26-05-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्हाला खूप चांगली संगत करायची आहे, वाईट संगतीचा रंग लागला तर कोसळाल (पतन होईल), कु-संगत बुद्धीला तुच्छ बनवते”

प्रश्न:-
आता तुम्हा मुलांना कोणता उत्साह आला पाहिजे?

उत्तर:-
तुम्हाला उत्साह आला पाहिजे की गावागावामध्ये जाऊन सेवा करावी. तुमच्याकडे जे काही आहे, ते सेवा अर्थ आहे. बाबा मुलांना सल्ला देतात - ‘मुलांनो, या जुन्या दुनियेतून तुमचा पदर मुक्त करा. कोणत्याही वस्तूमध्ये मोह ठेवू नका, यांच्यावर मन जडू देऊ नका.

गीत:-
इस पाप की दुनिया से…

ओम शांती।
पाप आत्म्यांची दुनिया आणि पुण्य आत्म्यांची दुनिया, नाव आत्म्यांचेच ठेवले जाते. आता इथे दुःख आहे म्हणून बोलावतात. पुण्य आत्म्यांच्या दुनियेमध्ये असे बोलावत नाहीत की, कुठे घेऊन चला. तुम्ही मुले समजता, हे काही पंडित, संन्यासी किंवा विद्वान इत्यादी ऐकवत नाहीत. हे (ब्रह्माबाबा) स्वतः देखील म्हणतात - ‘मी हे ज्ञान जाणत नव्हतो, रामायण इत्यादी शास्त्र तर पुष्कळ वाचत होतो’. बाकी हे ज्ञान मी (शिवबाबा) तुम्हाला ऐकवतो. हे (ब्रह्माबाबा) देखील ऐकतात. आता ही आहे पाप आत्म्यांची दुनिया. पुण्य आत्म्यांसाठी फक्त म्हणतील की, हे होऊन गेले आहेत. बस्स, पूजा करून येतील, शिवाची पूजा करून येतील. तुम्ही मुले आता कोणाची पूजा कराल? तुम्ही जाणता उच्च ते उच्च भगवान शिव आहेत, ते आहेत आज्ञाधारक पिता, टीचर, ओबीडीएंट प्रिसेप्टर (आज्ञाधारक गुरु). दुसरा कोणताही गुरु सोबत घेऊन जाण्याची गॅरंटी इत्यादी करू शकत नाही. तरी देखील ते काही सर्वांना थोडेच घेऊन जातील. आता तुम्ही सन्मुख बसले आहात, इथून आपल्या घरी गेल्यावर देखील तुम्ही विसरून जाल. इथे सन्मुख ऐकल्याने मजा येईल. बाबा घडोघडी सांगतात - ‘मुलांनो, नीट अभ्यास करा. या बाबतीत निष्काळजीपणा करू नका, कुसंगतीमध्ये अडकू नका. नाहीतर अजूनच तुच्छ-बुद्धि व्हाल’. मुले जाणतात आपण काय होतो, कोणती पापे केली. आता आम्ही हे देवता बनतो, ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे मग इथे घरे इत्यादीची चिंता कशाला करायची. या दुनियेचे जे काही आहे ते विसरायचे आहे. नाहीतर अडथळा निर्माण करतील. इथे मन लागत नाही. आपण नव्या दुनियेमध्ये आपले हिरे-माणकांचे महाल जाऊन बनवू. इथले पैसे इत्यादी कोणती गोष्ट आवडत असेल तर शरीर सोडते वेळी त्यामध्ये मोह जाईल. माझे-माझे कराल तर मग अंतिम समयी तेच समोर येईल. हे तर सर्व इथेच नष्ट होणार आहे. आम्ही आपल्या राजधानीमध्ये येऊ, यामध्ये (या जुन्या दुनियेमध्ये) का मन गुंतवायचे. तिथे खूप सुख असते. नावच आहे स्वर्ग. आता आपण चाललो आपल्या वतनला, हे तर रावणाचे वतन आहे, आमचे नाही. या मधून सुटका करण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. जुन्या दुनियेमधून तुमचा पदर सोडवतात (तुम्हाला मुक्त करतात); म्हणून बाबा म्हणतात - कोणत्याही गोष्टीमध्ये मोह ठेवू नका. पोट काही जास्त मागत नाही, फालतू गोष्टींवर खूप खर्च होतो. तुम्हा मुलांना सेवा करण्यासाठी उत्साह आला पाहिजे. बरीच मुले आहेत ज्यांना गावा-गावांमध्ये सेवा करण्याची हौस आहे. बाकी ज्यांना सेवेची हौस नाही, त्यांना काय कामाचे म्हणणार. जसे बाबा तसे मुलांना बनायला हवे. बाबांचाच परिचय द्यायचा आहे. बाबांची आठवण करा आणि बाबांकडून वारसा घ्या. मुलांना हौस असते - आपण बाबांच्या सेवेवर जातो. तर बाबा देखील हिंमत वाढवतात. बाबा आले आहेत सेवेवर, सेवेसाठी सर्व काही आहे. हा बाबांचा परिचय तर सर्वांना द्यायचा आहे. बाबा एकच आहेत. भारतामध्ये आले होते, भारतामध्ये देवतांचे राज्य होते. कालची गोष्ट आहे, लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते मग राम-सीतेचे. मग वाममार्गामध्ये गेले. रावण राज्य सुरू झाले, शिडी खाली उतरले; आता पुन्हा चढती कला सेकंदाची गोष्ट आहे.

