30-05-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्ही आता शांतीधाम, सुखधाममध्ये जाण्यासाठी ईश्वरीयधाम मध्ये बसला
आहात, हा सतचा संग आहे, जिथे तुम्ही पुरुषोत्तम बनत आहात”
प्रश्न:-
तुम्ही मुले
बाबांपेक्षाही उच्च आहात, नीच नाही; ते कसे?
उत्तर:-
बाबा म्हणतात - मुलांनो, मी विश्वाचा मालक बनत नाही, तुम्हाला विश्वाचा मालक बनवतो
तर ब्रह्मांडाचा देखील मालक बनवतो. मी उच्च ते उच्च पिता तुम्हा मुलांना नमस्ते करतो,
म्हणून तुम्ही माझ्यापेक्षाही उच्च आहात, मी तुम्हा मालकांना सलाम करतो. तुम्ही मग
असे बनविणाऱ्या बाबांना सलाम करता.
ओम शांती।
गोड-गोड रूहानी मुलांना नमस्ते. मुले रिस्पॉन्ड सुद्धा करत नाहीत की, ‘बाबा, नमस्ते’;
कारण मुले जाणतात - बाबा आम्हाला ब्रह्मांडाचा मालक देखील बनवतात आणि विश्वाचा मालक
देखील बनवतात. बाबा तर फक्त ब्रह्मांडाचे मालक बनतात, विश्वाचा मालक बनत नाहीत.
मुलांना ब्रह्मांड आणि विश्व दोन्हींचा मालक बनवतात तर सांगा मोठे कोण झाले? मुले
मोठी झाली ना म्हणून मुले मग नमस्ते करतात. बाबा, तुम्हीच आम्हाला ब्रह्मांड आणि
विश्वाचा मालक बनवता म्हणून तुम्हाला नमस्ते. मुसलमान लोक देखील ‘मालेकुम सलाम,
सलाम मालेकम्’ म्हणतात ना. तुम्हा मुलांना तो आनंद आहे. ज्यांना निश्चय आहे,
निश्चयाशिवाय तर कोणी इथे येऊ देखील शकणार नाही. इथे जे येतात ते जाणतात आपण काही
मानवी गुरुकडे (देहधारी गुरुकडे) जात नाही. देहधारी पित्याकडे, टीचरकडे किंवा
देहधारी गुरूकडे जात नाही. तुम्ही येता रुहानी पिता, रुहानी टीचर, रूहानी सद्गुरुकडे.
ते मनुष्य तर अनेक आहेत. हे एकच आहेत. हा परिचय कोणालाही नव्हता. भक्तिमार्गाच्या
शास्त्रांमध्ये देखील आहे की, रचता आणि रचनेला कोणीही जाणत नाही. न जाणल्या कारणाने,
त्यांना अनाथ म्हटले जाते. जे चांगले शिकले-सवरलेले असतात, समजू शकतात, आम्हा सर्व
आत्म्यांचा पिता एकच निराकार आहेत. ते येऊन पिता, टीचर, सद्गुरु देखील बनतात.
गीतेमध्ये श्रीकृष्णाचे नाव प्रसिद्ध आहे. गीता आहे सर्व शास्त्रमई शिरोमणी, सर्वात
उत्तम ते उत्तम. गीतेलाच मायबाप म्हटले जाते बाकीची जी काही शास्त्रे (धर्मग्रंथ)
आहेत, त्यांना मात-पिता म्हणणार नाही. श्रीमद् भगवद्गीता माता गायली जाते.
ईश्वराच्या मुख-कमला मधून निघालेल्या गीतेचे ज्ञान. सर्वोच्च बाबा आहेत तर जरूर
सर्वोच्च असणाऱ्याचीच गायलेली गीता झाली - क्रियेटर. बाकी सर्व शास्त्रे आहेत त्याची
पाने, क्रिएशन. रचनेकडून कधी वारसा मिळू शकत नाही. आणि मिळाला जरी तरी अल्पकाळाकरिता.
बाकीची इतकी असंख्य शास्त्रे आहेत, जी वाचल्याने अल्पकाळाचे सुख मिळते एका जन्मासाठी.
