29-05-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही पुन्हा आपल्या स्थानावर पोहोचला आहात, तुम्ही बाबांद्वारे रचता आणि रचनेला जाणले आहे तर आनंदाने रोमांच उभे राहिले पाहिजेत”

प्रश्न:-
यावेळी बाबा तुम्हा मुलांचा शृंगार का करत आहेत?

उत्तर:-
कारण आता आपल्याला नटून-थटून विष्णुपुरीमध्ये (सासरी) जायचे आहे. आम्ही या ज्ञानाने सजून विश्वाचे महाराजा-महाराणी बनतो. आता संगमयुगावर आहोत, बाबा टीचर बनून आपल्याला माहेराहून सासरी घेऊन जाण्यासाठी शिकवत आहेत.

गीत:-
आखिर वह दिन आया आज…

ओम शांती।
गोड-गोड स्वीट मुलांनी, गोड-गोड सिकीलध्या मुलांनी गाणे ऐकले. तुम्ही मुलेच जाणता की अर्धे कल्प ज्या माशुकची आठवण केली आहे, शेवटी ते भेटले आहेत. दुनिया हे जाणत नाही की, आपण कधी अर्धे कल्प भक्ती करतो, माशुक पित्याला बोलावतो. आपण आशिक आहोत, ते माशुक आहेत - हे देखील कोणी जाणत नाही. बाबा म्हणतात - रावणाने तुम्हाला अगदी तुच्छ बुद्धि बनवले आहे. खास भारतवासीयांना. तुम्ही देवी देवता होता हे देखील विसरला आहात, तर तुच्छ-बुद्धी झालात. आपल्या धर्माला विसरून जाणे, हे आहे तुच्छ-बुद्धिचे काम. आता हे फक्त तुम्हीच जाणता. आपण भारतवासी स्वर्गवासी होतो. हा भारत स्वर्ग होता. थोडाच काळ लोटला आहे. १२५० वर्षे तर सतयुग होते आणि १२५० वर्षे रामराज्य चालले. त्यावेळी अथाह सुख होते. सुखाची आठवण करून रोमांच उभे राहिले पाहिजेत. सतयुग, त्रेता… होऊन गेले. सतयुगाचे आयुर्मान किती होते, हे देखील कोणी जाणत नाही. लाखो वर्षे कशी असू शकतील. आता बाबा येऊन समजावून सांगतात - तुम्हाला मायेने किती तुच्छ-बुद्धि बनवले आहे. दुनियेमध्ये कोणीही स्वतःला तुच्छ-बुद्धि समजत नाहीत. तुम्ही जाणता काल आपण तुच्छ-बुद्धि होतो. आता बाबांनी इतकी बुद्धी दिली आहे ज्यामुळे आपण रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणले आहे. काल माहित नव्हते, आज माहित झाले आहे. जितके-जितके जाणत जाता, तितके आनंदाने रोमांच उभे राहतील. आम्ही पुन्हा एकदा आपल्या स्थानावर पोहोचत आहोत. खरोखर बाबांनी आम्हाला स्वर्गाची राजाई दिली होती आणि मग आम्ही गमावली. आता पतित बनलो आहोत. सतयुगाला पतित म्हणणार नाही. ती आहेच पावन दुनिया. मनुष्य म्हणतात - ‘हे पतित-पावन या’. रावण राज्यामध्ये पावन, श्रेष्ठ कोणी असूच शकत नाही. सर्वश्रेष्ठ बाबांची संतान बनलो तर श्रेष्ठ देखील बनलो. तुम्ही मुलांनी बाबांना जाणले आहे, ते देखील नंबरवार पुरुषार्थानुसार. पहाटे उठून स्वतःच्या मनाला विचारा, अमृतवेलेचा वेळ चांगला आहे. पहाटे अमृतवेलेला बसून हा विचार करा. बाबा आमचे पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत. ओ गॉड फादर, हे परमपिता परमात्मा असे म्हणतातही. आता तुम्ही मुले जाणता - ‘हे भगवान’, असे म्हणून ज्याची आठवण करतात, आता ते आम्हाला भेटले आहेत. आम्ही परत बेहदचा वारसा घेत आहोत. ते आहेत लौकिक पिता, हे आहेत बेहदचे पिता. तुमचे लौकिक पिता देखील त्या बेहदच्या पित्याची आठवण करतात. तर पित्यांचाही पिता, पतींचाही पती, तो झाला. हे देखील भारतवासीच म्हणतात कारण आता मी पित्यांचा पिता, पतींचा पती बनतो. आता मी तुमचा पिता देखील आहे. तुम्ही संतान बनला आहात. ‘बाबा-बाबा’ म्हणत राहता. आता पुन्हा तुम्हाला विष्णुपुरी सासरी घेऊन जातो. हे आहे तुमच्या पित्याचे घर, मग सासरी जाल. मुले जाणतात - आपल्याला खूप सुंदर शृंगारले जाते. आता तुम्ही माहेरी आहात ना. तुम्हाला शिकवले देखील जाते. तुम्ही या ज्ञानाने सजून विश्वाचे महाराजा-महाराणी बनता. तुम्ही इथे आलाच आहात विश्वाचा मालक बनण्याकरिता. तुम्ही भारतवासीच विश्वाचे मालक होता जेव्हा सतयुग होते. आता तुम्ही असे म्हणणार नाही की आम्ही विश्वाचे मालक आहोत. आता तुम्ही जाणता भारताचे मालक कलियुगी आहेत, आपण तर संगमयुगी आहोत. मग आम्ही सतयुगामध्ये साऱ्या विश्वाचे मालक बनणार. या गोष्टी तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आल्या पाहिजेत. जाणता विश्वाची बादशाही देणारे बाबा आले आहेत. आता संगमयुगावर ते आले आहेत. ज्ञानदाता एक बाबाच आहेत. बाबांव्यतिरिक्त कोणत्याही मनुष्याला ज्ञानदाता म्हणणार नाही कारण बाबांजवळ असे ज्ञान आहे ज्याद्वारे साऱ्या विश्वाची सद्गती होते. तत्वांसहित सर्वांची सद्गती होते. मानवाकडे सद्गतीचे ज्ञान नाही आहे.