एक असते खरे प्रेम, दुसरे असते आर्टिफिशियल प्रेम (कृत्रिम प्रेम). बाबांवर खरे प्रेम तेव्हा होईल जेव्हा स्वतःला आत्मा समजाल. आता तुम्हा मुलांना या दुनियेमध्ये कृत्रिम प्रेम आहे. ही दुनिया तर नष्ट होणार आहे. सेवा करणारे कधी उपाशी मरू शकत नाहीत. तर मुलांना सेवेची आवड असली पाहिजे. तुमचे ईश्वरीय मिशन खूप सोपे आहे. कोणीही समजत नाही की, धर्म कसा स्थापन होतो. क्राईस्ट आला, ख्रिश्चन धर्म स्थापन केला, धर्म वाढत गेला. त्याच्या मतावर चालता-चालता घसरत आले (पतन झाले), आता तुम्हा मुलांना देही-अभिमानी बनायचे आहे. अर्धे कल्प रावण राज्यामध्ये आपण बाबांना विसरलो, आता बाबांनी येऊन जागे केले आहे. बाबा म्हणतात - ड्रामा अनुसार तुम्हाला खाली यायचेच होते (अध:पतन व्हायचेच होते). तुमचाही दोष नाही. रावण राज्यामध्ये दुनियेची अशी हालत होते. बाबा म्हणतात - आता मी आलो आहे तुम्हाला शिकविण्याकरिता. तुम्ही पुन्हा आपली राजाई घ्या. मी अजून कोणताही त्रास देत नाही. एक तर बाजारातील घाणेरडे पदार्थ खाऊ नका आणि मामेकम् (मज एकाची) आठवण करा. आता तुम्ही मुले जाणता - हे ड्रामाचे चक्र आहे, जे पुन्हा रिपीट होईल. तुमच्या बुद्धीमध्ये ड्रामाच्या आदि, मध्य, अंताचे ज्ञान आहे. तुम्ही कोणालाही समजावून सांगू शकता. पहिले तर बाबांची आठवण राहिली पाहिजे. सेवेसाठी आपसात भेटून सोबती बनवले पाहिजेत. मातांनी देखील सेवेसाठी गेले पाहिजे. यामध्ये घाबरण्याची कोणतीही गोष्ट नाही. चित्र इत्यादी सर्व तुम्हाला मिळतील. तुमची सेवा जास्त होईल. म्हणतील तुम्ही निघून जाता, मग आम्हाला कोण शिकवणार? बोला, आम्ही सेवा करण्यासाठी तयार आहोत, तुम्ही घर इत्यादीचा प्रबंध करा. अनेकांच्या कल्याणार्थ निमित्त बनाल. बाबा सेवेचा उमंग देतात. मुलांमध्ये हिंमत असेल, तर सेवा देखील वाढते. ही काही जत्रा नाहीये जी १०-१५ दिवस जत्रा चालली आणि मग खलास. हा मेळावा तर चालतच राहतो. इथे आत्म्यांचे आणि परमात्म्याचे मिलन होते, ज्यालाच खरा मेळा म्हटले जाते. तो तर आता चालूच आहे. मेळावा बंद तेव्हा होईल जेव्हा सेवा पूर्ण होईल. ड्रामा अनुसार मुलांना सेवेची खूप आवड असली पाहिजे. जे बेहदच्या बाबांमध्ये नॉलेज आहे, ते मुलांच्या बुद्धीमध्ये आहे. उच्च ते उच्च बाबांकडून आम्ही किती श्रेष्ठ बनत आलो आहोत. अशा प्रकारे स्वतःशी गप्पा मारायच्या आहेत. आपसात सेमिनार करायचा आहे. बाबांकडून सल्ला घेऊन सेवेमध्ये रुजू व्हा. काही मदतीची गरज असेल तर बाबा दुल्हेलाल बसला आहे. हे सर्व ड्रामामध्ये नोंदलेले आहे. काळजी करण्याचा काही प्रश्नच नाही. नाहीतर स्थापना कशी होईल. दुसरी गोष्ट ही देखील आहे, जो करेल तो मिळवेल. आता तुम्ही मुले पत्थर-बुद्धी पासून हिऱ्यासमान बनता. बाबा ज्ञानाद्वारे इतके सरळ करतात, आणि माया मग नाकाला पकडून पाठ फिरवते.