जी मनुष्यच मनुष्यांना शिकवतात. बाकी सर्व प्रकारचे जे काही शिक्षण आहे ते
अल्पकाळासाठी मनुष्य, मनुष्याला शिकवतात. अल्पकाळाचे सुख मिळाले मग दुसऱ्या
जन्मामध्ये दुसरे शिक्षण शिकावे लागेल. इथे तर एक निराकार बाबाच आहेत जे २१
जन्मांसाठी वारसा देतात. कोणी मनुष्य तर देऊ शकत नाही. ते तर वर्थ नॉट अ पेनी (कवडीतूल्य)
बनवतात. बाबा बनवतात पाउंड. आता बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत - तुम्ही
सर्व ईश्वराची मुले आहात ना. सर्वव्यापी म्हटल्याने काहीच अर्थ समजत नाहीत.
सर्वांमध्ये परमात्मा आहे तर मग फादरहूड (पितृभाव) होतो. फादरच फादर तर मग वारसा
कुठून मिळणार! कोणाचे दुःख कोण हरेल! बाबांनाच दुःखहर्ता, सुखकर्ता म्हटले जाते.
फादरच फादर याचा तर काही अर्थच निघत नाही. बाबा बसून समजावून सांगतात - हे आहेच
रावणराज्य. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे म्हणून चित्रांमध्ये देखील क्लियर
करून दाखवले आहे.
तुम्हा मुलांच्या
बुद्धीमध्ये आहे - आम्ही पुरुषोत्तम संगमयुगावर आहोत. बाबा पुरुषोत्तम बनविण्यासाठी
आले आहेत. जसे बॅरिस्टरी, डॉक्टरी इत्यादी शिकतात, ज्या द्वारे पद-पोझिशन मिळते.
समजतात - या अभ्यासाने मी अमका बनणार. इथे तुम्ही सतच्या संगतीमध्ये बसले आहात, ज्या
द्वारे तुम्ही सुखधाममध्ये जाता. ‘सत-धाम’ देखील दोन आहेत - एक आहे - सुखधाम, दुसरे
आहे - शांतीधाम. हे आहे ईश्वराचे धाम. बाप रचता आहेत ना. जे बाबांकडून ज्ञान समजून
घेऊन हुशार होत जातात - त्यांचे कर्तव्य आहे सेवा करणे. बाबा म्हणतील - ‘तू आता
ज्ञान समजून हुशार झाला आहेस तर शिवाच्या मंदिरामध्ये जाऊन समजावून सांग, त्यांना
विचार - या शिवलिंगावर फळ, फुल, लोणी, तूप, धोत्र्याची फुलं, गुलाबाची विविध फुले
का वाहता? कृष्णाच्या मंदिरामध्ये धोत्र्याची फुले वाहत नाहीत. तिथे खूप चांगली
सुगंधित फुले घेऊन जातात. शिवाच्या समोर धोत्र्याची फुले तशीच गुलाबाची फुले देखील
वाहतात. अर्थ मात्र कोणीही जाणत नाही. यावेळी तुम्हा मुलांना बाबा शिकवत आहेत, कोणी
मनुष्य शिकवत नाहीये. बाकी साऱ्या दुनियेमध्ये मनुष्यांना मनुष्य शिकवतात. तुम्हाला
ईश्वर शिकवतात. कुणा मनुष्याला भगवान कदापि म्हटले जात नाही. लक्ष्मी-नारायणाला
देखील भगवान म्हटले जात नाही, त्यांना देवी-देवता म्हटले जाते.
