31-05-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - जो पर्यंत जगायचे आहे तो पर्यंत शिकत रहायचे आहे आणि शिकवत रहायचे आहे,
आनंदाचा आणि पदाचा आधार आहे - अभ्यास”
प्रश्न:-
सेवेच्या
सफलतेसाठी कोणता मुख्य गुण हवा?
उत्तर:-
सहनशीलतेचा. प्रत्येक गोष्टीमध्ये सहनशील बनून आपसात संघटन तयार करून सेवा करा.
भाषण इत्यादीचे प्रोग्राम घेऊन जा. मनुष्यांना झोपेतून जागे करण्यासाठी अनेक प्रबंध
केले जातील. जे नशीबवान बनणारे आहेत ते अभ्यास देखील आवडीने करतील.
गीत:-
हमें उन राहों
पर चलना है…
ओम शांती।
कोणता विचार करून तुम्ही मुले इथे मधुबनमध्ये येता! कोणते शिक्षण घेण्यासाठी येता?
कोणाकडे येता? (बापदादांकडे येतो) ही आहे नवीन गोष्ट. असेही कधी ऐकले आहे का की
बापदादांकडे शिकण्याकरिता जातो, ते देखील बापदादा दोघेही एकत्र आहेत. आश्चर्य आहे
ना. तुम्ही वंडरफुल बाबांची संतान आहात. तुम्ही मुले देखील ना रचताला जाणत होता, ना
रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणत होता. आता त्या रचता आणि रचनेला तुम्ही नंबरवार
पुरुषार्थानुसार जाणले आहे. जितके ज्ञान जाणले आहे आणि जितके ज्यांना समजावून सांगता
तितका आनंद आणि भविष्याचे पद असेल. मुख्य गोष्ट आहे आता आपण रचता आणि रचनेच्या
आदि-मध्य-अंताला जाणतो. फक्त आपण ब्राह्मण-ब्राह्मणीच जाणतो. जोपर्यंत जगायचे आहे,
स्वतःसाठी निश्चय करायचा आहे की, आम्ही बी.के. आहोत आणि शिवबाबांकडून साऱ्या
विश्वाचा वारसा घेत आहोत. पूर्णपणे शिकतो की कमी शिकतो, ती गोष्ट वेगळी आहे, तरीही
जाणत तर आहात ना. आम्ही त्यांची मुले आहोत, मग प्रश्न उभा राहतो शिकण्याचा अथवा न
शिकण्याचा. त्यानुसारच पद मिळेल. गोदीमध्ये आला निश्चय तर असेल आपण राजाईचे अधिकारी
बनणार. मग अभ्यासामध्ये देखील रात्रं-दिवसाचा फरक पडतो. काहीजण तर चांगल्या रीतीने
शिकतात आणि शिकवतात दुसरे काही सुचतच नाही. बस शिकायचे आहे आणि शिकवायचे आहे, हे
शेवटपर्यंत चालणार आहे. स्टुडंट लाईफमध्ये काही शेवटपर्यंत अभ्यास चालू राहत नाही.
ठरलेला वेळ असतो. तुम्हाला तर जोपर्यंत जगायचे आहे तोपर्यंत शिकायचे आहे आणि
शिकवायचे आहे. स्वतःला विचारायचे आहे किती जणांना रचयिता बाबांचा परिचय देतो?
मनुष्य तर मनुष्यच आहेत. दिसण्यामध्ये काही फरक पडत नाही. शरीरामध्ये फरक नाही. आत
बुद्धीमध्ये हा अभ्यास घुमत राहतो. जितके जो शिकेल तितका त्याला आनंद देखील होईल.
आतून हे वाटते की, मी नवीन विश्वाचा मालक बनणार. आता आम्ही स्वर्गाच्या द्वारी जातो.
कायम आपल्या मनाला विचारत रहा, माझ्यामध्ये किती फरक पडला आहे? बाबांनी आम्हाला आपले
बनवले आहे, आम्ही कशापासून काय बनतो. अभ्यासावरच अवलंबून आहे. त्या (लौकिक)
शिक्षणाने मनुष्य किती उच्च बनतात. ती तर सर्व अल्पकाळाची क्षणभंगुर पदे आहेत.