तुम्ही मुलांनी खूप चांगली संगत केली पाहिजे. वाईट संगतीचा रंग लागला तर खाली कोसळाल (पतन होईल). बाबा चित्रपट इत्यादी बघण्यासाठी मना करतात. ज्यांना चित्रपट बघण्याची सवय लागली आहे ते पतित बनल्याशिवाय राहू शकणार नाहीत. इथे प्रत्येकाचे वर्तन घाणेरडे (विकारी) आहे, नावच आहे वेश्यालय. बाबा शिवालय स्थापन करत आहेत. वेश्यालयाला पूर्णत: आग लागणार आहे. कुंभकर्णासारखे आसुरी निद्रेमध्ये झोपून पडले आहेत. तुम्ही समजता की आपण शिवालयामध्ये जात आहोत. अगोदर आम्ही देखील माकडाप्रमाणे होतो, यावर रामायणामध्ये देखील एक कथा आहे. आता तुम्ही बाबांचे मदतगार बनला आहात. तुम्ही आपल्या शक्तीने राज्य स्थापन करत आहात. मग हे रावणराज्य नष्ट होणार आहे. तुम्हा मुलांना अनेक प्रकारच्या युक्त्या सांगत राहतात. कोणाला जर दानच केले नाहीत तर फळ तरी कसे मिळणार. सर्वप्रथम १०-१५ जणांना रस्ता सांगून नंतरच भोजन केले पाहिजे. पहिले शुभ काम करून या, यातच तुमचे कल्याण आहे. कोणत्याही देहधारीची आठवण करू नका. ही तर पतित दुनिया आहे. पतित-पावन एका बाबांचीच आठवण करा तर पावन दुनियेचे मालक बनाल. अंत मति सो गति होईल. तर कोणाला ना कोणाला संदेश ऐकवून मग येऊन भोजन केले पाहिजे. तुम्ही सर्वांना हेच सांगत रहा की बाबांची आठवण केल्याने इतके श्रेष्ठ बनाल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