यावेळी संपूर्ण दुनिया तत्वां सहित तमोप्रधान आहे. यामध्ये राहणारे देखील तमोप्रधान आहेत. नवीन दुनिया आहेच सतयुग. त्यामध्ये राहणारे देखील देवता होते मग रावणाने जिंकले. आता पुन्हा बाबा आले आहेत. तुम्ही मुले म्हणता - आम्ही बापदादांकडे जातो. बाबा आम्हाला दादांद्वारे (ब्रह्मा बाबांद्वारे) स्वर्गाच्या बादशाहीचा वारसा देतात. बाबा तर स्वर्गाची बादशाही देतील अजून काय देतील. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये एवढे तरी आले पाहिजे ना. परंतु माया विसरायला लावते. स्थायी आनंद टिकू देत नाही. जे चांगल्या रीतीने शिकतील आणि शिकवतील तेच उच्च पद प्राप्त करतील. गायले देखील जाते सेकंदामध्ये जीवन-मुक्ती. एकदाच ओळखले पाहिजे ना. सर्व आत्म्यांचे पिता एकच आहेत, ते सर्व आत्म्यांचे पिता आलेले आहेत. परंतु सगळेच काही भेटू देखील शकणार नाहीत. अशक्य आहे. बाबा तर शिकविण्याकरिता येतात. तुम्ही देखील सर्व टीचर्स आहात. म्हटले जाते ना गीता पाठशाळा. हा शब्द देखील कॉमन आहे. म्हणतात कृष्णाने गीता ऐकवली. आता ही काही कृष्णाची पाठशाळा तर नाहीये. कृष्णाची आत्मा तर शिकत आहे. सतयुगामध्ये कोणी गीतापाठ शाळांमध्ये शिकतात आणि शिकवतात का? कृष्ण तर झालाच आहे सतयुगामध्ये आणि मग ८४ जन्म घेतो. एकही शरीर दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाही. ड्रामा प्लॅन अनुसार प्रत्येक आत्म्यामध्ये आपला ८४ जन्मांचा पार्ट भरलेला आहे. एक सेकंद दुसऱ्या सेंकदाशी मेळ खाऊ शकत नाही. ५ हजार वर्षे तुम्ही पार्ट बजावता. एका सेकंदाचा पार्ट दुसऱ्या सेकंदाशी मेळ खाऊ शकत नाही. किती समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. ड्रामा आहे ना. पार्ट रिपीट होत जातो. बाकी ती सर्व शास्त्रे आहेत भक्तिमार्गाची. अर्धाकल्प भक्ती चालते मग सर्वांना सद्गती मीच येऊन देतो. तुम्ही जाणता ५ हजार वर्षांपूर्वी राज्य करत होतो. सद्गती मध्ये होतो. दुःखाचे नाव सुद्धा नव्हते. आता तर दुःखच दुःख आहे. याला दुःख धाम म्हटले जाते. शांतीधाम, सुखधाम आणि दुःखधाम. भारतवासीयांनाच येऊन सुखधामचा रस्ता सांगतो. तर कल्प-कल्प मला यावे लागते. अनेकदा आलो आहे, येत राहीन. याचा शेवट होऊ शकत नाही. तुम्ही चक्र फिरून दुःखधाममध्ये येता तेव्हा मला यावे लागते. आता तुम्हाला स्मृती आली आहे ८४ जन्मांच्या चक्राची. आता बाबांना रचता म्हटले जाते. असे नाही की ड्रामाचा कोणी रचता आहेत. रचता अर्थात यावेळी सतयुगाला येऊन रचतात. सतयुगामध्ये ज्यांचे राज्य होते आणि मग गमावले, त्यांनाच बसून शिकवतो. मुलांना ॲडॉप्ट करतो. तुम्ही माझी मुले आहात ना. तुम्हाला कोणी साधु-संत इत्यादी शिकवत नाहीत. शिकविणारे एक बाबा आहेत, ज्यांची सर्वजण आठवण करतात. ज्यांची आठवण करतात ते जरूर कधीतरी येतीलही ना. हे देखील कोणाला समजत नाही की आठवण का करतात! तर जरूर पतित-पावन बाबा येतात. क्राईस्टला असे म्हणणार नाही की, परत या. ते (दुनियावाले) तर समजतात लीन झाले. मग येण्याचा तर प्रश्नच नाही. आठवण तरीही पतित-पावनचीच करतात. आम्हा आत्म्यांना पुन्हा वारसा द्या. आता तुम्हा मुलांना स्मृती आली - बाबा आलेले आहेत. नव्या दुनियेची स्थापना करतील. ते (इतर धर्मांचे) तरी देखील आपल्या वेळेवर रजो, तमोमध्येच येतील. आता तुम्ही मुले समजता आपण मास्टर नॉलेजफुल बनतो.