त्यामध्ये काहीच ठेवलेले नाही. जशी की काहीच कामाची नाहीत. लक्षणे काहीच नव्हती. आता
या शिक्षणाने किती श्रेष्ठ बनतो. सर्व अटेंशन अभ्यासावर द्यायचे आहे. ज्याच्या
नशिबात आहे त्यांचे मन अभ्यासामध्ये लागते. इतरांना देखील अभ्यासासाठी विविध प्रकारे
पुरुषार्थ करवून घेत राहतात. मन होते त्यांना शिकवून वैकुंठाचा मालक बनवावे.
मनुष्यांना झोपेतून जागे करण्यासाठी किती डोकेफोड करत राहतात आणि करत राहतील. ही
प्रदर्शनी इत्यादी तर काहीच नाही, पुढे जाऊन समजावून सांगण्याचे अजून प्रबंध निघतील.
आता बाबा पावन बनवत आहेत तर बाबांच्या शिकवणीवर लक्ष दिले पाहिजे. प्रत्येक
गोष्टीमध्ये सहनशील देखील असायला हवे. आपसात संघटन करून भाषण इत्यादींचे प्रोग्राम
ठेवले पाहिजेत. एका अल्फवर देखील आपण खूप चांगल्या रीतीने समजावून सांगू शकतो. उच्च
ते उच्च भगवान कोण? एका अल्फवर तुम्ही दोन तास भाषण करू शकता. हे देखील तुम्ही जाणता
अल्फची आठवण केल्याने आनंद मिळतो. जर मुलांचे आठवणीच्या यात्रेवर अटेंशन कमी आहे,
अल्फची आठवण करत नाहीत तर जरूर नुकसान होते. सर्व काही आठवणीवर अवलंबून आहे. आठवण
केल्याने एकदम हेवनमध्ये निघून जातो. आठवण विसरल्यानेच कोसळतो. या गोष्टींना इतर
कोणीही समजू शकत नाही. शिवबाबांना तर जाणतच नाहीत. भले कितीही कोणी खूप दिमाखात पूजा
करतात, आठवण करतात तरी देखील समजत नाहीत.
तुम्हाला बाबांकडून
खूप मोठी प्रॉपर्टी मिळते. भक्तिमार्गामध्ये कृष्णाचा साक्षात्कार करण्यासाठी किती
आटापिटा करतात, ठीक आहे, दर्शन झाले मग पुढे काय? फायदा तर काहीच झाला नाही. दुनिया
बघा कोणत्या गोष्टींवर चालत आहे. तुम्ही जसे की उसाचा रस साखर पिता, बाकी सर्व
मनुष्य साल चोखतात. तुम्ही आता साखर पिऊन पूर्ण पोट भरून अर्धा कल्प सुख प्राप्त
करता, बाकी सर्व भक्तिमार्गाची साले चोखत खाली घसरत येतात. आता बाबा किती प्रेमाने
पुरुषार्थ करवून घेतात. परंतु नशिबातच नाही त्यामुळे लक्ष देत नाहीत. ना स्वतः
अटेन्शन देत, ना इतरांना देऊ देत. ना स्वतः अमृत पित, ना दुसऱ्यांना पिऊ देत.
बऱ्याच जणांची अशी कामे चालतात. जर पूर्णतः अभ्यास करत नाहीत, दयाळू बनत नाहीत,
कोणाचे कल्याण करत नाहीत तर ते काय पद प्राप्त करतील! शिकणारे आणि शिकविणारे किती
उच्च पद प्राप्त करतात. अभ्यासच करत नाहीत तर काय पद असेल - ते देखील पुढे जाऊन
रिझल्ट माहित होईल. मग समजतील - बरोबर, बाबा आम्हाला किती वॉर्निंग देत होते. इथे
बसला आहात, बुद्धीमध्ये राहिले पाहिजे की, आपण बेहदच्या बाबांजवळ बसलो आहोत. ते
आम्हाला कल्पापूर्वीप्रमाणे वरून येऊन (परमधामवरून येऊन) या शरीराद्वारे शिकवतात.