रात्री क्लास (१७-०३-१९६८) – कधीही कोणते भाषण इत्यादी करायचे असेल तर आपसात मिळून दोन-चार वेळा रिहर्सल करा, पॉईंट्स ॲड करून, दुरुस्ती करून तयार करा तेव्हा मग उत्तम भाषण कराल. मूळ एका गोष्टीवर (गीतेचा भगवान यावरच) तुम्ही विजय मिळवाल तर मग बाकी सर्व गोष्टींमध्ये विजय होईल, यासाठी कॉन्फरन्स तर होईल ना! समजून घेत जातील झाडाची वृद्धी तर जरूर होणार आहे. मायेची वादळे तर सर्वांना लागतात. जास्त करून लिहितात - ‘बाबा, आम्ही काम विकाराची थप्पड खाल्ली’; याला म्हटले जाते केलेली कमाई चट झाली (नष्ट झाली). क्रोध इत्यादी केला तर म्हणणार थोडा तोटा झाला. यासाठी म्हणून समजावून सांगावे लागते - कामविकारावर विजय प्राप्त करून जगत जीत बनता. काम से हारे हार होते. काम विकाराने हरणाऱ्याची कमाई नष्ट होते, दंड होतो. ध्येय खूप मोठे आहे म्हणून खूप सावधगिरी बाळगावी लागते. तुम्ही मुले जाणता - ५००० वर्षांपूर्वी देखील आम्हाला बादशाही मिळाली होती. आता पुन्हा दैवी राजधानी स्थापन होत आहे. या अभ्यासाद्वारे आपण त्या राजधानीमध्ये जातो, सर्वकाही अभ्यासावर अवलंबून आहे. अभ्यास आणि धारणेद्वारेच बाप समान बनाल. रजिस्टर देखील हवे ना जेणेकरून समजेल की, किती जणांना आप समान बनवले. जितकी जास्त धारणा कराल तितकेच गोड बनाल. खूप प्रेमळ मुले हवीत. तुम्हा मुलांसाठीच तो दिवस आज आला आहे, ज्याच्यासाठी मनुष्य खूप प्रयत्न करतात की मुक्तीमध्ये जावे. बाबा सर्वांना एकत्रच मुक्ती-जीवनमुक्ती देतात. जे देवता बनण्याचा पुरुषार्थ करतात तेच जीवनमुक्ती मध्ये (सतयुगामध्ये) येतील. बाकी सर्व मुक्ती मध्ये (शांतीधाम मध्ये) जातील. अचूक हिशोब काढू शकत नाही. काही जण तर मागे राहतीलही. विनाशाचा साक्षात्कार करतील. हा आनंददायी काळ देखील बघतील. प्रत्येक गोष्टीमध्ये पुरुषार्थ करायचा असतो. असेही नाही की, आठवणीमध्ये बसले म्हणजे काम होईल. घर मिळेल. नाही. ते तर ड्रामामध्ये जे आहे तेच होते, अपेक्षा ठेवता कामा नये. पुरुषार्थ करायचा असतो. बाकी होते तर तेच जे ड्रामामध्ये नोंदलेले आहे. पुढे जाऊन तुमची वृत्ती देखील भावा-भावाची होईल. जितका पुरुषार्थ कराल तितकी ती वृत्ती राहील. आपण अशरीरी आलो होतो. ८४ जन्मांचे चक्र पूर्ण केले. आता बाबा म्हणतात कर्मातीत अवस्थेमध्ये जायचे आहे.