एक बाबाच आहेत जे तुम्हा मुलांना शिकवून विश्वाचा मालक बनवतात. स्वतः बनत नाहीत म्हणून त्यांना म्हटले जाते निष्काम सेवाधारी. मनुष्य म्हणतात - आम्ही फळाची अपेक्षा करत नाही, निष्काम सेवा करतो. परंतु असे होत नाही. जसे संस्कार घेऊन जातात, त्याच अनुसार जन्म मिळतो. कर्माचे फळ अवश्य मिळते. संन्यासी देखील पुनर्जन्म गृहस्थींकडे घेऊन मग संस्कारानुसार संन्यास धर्मामध्ये निघून जातात. जसे बाबा सैनिकांचे देखील उदाहरण देतात. म्हणतात - गीतेमध्ये लिहिलेले आहे जो युद्धाच्या मैदानावर मरेल तो स्वर्गामध्ये जाईल, परंतु स्वर्गाचाही काळ देखील हवा ना. स्वर्ग तर लाखो वर्षे असतो असे म्हणतात. आता तुम्ही जाणता बाबा काय समजावून सांगतात आणि गीतेमध्ये काय लिहिले आहे. म्हणतात - भगवानुवाच मी सर्वव्यापी आहे. बाबा म्हणतात - ‘मी स्वतःला अशी शिवी कशी बरे देईन की मी सर्वव्यापी आहे, कुत्रा-मांजर सर्वांमध्ये आहे. मला तर ज्ञान-सागर म्हणता. मग मी स्वतःला असे कसे म्हणेन?’ किती खोटे आहे. ज्ञान तर कोणालाच नाहीये. संन्यासी इत्यादींचा किती मान आहे, कारण पवित्र आहेत. सतयुगामध्ये तर कोणीही गुरु असत नाही. इथे तर पत्नीला म्हणतात - ‘तुझा पती गुरु ईश्वर आहे, दुसरा कोणता गुरु करू नकोस’. ते तर तेव्हा सांगितले जात होते जेव्हा भक्ती देखील सतोप्रधान होती. सतयुगामध्ये तर गुरु नव्हता. भक्तीच्या सुरुवातीला देखील गुरू असत नाहीत. पतीच सर्वकाही आहेत. गुरु करत नाहीत. या सर्व गोष्टींना आता तुम्ही समजता.