ब्रह्मा-विष्णू-शंकराला देखील देवता म्हणणार. भगवान एक बाबाच आहेत, ते आहेत सर्व
आत्म्यांचे पिता. सर्वजण म्हणतात देखील - हे परमपिता परमात्मा. त्यांचे खरे-खरे नाव
आहे - ‘शिव’ आणि तुम्ही मुले आहात - ‘शाळीग्राम’. पंडित लोक जेव्हा रुद्र यज्ञ
रचतात तर शिवाचे खूप मोठे लिंग बनवतात आणि छोटे-छोटे शाळीग्राम बनवतात. ‘शाळीग्राम’
म्हटले जाते आत्म्याला. ‘शिव’ म्हटले जाते परमात्म्याला. ते सर्वांचे पिता आहेत,
आपण सर्व आहोत भाऊ-भाऊ; म्हणतात देखील ब्रदरहूड (बंधुत्व). बाबांची मुले आपण
भाऊ-भाऊ आहोत. मग भाऊ-बहीण कसे झालो? प्रजापिता ब्रह्माच्या मुखाद्वारे प्रजा रचली
जाते. ते आहेत ब्राह्मण आणि ब्राह्मणी. आपण प्रजापिता ब्रह्माची संतान आहोत, म्हणून
बी.के. संबोधले जातो. अच्छा, ब्रह्माला कोणी जन्म दिला? भगवंताने. ब्रह्मा, विष्णू,
शंकर… ही सर्व क्रिएशन आहे. सूक्ष्मवतनची देखील रचना झाली. ब्रह्मा मुखकमला द्वारे
तुम्ही मुले जन्मता. ब्राह्मण-ब्राह्मणी म्हणून संबोधले जाता. तुम्ही ब्रह्मा
मुखवंशावळी ॲडॉप्टेड आहात. प्रजापिता ब्रह्मा इतक्या मुलांना कसे जन्म देतील,
नक्कीच ॲडॉप्ट करतील. जसे गुरुचे अनुयायी ॲडॉप्ट होतात, त्यांना म्हणणार शिष्य. तर
प्रजापिता ब्रह्मा साऱ्या दुनियेचा पिता झाला. त्यांना म्हटले जाते ग्रेट-ग्रेट
ग्रँड फादर. प्रजापिता ब्रह्मा तर इथे पाहिजे ना. सूक्ष्मवतनमध्ये देखील ब्रह्मा आहे.
नाव गायले गेले आहे ब्रह्मा, विष्णू, शंकर परंतु सूक्ष्मवतनमध्ये प्रजा तर नसते.
प्रजापिता ब्रह्मा कोण आहे, हे सर्व काही बाबा बसून समजावून सांगतात. ते (या
दुनियेतील) ब्राह्मण लोक देखील स्वतःला ब्रह्माची संतान म्हणतात. आता ब्रह्मा कुठे
आहे? तुम्ही म्हणाल - हे बसले आहेत, ते म्हणतील - होऊन गेले आहेत. ते मग स्वतःला
पुरोहित ब्राह्मण संबोधतात. आता तुम्ही तर प्रॅक्टिकलमध्ये आहात. प्रजापिता
ब्रह्माची मुले आपसामध्ये भाऊ-बहीणी झाले. ब्रह्माला ॲडॉप्ट केले आहे शिवबाबांनी.
म्हणतात मी या वृद्ध तनामध्ये प्रवेश करून तुम्हाला राजयोग शिकवतो. मनुष्याला देवता
बनविणे - हे काही मनुष्याचे काम नाहीये. बाबांनाच रचता म्हटले जाते. भारतवासी
जाणतात शिवजयंती देखील साजरी केली जाते. शिव आहेत पिता. मनुष्यांना हे देखील माहित
नाही आहे की, देवी-देवतांना हे राज्य कोणी दिले? स्वर्गाचे रचियता आहेतच परम-आत्मा,
ज्याला पतित-पावन म्हटले जाते. आत्मा मुळातच पवित्र असते, मग सतो-रजो-तमोमध्ये येते.
यावेळी कलियुगामध्ये सर्व आहेत तमोप्रधान, सतयुगामध्ये सतोप्रधान होते. आजपासून ५
हजार वर्षांपूर्वी या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. २५०० वर्षे देवतांची डिनायस्टी
चालली (घराणे चालले). त्यांच्या मुलांनी देखील राज्य केले ना. लक्ष्मी-नारायण पहिला,
दुसरा, असे चालत येते. मनुष्यांना या गोष्टीं बद्दल काहीच माहित नाही आहे. यावेळी
सर्व आहेत तमोप्रधान, पतित. इथे एकही मनुष्य पावन असूच शकत नाही. सर्वजण पुकारतात -
हे पतित-पावन या. तर पतित दुनिया झाली ना. यालाच कलियुग नरक म्हटले जाते. नवीन
दुनियेला स्वर्ग, पावन दुनिया म्हटले जाते. मग पतित कसे बनले, हे कोणीही जाणत नाही.
भारतामध्ये असा एकही मनुष्य नाही जो आपल्या ८४ जन्मांना जाणत असेल. मनुष्य
जास्तीत-जास्त ८४ जन्म घेतात, कमीत-कमी एक जन्म.
भारताला अविनाशी खंड
मानले गेले आहे कारण इथेच शिवबाबांचे अवतरण होते. भारत खंड कधी विनाश होऊ शकत नाही.