आता आम्ही पुन्हा बाबांच्या समोर बसलो आहोत. त्यांच्यासोबतच आम्हाला जायचे आहे.
सोडून जायचे नाही आहे. बाबा आपल्याला सोबत घेऊन जातील. ही जुनी दुनिया विनाश होईल.
या गोष्टी इतर कोणीही जाणत नाहीत. पुढे जाऊन समजतील, बरोबर जुनी दुनिया नष्ट होणार
आहे. काहीच मिळू शकणार नाही. या गोष्टी इतर कोणीही जाणत नाहीत. टू लेट होतील. हिशोब
चुकता करून सर्वांना परत जायचे आहे. हे देखील जी हुशार मुले आहेत तीच जाणतात. मुले
ती जी सेवेवर उपस्थित आहेत. माता-पित्याला फॉलो करतात. जसे बाबा रूहानी सेवा करतात
तशी तुम्हाला करायची आहे. बरीच मुले आहेत ज्यांना हा ध्यास लागून राहतो, ज्यांची
बाबा महिमा करतात, त्यांच्यासारखे बनायचे आहे. टीचर तर सर्वांनाच मिळत आहे. इथे
देखील सर्व येतात. इथे तर मोठा टीचर बसला आहे. बाबांची आठवणच करत नाहीत मग सुधारणार
तरी कसे. नॉलेज तर खूप सोपे आहे. ८४ जन्मांचे चक्र किती सोपे आहे. परंतु किती
डोकेफोड करावी लागते. बाबा किती सोपी गोष्ट समजावून सांगतात. बाबांची आणि ८४ च्या
चक्राची आठवण करा तर बेडा पार होईल (जीवन रुपी नाव पार होईल). हा मेसेज सर्वांना
द्यायचा आहे. आपल्या मनाला विचारा की, मी कितपत मेसेंजर बनलो आहे? जितके अनेकांना
जागे कराल (ज्ञान द्याल) तितके बक्षीस मिळेल, जर जागे करत नसेन तर जरूर कुठेतरी
झोपलेलो आहे तर मग मला इतके उच्च पद काही मिळणार नाही. बाबा दररोज सांगतात
संध्याकाळी आपला पूर्ण दिवसभराचा पोतामेल (हिशोब) काढा. सेवेमध्ये देखील रहायचे आहे.
मूळ गोष्ट आहे बाबांचा परिचय देणे. बाबांनीच भारताला स्वर्ग बनवले होते. आता नरक आहे
मग स्वर्ग होईल. चक्र तर फिरणार आहे. तमोप्रधानापासून सतोप्रधान बनायचे आहे. बाबांची
आठवण करा तर विकार निघून जातील. सतयुगामध्ये फार थोडे असतात. मग रावण राज्यामध्ये
किती वृद्धी होते. सतयुगामध्ये ९ लाख मग हळूहळू वृद्धि होत जाईल. जे आधी पावन होते
तेच मग पतित बनतात. सतयुगामध्ये देवतांचा पवित्र प्रवृत्ती मार्ग होता. तेच मग
अपवित्र प्रवृत्तीवाले बनले आहेत. ड्रामा अनुसार हे चक्र फिरणारच आहे. आता पुन्हा
तुम्ही पवित्र प्रवृत्ती मार्गाचे बनत आहात. बाबाच येऊन पवित्र बनवतात. म्हणतात -
‘माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील’. तुम्ही अर्धाकल्प पवित्र होता मग रावण
राज्यामध्ये तुम्ही पतित बनला आहात. हे देखील तुम्ही आता समजता. आम्ही देखील अगदीच
वर्थ नॉट अ पेनी होतो. आता किती नॉलेज मिळाले आहे. ज्याद्वारे आम्ही कशापासून काय
बनतो! बाकी जे काही इतके धर्म आहेत, हे नष्ट होणार आहेत. सर्व असे मरतील जसे पशु
मरतात. जसे बर्फ पडतो तर किती पशु-पक्षी इत्यादी मरून पडतात. नैसर्गिक आपत्ती देखील
येतील. हे सर्व नष्ट होईल. हे सर्व मरून पडले आहेत. या डोळ्यांनी जे तुम्ही बघता ते
मग असणार नाही. नवीन दुनियेमध्ये अगदीच थोडे असतील. हे ज्ञान तुमच्या बुद्धीमध्ये
आहे, ज्ञानाचा सागर बाबाच तुम्हाला ज्ञानाचा वारसा देत आहे. तुम्ही जाणता साऱ्या
दुनियेमध्ये कचराच कचरा आहे. आपणही कचऱ्यात लोळत पडलो होतो. बाबा कचऱ्यातून काढून
आता किती गुल-गुल (फूल) बनवत आहेत. आम्ही हे शरीर सोडू, आत्मा पवित्र होईल.