बरेच मनुष्य तर ब्रह्माकुमार-कुमारींचे नाव ऐकूनच घाबरून जातात कारण समजतात हे भाऊ-बहिण बनवतात. अरे, प्रजापिता ब्रह्माची संतान बनणे तर चांगले आहे ना. बी.के. च स्वर्गाचा वारसा घेतात. आता तुम्ही घेत आहात. तुम्ही बी.के. बनला आहात. दोघेही (पती-पत्नी) म्हणतात - आम्ही बहीण-भाऊ आहोत. शरीराचे भान, विकाराची दुर्गंधी निघून जाते. आम्ही एका पित्याची मुले भाऊ-बहीण विकारामध्ये कसे जाऊ शकतो. हे तर महान पाप आहे. ही पवित्र राहण्याची युक्ती ड्रामामध्ये आहे. संन्याशांचा आहे निवृत्ती मार्ग. तुम्ही आहात प्रवृत्ती मार्गवाले. आता तुम्हाला या छी-छी दुनियेच्या (पतित दुनियेच्या) चालीरीती सोडून या दुनियेलाच विसरून जायचे आहे. तुम्ही स्वर्गाचे मालक होता मग रावणाने किती छी-छी (पतित) बनवले आहे. हे देखील बाबांनी समजावून सांगितले आहे - कोणी म्हणेल आम्ही कसे मानावे की, आम्ही ८४ जन्म घेतले आहेत. ८४ जन्म घेतले आहेत, हे तर आम्ही चांगलेच सांगतो ना. ८४ जन्म घेतले नसतील तर थांबणारच नाही. समजले जाते हा देवी-देवता धर्माचा नाहीये, स्वर्गामध्ये येऊ शकणार नाही. प्रजेमध्ये देखील कमी दर्जाचे पद घेतील. प्रजेमध्ये देखील चांगले पद, कमी दर्जाचे पद आहे ना. या गोष्टी कोणत्याही शास्त्रांमध्ये नाही आहेत. ईश्वर येऊन किंगडम (राज्य) स्थापन करतात. श्रीकृष्ण तर वैकुंठाचा मालक होता. स्थापना बाबा करतात. बाबांनी गीता ऐकवली ज्याद्वारे हे पद प्राप्त केले मग तर शिकण्याची आणि शिकविण्याची गरजच नाही. तुम्ही शिकून पद मिळवता. नंतर मग थोडेच गीतेचे ज्ञान शिकतील. ज्ञानाने सद्गती मिळाली, जितका पुरुषार्थ तितके उच्च पद प्राप्त करतील. जितका पुरुषार्थ कल्पा पूर्वी केला होता तो करत राहतात. साक्षी होऊन बघायचे आहे. टीचरला देखील बघायचे आहे, यांनी मला शिकवले आहे, मला यांच्यापेक्षाही हुशार व्हायचे आहे. मार्जिन (संधी) खूप आहे. प्रयत्न करायचा आहे उच्च ते उच्च बनण्याचा. मूळ गोष्ट आहे तमोप्रधानापासून सतोप्रधान बनायचे आहे. ही समजण्यासारखी गोष्ट आहे ना. गृहस्थ व्यवहारामध्ये देखील रहायचे आहे, बाबांची आठवण करायची आहे तर पावन बनाल. इथे सर्वजण पतित आहेत, या दुनियेमध्ये दुःखच दुःख आहे. सुखाचे राज्य केव्हा होते, हे कोणालाच माहित नाही आहे. दुःखामध्ये म्हणतात - ‘हे भगवान, हे राम, हे दुःख का दिलेस?’ आता भगवान तर काही कोणाला दुःख देत नाहीत. रावण दुःख देतो. आता तुम्ही जाणता - आपल्या राज्यामध्ये दुसरा कोणताही धर्म नसेल. नंतर मागाहून बाकीचे धर्म येतील. तुम्ही भले कुठेही जा. अभ्यास तुमच्यासोबत आहे, मनमनाभवचे लक्ष्य तर मिळाले आहे, बाबांची आठवण करा. आपण बाबांकडून स्वर्गाचा वारसा घेत आहोत. एवढी सुद्धा आठवण करू शकत नाही. ही आठवण पक्की झाली पाहिजे. तर मग अंत मति सो गती होईल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) पहाटे अमृतवेलेला उठून विचार करायचा आहे - बाबा आमचा पिता देखील आहे, टिचरही आहे, आता बाबा आले आहेत आमचा ज्ञान रत्नांनी शृंगार करण्यासाठी. तो पित्यांचाही पिता, पतींचाही पती आहे, असे विचार करत अपार आनंदाचा अनुभव करायचा आहे.