तुम्हाला वास्तविक कोणाशीही शास्त्रे इत्यादींवर वाद घालण्याची गरज नाही. मूळ गोष्ट आहेच मुळी आठवणीची आणि सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला समजून घ्यायचे आहे. चक्रवर्ती राजा बनायचे आहे. फक्त याच चक्राला समजून घ्यायचे आहे. याचेच गायन आहे सेकंदामध्ये जीवनमुक्ती. तुम्हा मुलांना आश्चर्य वाटत असेल, अर्धे कल्प भक्ती चालते. कणभर सुद्धा ज्ञान नाही. ज्ञान आहेच बाबांकडे. बाबांद्वारेच जाणायचे आहे. हे बाप किती अनकॉमन (असाधारण) आहेत, म्हणून कोटींमध्ये कोणी निघतात. ते (दुनियेतील) टीचर्स असे थोडेच म्हणतील. हे (शिवबाबा) तर म्हणतात मीच पिता, टीचर, गुरु आहे. तर मनुष्य ऐकून आश्चर्यचकित होतील. भारताला मातृभूमी म्हणतात कारण अंबेचे नाव खूप प्रसिद्ध आहे. अंबेचे मेळावे देखील खूप भरतात. ‘अंबा’ खूप गोड शब्द आहे. छोटी मुले देखील आईवर प्रेम करतात ना कारण आई खाऊ-पिऊ घालते, सांभाळ करते. आता अंबेचे पिता देखील पाहिजेत ना. ही तर दत्तक मुलगी आहे, हिचा पती तर नाहीये. ही नवीन गोष्ट आहे ना. प्रजापिता ब्रह्मा जरूर दत्तक घेत असतील. या सर्व गोष्टी बाबाच येऊन तुम्हा मुलांना समजावून सांगतात. केवढी जत्रा भरते, पूजा होते, कारण तुम्ही मुले सेवा करता. मम्माने जितक्याजणांना शिकवले असेल तितके इतर कोणीही शिकवू शकणार नाही. मम्माच्या नावाचा बोलबाला खूप आहे, जत्रा देखील खूप भरते. आता तुम्ही मुले जाणता, बाबांनीच येऊन रचनेच्या आदि-मध्य-अंताचे सर्व रहस्य तुम्हा मुलांना समजावून सांगितले आहे. तुम्हाला बाबांच्या घरा विषयी देखील माहित झाले आहे. बाबांवरच प्रेम आहे, घरावर देखील प्रेम आहे. हे ज्ञान तुम्हाला आता मिळते. या शिक्षणाने किती कमाई होते. तर आनंद झाला पाहिजे ना आणि तुम्ही आहात अगदी साधारण. दुनियेला माहीतच नाही आहे, बाबा येऊन हे नॉलेज ऐकवतात. बाबाच येऊन सर्व नवीन-नवीन गोष्टी मुलांना ऐकवतात. नवीन दुनिया बनते बेहदच्या शिक्षणाने. जुन्या दुनियेपासून वैराग्य येते. तुम्हा मुलांना मनामध्ये ज्ञानाने आनंद होतो. बाबांची आणि घराची आठवण करायची आहे. घरी तर सर्वांना जायचेच आहे. बाबा तर सर्वांना म्हणतील ना - ‘मुलांनो, मी तुम्हाला मुक्ती-जीवनमुक्तीचा वारसा देण्यासाठी आलो आहे. मग विसरून का जाता! मी तुमचा बेहदचा पिता आहे, राजयोग शिकविण्यासाठी आलो आहे. तर काय तुम्ही श्रीमतावर चालणार नाही. मग तर खूप तोटा होईल’. हा आहे बेहदचा घाटा. बाबांचा हात सोडला तर कमाईमध्ये घाटा होईल. अच्छा - गुड नाईट. ओम् शांती.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) या दुनियेमधले जे काही आहे त्याला विसरायचे आहे. बाप समान ओबीडीएंट (आज्ञाधारक) बनून सेवा करायची आहे. सर्वांना बाबांचा परिचय द्यायचा आहे.

२) या पतित दुनियेमध्ये स्वतःला कुसंगतीपासून वाचवायचे आहे. बाजारचे घाणेरडे भोजन खायचे नाही, चित्रपट बघायचा नाही.

वरदान:-
त्रिकालदर्शी स्टेजद्वारे व्यर्थचे खाते बंद करणारे सदा सफलता मूर्त भव

त्रिकालदर्शी स्टेजवर स्थित होणे अर्थात प्रत्येक संकल्प, बोल अथवा कर्म करण्यापूर्वी चेक करणे की, हे व्यर्थ आहे की समर्थ आहे! व्यर्थ एका सेकंदामध्ये पद्मांचे नुकसान करते, समर्थ एका सेकंदामध्ये पद्मांची कमाई करते. सेकंदाचे व्यर्थ देखील कमाईमध्ये खूप नुकसान करते ज्यामुळे केलेली कमाई देखील लपते म्हणून एक-कालदर्शी होऊन कर्म करण्याऐवजी त्रिकालदर्शी स्थितीमध्ये स्थित होऊन करा तर व्यर्थ समाप्त होईल आणि सदा सफलता मूर्त बनाल.

बोधवाक्य:-
मान, शान आणि साधनांचा त्याग हाच महान त्याग आहे.


अव्यक्त इशारे - रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:- जसे देह आणि देही दोन्ही वेगवेगळ्या दोन वस्तू आहेत, परंतु अज्ञान-वश दोघांना एकत्र केले आहे; ‘माझे’ ला ‘मी’ समजले आहेत आणि याच चुकीमुळे इतका त्रास, दुःख आणि अशांती प्राप्त झाली आहे. तसेच हे अपवित्रता आणि विस्मृतीचे संस्कार, जे ब्राह्मणपणाचे नाहीत, शूद्रपणाचे आहेत, यांना देखील माझे समजल्याने मायेच्या वश होता आणि मग त्रस्त होता.