27-05-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुमचे तोंड आता स्वर्गाच्या दिशेला आहे, तुम्ही नरकापासून किनारा करुन
स्वर्गाच्या दिशेने जात आहात, म्हणून बुद्धीचा योग नरकामधून काढून टाका”
प्रश्न:-
सर्वात उच्च
आणि सूक्ष्म ध्येय कोणते आहे, त्याला कोण पार करु शकतात?
उत्तर:-
तुम्ही मुले स्वर्गाच्या दिशेला तोंड करता, माया तुमचे तोंड नरकाच्या दिशेला वळवते,
अनेक वादळे निर्माण करते, त्याच वादळांना पार करणे - हेच तुमचे सूक्ष्म ध्येय आहे.
या ध्येयाला पार करण्यासाठी नष्टोमोहा बनावे लागेल. निश्चय आणि हिंमतीच्या आधारावर
याला पार करु शकता. विकारींच्यामध्ये राहत असताना निर्विकारी हंस बनणे - हीच आहे
मेहनत.
गीत:-
निर्बल से
लड़ाई बलवान की...
ओम शांती।
जी मुले हुशार आहेत ती अर्थ तर चांगल्या रीतीने समजतात, ज्यांचा बुद्धियोग शांतीधाम
आणि स्वर्गाच्या दिशेला आहे त्यांनाच वादळे लागतात. बाबा तर आता तुमचे तोंड फिरवतात.
अज्ञान काळामध्ये देखील जुन्या घरापासून तोंड फिरते मग नवीन घराची आठवण करत राहतात
- कधी तयार होईल! आता तुम्हा मुलांच्या देखील लक्षात आहे की, कधी आपल्या स्वर्गाची
स्थापना होईल आणि आपण सुखधाममध्ये येणार. या दुःखधाम मधून तर सर्वांनाच जायचे आहे.
साऱ्या सृष्टीच्या मनुष्य मात्रांना बाबा समजावून सांगत राहतात - मुलांनो आता
स्वर्गाचे दरवाजे उघडत आहेत. आता तुमचा बुद्धियोग स्वर्गाच्या दिशेने गेला पाहिजे.
हेवन मध्ये जाणाऱ्याला म्हटले जाते पवित्र. हेल मध्ये जाणाऱ्याला अपवित्र म्हटले
जाते. गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना देखील बुद्धियोग हेवनच्या दिशेने ठेवायचा
आहे. समजा वडिलांचा बुद्धियोग स्वर्गाच्या दिशेला आणि मुलांचा नरकाच्या दिशेला असेल
तर दोघेही एकाच घरामध्ये कसे बरे राहू शकतात. हंस आणि बगळे एकत्र राहू शकत नाहीत.
फार अवघड आहे. त्यांचा बुद्धियोग आहेच ५ विकारांच्या दिशेला. तो (मुलगा) नरकाच्या
दिशेने जाणारा, ते (वडील) स्वर्गाच्या दिशेने जाणारे, दोघेही एकत्र राहू शकत नाहीत.
मोठे ध्येय आहे. वडील बघतात आपल्या मुलाचे तोंड नरकाच्या दिशेने आहे, नरकामध्ये
गेल्याशिवाय राहू शकत नाही, मग काय केले पाहिजे! जरूर घरामध्ये भांडण होईल. म्हणतील
- हे कसले ज्ञान आहे! जे सांगते मुलाने लग्नच करू नये...! असे पुष्कळ जण गृहस्थ
व्यवहारामध्ये राहत आहेत ना. मुलाचे तोंड नरकाच्या दिशेने आहे, त्यांना वाटते
नरकामध्ये जावे. वडील म्हणतात नरकाच्या दिशेने बुद्धियोग ठेवू नको. परंतु वडीलांचे
सुद्धा सांगणे मानत नाहीत. मग काय करायचे? यामध्ये खूप नष्टोमोहा स्थिती पाहिजे. हे
सारे ज्ञान आत्म्यामध्ये आहे. वडीलांची आत्मा म्हणते याला मी जन्म दिला आहे, माझे
म्हणणे मानत नाही. काही तर ब्राह्मण सुद्धा बनले आहेत तरीही बुद्धी नरकाच्या दिशेने
जाते. तर ते जसे एकदम रसातळाला जातील.
