28-05-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - आता ड्रामाचे चक्र पूर्ण होते, तुम्हाला क्षीरखंड बनून नव्या दुनियेमध्ये
यायचे आहे, तिथे सर्व क्षीरखंड आहेत. इथे सर्व खाऱ्या पाण्यासारखे आहेत”
प्रश्न:-
तुम्ही
त्रिनेत्री मुले कोणत्या ज्ञानाला जाणून त्रिकालदर्शी बनले आहात?
उत्तर:-
तुम्हाला आता साऱ्या जगाच्या इतिहास-भूगोलाचे ज्ञान मिळाले आहे, सतयुगापासून कलियुग
अंतापर्यंतचा इतिहास-भूगोल तुम्ही जाणता. तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला की,
आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते. संस्कार आत्म्यामध्ये आहेत. आता बाबा म्हणतात -
मुलांनो, नावा-रूपाहून न्यारे व्हा. स्वतःला आत्मा अशरीरी समजा.
गीत:-
धीरज धर मनुवा…
ओम शांती।
कल्प-कल्प मुलांना सांगितले जाते आणि मुले जाणतात, मनात येते की लवकर सतयुग यावे तर
या दुःखापासून सुटका होईल. परंतु ड्रामा खूप हळू-हळू चालणारा आहे. बाबा धीर देतात -
आता थोडे दिवस बाकी आहेत. मोठमोठ्या व्यक्तींकडूनही आवाज ऐकत रहाल की, दुनिया बदलली
पाहिजे. जे कोणी मोठमोठ्या हस्ती आहेत, पोप आहे ते देखील म्हणतात - दुनिया बदलणार
आहे. अच्छा, मग शांती कशी होईल? यावेळी सर्व खारे-पाणी (खारट पाण्यासारखे) आहेत. आता
आपण क्षीरखंड होत आहोत. त्या बाजूला (जुन्या दुनियेमध्ये) दिवसेंदिवस खारे-पाणी होत
जातात. आपसात भांडण-तंटे करून संपणार आहेत, तयारी होत आहे. हे ड्रामाचे चक्र आता
पूर्ण होते. जुनी दुनिया पूर्ण होत आहे. नवीन दुनियेची स्थापना होत आहे. नवी दुनिया
सो जुनी, जुनी सो नवी दुनिया परत बनेल. याला दुनियेचे चक्र म्हटले जाते जे फिरतच
राहते. असे नाही, लाखो वर्षांनंतर जुनी दुनिया नवीन होईल. नाही. तुम्हा मुलांना आता
व्यवस्थित समजले आहे की, भक्ती पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. भक्तीचे कनेक्शन रावणा
सोबत आहे. ज्ञानाचे कनेक्शन रामा सोबत आहे. हे तुम्ही आता समजत आहात. आता बाबांना
बोलावतात देखील - ‘हे पतीत-पावन या, येऊन नवी दुनिया स्थापन करा’. नवीन दुनियेमध्ये
जरूर सुख असते. आता मुले लहान अथवा मोठी सर्वांना माहित झाले आहे की आता घरी जायचे
आहे. हे नाटक संपले आहे. आम्ही पुन्हा सतयुगामध्ये जाणार आणि मग ८४ जन्मांचे चक्र
फिरायचे आहे. स्व आत्म्याला दर्शन होते सृष्टी चक्राचे अर्थात आत्म्याला ज्ञानाचा
तिसरा नेत्र मिळाला आहे, त्याला म्हटले जाते - त्रिनेत्री. आता तुम्ही त्रिनेत्री
आहात, बाकी सर्व मनुष्यांना हे स्थूल नेत्र आहेत. ज्ञानाचा नेत्र कोणालाच नाही.
त्रिनेत्री बनतील तेव्हाच तर त्रिकालदर्शी बनतील कारण आत्म्याला ज्ञान मिळते ना.
आत्माच एक शरीर सोडून दुसरे घेते. संस्कार आत्म्यामध्ये असतात. आत्मा अविनाशी आहे.
आता बाबा म्हणतात - नावा-रूपापासून न्यारे व्हा. स्वतःला अशरीरी समजा. देह समजू नका.