बाबा सर्वांना एकसारखे
शिक्षण शिकवतात परंतु कितीतरीजणांची बुद्धी बिलकुल जड आहे, काहीच समजू शकत नाहीत.
हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. बाबा म्हणतात - यांच्या भाग्यामध्ये नाहीये तर
मी तरी काय करू शकतो. मी तर सर्वांना एकसारखे शिकवतो. शिकतात नंबरवार. कोणी
व्यवस्थित समजून घेतात आणि समजावून सांगतात, इतरांचे देखील जीवन हिऱ्यासारखे बनवतात.
कोणी तर बनवतच नाहीत. उलटा अहंकार किती आहे. जशी वैज्ञानिकांना आपल्या बुद्धीची किती
घमेंड आहे, दूर-दूर आकाशाला, समुद्राला पाहू इच्छितात. बाबा म्हणतात - याने काहीच
फायदा होत नाही. फुकट विज्ञान घमेंडी आपले डोके खराब करून घेत आहेत. मोठे-मोठे पगार
त्यांना मिळतात, सर्व वाया घालवत राहतात. असे नाही कि सोन्याची द्वारका काही खालून
वर येईल. हे तर ड्रामाचे चक्र आहे जे फिरत राहते. मग आपण आपल्या वेळेला नवीन
दुनियेमध्ये जाऊन आपले महाल बनवणार. कोणाला आश्चर्य वाटते, अशीच घरे पुन्हा बनणार
काय! जरूर, बाबा दाखवतात की, तुम्ही पुन्हा असेच सोन्याचे महाल बनवणार. तिथे तर सोने
भरपूर असते. आजही काही-काही भागात खूप सोन्याचे डोंगर आहेत परंतु सोने काढू शकत
नाहीत. नवीन दुनियेमध्ये तर सोन्याच्या अथाह खाणी होत्या, त्या आता नष्ट झाल्या
आहेत. आता हिऱ्याची किंमत सुद्धा बघा किती आहे. आज इतकी किंमत आहे, उद्या दगडांसारखी
होईल. बाबा तुम्हा मुलांना खूप वंडरफूल गोष्टी ऐकवतात आणि साक्षात्कार देखील घडवतात.
तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आता हेच राहिले पाहिजे - आम्हा आत्म्यांना आपले घर
सोडून आता ५००० वर्षे झाली आहेत ज्याला मुक्ती-धाम म्हणतात. भक्तीमार्गामध्ये
मुक्तीसाठी किती डोकेफोड करतात परंतु आता तुम्ही समजता बाबांव्यतिरिक्त कोणीही
मुक्ती देऊ शकत नाहीत. सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत. आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये
नवीन दुनिया आहे, जाणता हे चक्र फिरणार आहे, तुम्हाला बाकी कोणत्याही गोष्टींमध्ये
जायचे नाहीये. फक्त बाबांची आठवण करायची आहे, सर्वांना हेच सांगत रहा - बाबांची
आठवण करा तर विकर्म विनाश होतील. बाबांनी तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवले होते ना.