मुलांना सांगितले गेले
आहे - हा आहे ज्ञान सागराचा दरबार. भक्तिमार्गामध्ये इंद्राचा दरबार देखील गायला
जातो. पुखराज परी, नीलम परी, माणिक परी, खूपच नावे ठेवलेली आहेत कारण ज्ञान डान्स
करतात ना. विविध प्रकारच्या पऱ्या आहेत. त्या देखील पवित्र पाहिजेत. जर कोणी
अपवित्र असणाऱ्याला घेऊन आली तर सजा खावी लागेल. याबाबतीत खूपच पावन पाहिजेत. हे
लक्ष्य खूप उच्च आहे म्हणून झाडाची लवकर वृद्धी होत नाही. बाबा जे ज्ञान देतात
त्याला कोणीही जाणत नाही. शास्त्रांमध्ये देखील हे ज्ञान नाहीये त्यामुळे थोडासा
निश्चय झाला की मग माया एकच थप्पड मारून पाडते. वादळ आहे ना. छोटासा दिवा त्याला तर
वादळ एकाच थपडेने पाडून टाकते. दुसऱ्यांना विकारामध्ये जाताना पाहून आपणही घसरतात.
हे समजून घेण्यासाठी तर खूप चांगली बुद्धी पाहिजे. गायले देखील गेले आहे अबलांवर
अत्याचार झाले. बाबा समजावून सांगत आहेत - ‘मुलांनो, काम विकार महाशत्रू आहे, याचा
तर तुम्हाला खूप तिटकारा आला पाहिजे. आता बाबा खूप तिटकारा उत्पन्न करतात, अगोदर या
गोष्टी नव्हत्या. नरक तर आता आहे ना. द्रौपदीने बोलावले आहे, ही आत्ताचीच तर गोष्ट
आहे. किती चांगल्या रीतीने समजावून सांगितले जाते. तरी देखील डोक्यात राहत नाही.
हे गोळ्याचे चित्र
खूप चांगले आहे - गेट वे टू हेवन. या गोळ्याच्या चित्रावरून अगदी व्यवस्थित समजू
शकतील. शिडीच्या चित्रावरून सुद्धा इतके नाही जितके या चित्रावरून समजतील.
दिवसेंदिवस सुधारणा देखील होत जातात. बाबा म्हणतात - आज मी तुम्हाला एकदम नवीन
डायरेक्शन देतो. सर्व डायरेक्शन आधीपासून थोडेच मिळतात. ही कशी दुनिया आहे, यामध्ये
किती दुःख आहे. मुलांमध्ये किती मोह असतो. मुलाचा मृत्यू झाला तर एकदम वेडेपिसे
होतात, अथाह दुःख आहे. असे नाही की, श्रीमंत आहेत, म्हणजे ते सुखी आहेत. अनेक
प्रकारचे आजार होत राहतात. मग हॉस्पिटलमध्ये पडून राहतात. गरीब जनरल वॉर्डमध्ये
पडून राहतात, श्रीमंतांना वेगळी स्पेशल रुम मिळते. परंतु दुःख तर जसे श्रीमंताला
होते तसेच गरिबाला होते. फक्त त्यांना जागा चांगली मिळते. नीट लक्ष दिले जाते. आता
तुम्ही मुले जाणता आम्हाला बाबा शिकवत आहेत. बाबांनी अनेकदा शिकवले आहे. आपल्या
मनाला विचारले पाहिजे की आपण शिकतो की नाही? किती जणांना शिकवतो? जर शिकवले नाहीत
तर कसले पद मिळणार! रोज रात्री आपला चार्ट बघा - आज कोणाला दुःख तर नाही दिले?
श्रीमत सांगते - कोणाला दुःख देऊ नका आणि सर्वांना रस्ता सांगा. जो आपल्या परिवाराचा
सदस्य असेल त्यांना लगेच टच होईल. यामध्ये सोन्याचे भांडे पाहिजे, ज्यामध्ये अमृत
टिकेल. जसे म्हणतात ना - वाघिणीच्या दुधासाठी सोन्याचे भांडे हवे कारण तिचे दूध खूप
शक्तिशाली असते. तिचा आपल्या बछड्यामध्ये मोह असतो. कोणाला पाहिले तर एकदम झेपच
घेईल. समजेल - कुठे बछड्याला मारून टाकायला नको. इथे देखील बरेच आहेत ज्यांचा पति,
मुले इत्यादींमध्ये मोह असतो. आता तुम्ही मुले जाणता स्वर्गाचे गेट उघडत आहे.