२) प्रत्येकाच्या पुरुषार्थाला साक्षी होऊन बघायचे आहे, उच्च पदाची मार्जिन (संधी) आहे त्यामुळे तमोप्रधानापासून सतोप्रधान बनायचे आहे.

वरदान:-
व्हाईसलेसच्या शक्तीद्वारे सूक्ष्मवतन किंवा तिन्ही लोकचा अनुभव करणारे श्रेष्ठ भाग्यवान भव ज्या मुलांकडे व्हाईस लेस ची शक्ती आहे, बुद्धियोग पूर्णपणे रिफाईन (शुद्ध) आहे - अशी भाग्यवान मुले सहजच तिन्ही लोकांची सैर करू शकतात. सूक्ष्मवतनपर्यंत आपले संकल्प पोहोचविण्यासाठी सर्व नातेसंबंधांचे सार असणारी सूक्ष्म आठवण असली पाहिजे. हीच सर्वात पॉवरफुल तार आहे, याच्यामध्ये माया इंटरफिअर (हस्तक्षेप) करू शकत नाही. तर सूक्ष्मवतनच्या सौंदर्याचा अनुभव करण्यासाठी स्वतःला व्हाईसलेसच्या शक्तीने संपन्न बनवा.

बोधवाक्य:-
कोणत्याही व्यक्ती, वस्तू आणि वैभवा प्रति आकर्षित होणे म्हणजेच कंम्पेनीयन बाबांना संकल्पाद्वारे घटस्फोट देणे आहे.


अव्यक्त इशारे - रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:- पवित्रता संगमयुगी ब्राह्मणांच्या महान जीवनाची महानता आहे. पवित्रता ब्राह्मण जीवनाचा श्रेष्ठ शृंगार आहे. जसे स्थूल शरीरामध्ये विशेष श्वास चालणे आवश्यक आहे. श्वास नाही तर जीवन नाही; तसा ब्राह्मण जीवनाचा श्वास आहे - पवित्रता. २१ जन्मांच्या प्रारब्धाचा आधार अर्थात फॉऊंडेशन पवित्रता आहे.