हे देखील जाणता आपण अर्ध्या कल्पापासून परमात्म्याची आठवण करत आलो आहोत. यामध्ये
जेव्हा जास्ती दुःख होते तेव्हा जास्ती आठवण करतात, आता किती दुःख आहे. पूर्वी इतके
दुःख नव्हते. जेव्हापासून बाहेरचे आले आहेत तेव्हापासून हे राजे लोक देखील आपसात
भांडले आहेत. वेगवेगळे झाले आहेत. सतयुगामध्ये तर एकच राज्य होते.
आता आपण सतयुगापासून
कलियुग अंतापर्यंत इतिहास-भूगोल समजून घेत आहोत. सतयुग-त्रेतामध्ये एकच राज्य होते.
अशी एकच डिनायस्टी (एकच घराणे) कोणाचीही असत नाही. ख्रिश्चनांमध्ये देखील पहा फूट
आहे, तिथे तर सारे विश्व एकाच्या हाती असते. ते फक्त सतयुग-त्रेतामध्येच असते. हा
बेहदचा इतिहास-भूगोल आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे. दुसऱ्या कोणत्या सत्संगामध्ये
‘इतिहास-भूगोल’ शब्द ऐकू येणार नाही. तिथे तर रामायण, महाभारत इत्यादीच ऐकतात. इथे
त्या गोष्टी नाहीत. इथे आहे जगाचा इतिहास-भूगोल. तुमच्या बुद्धीमध्ये आहे उच्च ते
उच्च आमचे पिता आहेत. बाबांचे आभार आहेत ज्यांनी सर्व ज्ञान ऐकवले आहे. एक
आत्म्यांचे झाड आहे, दुसरे आहे मनुष्यांचे झाड. मनुष्यांच्या झाडामध्ये वरती कोण आहे?
ग्रेट-ग्रेट ग्रँडफादर ब्रह्मालाच म्हणणार. ब्रह्मा मुख्य आहे हे जाणतात परंतु
ब्रह्माच्या मागे काय इतिहास-भूगोल आहे, हे मात्र कोणीही जाणत नाही. आता तुमच्या
बुद्धीमध्ये आहे - उच्च ते उच्च बाबा राहतात देखील परमधाममध्ये. मग सूक्ष्मवतन विषयी
देखील तुम्हाला माहित आहे. मनुष्यच फरिश्ता बनतात, म्हणून सूक्ष्मवतन दाखवले आहे.
तुम्ही आत्मे जाता, सूक्ष्मवतनमध्ये शरीर तर जाणार नाही. जातात कसे, त्याला म्हटले
जाते - तिसरा नेत्र, दिव्य-दृष्टी अथवा ध्यान असे देखील म्हणतात. तुम्ही ध्यानामध्ये
ब्रह्मा-विष्णू-शंकराला बघता. लोक दाखवतात - शंकराचे डोळे उघडल्याने विनाश होतो. आता
यांच्याद्वारे तर कोणी समजू शकत नाही. आता तुम्ही जाणता विनाश तर ड्रामा अनुसार
होणारच आहे. आपसात युद्ध करून नष्ट होतील. बाकी शंकर काय करतात! हे ड्रामा अनुसार
नाव ठेवले आहे. तर समजावून सांगावे लागते. ब्रह्मा-विष्णू-शंकर तिघे आहेत.
स्थापनेसाठी ब्रह्माला ठेवले आहे, पालनेसाठी विष्णूला, विनाशासाठी शंकराला ठेवले आहे.
वास्तविक हा पूर्वनियोजित ड्रामा आहे. शंकराचा काहीही पार्ट नाहीये. ब्रह्मा आणि
विष्णूचा पार्ट तर पूर्ण कल्पामध्ये आहे. ब्रह्मा सो विष्णू, विष्णु सो ब्रह्मा.
ब्रह्माचे देखील ८४ जन्म पूर्ण झाले तर विष्णूचे देखील पूर्ण झाले. शंकर तर
जन्म-मरणापासून न्यारा आहे म्हणून मग शिव आणि शंकराला एकत्र केले आहे. वास्तविक
शिवाचा तर खूप पार्ट आहे, शिकवतात.
ईश्वराला म्हटले जाते
नॉलेजफुल. जर तो प्रेरणेने कार्य करत असता तर सृष्टी चक्राचे ज्ञान कसे दिले असते!