कृष्णाच्या चित्रामध्ये अगदी स्पष्टपणे लिहिलेले आहे. या युद्धा नंतर स्वर्गाचे
दरवाजे उघडतात. तिथे फार थोडे मनुष्य असतात. बाकी सर्व मुक्तिधाम मध्ये निघून जातात.
सजा खूप खावी लागते. जी काही पाप कर्म केली आहेत, एका-एका जन्माचा साक्षात्कार करत,
सजा खात रहाल. मग पाई-पैशाचे पद मिळवाल. आठवणीमध्ये न राहिल्या कारणाने विकर्म
विनाश होत नाहीत.
बरीच मुले आहेत जी
मुरली सुद्धा चुकवतात, पुष्कळ मुले या बाबतीत निष्काळजी असतात. समजतात आम्ही नाही
वाचली तर काय झाले! आम्ही तर पार झालो आहोत. मुरलीची पर्वा करत नाहीत. असे
देह-अभिमानी खूप आहेत, ते आपलेच नुकसान करतात. बाबा जाणतात म्हणून इथे जेव्हा येतात,
तेव्हा देखील विचारतात, बऱ्याच मुरल्या वाचल्या नसणार! माहीत नाही त्यामध्ये काही
चांगले पॉईंट्स असतील. पॉईंटस् तर रोज निघतात ना. असे देखील खूप सेंटर्सवर येतात.
परंतु अजिबात धारणा नाही, ज्ञान नाही. श्रीमतावर चालला नाहीत तर पद थोडेच मिळेल.
सत्य बाबा, सत्य टीचरची निंदा केल्याने कधी ठौर (उच्च पद) मिळू शकणार नाही. परंतु
सगळेच काही राजा बनणार नाहीत. प्रजा देखील बनते. नंबरवार पदे असतात ना. सर्व काही
आठवणीवर अवलंबून आहे, ज्या बाबांकडून विश्वाचे राज्य मिळते, त्यांची आठवण करू शकत
नाही. नशिबातच नसेल तर मग पुरुषार्थ तरी काय करतील. बाबा तर म्हणतात - आठवणीच्या
यात्रेनेच पापे भस्म होतील, तर पुरुषार्थ केला पाहिजे ना. बाबा काही असेही म्हणत
नाहीत की खाऊ-पिऊ नका. हा काही हठयोग नाहीये. चालता-फिरता सर्व काम करत असताना, जसे
आशिक माशूकची आठवण करतात, तसे आठवणीमध्ये रहा. त्यांचे नाव-रूपाचे प्रेम असते. हे
लक्ष्मी-नारायण विश्वाचे मालक कसे बनले? कोणालाही माहित नाही. तुम्ही तर म्हणता
कालची गोष्ट आहे. हे राज्य करत होते, मनुष्य तर लाखो वर्षे म्हणतात. मायेने
मनुष्याना अगदीच पत्थर-बुद्धी बनवले आहे. आता तुम्ही पत्थर-बुद्धी पासून पारस-बुद्धी
बनता. पारसनाथाचे मंदिर देखील आहे. परंतु ते कोण आहेत, हे कोणीही जाणत नाही. मनुष्य
एकदम घोर अंधारामध्ये आहेत. आता बाबा किती चांगल्या-चांगल्या गोष्टी समजावून सांगत
आहेत. तर मग प्रत्येकाच्या बुद्धीवर आहे. शिकवणारा तर एकच आहे, शिकणारे पुष्कळ होत
जातील. गल्ली-गल्ली मध्ये तुमचे स्कुल बनेल. गेट वे टू हेवन. असा एकही मनुष्य नाही
जो समजतो की आपण नरकामध्ये आहोत. बाबा म्हणतात सगळे पुजारी आहेत. पूज्य असतातच
सतयुगामध्ये. पुजारी असतात कलियुगामध्ये. मनुष्य मग समजतात भगवानच पूज्य, भगवानच
पुजारी बनतात. तुम्हीच भगवान आहात, तुम्हीच हा सर्व खेळ करता. तुम्हीही भगवान, आम्ही
देखील भगवान. काहीच समजत नाहीत, हे आहेच रावण राज्य. तुम्ही काय होता, आता काय बनता.
मुलांना खूप नशा असला पाहिजे. बाबा फक्त एवढेच म्हणतात - माझी आठवण करा तर तुम्ही
पुण्य-आत्मा बनाल.
बाबा मुलांना
पुण्य-आत्मा बनण्याची युक्ती सांगतात - ‘मुलांनो, या जुन्या दुनियेचा आता शेवट आहे.