तुम्ही माझी शिवजयंती सुद्धा साजरी करता. किती वर्षे झाली? ५ हजार वर्षांची गोष्ट
आहे. तुम्ही स्वर्गवासी बनला होता मग ८४ चे चक्र फिरला आहात. हा देखील ड्रामा पूर्व
नियोजित आहे. येऊन तुम्हाला या सृष्टीचक्राविषयी समजावून सांगतो. आता तुम्हा मुलांना
खूप चांगल्या प्रकाराने स्मृती आली आहे. आपण सर्वात श्रेष्ठ पार्टधारी आहोत. आपला
पार्ट बाबांसोबत आहे, आपण बाबांच्या श्रीमतावर बाबांच्या आठवणीमध्ये राहून इतरांना
देखील आप समान बनवतो. जे कल्पापूर्वी होते तेच बनतील. साक्षी होऊन पहात रहाल आणि
पुरुषार्थ देखील करवून घेत रहाल. सदैव उत्साहामध्ये राहण्यासाठी रोज एकांतामध्ये
बसून आपल्या सोबत गोष्टी करा. बाकी या अशांत दुनियेमध्ये फार थोडा वेळ शिल्लक आहे,
नंतर मग अशांतीचे नाव सुद्धा राहणार नाही. कोणी मुखावाटे असे म्हणू शकत नाही की,
मनाची शांती कशी मिळेल. शांतीसाठी तर जातात परंतु शांतीचा सागर तर एक बाबाच आहेत,
दुसऱ्या कोणाकडे ही वस्तु नाहीये. तसे तर तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये हे घुमत
राहिले पाहिजे की, रचता आणि रचनेला जाणणे - हे आहे ज्ञान. ते शांतीसाठी, ते सुखासाठी.
सुख मिळते धनाने. धन नसेल तर मनुष्य काही कामाचा नाही. धनासाठी लोक किती पाप करतात.
बाबांनी अथाह धन दिले आहे. स्वर्ग सोन्याचा, नरक दगडांचा. अच्छा !
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) वेळ काढून
एकांतामध्ये आपणच आपल्याशी गोष्टी करून स्वतःला उत्साहामध्ये आणायचे आहे. आप समान
बनविण्याच्या सेवेसोबतच साक्षी होऊन प्रत्येकाच्या पार्टला बघण्याचा अभ्यास करायचा
आहे.
२) बाबांची आठवण करून
आपणच आपल्याला सुधारायचे आहे. आपल्या मनाला विचारायचे आहे - ‘मी मेसेंजर बनलो आहे,
किती जणांना आप समान बनवतो?’
वरदान:-
श्रेष्ठ
पुरुषार्थाद्वारे फायनल रिझल्टमध्ये पहिला नंबर घेणारे उडता पक्षी भव
फायनल रिझल्टमध्ये
पहिला नंबर घेण्याकरिता:- १) हृदयापासूनच्या अविनाशी वैराग्याद्वारे होऊन गेलेल्या
गोष्टींना, संस्कार रुपी बिजाला जाळून टाका. २) अमृतवेलेपासून रात्रीपर्यंत ईश्वरीय
नियमांचे आणि मर्यादांचे सदैव पालन करण्याचे व्रत घ्या. ३) मनसाद्वारे, वाणी द्वारे,
किंवा संबंध-संपर्काद्वारे निरंतर महादानी बनून, पुण्य आत्मा बनून दान पुण्य करत रहा.
जेव्हा असा श्रेष्ठ हाय जंप घेणारा पुरुषार्थ होईल तेव्हा उडता पक्षी बनून फायनल
रिझल्टमध्ये नंबर वन बनू शकाल.
बोधवाक्य:-
वृत्तीद्वारे
वायुमंडळाला पॉवरफुल बनविणे हाच अखेरचा पुरुषार्थ आणि सेवा आहे.
अव्यक्त इशारे -
रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:-
विशेष आत्म्यांना
किंवा महान आत्म्यांना देशाचे किंवा विश्वाचे व्यक्तिमत्व म्हटले जाते. पवित्रतेची
पर्सनॅलिटी अर्थात प्रत्येक कर्मामध्ये महानता आणि विशेषता. पर्सनॅलिटीवाले आत्मे
आपली शक्ती, समय, संकल्प वाया घालवत नाहीत, सफल करतात. असे पर्सनॅलिटीवाले कधीही
छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आपल्या मन-बुद्धीला बिझी ठेवत नाहीत.