म्हणून बाबा समजावून सांगतात - मुलांनो, प्रेरणेची तर कोणती गोष्टच नाही. बाबांना
तर यावे लागते. बाबा म्हणतात - मुलांनो, माझ्यामध्ये सृष्टी चक्राचे ज्ञान आहे. मला
हा पार्ट मिळालेला आहे म्हणून मलाच ज्ञानसागर नॉलेजफुल म्हणतात. नॉलेज कशाला म्हटले
जाते, ते तर जेव्हा मिळेल तेव्हा माहित होईल. मिळालेच नाही आहे तर अर्थ कसा माहीत
होईल. अगोदर तुम्ही देखील म्हणत होता ईश्वर प्रेरणा देतात. ते सर्व काही जाणतात.
आपण जे पाप करतो ते ईश्वर बघत असतो. बाबा म्हणतात - ‘हा धंदा मी करत नाही’. हे तर
जसे कर्म करतात त्याची स्वतःच सजा भोगतात, मी कोणालाही सजा देत नाही. ना कोणत्या
प्रेरणे द्वारे सजा करणार. मी प्रेरणेने केले तर जशी मी सजा केली. कोणाला सांगणे
की, याला मारा, हा देखील दोष आहे. सांगणारा देखील अडकणार. शंकराने प्रेरणा दिली तर
तो देखील अडकेल. बाबा म्हणतात मी तर तुम्हा मुलांना सुख देणारा आहे. तुम्ही माझी
महिमा करता - ‘बाबा, येऊन दुःख हरण करा’. मी थोडेच दुःख देतो.
आता तुम्ही मुले
बाबांच्या सन्मुख बसले आहात तर किती आनंद झाला पाहिजे! इथे डायरेक्ट भासना येते.
बाबा आम्हाला शिकवत आहेत. याला मेळा म्हटले जाते. सेंटरवर तुम्ही जाता तिथे काही
आत्म्यांचा आणि परमात्म्याचा मेळा म्हणणार नाही. आत्म्यांचा आणि परमात्म्याचा मेळा
इथे भरतो. हे देखील तुम्ही जाणता, आता मेळा चालू आहे. बाबा मुलांजवळ आले आहेत. सर्व
आत्मे इथे आहेत. आत्माच आठवण करते की, बाबांनी यावे. हा सर्वात सुंदर मेळा आहे. बाबा
येऊन सर्व आत्म्यांना रावण राज्यातून सोडवतात. हा मेळा सुंदर झाला ना, ज्याद्वारे
मनुष्य पारस-बुद्धी बनतात. त्या मेळ्यांमध्ये तर मनुष्य घाणेरडे होतात. पैसे बरबाद
करत राहतात, मिळत काहीच नाही. त्याला मायावी, आसुरी मेळा म्हटले जाईल. हा आहे
ईश्वरीय मेळा. रात्रं-दिवसाचा फरक आहे. तुम्ही देखील आसुरी मेळ्यामध्ये होता. आता
आहात ईश्वरीय मेळ्यामध्ये. तुम्हीच जाणता बाबा आलेले आहेत. सर्वांना कळले तर माहित
नाही किती गर्दी होईल. इतकी घरे इत्यादी राहण्यासाठी कुठून आणणार! मागाहून गातात ना
- ‘अहो प्रभू, तुझी लीला’. कोणती लीला? सृष्टीला बदलण्याची लीला. ही आहे सर्वात मोठी
लीला. जुनी दुनिया नष्ट होण्यापूर्वी नवीन दुनियेची स्थापना होते म्हणून नेहमी
कोणालाही समजावून सांगाल तेव्हा अगोदर स्थापना, विनाश आणि मग पालना असे सांगायचे आहे.
जेव्हा स्थापना पूर्ण होते तेव्हा परत विनाश सुरू होतो, मग पालना सुरु होईल. तर
तुम्हा मुलांना हा आनंद होतो - आपण स्वदर्शन चक्रधारी ब्राह्मण आहोत. नंतर मग आम्ही
चक्रवर्ती राजा बनतो. हे कोणालाही माहीत नाही, या देवतांचे राज्य कुठे गेले.