आता मी डायरेक्ट आलो आहे, हे आहे शेवटचे दान, एकदम सरेंडर व्हा’. ‘बाबा, हे सर्व
तुमचे आहे. बाबा तर देण्यासाठीच करतात. यांचे थोडेतरी भविष्य बनावे. मनुष्य ईश्वर
अर्थ दान-पुण्य करतात, ते आहे इनडायरेक्ट. त्याचे फळ दुसऱ्या जन्मामध्ये मिळते. असे
देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. आता तर मी आहे डायरेक्ट. आता तुम्ही जे कराल त्याचे
रिटर्न पद्मगुणा मिळेल. सतयुगामध्ये तर दान-पुण्य इत्यादीची गोष्ट नसते. इथे कोणाकडे
पैसे आहेत तर बाबा म्हणतील - ‘अच्छा, तुम्ही जाऊन सेंटर उघडा. प्रदर्शनी बनवून द्या’.
गरीब असेल तर म्हणतील - ‘अच्छा, आपल्या घरावर फक्त बोर्ड लावा - ‘गेट वे टू हेवन’’.
स्वर्ग आणि नरक आहे ना. आता आपण नरकवासी आहोत, हे देखील कोणी समजत नाहीत. जर
स्वर्गामध्ये गेला तर मग त्याला नरकामध्ये का बोलावता. स्वर्गामध्ये थोडेच कोणी
म्हणेल स्वर्गात गेला. तो तर आहेच स्वर्गामध्ये. पुनर्जन्म स्वर्गामध्येच मिळतो. इथे
पुनर्जन्म नरकामध्येच मिळतो. या गोष्टी देखील तुम्ही समजावून सांगू शकता. भगवानुवाच
- मामेकम् (मज एकाची) आठवण करा कारण तेच पतित-पावन आहेत, माझी आठवण करा तर तुम्ही
पुजारी पासून पूज्य बनाल. भले स्वर्गामध्ये सुखी तर सगळे असतील परंतु नंबरवार पदे
असतात. खूप मोठे ध्येय आहे. कुमारींना तर खूप सेवा करण्याचा उत्साह आला पाहिजे.
आम्ही भारताला स्वर्ग बनवून दाखवू. कुमारी ती जी २१ कुळांचा उद्धार करेल अर्थात २१
जन्मांचा उद्धार करू शकते. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) या जुन्या
दुनियेचा शेवट आहे, बाबा डायरेक्ट आले आहेत तर एकदम सरेंडर व्हायचे आहे, बाबा हे
सर्व काही तुमचे आहे… या युक्तीने पुण्यात्मा बनाल.
२) मुरली कधीही
चुकवायची नाही, मुरलीच्या बाबतीत निष्काळजी रहायचे नाही. असे नाही, मी नाही वाचली
तर काय झाले. मी तर पार झालो आहे. नाही. हा देह-अभिमान आहे. मुरली जरूर वाचायची आहे.
वरदान:-
स्वतःला मोल्ड
करून रियल गोल्ड बनून प्रत्येक कार्यामध्ये यशस्वी होणारे स्व परिवर्तक भव जे
प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःला परिवर्तन करून स्व परिवर्तक बनतात ते सदैव सफल
होतात (यशस्वी होतात). त्यामुळे स्वतःला बदलवण्याचे लक्ष्य ठेवा. दुसरा बदलेल तर मी
बदलेन - नाही. दुसरा बदलेल किंवा नाही बदलेल मला बदलायचे आहे. ‘हे अर्जुन’ मला
बनायचे आहे. सदैव परिवर्तन करण्यामध्ये ‘पहिला मी’. जो यामध्ये ‘पहिला मी’ करतो तोच
पहिला नंबर बनतो, कारण स्वतःला मोल्ड करणाराच रियल गोल्ड आहे. रियल गोल्डचीच
व्हॅल्यू आहे.
बोधवाक्य:-
आपल्या
श्रेष्ठ जीवनाच्या प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे बाबांना प्रत्यक्ष करा.
अव्यक्त इशारे -
रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:- बाप समान बनायचे असेल किंवा
बाबांच्या समीप जायचे असेल तर अपवित्रता अर्थात काम महाशत्रूने स्वप्नामध्ये देखील
वार करू नये. सदैव भावा-भावाची स्मृती सहज आणि स्वतः स्वरूपामध्ये असावी.
आत्म्याच्या सत्य गुण-स्वरूप आणि शक्ती-स्वरूप स्थितीमधून खाली येऊ नका.