बाकी इतर जे अनेक खंड आहेत ते सर्व विनाश होतील. यावेळी आदि सनातन देवी-देवता धर्म
प्राय: लोप झाला आहे. कोणीही आपल्याला देवता म्हणत नाही कारण देवता सतोप्रधान पावन
होते. आता तर सर्वजण पतित पुजारी बनले आहेत. हे देखील बाबा बसून समजावून सांगतात,
भगवानुवाच आहे ना. ईश्वर सर्वांचा पिता आहे, ते एकदाच भारतामध्ये येतात. केव्हा
येतात? पुरुषोत्तम संगमयुगावर. या संगमयुगालाच पुरुषोत्तम म्हटले जाते. हे संगमयुग
आहे कलियुगापासून सतयुग, पतितापासून पावन बनण्याचे युग. कलियुगामध्ये राहतात पतित
मनुष्य, सतयुगामध्ये आहेत पावन देवता याला पुरुषोत्तम संगमयुग म्हटले जाते, जेव्हा
बाबा येऊन पतिता पासून पावन बनवतात. तुम्ही आलाच आहात मनुष्यापासून देवता
पुरुषोत्तम बनण्यासाठी. मनुष्य तर हे देखील जाणत नाहीत की आम्ही आत्मे
निर्वाणधाममध्ये राहतो. तिथून येतो पार्ट बजावण्यासाठी. या अमर्याद नाटकाचा कालावधी
५ हजार वर्षांचा आहे. आम्ही या बेहदच्या नाटकामध्ये पार्ट बजावतो. इतके सर्व मनुष्य
पार्टधारी आहेत. हे ड्रामाचे चक्र निरंतर फिरत राहते. ते कधीही थांबणार नाही. या
नाटकामध्ये सर्वप्रथम सतयुगामध्ये पार्ट बजावण्यासाठी येतात - देवी-देवता. मग
त्रेतामध्ये क्षत्रिय येतात. या नाटकाला देखिल जाणून घेतले पाहिजे ना. हे आहेच
काट्यांचे जंगल. सर्व मनुष्य दुःखी आहेत. कलियुगानंतर मग सतयुग येते. कलियुगामध्ये
भरमसाठ मनुष्य आहेत, सतयुगामध्ये किती असतील? अगदी थोडे. आदि सनातन सूर्यवंशी
देवी-देवताच असतील. ही जुनी दुनिया आता बदलणार आहे. मनुष्य सृष्टी पासून मग देवतांची
सृष्टी होईल. आदि सनातन देवी-देवता धर्म होता. परंतु आता स्वतःला देवता म्हणत नाहीत.
आपल्या धर्मालाच विसरले आहेत. हे फक्त भारतवासीच आहेत जे आपल्या धर्माला विसरले
आहेत, हिंदुस्तानमध्ये राहिल्या कारणाने हिंदू धर्म म्हणतात. देवता तर पावन होते,
हे आहेत पतित म्हणून स्वतःला देवता म्हणू शकत नाहीत. देवतांची पूजा करत राहतात.
स्वतःला पापी, नीच म्हणतात. आता बाबा समजावून सांगतात तुम्हीच पूज्य होता मग
तुम्हीच पुजारी पतित बनला आहात. हम सो चा अर्थ देखिल समजावून सांगितला आहे. ते
म्हणतात आत्मा सो परमात्मा. हा आहे खोटा अर्थ, ‘झूठी काया, झूठी माया…’ सतयुगामध्ये
असे म्हणणार नाही. सचखंडाची स्थापना बाबा करतात, झूठ खंड मग रावण बनवतो. हे देखील
बाबा येऊन समजावून सांगतात - आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे. हे देखील कुणी जाणत
नाही. बाबा म्हणतात - तुम्ही आत्मा बिंदू आहात, तुमच्यामध्ये ८४ जन्मांचा पार्ट
नोंदलेला आहे. आपण आत्मा कशी आहोत - हे कोणीही जाणत नाहीत. आपण बॅरिस्टर आहोत, अमुक
आहोत - हे जाणतात, बाकी आत्म्याला एकही जाणत नाही. बाबाच येऊन ओळख देतात. तुमच्या
आत्म्यामध्ये ८४ जन्मांचा पार्ट अविनाशी नोंदलेला आहे, जो कधी विनाश होऊ शकत नाही.
हाच भारत गार्डन ऑफ फ्लॉवर (फुलांचा बगीचा) होता. सुखच सुख होते, आता दुःखच दुःख आहे.
हे नॉलेज बाबा देतात.