नामोनिशाण नाहीसे झाले. देवतांच्या ऐवजी स्वतःला हिंदू म्हणतात. हिंदुस्तान मध्ये
राहणारे हिंदू आहेत. लक्ष्मी-नारायणाला तर असे कधी म्हणणार नाही. त्यांना तर देवता
म्हटले जाते. तर आता या मेळ्यामध्ये ड्रामा अनुसार तुम्ही आला आहात. हे ड्रामामध्ये
नोंदलेले आहे. हळूहळू वृद्धी होत राहील. तुमचा जो काही पार्ट चालू आहे पुन्हा
कल्पानंतर चालेल. हे चक्र फिरत राहते. मग रावण राज्यामध्ये आसुरी पालन होईल. तुम्ही
आता ईश्वरीय संतान आहात मग दैवी संतान नंतर मग क्षत्रिय बनाल. तुम्ही जे अपवित्र
प्रवृत्तीवाले बनला होता ते मग पवित्र प्रवृत्तीवाले बनता. आहेत तर हे देवता देखील
दैवी गुणवाले मनुष्यच ना. बाकी इतक्या भुजा इत्यादी दिल्या आहेत, विष्णू कोण आहे,
हे कोणीही सांगू शकणार नाही. महालक्ष्मीची देखील पूजा करतात. जगत-अंबेकडे कधी धन
मागत नाहीत. धन जास्त मिळाले तर म्हणतील लक्ष्मीची पूजा केली म्हणून तिने भंडारा
भरून टाकला. इथे तर तुम्ही जगत-अंबेकडून प्राप्त करत आहात परमपिता परमात्मा शिव
द्वारा, देणारा तो आहे. तुम्ही मुले बापदादांपेक्षाही भाग्यवान आहात. बघा, जगदंबेचे
किती मेळे भरतात, ब्रह्माचे इतके नाहीत. ब्रह्माला तर एकाच जागी बसवले आहे,
अजमेरमध्ये मोठे मंदिर आहे. देवींची मंदिरे अनेक आहेत कारण यावेळी तुमची खूप महिमा
आहे. तुम्ही भारताची सेवा करता. पूजा देखील तुमची जास्त होते. तुम्ही भाग्यवान आहात.
जगत-अंबेसाठी असे कधी म्हणणार नाही की ती सर्वव्यापी आहे. तुमची महिमा होत राहते.
ब्रह्मा, विष्णू, शंकराला देखील सर्वव्यापी म्हणत नाहीत, मला म्हणतात - कणाकणामध्ये
आहे, किती निंदा करतात.
मी तुमची महिमा किती
वाढवतो. भारत माता की जय म्हणतात ना. भारत माता तर तुम्ही आहात ना. धरती नाही. धरती
इत्यादी जी आता तमोप्रधान आहे, सतयुगामध्ये सतोप्रधान होते म्हणून म्हणतात देवतांचे
पाय पतित दुनियेमध्ये येत नाहीत. जेव्हा सतोप्रधान धरणी होते तेव्हा येतात. आता
तुम्हाला सतोप्रधान बनायचे आहे. श्रीमतावर चालत बाबांची आठवण करत रहाल तर उच्च पद
मिळवाल. ही काळजी घ्यायची आहे. आठवण कराल तर विकर्म विनाश होतील. श्रीमत मिळत राहते.
सतयुगामध्ये तर तुमची आत्मा पवित्र कांचन बनते तर शरीर देखील कांचन (सोन्यासारखे)
मिळते. सोन्यामध्ये भेसळ पडते तर मग दागिना देखील तसाच बनतो. आत्मा खोटी तर शरीरही
खोटे. भेसळ पडल्याने सोन्याचे मूल्य देखील कमी होते. तुमचे आता काहीही मूल्य नाहीये.
आधी तुम्ही विश्वाचे मालक २४ कॅरेट होता. आता ९ कॅरेट म्हणणार. हे बाबा मुलांशी
रूहरिहान करतात. मुलांसोबत बसून करमणूक करतात, जे तुम्ही ऐकता-ऐकता बदलून जाता.
मनुष्यापासून देवता बनता. तिथे हिऱ्या-माणकांचे महाल असतील, स्वर्ग तर मग काय! तिथले
शुबीरस इत्यादी देखील तुम्ही पिऊन येता. तिथली फळेच इतकी मोठी-मोठी असतात. इथे काही
अशी मिळू शकणार नाहीत. सूक्ष्मवतनमध्ये तर काहीच नाहीये. आता तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये
तिथे जाता. हा आहे आत्मा आणि परमात्म्याचा मेळा, याद्वारे तुम्ही तेजस्वी बनता.
