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) शिवबाबांना
आपला वारसदार बनवून सर्व काही एक्स्चेंज करायचे आहे. वारसदार बनवून शरीर निर्वाह
देखील करायचा आहे, ट्रस्टी समजून रहायचे आहे. कोणत्याही पाप कर्मामध्ये पैसे लावायचे
नाहीत.
२)आत आनंदाने
गुदगुल्या होत रहाव्यात की, स्वयं ज्ञानाचा सागर बाबा आम्हाला शिकवत आहेत. पुण्य
आत्मा बनण्यासाठी आठवणीमध्ये रहायचे आहे, मायेच्या वादळांना घाबरायचे नाही.
वरदान:-
सत्यतेच्या
आधारावर एका बाबांना प्रत्यक्ष करणारे, निर्भय ऑथॉरिटी स्वरूप भव
सत्यताच प्रत्यक्षतेचा
आधार आहे. बाबांना प्रत्यक्ष करण्यासाठी निर्भय आणि ऑथॉरिटी स्वरूप बनून बोला,
संकोचाने नाही. जेव्हा अनेक मते असणारे फक्त एका गोष्टीला मानतील की आम्हा सर्वांचा
पिता एक आहे आणि तेच आता कार्य करत आहेत, आम्ही सर्व त्या एकाची संतान एकच आहोत आणि
हे एकच सत्य आहे… तेव्हा विजयाचा झेंडा फडकेल. याच संकल्पाद्वारे मुक्तिधामला जाल
आणि पुन्हा जेव्हा आपला-आपला पार्ट बजावण्यासाठी याल तेव्हा पहिले हेच संस्कार
इमर्ज होतील की, गॉड इज वन. हीच ‘गोल्डन एज’ची (सुवर्ण युगाची) स्मृति आहे.
बोधवाक्य:-
सहन करणेच
स्वतःच्या शक्ति रुपाला प्रत्यक्ष करणे आहे.
अव्यक्त इशारे -
आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा, अंतर्मुखी बना:-
जसे हा देह स्पष्ट
दिसून येतो तसे आपल्या आत्म्याचे स्वरुप स्पष्ट दिसून यावे अर्थात अनुभव व्हावे.
मस्तक अर्थात बुद्धीची स्मृती अथवा दृष्टीने आत्मिक स्वरुपाशिवाय इतर काहीही दिसू
नये अथवा स्मृतीमध्ये येऊ नये. असे निरंतर तपस्वी बना तेव्हाच प्रत्येक आत्म्याप्रति
कल्याणाचा शुभ संकल्प उत्पन्न होईल. भले कोणी आपल्या संस्कार-स्वभावाच्या वश तुमच्या
पुरुषार्थामध्ये परीक्षा घेण्याच्या निमित्त बनलेला असेल, त्याच्या प्रति सुद्धा
कल्याणाचा संकल्प उत्पन्न व्हावा.