तुम्ही मुले
बाबांद्वारे नवीन-नवीन गोष्टी ऐकता. सर्वात नवीन गोष्ट आहे - तुम्हाला मनुष्यापासून
देवता बनायचे आहे. तुम्ही जाणता मनुष्यापासून देवता बनवण्याचे शिक्षण काही कोणी
मनुष्य शिकवत नाही, ईश्वर शिकवतात. त्या ईश्वराला सर्वव्यापी म्हणणे हे तर शिवी देणे
आहे. आता बाबा समजावून सांगतात - मी दर ५ हजार वर्षांनी येऊन भारताला स्वर्ग बनवतो.
रावण नरक बनवतो. या गोष्टी दुनियेमध्ये इतर कोणीही जाणत नाही. बाबाच येऊन तुम्हाला
मनुष्यापासून देवता बनवतात. गायन देखील आहे - ‘मूत पलीती कपड़ धोए…’ तिथे विकार असत
नाही. ती आहे संपूर्ण निर्विकारी दुनिया. आता आहे विशश वर्ल्ड (विकारी दुनिया).
बोलावतात देखील - पतित-पावन या. आम्हाला रावणाने पतित बनवले आहे परंतु हे जाणत
नाहीत की रावण केव्हा आला, काय झाले! रावणाने किती गरीब बनवले आहे. भारत ५ हजार
वर्षांपूर्वी किती श्रीमंत होता. सोने, हिरे-माणकांचे महाल होते. किती धन होते. आता
काय हालत झाली आहे! तर बाबांशिवाय सिरताज (मुकुटधारी) कोणीही बनवू शकत नाही. आता
तुम्ही म्हणता - शिवबाबा भारताला स्वर्ग बनवतात. आता बाबा म्हणतात - मृत्यू समोर उभा
आहे. तुम्ही वानप्रस्थी आहात. आता परत जायचे आहे त्यामुळे स्वतःला आत्मा समजा,
मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर पापे भस्म होतील. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आपण
ब्रह्मामुखवंशावळी ब्राह्मण आहोत, स्वयं भगवान आम्हाला मनुष्यापासून देवता बनवण्याचे
शिक्षण देत आहेत, या नशेमध्ये आणि आनंदामध्ये रहायचे आहे. पुरुषोत्तम संगमयुगावर
पुरुषोत्तम बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.
२) आता आपली
वानप्रस्थ अवस्था आहे, मृत्यू समोर उभा आहे, घरी परत जायचे आहे… म्हणून बाबांच्या
आठवणीने सर्व पापांना भस्म करायचे आहे.
वरदान:-
नॉलेज रुपी
चावीद्वारे भाग्याचा अखूट खजिना प्राप्त करणारे मालामाल भव
संगमयुगावर सर्व
मुलांचे भाग्य बनविण्यासाठी नॉलेज रुपी चावी मिळते. ही चावी लावा आणि जितका हवा
तितका भाग्याचा खजिना घ्या. चावी मिळाली आणि श्रीमंत बनलो. जो जितका मालामाल बनतो
तितका स्वतः आनंदी होतो. असे अनुभव होते जणूकाही आनंदाचा झरा अखंड अविनाशी वाहतच आहे.
ते सर्व खजिन्यांनी भरपूर मालामाल दिसून येतात. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची
अप्राप्ती रहात नाही.
बोधवाक्य:-
बाबांशी नीट
कनेक्शन ठेवा म्हणजे सर्व शक्तींचा करंट येत राहील.
अव्यक्त इशारे -
रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:-
जितकी पवित्रता आहे
तितकी ब्राह्मण जीवनाची पर्सनॅलिटी आहे, जर पवित्रता कमी तर पर्सनॅलिटी कमी. ही
प्युरिटीची पर्सनॅलिटी सेवेमध्ये देखील सहज सफलता मिळवून देते. परंतु जर एक विकार
देखील अंश मात्र असेल तर त्याचे बाकीचे साथीदार सुद्धा त्याच्यासोबत जरूर असतील. जसे
पवित्रतेचा सुख-शांतीशी गहिरा संबंध आहे, तसा अपवित्रतेचा देखील पाच विकारांशी गहिरा
संबंध आहे म्हणून कोणत्याही विकाराचा अंश मात्र राहू नये तेव्हा म्हणणार
पवित्रतेच्या पर्सनॅलिटीद्वारे सेवा करणारे.