तुम्ही मुले जेव्हा
इथे येता तर फ्री असता, घरदार, कामधंदा इत्यादीची काहीच चिंता नाही. तर इथे तुम्हाला
आठवणीच्या यात्रेमध्ये राहण्याचा चान्स चांगला आहे. तिथे तर घर-परिवार इत्यादी आठवत
राहील. इथे तर असे काहीच नाही. रात्री दोन वाजता उठून इथे बसा. सेंटरवर काही तुम्ही
रात्रीचे जाऊ शकत नाही. इथे तर सोपे आहे. येऊन शिवबाबांच्या आठवणीमध्ये बसा, दुसऱ्या
कोणाचीही आठवण येऊ नये. इथे तुम्हाला मदतही मिळेल. रात्री लवकर झोपा आणि पहाटे उठा.
येऊन ३ ते ५ वाजेपर्यंत बसा. बाबा देखील येतील, मुले खुश होतील. बाबा आहेत योग
शिकवणारे. हे (ब्रह्मा बाबा) देखील शिकणारे आहेत तर दोघेही बाबा आणि दादा येतील मग
इथे आणि तिथे (मधुबनमध्ये आणि सेंटरवर) योगामध्ये बसण्यातील फरक सुद्धा समजेल. इथे
काहीही आठवणार नाही, यामध्ये फायदा खूप आहे. बाबा सल्ला देतात - हे खूप चांगले होऊ
शकते. आता बघूया मुले उठू शकतात का? बऱ्याच जणांना पहाटे उठण्याचा अभ्यास आहे. तुमचा
संन्यास आहे ५ विकारांचा आणि वैराग्य आहे साऱ्या जुन्या दुनियेचे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आता सृष्टी
परिवर्तनाची लीला चालू आहे म्हणून स्वतःला बदलायचे आहे. क्षीरखंड होऊन राहायचे आहे.
२) पहाटे उठून एका
बाबांच्या आठवणीमध्ये बसायचे आहे, त्यावेळी दुसऱ्या कोणाचीही आठवण येऊ नये. जुन्या
दुनियेपासून बेहदचे वैरागी बनून ५ विकारांचा संन्यास करायचा आहे.
वरदान:-
बेहदच्या
स्थितीमध्ये स्थित राहून, सेवेच्या आकर्षणापासून न्यारे आणि प्यारे विश्व सेवाधारी
भव
विश्व सेवाधारी
अर्थात बेहदच्या स्थितीमध्ये स्थित राहणारे. असे सेवाधारी सेवा करताना सुद्धा न्यारे
आणि कायम बाबांचे प्रिय असतात. सेवेशी आकर्षणामध्ये येत नाहीत कारण सेवेचे आकर्षण
देखील सोन्याची बेडी आहे. हे बंधन बेहदमधून हदमध्ये आणते. म्हणून देहाच्या स्मृती
पासून, ईश्वरीय नात्यापासून, सेवेच्या साधनांच्या आकर्षणापासून न्यारे आणि बाबांचे
प्रिय बना तर ‘विश्व सेवाधारी’चे वरदान प्राप्त होईल आणि कायम सफलता मिळत राहील.
बोधवाक्य:-
व्यर्थ
संकल्पांना एका सेकंदामध्ये स्टॉप करण्याची प्रॅक्टिस करा तेव्हाच शक्तिशाली बनाल.
अव्यक्त इशारे -
रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:-
तुम्हा सर्वांची पहिली
प्रवृत्ती आहे आपल्या देहाची प्रवृत्ती. मग आहे देहाच्या संबंधाची प्रवृत्ती. तर
पहिली प्रवृत्ती - देहाच्या प्रत्येक कर्मेंद्रियाला पवित्र बनवायचे आहे. जोपर्यंत
देहाच्या प्रवृत्तीला पवित्र बनवलेले नाही तोपर्यंत देहाच्या संबंधांची प्रवृत्ती,
भले मग हदची असो नाहीतर बेहदची असो तिला देखील पवित्र बनवू शकणार नाही. तर अगोदर
आपणच आपल्याला विचारा की आपल्या शरीर रुपी घराला अर्थात संकल्पांना, बुद्धीला,
नेत्रांना आणि वाणीला रूहानी अर्थात पवित्र बनविले आहे? असे पवित्र आत्मेच महान
आहेत.